शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने भारताची भीती घेतली! पीओकेमधील हॉटेल्स अन् गेस्ट हाऊसमध्ये सैन्य; मदरसे बंद
2
पाकिस्तानने अटारी, वाघा बॉर्डरचे गेट उघडले; धास्ती एवढी की पाकिस्तानींनाही घेत नव्हते...
3
श्रीराम दर्शनाची ओढ लागली, ३०० वर्षे जुनी परंपरा मोडली; हनुमानगढीचे महंत मंदिराबाहेर पडले!
4
बजाज चेतकला एप्रिल फूल बनविले; टीव्हीएस पहिल्यांदाच नंबर १, विक्रीत ओला कुठे...
5
पाकिस्तानी हवाई क्षेत्र बंद; एअर इंडियाल 5000 कोटी रुपयांचा फटका बसण्याचा अंदाज...
6
दारूच्या व्यसनाने आई आणि चुलतीचा खून; बीड जिल्हा दोन हत्येच्या घटनांनी हादरला
7
पंकजा मुंडेंना कॉल अन् पाठवला अश्लील मेसेज, पुण्यातील तरुणाला पोलिसांनी केली अटक
8
CEOs चा १ तासाचा पगार सामान्य कर्मचाऱ्याच्या वर्षाच्या पगाराइतका, एका रिपोर्टमध्ये झाले अनेक आश्चर्यकारक खुलासे
9
अन्न पुन्हा गरम करणं आरोग्यासाठी ठरतंय घातक; 'या' ५ गोष्टी टाळाल तरच ठणठणीत राहाल
10
 संतापजनक! मासिक पाळीत स्वयंपाक करणं महिलेच्या जीवावर बेतलं,नणंद आणि सासूने खून केल्याचा आरोप, दोन मुलं अनाथ
11
नवी मुंबईत ठाकरे गटाला खिंडार! माजी नगरसेवकांचे उद्धवसेनेला जय महाराष्ट्र, शिंदेसेनेत प्रवेश
12
"मॅडम येत आहेत, त्यांना..."; पोलीस असल्याचं सांगून दुकानात घुसले अन् २ लाखांचे दागिने चोरले
13
ISI कडून मिळाले आदेश, बेताब खोऱ्यात लपवली शस्त्रे; NIA च्या अहवालात धक्कादायक खुलासा
14
संजय राऊतांनी PM मोदींच्या नेतृत्वक्षमतेवर घेतली शंका; म्हणाले, “शाह यांचा राजीनामा का घेत नाही”
15
काश्मीरात सर्च ऑपरेशन सुरूच, आतापर्यत ३००० जण ताब्यात; जंगलात लपलेत पहलगाम हल्ल्याचे दहशतवादी
16
चिनी कर्मचाऱ्यांना पगारही मिळत नाहीये, ट्रम्प टॅरिफमुळे कारखाने होताहेत बंद; कामगार उतरले रस्त्यावर
17
हॉटेलमधील 'तो' पदार्थ खाणं पडलं महागात! निक्की तांबोळीला ICU मध्ये केलं दाखल, आता कशी आहे अभिनेत्रीची तब्येत?
18
"हा, आम्ही दहशतवादी पोसले पण आता..."; संरक्षण मंत्र्यानंतर बिलावल भुट्टोनेही दिली कबुली
19
Nashik Hit and Run: भावासमोरच जयश्रीने सोडला जीव, नाशिकमध्ये पिकअपने तीन वाहनांना उडवले
20
Ganga Saptami 2025: गंगा सप्तमीला 'हे' उपाय केले असता घरात येईल सुख समृद्धी!

स्वच्छतेत वसई महापालिका ३६ वी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2019 23:59 IST

स्वच्छ सर्वेक्षण 2019 अंतर्गत केलेल्या सर्वेक्षणाचा निकाल बुधवारी जाहिर करण्यात आला

