शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही इन्कम टॅक्सकडून आलोय…’’, सांगलीत वॉरंट दाखवत डॉक्टरच्या घरातील कोट्यवधीचा ऐवज लुटला 
2
"हा तर 'पोपटवाडी' संघ..."; IND vs PAK सामन्यानंतर सुनील गावसकरांनी उडवली पाकिस्तानची खिल्ली
3
निसर्गाचा प्रकोप! डेहरादूनमध्ये ढगफुटीमुळे विध्वंस; सहस्त्रधारा, तपकेश्वरचे धडकी भरवणारे Video
4
वारंवार हल्ले करणाऱ्या कुत्र्यांना जन्मठेप होणार! उत्तर प्रदेश सरकारने घेतला मोठा निर्णय
5
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या आणि माजी आमदार निर्मला ठोकळ यांचे निधन 
6
जळगाव जिल्ह्यात ढगफुटी? गावांमध्ये शिरले पुराचे पाणी; लोकांनी रात्र काढली जागून, शाळांना सुट्टी
7
Pitru Paksha 2025: पितृपक्षात कसे केले जाते दशमी श्राद्ध? वाचा महत्त्व, मुहूर्त आणि श्राद्धविधी!
8
दुकानं-बस वाहून गेल्या, सगळीकडे पाणीच पाणी! हिमाचलच्या मंडीमध्ये पावसामुळे हाहाकार; ३ जणांचा मृत्यू
9
१७ वर्षाच्या मुलीला अजूनही मासिक पाळी आली नाही; तपासणी करताच वेगळेच सत्य उघड, डॉक्टरही हैराण
10
Post Office च्या ५ जबरदस्त स्कीम्स; छोट्या बचतीत मोठा फायदा, यापैकी दोन महिलांसाठी खास
11
अभिनेत्री हुमा कुरेशीने गुपचूप उरकला साखरपुडा, खाजगी समारंभातील फोटो आला समोर
12
आता कॅश काढण्यासाठी ATM ची गरज नाही! स्मार्टफोनने काढता येणार १०००० रुपये; कुठे मिळणार सुविधा?
13
Nashik: नाशिकमधील एका खाजगी शाळेला बॉम्बने उडवण्याची धमकी!
14
यूपीआयवरून रोज करा दहा लाखांचे पेमेंट; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी फायदा
15
पितृपक्ष २०२५: एखादी व्यक्ती हरवली आणि अनेक वर्षं सापडलीच नाही तर तिचेही श्राद्ध करतात का?
16
शेअर बाजारात पुन्हा तेजी, Sensex ८१,८२० च्या जवळ; निफ्टीही ग्रीन झोनमध्ये, 'या' स्टॉक्समध्ये तेजी
17
गुंतवणूकदारांसाठी आनंदाची बातमी! सेन्सेक्सला मागे टाकत सोन्याने दिला तब्बल ५०.१ टक्के परतावा
18
Dashavatar: 'दशावतार'च्या टीमकडून खास सरप्राइज, फक्त ९९ रुपये केलं सिनेमाचं तिकीट, प्रेक्षक म्हणाले- "तिकीट कमी करू नका..."
19
पश्चात्ताप! निळ्या रंगाच्या 'ड्रम'कांडमुळे जेलमध्ये गेलेल्या आरोपी साहिलच्या आयुष्याला नवी कलाटणी
20
Siddharth Shinde: सर्वोच्च न्यायालयातील वकील सिद्धार्थ शिंदे यांचे ह्रदयविकाराने निधन, दिल्लीत घेतला अखेरचा श्वास

वसई विरार महापालिका दुर्घटनेच्या प्रतिक्षेत?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2019 23:14 IST

नुसत्या नोटीसांनी काय होणार? : रहिवाशांना पर्याय नाही, पुन्हा घर मिळण्याची हमी नाही

नालासोपारा : वसई विरार महानगरपालिकेच्या अंतर्गत शेकडो इमारती धोकादायक अवस्थेत आहेत. त्यामध्ये शेकडो परिवार आपला जीव धोक्यात घालून राहतात. जोरदार पाऊस पडला तर अशा धोकादायक इमारतीना मोठ्या प्रमाणात धोका असतो. यामुळे कोणतीही जीवितहानी होऊ नये याकरिता या धोकादायक इमारतींना महानगरपालिका नोटीस पाठवून देते आणि आपला पल्ला झाडते.

या इमारती रिकाम्या करुन त्यांचा पुनर्विकास करण्यासाठी का पावले उचलत नाही? काही इमारती खाली करण्याबाबत कोर्टात केस चालू आहे. यामुळे या इमारती तोडून रिडेव्हलपमेंट करण्यासाठी कोणीही बिल्डर पुढे येत नाही. वसई विरार महानगरपालिका क्षेत्रातील नालासोपारा पूर्व विभागात मोठ्या प्रमाणात धोकादायक इमारती आहेत. काही इमारती तर कधीही पडून मोठा अपघात घडू शकतो. इमारती खाली न करता काही परिवार याच इमारतीमध्ये आपला जीव मुठित ठेवून राहतात. भरपूर वेळा धोकादायक इमारती म्हणून मनपाने नोटीस पाठवून सुध्दाही रहिवासी या इमारती रिकाम्या करत नाहीत आणि महानगरपालिका या गंभीर विषयावर मूग गिळून बसली आहे. वसई विरार महानगरपालिकाने गेल्या पावसाळ्यापूर्वी या धोकादायक इमारतीना नोटीस पाठवून रिकाम्या करण्याचे आदेश द्या असे सर्व विभागाच्या अधिकाऱ्यांना बजावले होते. या विभागातील प्रत्येक अधिकाऱ्यांनी आपल्या विभागातील धोकादायक इमारतीना नोटीस पाठवल्या तरी रहिवासी त्या रिकाम्या करतच नाहीत.

याबाबत त्यांना विचारले असता त्यांनी सांगितले की, आम्ही घर रिकामे करू पण उद्या आम्हाला घर ते पुुन्हा मिळेल याची हमी काय? याबाबत वसई विरार महानगरपालिका काही ठोस पावले उचलत नसल्यामुळे आम्ही आमचा जीव मुठित ठेवून राहत आहोत. नालासोपारा पूर्वेकडील सर्वात जास्त धोकादायक अशा २३ इमारती आत्मवल्लभ सोसायटीमधे आहेत.या इतक्या धोकादायक आहेत की काही घरे आरपार दिसत असून त्यांचे प्लास्टर मोठ्या प्रमाणात निघाले असल्यामुळे कधीही मोठी जीवितहानीची घटना घडू शकते. यांना नालासोपारा महानगरपालिका विभागाने धोकादायक इमारती म्हणून नोटीस पाठवल्या आहेत पण रहिवासी आपली घर रिकामी करीतच नाहीत.आमची पर्यायी व्यवस्था का नाही करत असे नाव न सांगण्याच्या अटीवर आम्ही या धोकादायक इमारतीमधे राहत असून अनेक परिवार राहतात. आम्हाला राहण्याची पर्यायी व्यवस्था, भाडे, डिपॉझिट आणि आम्हाला पुन्हा घर मिळेल की नाही याचे काहीही ट्रस्टी सांगत नाही म्हणून आम्ही आमचा जीव मुठित धरत राहत आहोत.- संतप्त रहिवाशी

टॅग्स :Vasai Virarवसई विरार