शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
4
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
5
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
6
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
7
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
8
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
9
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
10
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
11
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
12
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
13
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
14
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
15
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
16
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
17
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
18
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
19
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
20
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त

वनक्षेत्रपालाच्या बचावासाठीच दस्तान डेपो छापा प्रकरणात हस्तक्षेप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2018 01:52 IST

शहरातील एका दास्तान डेपोवर विनापरवाना लाकडाचा अवैध साठा सापडला असून एवढा मोठा साठा मिळाला असतानाही फक्त एका वनपालाला यात दोषी धरून त्यांना निलंबित करण्यात आले आहे.

- वसंत भोईरवाडा -  शहरातील एका दास्तान डेपोवर विनापरवाना लाकडाचा अवैध साठा सापडला असून एवढा मोठा साठा मिळाला असतानाही फक्त एका वनपालाला यात दोषी धरून त्यांना निलंबित करण्यात आले आहे. मात्र वनक्षेत्रपाल हेही त्यास तेवढेच जबाबदार असतानाही त्यांना वाचवण्यासाठी वरिष्ठांची चालढकल सुरू आहे. या कारवाईबाबत वन विभागाच्या दक्षता पथकानेच आक्षेप नोंदवून कारवाईच्या सूचना केल्या असतानाही कारवाई होत नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.वाडा मनोर या महामार्गावरील ठाणगेपाडा येथे असलेल्या एका दास्तान डेपोवर विनापरवाना लाकूडसाठा असल्याची खबर दक्षता पथकाला मिळाली. त्यानंतर त्यांनी ११ जुलै २०१८ रोजी सायंकाळी डेपोवर धाड टाकली. या धाडीत लाकडाचा साठा जास्त असल्याचे निदर्शनास आल्याने त्यांनी स्थानिक वनक्षेत्रपाल एच. व्ही. सापळे यांना कारवाई करण्याची सूचना केली. त्यानंतर तब्बल नऊ दिवसांनी सापळे यांनी तो दास्तान डेपो सील करून २० जुलै २०१८ पासून कारवाई करण्यास सुरु वात केली. या कारवाईला विलंब झाल्याने सापळे यांच्याबाबत संशय व्यक्त केला असून विभागीय दक्षता पथकाचे विभागीय अधिकारी संतोष सस्ते यांनी जव्हारच्या उपवनसंरक्षकांना ३० जुलै रोजी पत्र काढून वनक्षेत्रपालाविरोधात आक्षेप नोंदवले आहे व कारवाई करण्याची सुचना केली आहे.वनक्षेत्रपाल एच. व्ही. सापळे यांना ११ जुलै रोजी डेपोची तपासणी करून अनियमितता असल्यास कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. मात्र, ही कारवाई २० जुलै रोजी केली आहे. प्रकरणी गांभीर्य लक्षात घेऊन वनक्षेत्रपाल यांनी तत्काळ कार्यवाही करणे अपेक्षित होते. पंरतु गुन्हा दाखल करण्यास विलंब झाल्याचा आक्षेप पत्रात नोंदवला आहे. स्थळ पंचनाम्यानुसार वन उपजाचे मोजमाप केले असता जागेवर जवळपास १०१५ घनमीटर इतका अवैध वनउपजाचा साठा आढळून आला आहे. हा दास्तान डेपो वनपरिक्षेत्र अधिकारी वाडा यांचे कार्यालयापासून काही अंतरावर आहे.डेपोवरील आवक जावक रजिस्टरची तपासणी केली असता एकदाही वनक्षेत्रपाल यांनी तपासणी केल्याची नोंद नाही. एवढ्या मोठ्या प्रमाणात अवैध वनोपजाची वाहतूक होऊन डेपोवर साठा होत असताना वनक्षेत्रपाल यांनी दुर्लक्ष केल्याचे दिसते. यावरून कर्तव्यात टाळाटाळ केल्याचे सिध्द होत असल्याचा आक्षेप पत्रात नोंदवण्यात आला आहे.लाकडे कोणत्या जंगल अथवा मालकी क्षेत्रातील हे गुढच'वनगुन्हा दाखल होऊनही विनापरवाना माल कोणत्या जंगलातून अथवा मालकीतून आला याची चौकशी झालेली नसून ठोस कारवाई करण्याबाबत वनक्षेत्रपाल टाळाटाळ करीत असल्याचा आक्षेप दक्षता पथकाचे विभागीय वनअधिकारी संतोष सस्ते यांनी उपवनसंरक्षक जव्हार यांना पाठवलेल्या पत्रात केला आहे. वनक्षेत्रपाल यांचेवर वनसंरक्षणात्मक कामात हलगर्जीपणा केल्याचा आक्षेप पत्रात नोंदवले आहेत.दरम्यान, वनक्षेत्रपालावर कारवाई करण्यात वरिष्ठ अधिकाऱ्याकडून टाळाटाळ केली जात असल्याचे दिसून येत आहे. ही कारवाईच संशयास्पद असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. तालुक्या बाहेरील वनअधिकाºयाकडे या गुन्ह्याचा तपास देण्यात यावा अशी मागणीही वक्षप्रेमी करीत आहेत.

टॅग्स :Vasai Virarवसई विरारnewsबातम्या