शहरं
Join us  
Trending Stories
1
'पुष्पा २' प्रीमियर चेंगराचेंगरी प्रकरणात अभिनेता अल्लू अर्जुनसह २३ जण दोषी, आरोपपत्र दाखल
2
जम्मू काश्मीर: ३० ते ३५ दहशतवादी लपल्याची शंका, बर्फवृष्टीतही भारतीय सैन्याची शोधमोहिम सुरु
3
भररस्त्यात पाठलाग करून मंगेश काळोखेंवर केले २७ वार; आरोपींच्या निर्दयीपणाचे 'सीसीटीव्ही' फुटेज समोर
4
’मंगेश काळोखे यांच्या मारेकऱ्यांवर मोक्का लावून कठोरात कठोर कारवाई करणार’, एकनाथ शिंदे यांचं आश्वासन
5
भाजपा, शिंदेसेनेत युतीसाठी कोणतीही अडचण नाही; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची स्पष्टोक्ती
6
ठाण्यात तीन प्रभागावरून युती अडली; आज तोडगा निघण्याची शक्यता, १२ जागांवरून अडले घोडे
7
Solapur Municipal Election: काँग्रेसने २० उमेदवारांच्या नावाची केली घोषणा, पहिल्या यादीत कुणाची नावे?
8
खोपोलीतील घटना अत्यंत निंदनीय, निषेध करत सुनिल तटकरे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली मोठी मागणी
9
"PM मोदींचा हा वन मॅन शो फक्त..."; मनरेगाच्या नामांतरावरून सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल, काँग्रेस ५ जानेवारीपासून रस्त्यावर उतरणार
10
VIDEO : इटलीच्या बॅटरकडून शाहीन आफ्रिदीची धुलाई; पाक गोलंदाजावर 'लंगडी' घालत मैदान सोडण्याची वेळ!
11
शिंदेसेनेच्या बैठकीत राडा? शहरप्रमुख नाना भानगिरे रागारागात बाहेर पडले आणि गेले निघून; व्हिडीओ आला समोर
12
जळगाव: बापच बनला हैवान! चौथी मुलगी झाल्याच्या रागातून अवघ्या ३ दिवसांच्या मुलीची हत्या
13
बांगलादेशमध्ये एका मिस्ट्री गर्लची एंट्री, बनू शकते भविष्यातील शेख हसीना किंवा खलिदा झिया
14
Sukesh Chandrashekhar : "२१७ कोटी देण्यास तयार, पण...", महाठग सुकेश चंद्रशेखरचा मास्टरस्ट्रोक; खंडणी प्रकरणात मोठी ऑफर
15
AUS vs ENG: डोक्यात निवृत्तीचा विचार, मनात भीती… आणि त्यानेच सामना फिरवला!
16
कौतुकास्पद! आईने दागिने विकून शिकवलं, १० वेळा अपयश आलं पण लेकाने वडिलांचं स्वप्न पूर्ण केलं
17
विराट कोहलीचा VIDEO घेण्यासाठी बस ड्रायव्हरची भन्नाट 'आयडिया', सोशल मीडियावर क्लिप VIRAL
18
राजकारण पेटलं! कर्नाटकमध्ये काँग्रेस सरकारची बुलडोझर कारवाई; ४०० हून अधिक घरं पाडली
19
शाकंभरी नवरात्र २०२५: शाकंभरी मातेच्या कृपेने 'या' राशींचे उजळणार भाग्य; २०२६ ची होणार स्वप्नवत सुरुवात!
20
"भाजपाने आमच्या पाठीत खंजीर खुपसला, मतदारांचाही विश्वासघात करेल"; राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष मुळीक यांचे टीकास्त्र
Daily Top 2Weekly Top 5

वसई ग्रामीणवर ८० टक्के करवाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2019 23:05 IST

वसई : वसई-विरार शहर महापालिका हद्दीच्या ग्रामीण भागातील नागरिकांना पुढील आर्थिक वर्षांपासून आणखी करवाढ सहन करावी लागणार आहे. दरम्यान, ...

वसई : वसई-विरार शहर महापालिका हद्दीच्या ग्रामीण भागातील नागरिकांना पुढील आर्थिक वर्षांपासून आणखी करवाढ सहन करावी लागणार आहे. दरम्यान, पालिका क्षेत्रातील शहरी- ग्रामीण कराचे एकसमानीकरण करण्याच्या धोरणाचा दाखला देत महापालिकेने ग्रामीण भागांत शहराच्या तुलनते तब्बल ८० टक्के कर लागू केला आहे. परिणामी गतवर्षीच्या पूरस्थितीमुळे किमान एक वर्ष तरी ही करवाढ पुढे ढकलण्यात यावी असे विरोधी गटातील सेना-भाजपच्या सदस्यांनी मागणी केली असताना, ती मागणी आयुक्तांनी महासभेत फेटाळली आहे.

