शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली लाल किल्ला स्फोट: कारमधून ब्लास्ट घडवून आणणाऱ्या उमरचा पहिला फोटो आला समोर
2
दिल्लीच्या स्फोटाची पाकिस्ताननं घेतली धास्ती; रात्रीच बोलावली तातडीची बैठक, NOTAM जारी अन्...
3
VIDEO: स्फोटकांनी भरलेली कार ३ तास एकाच ठिकाणी उभी; स्फोट घडवणाऱ्याने एका मिनिटासाठीही गाडी सोडली नाही
4
दिल्लीतील स्फोट हा आत्मघाती हल्ला? समोर येतेय अशी माहिती, पोलिसांकडून गुन्हा दाखल
5
गुंतवणूकदारांसाठी मोठी बातमी! निफ्टीमध्ये आणखी १४% तेजीची शक्यता; गोल्डमॅन सॅक्सने सांगितलं कारण
6
टॅरिफमुळे प्रत्येक अमेरिकन नागरिकाला मिळणार २००० डॉलर्स, याच्या विरोधात बोलणारा मुर्ख; काय म्हणाले ट्रम्प?
7
Dharmendra Health Update: धर्मेंद्र यांच्या प्रकृतीत होतेय सुधारणा, हेमा मालिनी आणि ईशा देओलने दिली हेल्थ अपडेट; म्हणाल्या...
8
कंटेनर शिरला थेट वारकऱ्यांच्या दिंडीत, १० जखमी, एका महिलेचा चिरडून मृत्यू, जुन्या पुणे मुंबई हायवे मार्गावरील घटना
9
५ वर्षांच्या आत हे 'काम' पूर्ण झालं पाहिजे; केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी अधिकाऱ्यांना दिलं टार्गेट
10
दिल्लीत 'फिदायिन' हल्ला?; लाल किल्ल्याजवळ स्फोट घडवण्यापूर्वी कारमध्ये दिसलेला संशयित डॉक्टर उमर
11
Share Market Update: शेअर बाजार आपटला; सेन्सेक्समध्ये २५० अंकांची घसरण, 'हे' प्रमुख स्टॉक्स धडाम
12
रोहित शर्मा-विराट कोहलीच्या दमदार खेळीनंतर गौतम गंभीरने अजिबात सेलिब्रेशन केलं नाही; कारण..
13
Post Office च्या ‘या’ स्कीममध्ये मिळेल दरमहा ₹५५०० चं फिक्स व्याज; किती करावी लागेल गुंतवणूक, पटापट करा चेक
14
"थोड्या वेळात घरी येतोय..."; दिल्ली स्फोटाने बस कंडक्टर अशोक कुमारचा घेतला बळी; आईला अजूनही माहिती नाही
15
पकडले जाण्याच्या भीतीने उमरने उडवली स्फोटकांनी भरलेली कार; पुलवामा हल्ल्याच्या दिवशी विकली गाडी
16
भाजप, काँग्रेसची नगराध्यक्ष उमेदवारांची यादी ५ दिवसांत, आज भाजपची तर उद्या काँग्रेसची मुंबईत होणार महत्त्वपूर्ण बैठक
17
दिल्लीतील स्फोटाचं पुलवामा कनेक्शन समोर, सलमानने काश्मीरमधील तारिकला विकली होती ती कार
18
बिहारमध्ये दुसऱ्या टप्प्यासाठी आज मतदान, २० जिल्हे, १२२ मतदारसंघ, ३.७ कोटींवर मतदार
19
दिल्लीतील स्फोटात आतापर्यंत १० खुलासे समोर; फरीदाबाद मॉड्यूलशी काय आहे कनेक्शन?
20
दिल्लीत स्फोट; मुंबईत अलर्ट, मुंबईच्या पाचही प्रवेशद्वारांसह सागरी सुरक्षेत वाढ; रेल्वे स्थानके, महत्त्वाच्या ठिकाणी नाकाबंदी

वसई ग्रामीणवर ८० टक्के करवाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2019 23:05 IST

वसई : वसई-विरार शहर महापालिका हद्दीच्या ग्रामीण भागातील नागरिकांना पुढील आर्थिक वर्षांपासून आणखी करवाढ सहन करावी लागणार आहे. दरम्यान, ...

वसई : वसई-विरार शहर महापालिका हद्दीच्या ग्रामीण भागातील नागरिकांना पुढील आर्थिक वर्षांपासून आणखी करवाढ सहन करावी लागणार आहे. दरम्यान, पालिका क्षेत्रातील शहरी- ग्रामीण कराचे एकसमानीकरण करण्याच्या धोरणाचा दाखला देत महापालिकेने ग्रामीण भागांत शहराच्या तुलनते तब्बल ८० टक्के कर लागू केला आहे. परिणामी गतवर्षीच्या पूरस्थितीमुळे किमान एक वर्ष तरी ही करवाढ पुढे ढकलण्यात यावी असे विरोधी गटातील सेना-भाजपच्या सदस्यांनी मागणी केली असताना, ती मागणी आयुक्तांनी महासभेत फेटाळली आहे.

