शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
2
“भावाला न्याय मिळत नाही तोपर्यंत चप्पल घालणार नाही”; संतोष देशमुख यांच्या बहिणीचा निर्धार
3
“जातनिहाय जनगणनेचा मुद्दाही सुप्रीम कोर्टात जाईल, १० वर्षे तरी...”; वकिलांनी कायदाच सांगितला
4
OLA Electric ची डोकेदुखी वाढली, इनसाइडर ट्रेडिंग प्रकरणी SEBI कडून तपास; प्रकरण काय?
5
"मी माझ्या पत्नीवर खरं प्रेम केलं होतं पण तिने..."; तरुणाने Video बनवून स्वत:वर झाडली गोळी
6
"अनेकांची झोप उडवेल आजचा कार्यक्रम, जेथे मेसेज जायला हवा होता, तेथे पोहोचला"; नेमकं काय म्हणाले पीएम मोदी
7
भारतातील या मुख्यमंत्र्यांनी भारत-पाकिस्तान युद्धावेळी चालवलं होतं विमान, सैनिकांना पोहोचवलं होतं श्रीनगरला
8
भारतीयांवर लक्ष्मी प्रसन्न! लोकांनी तीन वर्षात 'यु ट्यूब'वरून कमावले तब्बल 21000 कोटी
9
एजाज खान अडचणीत, महिला आयोगाची कारवाई; ULLU ने 'हाउस अरेस्ट'चे सर्व एपिसोड हटवले
10
सौरभची हत्या करणाऱ्या मुस्कान-साहिलने हात जोडले; जेलमध्ये ढसाढसा रडले अन् म्हणाले...
11
आई, वडील आयटी प्रोफेशनल; काळजावर दगड ठेवत अवघ्या तीन वर्षांच्या मुलीला दिला जैन धर्माचा संथारा, कहाणी ऐकून व्हाल भावूक...
12
Gold Rates 2 May : सोन्याच्या किंमतीत जोरदार घसरण, ७८ हजारांपर्यंत येऊ शकतो १० ग्रॅम सोन्याचा दर?
13
अधिकाधिक हिंदू तरुणींवर बलात्कार करण्याचं होतं लक्ष्य, भोपाळ लव्ह जिहाद प्रकरणातील आरोपीचा धक्कादायक दावा 
14
पहलगाम हल्ल्याचा दणका! भारताकडून पाकिस्तानचा ऑलिम्पिक विजेता अर्शद नदीम BLOCK!!
15
वादग्रस्त आयएएस प्रशिक्षणार्थी पूजा खेडकर दिल्ली पोलिसांत हजर; मनाने आलेली नाही, सामाजिक कार्यकर्त्यांचा आरोप 
16
Waves Summit 2025: "भारतात पुरेसे सिनेमागृहच नाहीत..." आमिर खानने व्यक्त केली खंत
17
श्रीराम दर्शनाची ओढ लागली, ३०० वर्षे जुनी परंपरा मोडली; हनुमानगढीचे महंत मंदिराबाहेर पडले!
18
केवळ १००० रुपयांनी गुंतवणूक करून तुमच्या मुलांना बनवू शकता कोट्यधीश; कोणती आहे ही स्कीम?
19
पत्नी माहेरी गेली, पतीने घरातच केली आत्महत्या; अकोला जिल्ह्यातील धक्कादायक घटना
20
प्रेक्षकांचा सूरज चव्हाणला 'गोलीगत धोका', 'झापुक झुपूक'ने पहिल्या आठवड्यात केली फक्त इतकी कमाई

वसई ग्रामीणवर ८० टक्के करवाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2019 23:05 IST

वसई : वसई-विरार शहर महापालिका हद्दीच्या ग्रामीण भागातील नागरिकांना पुढील आर्थिक वर्षांपासून आणखी करवाढ सहन करावी लागणार आहे. दरम्यान, ...

वसई : वसई-विरार शहर महापालिका हद्दीच्या ग्रामीण भागातील नागरिकांना पुढील आर्थिक वर्षांपासून आणखी करवाढ सहन करावी लागणार आहे. दरम्यान, पालिका क्षेत्रातील शहरी- ग्रामीण कराचे एकसमानीकरण करण्याच्या धोरणाचा दाखला देत महापालिकेने ग्रामीण भागांत शहराच्या तुलनते तब्बल ८० टक्के कर लागू केला आहे. परिणामी गतवर्षीच्या पूरस्थितीमुळे किमान एक वर्ष तरी ही करवाढ पुढे ढकलण्यात यावी असे विरोधी गटातील सेना-भाजपच्या सदस्यांनी मागणी केली असताना, ती मागणी आयुक्तांनी महासभेत फेटाळली आहे.

