शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025: मोहसीन नक्वी टीम इंडियाला ट्रॉफी द्यायला झाले तयार, पण आता ठेवली 'ही' एक अट
2
तब्बल २२ वाहने चोरणाऱ्या आंतरराज्य चोरट्याला सांगलीत अटक; १६ लाखांचा मुद्देमाल जप्त
3
चांदी दीड लाख रूपये किलो, सप्टेंबरमध्ये २१,५२७ रुपयांची झेप; सोन्याचीही ११ हजारांची उडी
4
भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार पती-पत्नी जागीच ठार; कोहमारा-वडसा मार्गावरील घटना
5
भाजपा पदाधिकाऱ्याची पत्नीसह ३ ठिकाणी मतदारयादीत नावे, एका दुकानावर २५ नावे- काँग्रेसचा आरोप
6
पंतप्रधान मोदी करणार ‘मुख्यमंत्री अल्पमुदतीचे रोजगारक्षम अभ्यासक्रम’ कार्यक्रमाचे उद्घाटन
7
'या' दिवसापर्यंत गपचूप ट्रॉफी भारताला द्या नाहीतर...; BCCIचे मोहसीन नक्वी यांना 'अल्टीमेटम'
8
दहिसर टोलनाका वाहतूककोंडी दूर करण्यासाठी मंत्री प्रताप सरनाईक यांनी सुचवल्या उपाययोजना
9
१०० वर्षांनी हंस महालक्ष्मी योग: ८ राशींचे कल्याण, कल्पनेपलीकडे लाभ; अपार यश, भरघोस भरभराट!
10
“शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान, भरीव मदत सरकार देईल, उद्या मंत्रिमंडळ बैठकीत...”: संजय शिरसाट
11
"दुसऱ्याच महिन्यात रंगेहाथ पकडलं...!" धनश्री वर्माचा खळबळजनक खुलासा, युजवेंद्र चहलनं लग्नाच्या पहिल्याच वर्षात दिला होता धोका?
12
अंधेरी क्रीडा संकुल महापालिकेने स्वतः उभारावे; गोपाळ शेट्टी यांची पालिका आयुक्तांकडे मागणी
13
"ही सगळी नाटकं, पाकिस्तानसोबत खेळायलाच नको होतं"; भारत-पाक सामन्यावरुन आदित्य ठाकरेंनी सुनावलं
14
भाजप कार्यालय आमच्यासाठी इमारत नाही, मंदिर आहे; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केल्या भावना...
15
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय! आता 'या' उद्योगावर लादला १००% कर; भारताला सर्वाधिक फटका...
16
“दसरा मेळाव्याबाबत सदसद्विवेकबुद्धीला स्मरून निर्णय घ्यावा”; अजित पवारांचा रोख कुणाकडे?
17
१० वर्षांपासून सत्ता असलेल्या राज्यात भाजपाला जबर धक्का, निवडणुकीत मिळाल्या ४० पैकी केवळ ५ जागा   
18
कुठलाही क्रिकेट सामना हे सत्य बदलू शकत नाही; PM मोदींच्या ट्विटवर मोहसीन नक्वींची दर्पोक्ती
19
विघ्नहर्ता बाप्पा संकटात धावला! श्री सिद्धीविनायक मंदिर अतिवृष्टीबाधितांसाठी १० कोटी देणार
20
IND vs PAK Final : "ते स्वतः स्ट्राइकवर येऊन..." PM मोदींसंदर्भात नेमकं काय म्हणाला सूर्यकुमार यादव?

वसईत पंचायत समितीच्या निवडणुकीची लगबग सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2019 23:30 IST

पक्ष समीकरणाकडे मतदारांचे लक्ष : राजकीय पक्षांच्या कार्यालयांत इच्छुकांची भाऊगर्दी

