शहरं
Join us  
Trending Stories
1
Kedarnath Helicopter Crash : चारधाम यात्रेची हेलिकॉप्टर सेवा स्थगित; गौरीकुंडमधील दुर्घटनेनंतर नवा आदेश
2
कोल्हार- घोटी राज्यमार्गावर भीषण अपघात; तीन ठार, दहा जखमी
3
Israel–Iran War : इस्त्रायल-इराण युद्धात जग दोन गटात विभागले! 'या' मुस्लीम देशांनी घेतली इराणची बाजू; भारत कोणासोबत?
4
BCCI ने जाहीर केलं 'टीम इंडिया'चं पुढल्या वर्षीचं वेळापत्रक, रोहित-विराट 'या' तगड्या संघाविरूद्ध मैदानात उतरणार
5
केदारनाथला जाण्यासाठी हेलिकॉप्टरचं तिकीट किती? अपघात झाल्यास कोण देतं भरपाई?
6
Bhiwandi Fire: भिवंडीत भीषण आगीत, १२ केमिकल गोदामे जळून खाक!
7
मोठी बातमी: पुणे पोलिसांनी केलेल्या गोळीबारात कुख्यात गुन्हेगार ठार; सोलापूर जिल्ह्यातील घटना
8
चंद्रपूर: 'फादर्स डे'च्या दिवशी पाच मुले झाली पोरकी! दोन रानटी हत्तीनी सोंडेने आपटून एकाला केले ठार
9
मोठा दिलासा! आधार मोफत अपडेट करण्याची शेवटची संधी? UIDAI ने तारीख बदलली!
10
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
11
केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सात जणांचा मृत्यू, महाराष्ट्रातील भाविकांचा समावेश
12
सुनेची काळजी घेण्यासाठी निघालेल्या यास्मिन; तीन दिवस प्रवास पुढे ढकलला, विमान अपघातात मृत्यू
13
Navi Mumbai: नवी मुंबई विमानतळावर लँडिंग करण्याआधी वैमानिकांसमोर २२५ अडथळे!
14
वाशिमच्या मेडशी बायपासवर भीषण अपघात; दोन ठार, एक जखमी, दोघे थोडक्यात बचावले
15
लव जिहादच्या आरोपावर आमिर खानने दिलं उत्तर, म्हणाला, "माझ्या दोन्ही बहिणी अन् मुलीने..."
16
इस्रायलचा इराणवर 'वार'! तेहरानमधील संरक्षण मंत्रालयाची इमारत, अणु मुख्यालय उद्ध्वस्त
17
Thane: मुंब्रा-शीळ भागात आणखी ८ इमारती जमीनदोस्त!
18
हायकू हायकू हायकू... म्हणजेच...; पुस्तकाच्या जन्माची गोष्ट!
19
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
20
"मी एकावेळी ४-४ सिनेमे केले नाही...", दीपिकाच्या ८ तास शिफ्ट मागणीवर काजोलची प्रतिक्रिया

वसई विरार महापालिका दुर्घटनेच्या प्रतिक्षेत?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2019 23:14 IST

नुसत्या नोटीसांनी काय होणार? : रहिवाशांना पर्याय नाही, पुन्हा घर मिळण्याची हमी नाही

नालासोपारा : वसई विरार महानगरपालिकेच्या अंतर्गत शेकडो इमारती धोकादायक अवस्थेत आहेत. त्यामध्ये शेकडो परिवार आपला जीव धोक्यात घालून राहतात. जोरदार पाऊस पडला तर अशा धोकादायक इमारतीना मोठ्या प्रमाणात धोका असतो. यामुळे कोणतीही जीवितहानी होऊ नये याकरिता या धोकादायक इमारतींना महानगरपालिका नोटीस पाठवून देते आणि आपला पल्ला झाडते.

या इमारती रिकाम्या करुन त्यांचा पुनर्विकास करण्यासाठी का पावले उचलत नाही? काही इमारती खाली करण्याबाबत कोर्टात केस चालू आहे. यामुळे या इमारती तोडून रिडेव्हलपमेंट करण्यासाठी कोणीही बिल्डर पुढे येत नाही. वसई विरार महानगरपालिका क्षेत्रातील नालासोपारा पूर्व विभागात मोठ्या प्रमाणात धोकादायक इमारती आहेत. काही इमारती तर कधीही पडून मोठा अपघात घडू शकतो. इमारती खाली न करता काही परिवार याच इमारतीमध्ये आपला जीव मुठित ठेवून राहतात. भरपूर वेळा धोकादायक इमारती म्हणून मनपाने नोटीस पाठवून सुध्दाही रहिवासी या इमारती रिकाम्या करत नाहीत आणि महानगरपालिका या गंभीर विषयावर मूग गिळून बसली आहे. वसई विरार महानगरपालिकाने गेल्या पावसाळ्यापूर्वी या धोकादायक इमारतीना नोटीस पाठवून रिकाम्या करण्याचे आदेश द्या असे सर्व विभागाच्या अधिकाऱ्यांना बजावले होते. या विभागातील प्रत्येक अधिकाऱ्यांनी आपल्या विभागातील धोकादायक इमारतीना नोटीस पाठवल्या तरी रहिवासी त्या रिकाम्या करतच नाहीत.

याबाबत त्यांना विचारले असता त्यांनी सांगितले की, आम्ही घर रिकामे करू पण उद्या आम्हाला घर ते पुुन्हा मिळेल याची हमी काय? याबाबत वसई विरार महानगरपालिका काही ठोस पावले उचलत नसल्यामुळे आम्ही आमचा जीव मुठित ठेवून राहत आहोत. नालासोपारा पूर्वेकडील सर्वात जास्त धोकादायक अशा २३ इमारती आत्मवल्लभ सोसायटीमधे आहेत.या इतक्या धोकादायक आहेत की काही घरे आरपार दिसत असून त्यांचे प्लास्टर मोठ्या प्रमाणात निघाले असल्यामुळे कधीही मोठी जीवितहानीची घटना घडू शकते. यांना नालासोपारा महानगरपालिका विभागाने धोकादायक इमारती म्हणून नोटीस पाठवल्या आहेत पण रहिवासी आपली घर रिकामी करीतच नाहीत.आमची पर्यायी व्यवस्था का नाही करत असे नाव न सांगण्याच्या अटीवर आम्ही या धोकादायक इमारतीमधे राहत असून अनेक परिवार राहतात. आम्हाला राहण्याची पर्यायी व्यवस्था, भाडे, डिपॉझिट आणि आम्हाला पुन्हा घर मिळेल की नाही याचे काहीही ट्रस्टी सांगत नाही म्हणून आम्ही आमचा जीव मुठित धरत राहत आहोत.- संतप्त रहिवाशी

टॅग्स :Vasai Virarवसई विरार