शहरं
Join us  
Trending Stories
1
“जो जीता वही सिकंदर, पण सिकंदर बनायचे राज समजू शकले नाही”; बिहार निकालावर उद्धव ठाकरे बोलले
2
राहुल गांधींमुळे काँग्रेसच्या तरुण खासदारांचे भविष्य धोक्यात; PM मोदींचा घणाघात...
3
लालूप्रसाद यादवांना निकामी किडनी दिली; तेजस्वी यादव अन् बहीण रोहिणी आचार्य यांच्यात तू तू मै मै, चप्पलफेक...
4
सावधान! डिजिटल गोल्डमध्ये गुंतवणूक करताय? 'या' ३ मोठ्या जोखमींमुळे पैसे बुडण्याची शक्यता
5
बिहारमध्ये सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग; मंत्रिमंडळ वाटपाचा फॉर्म्युला ठरला?
6
पत्नीच्या नावाने म्युच्युअल फंडात SIP करताय? टॅक्स स्लॅब आणि 'कॅपिटल गेन्स'चे नियम स्पष्ट समजून घ्या!
7
जबरदस्तीची मिठी अन् दोन वेळा Kiss...! प्रसिद्ध ज्वेलर्सच्या मुलाचं घाणेरड कृत्य; व्हिडिओ व्हायरल
8
भारताचा लाजिरवाणा पराभव! आफ्रिकेने हरवल्यानंतर उपकर्णधार पंत म्हणतो- "आज झालेला पराभव...
9
दिल्ली स्फोट प्रकरण: डझनभर डॉक्टरांचे फोन बंद; 'अल फलाह' विद्यापीठातील मोठे नेटवर्क उघड
10
IND vs SA : आम्ही जिंकलो असतो तर...! लाजिरवाण्या पराभवानंतर नेमकं काय म्हणाले कोच गौतम गंभीर?
11
‘वंदे भारत’च्या मदतीला TATA कंपनी? ट्रेन बांधणीत ठरणार गेम चेंजर! ‘मेक इन इंडिया’ वेग घेणार
12
टीम इंडियासमोर दक्षिण आफ्रिकेची कमाल! 'लो स्कोअरिंग' टेस्टमध्ये बेस्ट कामगिरीसह मारली बाजी
13
“काही ठिकाणी महायुती झाली, कुठे नाही, परवापर्यंत सगळे समजेल”: CM फडणवीसांनी केले स्पष्ट
14
Rohini Acharya : "मला घाणेरड्या शिव्या दिल्या, मारायला चप्पल उचलली, आई-वडिलांना..."; रोहिणी यांची भावुक पोस्ट
15
प्यार किया तो डरना क्या! ८३ वर्षीय आजीच्या प्रेमात वेडा झाला २३ वर्षांचा तरुण, कुटुंबाने दिली साथ
16
याला म्हणतात धमाका शेअर...! फक्त 2 वर्षांत दिला 16000% परतावा, गुंतवणूकदारांना केलं मालामाल आता 5 बोनस शेअर वाटणार कंपनी
17
जैश टेरर मॉड्यूलवर मोठी कारवाई: अनंतनागमध्ये छाप्यानंतर हरियाणाची महिला डॉक्टर ताब्यात
18
अ‍ॅसिड फेकलं, छतावरुन ढकललं; 'तो' वाद टोकाला गेला, नवरा थेट बायकोच्या जीवावर उठला
19
Mumbai: वाकोला ते बीकेसी उन्नत मार्गाचे ८० टक्के काम पूर्ण; लवकरच वाहतुकीसाठी खुला होणार!
20
गोरखपूरमध्ये उभारलं जातंय जागतिक दर्जाचे विज्ञान उद्यान; योगी सरकारने घेतला मोठा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

वसई विरार महापालिकेच्या दिरंगाईने जोसडी वंचितच!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2019 02:58 IST

वसई विरार महानगरपालिका प्रगतीच्या दिशेकडे जात असली तरी तीमधील अनेक गावांमध्ये मूलभूत सुविधा देखील नाही. पाणी, वाहतुकीसाठी चांगला रास्ता अशा अनेक सुविधांपासून जोसोडी गाव गेल्या अनेक महिन्यापासून वंचित आहे.