महापालिकेची स्थापना २००९ मध्ये झाली. त्यावेळी ५३ गावे समाविष्ट करण्यात आली होती. त्यावेळी पालिका हद्दीतील त्या गावांना कर लावला जाणार नाही असे आश्वासन दिल्यानंतरच ही गावे महापालिकेत समाविष्ट होण्यास तयार झाली होती. मात्र, महापालिकेने २०१७ मध्ये करवाढीचा ठराव बहुमताने संमत करुन त्यांना विश्वासघात केला होता.

या ठरावाच्या आधारे टप्प्या टप्प्याने करवाढ लागू केली जाणार असल्याचे ठरले. मात्र मागील करवाढीचा दाखला देत, महापालिकेने पहिल्या टप्प्यात ४० टक्के कर लागू केला तर दुसऱ्या टप्प्यात ६० टक्के लागू केल्यानंतर यंदाच्या अर्थसंकल्पात म्हणजे तिसºया टप्प्यात ८० टक्के कर वाढ लागू करण्याचा निर्णय घेतला असून त्याची अम्मलबजावणी या वर्र्षीपासून सुरु होणार आहे.

एकूणच महापालिकेत समाविष्ट ग्रामपंचायत क्षेत्रांसाठी महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमनाच्या कलम १२९-अ अन्वये मालमत्ता कर टप्प्याटप्प्याने वाढवण्याची शासन तरतूद आहे. २०१७-१८ आणि २०१८-१९ मध्ये दोन टप्प्यांनी करवाढ केली होती. करवाढीचा तिसरा टप्पा बुधवारी झालेल्या महासेभत मंजूर करण्यात आला आहे. त्यामुळे आता आता शहरातील उपहारगृहे, सिनेमागृहांना ही त्याचा फटका बसणार आहे.

आगाऊ कर भरलेल्यांना दिलासानागरिकांनी कर भरावा यासाठी शासनाकडून प्रोत्साहन दिले जात असते. पाच वर्षांंचा कर भरणाºयांना शासनाकडून सवलत दिली गेली होती. त्या आवाहनाला प्रतिसाद देऊन अनेक नागरिकांनी पाच वर्षांचा कर एकत्रित भरला होता. ज्यांनी आधीच कर भरला आहे, त्यांना वाढीव कर भरावा लागेल का, असा सवाल प्रभाग समिती आय च्या सभापती प्राची कोलासो यांनी केला. त्यावेळी ज्यांनी पाच वर्षांचा आगाऊ कर भरला आहे. त्यांना वाढीव कर भरावा लागणार नाही, असे आयुक्तांनी स्पष्ट केले.शिवसेनेने मांडली पूरग्रस्तांची कैफियतवसईत गतवर्षी जुलै-२०१८ मध्ये पावसाळ्यात मोठा पूर आला होता. त्याचा वसईतील हजारो नागरिकांना फटका बसला. त्यामुळे महापालिकेने किमान एक वर्ष तरी करवाढ पुढे ढकलावी, अशी मागणी शिवसेना गटनेत्या किरण चेंदवणकर यांनी केली. परंतु आयुक्तांनी ती फेटाळून लावली.ग्रामीण भागात सोयी-सुविधा न देता केवळ कर वाढवला जात असल्या बद्दल शिवसेना नगरसेविका प्रीती म्हात्रे यांनी त्यावेळी विरोध केला. पूर्वपट्टीतील गावात तर महापालिकेचे साधे पाणी सुद्धा नाही इतर सोयीसुविधा तर दूरच आहेत. मग ही ८० टक्के करवाढ का, असा सवाल ही उपस्थित झाला आहे.

आगाऊ कर भरलेल्यांना दिलासानागरिकांनी कर भरावा यासाठी शासनाकडून प्रोत्साहन दिले जात असते. पाच वर्षांंचा कर भरणाºयांना शासनाकडून सवलत दिली गेली होती. त्या आवाहनाला प्रतिसाद देऊन अनेक नागरिकांनी पाच वर्षांचा कर एकत्रित भरला होता. ज्यांनी आधीच कर भरला आहे, त्यांना वाढीव कर भरावा लागेल का, असा सवाल प्रभाग समिती आय च्या सभापती प्राची कोलासो यांनी केला. त्यावेळी ज्यांनी पाच वर्षांचा आगाऊ कर भरला आहे. त्यांना वाढीव कर भरावा लागणार नाही, असे आयुक्तांनी स्पष्ट केले.