वसई : स्वच्छ सर्वेक्षण 2019 अंतर्गत केलेल्या सर्वेक्षणाचा निकाल बुधवारी जाहिर करण्यात आला असून, स्वच्छतेच्या बाबतीत देशातले तिसरे सर्वाधिक चांगली कामगिरी करणारे राज्य होण्याचा मान महाराष्ट्राने मिळवला आहे. या यादीत पहिला क्र मांक छत्तीसगड तर दुसऱ्या क्र मांकावर झारखंड आहे. वसई विरार महानगरपालिका या सर्वेक्षणात देशात ३६ व्या स्थानी आहे.देशातील ४२३७ शहरांमध्ये हे सर्वेक्षण करण्यात आलं होतं. २८ दिवस डिजीटल पद्धतीने करण्यात आलेल्या या सर्वेक्षणाचे निकाल राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी दिल्ली येथे घोषित केले.स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत वसई विरार शहर महानगपालिकेला यंदाचा कचरा मुक्त महापालिका म्हणून राज्यातून तिसऱ्या क्रमांकाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. तर स्वच्छ सर्वेक्षण अभियानात देशभरातून ३६ वा क्र मांक मिळाला आहे. गतवर्षी सर्वेक्षणात पालिका ६७ व्या क्रमांकावर आली होती. वसई विरार महापालिकेचे महापौर रूपेश जाधव यांनी बुधवारी दिल्ली येथे हा पुरस्कार स्वीकारला असून गेल्या पाच वर्षात पालिकेचा स्वच्छ भारत अभियानामधील आलेख वाढत असल्याने समाधान व्यक्त करण्यात येत आहे.केंद्र शासनातर्फे स्वच्छ भारत अभियान स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या सर्वेक्षणात देशभारीत ४ हजार २३७ शहराचे सर्वेक्षण करण्यात आले होते. ६४ लाख प्रतिसाद आणि ४ कोटी लोकांनी समाजमाध्यमावरून या सर्वेक्षणात भाग घेता होता. या सर्वेक्षणात कचरामुक्त महानगरपालिका म्हणून वसई विरार महानगरपालिकेला महाराष्ट्रातून तिसरा क्रमांक मिळाला आहे. तर स्वच्छ सर्वेक्षणमध्ये संपूर्ण देशभरातून ३६ वा क्रमांक महानगरपालिकेला मिळाला. त्याचा पुरस्कार प्रधान सोहळा आज विज्ञान भवन दिल्ली येथे संपन्न झाला. यावेळी वसई विरार शहर महापालिकेचे महापौर रुपेश जाधव, उपमहापौर प्रकाश रॉड्रिग्ज, तत्कालीन आयुक्त सतीश लोखंडे, पालिका आयुक्त बळीराम पवार, शहर अभियंता माधव जवादे यांनी पालिकेतर्फे पुरस्कार स्वीकारला.महानगरपालिकेचे क्षेत्र ३४६३१ हेक्टर इतके आहे. महानगरपालिकेची लोकसंख्या सद्यस्थीतीत १७ लाखाच्या आसपास आहे. महानगरपालिका निवडून आलेले सदस्य ११५इतके असून ५ स्वीकृत नगरसेवक मिळून १२० सदस्य आहेत. २०१४ साली सुरु झालेल्या स्वच्छ भारत मिशन मध्ये महानगरपालिका प्रत्येक सर्वेक्षणात भाग घेत असून त्यासाठी मोठ्या प्रमाणावर प्रयत्न देखील केलेले आहेत.>गोल्डन बुक आॅफ रेकॉर्डमध्ये नोंद२०१७ या वर्षी लोक सहभागातून राबविलेल्या स्वच्छता मोहीमेत २७ हजाराहून अधिक नागरीकांनी भाग घेतला व त्याची नोंद गोल्डन बुक आॅफ वर्ल्ड रेकार्ड मध्ये झाली. केंद्र शासनाच्या स्वच्छ भारत अभियांना अंतर्गत हगणदारी मुक्त शहर म्हणून गेल्या वर्षी महापालिकेला घोषित करण्यांत आले होते. १० हजार ६०७वैयक्तीक शौचालये बांधली असून ५६४ सामुदायिक शौचालये बांधून पूर्ण झाली आहेत. स्वच्छ भारत अभियांना अंतर्गत आतापर्यंत वसई विरार शहर महानगरपालिकेला २०१६ साली ३५ वा , २०१७ साली १३९ वा क्रमांक, २०१८साली ६१ वा आणि यंदा ३६ वा क्र मांक अशी मानांकने मिळाली आहेत. तसेच यंदा स्वच्छ भारत अभियांना अंतर्गत कचरा मुक्त महापालिका म्हणून राज्यातून तिसरा क्र मांक मिळाला आहे. नागरीकांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्यानेच हे यश मिळाल्याचे महापालिकेने सांगितले.

टॅग्स :Vasai Virarवसई विरार