शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
3
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
4
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
5
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
8
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
9
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
10
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
11
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
12
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
13
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
14
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
15
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
16
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
17
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
18
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
19
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
20
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
Daily Top 2Weekly Top 5

स्वच्छतेत वसई महापालिका ३६ वी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2019 23:59 IST

स्वच्छ सर्वेक्षण 2019 अंतर्गत केलेल्या सर्वेक्षणाचा निकाल बुधवारी जाहिर करण्यात आला

वसई : स्वच्छ सर्वेक्षण 2019 अंतर्गत केलेल्या सर्वेक्षणाचा निकाल बुधवारी जाहिर करण्यात आला असून, स्वच्छतेच्या बाबतीत देशातले तिसरे सर्वाधिक चांगली कामगिरी करणारे राज्य होण्याचा मान महाराष्ट्राने मिळवला आहे. या यादीत पहिला क्र मांक छत्तीसगड तर दुसऱ्या क्र मांकावर झारखंड आहे. वसई विरार महानगरपालिका या सर्वेक्षणात देशात ३६ व्या स्थानी आहे.देशातील ४२३७ शहरांमध्ये हे सर्वेक्षण करण्यात आलं होतं. २८ दिवस डिजीटल पद्धतीने करण्यात आलेल्या या सर्वेक्षणाचे निकाल राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी दिल्ली येथे घोषित केले.स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत वसई विरार शहर महानगपालिकेला यंदाचा कचरा मुक्त महापालिका म्हणून राज्यातून तिसऱ्या क्रमांकाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. तर स्वच्छ सर्वेक्षण अभियानात देशभरातून ३६ वा क्र मांक मिळाला आहे. गतवर्षी सर्वेक्षणात पालिका ६७ व्या क्रमांकावर आली होती. वसई विरार महापालिकेचे महापौर रूपेश जाधव यांनी बुधवारी दिल्ली येथे हा पुरस्कार स्वीकारला असून गेल्या पाच वर्षात पालिकेचा स्वच्छ भारत अभियानामधील आलेख वाढत असल्याने समाधान व्यक्त करण्यात येत आहे.केंद्र शासनातर्फे स्वच्छ भारत अभियान स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या सर्वेक्षणात देशभारीत ४ हजार २३७ शहराचे सर्वेक्षण करण्यात आले होते. ६४ लाख प्रतिसाद आणि ४ कोटी लोकांनी समाजमाध्यमावरून या सर्वेक्षणात भाग घेता होता. या सर्वेक्षणात कचरामुक्त महानगरपालिका म्हणून वसई विरार महानगरपालिकेला महाराष्ट्रातून तिसरा क्रमांक मिळाला आहे. तर स्वच्छ सर्वेक्षणमध्ये संपूर्ण देशभरातून ३६ वा क्रमांक महानगरपालिकेला मिळाला. त्याचा पुरस्कार प्रधान सोहळा आज विज्ञान भवन दिल्ली येथे संपन्न झाला. यावेळी वसई विरार शहर महापालिकेचे महापौर रुपेश जाधव, उपमहापौर प्रकाश रॉड्रिग्ज, तत्कालीन आयुक्त सतीश लोखंडे, पालिका आयुक्त बळीराम पवार, शहर अभियंता माधव जवादे यांनी पालिकेतर्फे पुरस्कार स्वीकारला.महानगरपालिकेचे क्षेत्र ३४६३१ हेक्टर इतके आहे. महानगरपालिकेची लोकसंख्या सद्यस्थीतीत १७ लाखाच्या आसपास आहे. महानगरपालिका निवडून आलेले सदस्य ११५इतके असून ५ स्वीकृत नगरसेवक मिळून १२० सदस्य आहेत. २०१४ साली सुरु झालेल्या स्वच्छ भारत मिशन मध्ये महानगरपालिका प्रत्येक सर्वेक्षणात भाग घेत असून त्यासाठी मोठ्या प्रमाणावर प्रयत्न देखील केलेले आहेत.>गोल्डन बुक आॅफ रेकॉर्डमध्ये नोंद२०१७ या वर्षी लोक सहभागातून राबविलेल्या स्वच्छता मोहीमेत २७ हजाराहून अधिक नागरीकांनी भाग घेतला व त्याची नोंद गोल्डन बुक आॅफ वर्ल्ड रेकार्ड मध्ये झाली. केंद्र शासनाच्या स्वच्छ भारत अभियांना अंतर्गत हगणदारी मुक्त शहर म्हणून गेल्या वर्षी महापालिकेला घोषित करण्यांत आले होते. १० हजार ६०७वैयक्तीक शौचालये बांधली असून ५६४ सामुदायिक शौचालये बांधून पूर्ण झाली आहेत. स्वच्छ भारत अभियांना अंतर्गत आतापर्यंत वसई विरार शहर महानगरपालिकेला २०१६ साली ३५ वा , २०१७ साली १३९ वा क्रमांक, २०१८साली ६१ वा आणि यंदा ३६ वा क्र मांक अशी मानांकने मिळाली आहेत. तसेच यंदा स्वच्छ भारत अभियांना अंतर्गत कचरा मुक्त महापालिका म्हणून राज्यातून तिसरा क्र मांक मिळाला आहे. नागरीकांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्यानेच हे यश मिळाल्याचे महापालिकेने सांगितले.

टॅग्स :Vasai Virarवसई विरार