वसई - वसई विरार महानगरपालिका प्रगतीच्या दिशेकडे जात असली तरी तीमधील अनेक गावांमध्ये मूलभूत सुविधा देखील नाही. पाणी, वाहतुकीसाठी चांगला रास्ता अशा अनेक सुविधांपासून जोसोडी गाव गेल्या अनेक महिन्यापासून वंचित आहे. महापालिकेकडे अनेकदा तक्र ारी करून सुद्धा फक्त आश्वासने मिळत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत.भुईगाव इथे असलेले जोसोडी हे गाव अनेक सुविधांपासून वंचित आहे. महानगरपालिकेची दिरंगाई हि सामन्य नागरिकांना नेहमीच हैराण करीत असते. वसई विरार मधल्या गावांमध्ये अजूनही मूलभूत सुविधा नसल्याने नागरिकांचे हाल होत आहेत. नागरिकांनी अनेकदा मागण्या करून देखील पालिके कडून टाळाटाळ होत आहे. पालिकेने काही मागण्या मान्य करून कामे केली आहेत तरी ती अगदीच हलक्या दर्जाची आहेत. तर या गावातील नागरिकांना पाणी, रास्ता, इ. गोष्टींसाठी भरपूर कष्ट घ्यावे लागत आहेत.दोन रस्त्याच्या मध्ये असलेल्या नाल्यामुळे वाहनांना तेथून ये-जा करणे कठीण होत होते, यासाठी नागरिकांनी पालिकेकडे नाल्यावर स्लॅबची मागणी केली होती. पालिकेने अनेक मागण्यां नंतर गेल्या वर्षी मे महिन्यात हा स्लॅब बांधला पण लगेचच दोन मिहन्यात तो खचला. त्यावरून आता अवजड वाहनांना जाता येत नाहीत आणि जरी गेली तर स्लॅब तुटून खाली पडेल अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.(पान ३ वर)स्लॅब खचला, गटारे अरुंद, पाणीटंचाई ओढावली, पावसाचे पाणी राहते तुंबून, शेतीला धोका, कचरा साठतोस्लॅब खाचल्यामुळे त्यावरून अवजड वाहने जाऊ शकत नाही. त्यामुळे पालिकेची कचरा उचलणारी गाडी देखील येत नाही त्यामुळे लोकांना बाहेर जावे लागते.बंधारा नसल्याने पाणी जाऊन शेती खराब होते. धारणाकडचा रस्ता खराब असल्यामुळे पाय घसरून नागरिक खोल पाण्यात पडू शकतात.पाण्याची मोटर चालू करण्यासाठी लोकांना चिखलातून जावे लागते. रास्ता एकदमच खराब आहे.रस्त्याला भेगा पडल्यामुळे सरपटणारे प्राणी त्यात लपून राहतात व गाड्या त्यात अडकतात त्यामुळे अपघात होण्याची शक्यता असते तर प्राण्यांमुळे जीवाला धोका निर्माण होतो.गटारे अरु ंद असल्याने पाण्याचा निचरा होत नाही, पावसाळ्यात पाणी भरते. ये जा करायला नागरिकांना त्रास होतो.धरणातले पाणी आटल्याने नागरिकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागतो.कंत्राटदारांनी पाईप कापल्यामुळे गटारात उतरून पाणी घ्यावे लागते.

मध्यंतरी काम सुरु करण्यात आले होते पण गावकर्यांनी आम्हांला अडवलं. गावकरी काम करू देत नाही.- अमिता तापडे, नगरसेविकाप्रोसिजर प्रमाणे काम होणार. ही कामं महासभेत मांडलेली आहे त्यामुळे त्यांचे टेंडर निघायला व इतर प्रोसिजरला वेळ लागतो.-प्रभाग समिती सभापती, प्राची कोलासोलहान मुलांपासून जेष्ठ नागरीकां पर्यंत सगळ्यांना त्रास होत आहे. पत्र व्यवहार झालेला आहे. एकिह सुविधा पूर्णत: नाही.-स्थानिक रहिवासी- विलियम डाबरे

टॅग्स :Vasai Virarवसई विरार