सुनिल घरत ।लोकमत न्यूज नेटवर्कपारोळ : वसई तालुक्यातील आठ गणांसाठी व चार जिल्हा परिषद गटासाठी निवडणुकीची ७ जानेवारीला निवडणूक होत असल्याने व उमेदवारी अर्ज भरण्याची तारीख १८ ते २३ डिसेंबर असल्याने निवडणुकीची लगीनघाई सुरू झाली असून राजकीय पक्षांच्या कार्यालयात कार्यकर्त्यांची लगबग वाढली आहे. दरम्यान, यंदाच्या विधानसभा निवडणुकीनंतर राजकीय गणिते बदलली आहेत. त्यामुळे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत सुद्धा हेच चित्र दिसणार का? कोण कोणाशी आघाडी करतेय? याकडे वसईतील मतदारांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, उमेदवारी अर्ज भरण्यासाठी वेळ कमी असल्याने रात्र थोडी सोंगे फार अशीच स्थिती उमेदवारांची झाली आहे.वसई तालुका नागरी, सागरी व डोंगरी अशा स्वरूपात विस्तारला असून या तालुक्यात ३१ ग्रामपंचायती आहेत. काही गावांचा प्रश्न अजूनही प्रलंबित आहे. मागील पंचायत समितीच्या निवडणुकीत बहुजन विकास आघाडीने सहा जागा व जनआंदोलनने दोन जागा जिंकल्या होत्या. त्या वेळी शिवसेना व जनआंदोलन यांची युती होती. मात्र बहुजन विकास आघाडीने पंचायत समितीवर सत्ता मिळवली होती.अलीकडेच झालेल्या विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात महाविकास आघाडी सत्तेत असल्याने वसई पंचायत समितीचीही गणिते बदलणार आहेत. बहुजन विकास आघाडीने राज्यात सत्तेवर आलेल्या महाविकास आघाडीला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे पालघर जिल्ह्यात आघाडी एकत्र लढल्यास यामध्ये बहुजन विकास आघाडी सामील का, हाही एक प्रश्नच आहे. तर श्रमजीवी संघटना ही आपले पत्ते उघड करत नसल्याने त्यांनीही पंचायत समिती निवडणुकीत उमेदवार उतरवण्याची तयारी सुरू केली आहे. भाजपही स्वबळावर निवडणूक लढण्याची शक्यता आहे. जर महाविकास आघाडीने वसई पंचायत समिती निवडणूक लढवली तर काँग्रेस व राष्ट्रवादीलाही वाटा द्यावा लागेल. मागील निवडणूक सर्व पक्ष एकत्र येत बहुजन विकास आघाडीविरोधात निवडणूक लढवल्याने या निवडणुकीत शिवसेना, भाजपा, श्रमजीवी संघटना वसई पुरती का होईना मोट बांधते का, याकडेही वसईकरांची नजर लागली आहे. वसई तालुक्यातील आगामी पंचायत समितीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वसईतील आठ गणांसाठी आरक्षण जाहीर करण्यात आले. यामध्ये चार गणांमध्ये महिलांचे आरक्षण देण्यात आले आहे. तालुक्यातील भाताणे, मेढे, तिल्हेर, चंद्रपाडा, अनार्ळा, अनार्ळा किल्ला, कळंब, वासळई या आठ गणांवर पंचायत समिती सदस्यांसाठी आरक्षण सोडत झाली. यामध्ये भाताणे गणासाठी नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग, मेढे आणि अर्नाळा किल्ला गणासाठी सर्वसाधारण जागा, तिल्हेर गणासाठी नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग महिला, चंद्रपाडा आणि कळंब येथे अनुसूचित जमाती महिला, तर वासळई गणासाठी सर्वसाधारण महिला आणि अर्नाळा येथे अनुसूचित जमाती अशा जागा आरक्षित केल्या आहेत.रात्र थोडी सोंगे फारच्उमेदवारी अर्ज भरण्यासाठी वेळ खूपच कमी असल्याने रात्र थोडी सोंगे फार अशीच स्थिती उमेदवार आणि पदाधिकाऱ्यांची झाली आहे.च्यात जातपडताळणी महत्त्वाची असल्याने तिची पावती मिळाली नाही तर इच्छुक असूनही उमेदवाराला अर्ज भरता येणार नाही. यामुळे पक्ष कार्यालयात इच्छुकांची गर्दी होत असून त्यांच्या कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी पदाधिकाऱ्यांचीही डोकेदुखी वाढली आहे.