शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
4
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
5
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
6
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
7
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
8
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
9
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
10
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
11
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
13
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
14
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
15
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
16
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
17
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
18
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
19
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
20
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स

वनक्षेत्रपालाच्या बचावासाठीच दस्तान डेपो छापा प्रकरणात हस्तक्षेप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2018 01:52 IST

शहरातील एका दास्तान डेपोवर विनापरवाना लाकडाचा अवैध साठा सापडला असून एवढा मोठा साठा मिळाला असतानाही फक्त एका वनपालाला यात दोषी धरून त्यांना निलंबित करण्यात आले आहे.

- वसंत भोईरवाडा -  शहरातील एका दास्तान डेपोवर विनापरवाना लाकडाचा अवैध साठा सापडला असून एवढा मोठा साठा मिळाला असतानाही फक्त एका वनपालाला यात दोषी धरून त्यांना निलंबित करण्यात आले आहे. मात्र वनक्षेत्रपाल हेही त्यास तेवढेच जबाबदार असतानाही त्यांना वाचवण्यासाठी वरिष्ठांची चालढकल सुरू आहे. या कारवाईबाबत वन विभागाच्या दक्षता पथकानेच आक्षेप नोंदवून कारवाईच्या सूचना केल्या असतानाही कारवाई होत नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.वाडा मनोर या महामार्गावरील ठाणगेपाडा येथे असलेल्या एका दास्तान डेपोवर विनापरवाना लाकूडसाठा असल्याची खबर दक्षता पथकाला मिळाली. त्यानंतर त्यांनी ११ जुलै २०१८ रोजी सायंकाळी डेपोवर धाड टाकली. या धाडीत लाकडाचा साठा जास्त असल्याचे निदर्शनास आल्याने त्यांनी स्थानिक वनक्षेत्रपाल एच. व्ही. सापळे यांना कारवाई करण्याची सूचना केली. त्यानंतर तब्बल नऊ दिवसांनी सापळे यांनी तो दास्तान डेपो सील करून २० जुलै २०१८ पासून कारवाई करण्यास सुरु वात केली. या कारवाईला विलंब झाल्याने सापळे यांच्याबाबत संशय व्यक्त केला असून विभागीय दक्षता पथकाचे विभागीय अधिकारी संतोष सस्ते यांनी जव्हारच्या उपवनसंरक्षकांना ३० जुलै रोजी पत्र काढून वनक्षेत्रपालाविरोधात आक्षेप नोंदवले आहे व कारवाई करण्याची सुचना केली आहे.वनक्षेत्रपाल एच. व्ही. सापळे यांना ११ जुलै रोजी डेपोची तपासणी करून अनियमितता असल्यास कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. मात्र, ही कारवाई २० जुलै रोजी केली आहे. प्रकरणी गांभीर्य लक्षात घेऊन वनक्षेत्रपाल यांनी तत्काळ कार्यवाही करणे अपेक्षित होते. पंरतु गुन्हा दाखल करण्यास विलंब झाल्याचा आक्षेप पत्रात नोंदवला आहे. स्थळ पंचनाम्यानुसार वन उपजाचे मोजमाप केले असता जागेवर जवळपास १०१५ घनमीटर इतका अवैध वनउपजाचा साठा आढळून आला आहे. हा दास्तान डेपो वनपरिक्षेत्र अधिकारी वाडा यांचे कार्यालयापासून काही अंतरावर आहे.डेपोवरील आवक जावक रजिस्टरची तपासणी केली असता एकदाही वनक्षेत्रपाल यांनी तपासणी केल्याची नोंद नाही. एवढ्या मोठ्या प्रमाणात अवैध वनोपजाची वाहतूक होऊन डेपोवर साठा होत असताना वनक्षेत्रपाल यांनी दुर्लक्ष केल्याचे दिसते. यावरून कर्तव्यात टाळाटाळ केल्याचे सिध्द होत असल्याचा आक्षेप पत्रात नोंदवण्यात आला आहे.लाकडे कोणत्या जंगल अथवा मालकी क्षेत्रातील हे गुढच'वनगुन्हा दाखल होऊनही विनापरवाना माल कोणत्या जंगलातून अथवा मालकीतून आला याची चौकशी झालेली नसून ठोस कारवाई करण्याबाबत वनक्षेत्रपाल टाळाटाळ करीत असल्याचा आक्षेप दक्षता पथकाचे विभागीय वनअधिकारी संतोष सस्ते यांनी उपवनसंरक्षक जव्हार यांना पाठवलेल्या पत्रात केला आहे. वनक्षेत्रपाल यांचेवर वनसंरक्षणात्मक कामात हलगर्जीपणा केल्याचा आक्षेप पत्रात नोंदवले आहेत.दरम्यान, वनक्षेत्रपालावर कारवाई करण्यात वरिष्ठ अधिकाऱ्याकडून टाळाटाळ केली जात असल्याचे दिसून येत आहे. ही कारवाईच संशयास्पद असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. तालुक्या बाहेरील वनअधिकाºयाकडे या गुन्ह्याचा तपास देण्यात यावा अशी मागणीही वक्षप्रेमी करीत आहेत.

टॅग्स :Vasai Virarवसई विरारnewsबातम्या