महापालिकेची स्थापना २००९ मध्ये झाली. त्यावेळी ५३ गावे समाविष्ट करण्यात आली होती. त्यावेळी पालिका हद्दीतील त्या गावांना कर लावला जाणार नाही असे आश्वासन दिल्यानंतरच ही गावे महापालिकेत समाविष्ट होण्यास तयार झाली होती. मात्र, महापालिकेने २०१७ मध्ये करवाढीचा ठराव बहुमताने संमत करुन त्यांना विश्वासघात केला होता.

या ठरावाच्या आधारे टप्प्या टप्प्याने करवाढ लागू केली जाणार असल्याचे ठरले. मात्र मागील करवाढीचा दाखला देत, महापालिकेने पहिल्या टप्प्यात ४० टक्के कर लागू केला तर दुसऱ्या टप्प्यात ६० टक्के लागू केल्यानंतर यंदाच्या अर्थसंकल्पात म्हणजे तिसºया टप्प्यात ८० टक्के कर वाढ लागू करण्याचा निर्णय घेतला असून त्याची अम्मलबजावणी या वर्र्षीपासून सुरु होणार आहे.

एकूणच महापालिकेत समाविष्ट ग्रामपंचायत क्षेत्रांसाठी महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमनाच्या कलम १२९-अ अन्वये मालमत्ता कर टप्प्याटप्प्याने वाढवण्याची शासन तरतूद आहे. २०१७-१८ आणि २०१८-१९ मध्ये दोन टप्प्यांनी करवाढ केली होती. करवाढीचा तिसरा टप्पा बुधवारी झालेल्या महासेभत मंजूर करण्यात आला आहे. त्यामुळे आता आता शहरातील उपहारगृहे, सिनेमागृहांना ही त्याचा फटका बसणार आहे.

आगाऊ कर भरलेल्यांना दिलासानागरिकांनी कर भरावा यासाठी शासनाकडून प्रोत्साहन दिले जात असते. पाच वर्षांंचा कर भरणाºयांना शासनाकडून सवलत दिली गेली होती. त्या आवाहनाला प्रतिसाद देऊन अनेक नागरिकांनी पाच वर्षांचा कर एकत्रित भरला होता. ज्यांनी आधीच कर भरला आहे, त्यांना वाढीव कर भरावा लागेल का, असा सवाल प्रभाग समिती आय च्या सभापती प्राची कोलासो यांनी केला. त्यावेळी ज्यांनी पाच वर्षांचा आगाऊ कर भरला आहे. त्यांना वाढीव कर भरावा लागणार नाही, असे आयुक्तांनी स्पष्ट केले.शिवसेनेने मांडली पूरग्रस्तांची कैफियतवसईत गतवर्षी जुलै-२०१८ मध्ये पावसाळ्यात मोठा पूर आला होता. त्याचा वसईतील हजारो नागरिकांना फटका बसला. त्यामुळे महापालिकेने किमान एक वर्ष तरी करवाढ पुढे ढकलावी, अशी मागणी शिवसेना गटनेत्या किरण चेंदवणकर यांनी केली. परंतु आयुक्तांनी ती फेटाळून लावली.ग्रामीण भागात सोयी-सुविधा न देता केवळ कर वाढवला जात असल्या बद्दल शिवसेना नगरसेविका प्रीती म्हात्रे यांनी त्यावेळी विरोध केला. पूर्वपट्टीतील गावात तर महापालिकेचे साधे पाणी सुद्धा नाही इतर सोयीसुविधा तर दूरच आहेत. मग ही ८० टक्के करवाढ का, असा सवाल ही उपस्थित झाला आहे.

आगाऊ कर भरलेल्यांना दिलासानागरिकांनी कर भरावा यासाठी शासनाकडून प्रोत्साहन दिले जात असते. पाच वर्षांंचा कर भरणाºयांना शासनाकडून सवलत दिली गेली होती. त्या आवाहनाला प्रतिसाद देऊन अनेक नागरिकांनी पाच वर्षांचा कर एकत्रित भरला होता. ज्यांनी आधीच कर भरला आहे, त्यांना वाढीव कर भरावा लागेल का, असा सवाल प्रभाग समिती आय च्या सभापती प्राची कोलासो यांनी केला. त्यावेळी ज्यांनी पाच वर्षांचा आगाऊ कर भरला आहे. त्यांना वाढीव कर भरावा लागणार नाही, असे आयुक्तांनी स्पष्ट केले.