महापालिकेची स्थापना २००९ मध्ये झाली. त्यावेळी ५३ गावे समाविष्ट करण्यात आली होती. त्यावेळी पालिका हद्दीतील त्या गावांना कर लावला जाणार नाही असे आश्वासन दिल्यानंतरच ही गावे महापालिकेत समाविष्ट होण्यास तयार झाली होती. मात्र, महापालिकेने २०१७ मध्ये करवाढीचा ठराव बहुमताने संमत करुन त्यांना विश्वासघात केला होता.

या ठरावाच्या आधारे टप्प्या टप्प्याने करवाढ लागू केली जाणार असल्याचे ठरले. मात्र मागील करवाढीचा दाखला देत, महापालिकेने पहिल्या टप्प्यात ४० टक्के कर लागू केला तर दुसऱ्या टप्प्यात ६० टक्के लागू केल्यानंतर यंदाच्या अर्थसंकल्पात म्हणजे तिसºया टप्प्यात ८० टक्के कर वाढ लागू करण्याचा निर्णय घेतला असून त्याची अम्मलबजावणी या वर्र्षीपासून सुरु होणार आहे.

एकूणच महापालिकेत समाविष्ट ग्रामपंचायत क्षेत्रांसाठी महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमनाच्या कलम १२९-अ अन्वये मालमत्ता कर टप्प्याटप्प्याने वाढवण्याची शासन तरतूद आहे. २०१७-१८ आणि २०१८-१९ मध्ये दोन टप्प्यांनी करवाढ केली होती. करवाढीचा तिसरा टप्पा बुधवारी झालेल्या महासेभत मंजूर करण्यात आला आहे. त्यामुळे आता आता शहरातील उपहारगृहे, सिनेमागृहांना ही त्याचा फटका बसणार आहे.

आगाऊ कर भरलेल्यांना दिलासानागरिकांनी कर भरावा यासाठी शासनाकडून प्रोत्साहन दिले जात असते. पाच वर्षांंचा कर भरणाºयांना शासनाकडून सवलत दिली गेली होती. त्या आवाहनाला प्रतिसाद देऊन अनेक नागरिकांनी पाच वर्षांचा कर एकत्रित भरला होता. ज्यांनी आधीच कर भरला आहे, त्यांना वाढीव कर भरावा लागेल का, असा सवाल प्रभाग समिती आय च्या सभापती प्राची कोलासो यांनी केला. त्यावेळी ज्यांनी पाच वर्षांचा आगाऊ कर भरला आहे. त्यांना वाढीव कर भरावा लागणार नाही, असे आयुक्तांनी स्पष्ट केले.शिवसेनेने मांडली पूरग्रस्तांची कैफियतवसईत गतवर्षी जुलै-२०१८ मध्ये पावसाळ्यात मोठा पूर आला होता. त्याचा वसईतील हजारो नागरिकांना फटका बसला. त्यामुळे महापालिकेने किमान एक वर्ष तरी करवाढ पुढे ढकलावी, अशी मागणी शिवसेना गटनेत्या किरण चेंदवणकर यांनी केली. परंतु आयुक्तांनी ती फेटाळून लावली.ग्रामीण भागात सोयी-सुविधा न देता केवळ कर वाढवला जात असल्या बद्दल शिवसेना नगरसेविका प्रीती म्हात्रे यांनी त्यावेळी विरोध केला. पूर्वपट्टीतील गावात तर महापालिकेचे साधे पाणी सुद्धा नाही इतर सोयीसुविधा तर दूरच आहेत. मग ही ८० टक्के करवाढ का, असा सवाल ही उपस्थित झाला आहे.

आगाऊ कर भरलेल्यांना दिलासानागरिकांनी कर भरावा यासाठी शासनाकडून प्रोत्साहन दिले जात असते. पाच वर्षांंचा कर भरणाºयांना शासनाकडून सवलत दिली गेली होती. त्या आवाहनाला प्रतिसाद देऊन अनेक नागरिकांनी पाच वर्षांचा कर एकत्रित भरला होता. ज्यांनी आधीच कर भरला आहे, त्यांना वाढीव कर भरावा लागेल का, असा सवाल प्रभाग समिती आय च्या सभापती प्राची कोलासो यांनी केला. त्यावेळी ज्यांनी पाच वर्षांचा आगाऊ कर भरला आहे. त्यांना वाढीव कर भरावा लागणार नाही, असे आयुक्तांनी स्पष्ट केले.