शहरं
Join us  
Trending Stories
1
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
2
मतांच्या चोरीबाबत भक्कम पुरावे, निवडणूक आयोगाला तोंड लपवायला जागा उरणार नाही: राहुल गांधी
3
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स
4
पत्नीला संपवलं अन् हॉस्पिटलमध्ये जाऊन म्हणाला साप चावला; दिव्यांग मुलींनी केली पित्याची पोलखोल 
5
निर्जन रस्ता, अर्धवट जळालेला मृतदेह अन् रहस्यमय गुंता...; १३ वर्षीय मुलाच्या हत्येमागे ट्विस्ट काय?
6
RSS प्रमुख मोहन भागवत यांना पकडा, माजी ATS अधिकाऱ्याचा हा दावा विशेष कोर्टाने फेटाळला
7
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹१४,८८८ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स
8
"हा पुरस्कार मी...", राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर शाहरुख खानची पोस्ट, पण फ्रॅक्चर हात पाहून चाहते चिंतेत
9
जम्मू-काश्मीर: कुलगाममध्ये चकमक, सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला केले ठार
10
आजचे राशीभविष्य २ ऑगस्ट २०२५ : कामात आघाडीवर राहाल, कौटुंबिक सौख्य लाभेल!
11
भारत आता रशियाकडून तेल खरेदी करणार नाही? डोनाल्ड ट्रम्प यांच्या चेहऱ्यावर उमटले हास्य! म्हणाले...
12
बिहारमध्ये ६५ लाख मतदार वगळले; नोंदणी केलेल्या मतदारांची संख्या ७.२४ कोटींपर्यंत घटली
13
कोल्हापुरात हायकोर्टाचे १८ ऑगस्टपासून ‘सर्किट बेंच’; ४० वर्षांच्या प्रदीर्घ लढ्याला अखेर यश
14
मालेगाव स्फोटप्रकरणी सिमीच्या अँगलने तपास व्हायला हवा होता; विशेष न्यायालयाने केले स्पष्ट
15
‘एफ-३५’ फायटर खरेदी प्रस्ताव रोखला; भारताचे अमेरिकेला प्रत्युत्तर, लोकसभेत सरकारची माहिती
16
आठवडाभर लांबले; भारतावरील २५ टक्के टॅरिफची अंमलबजावणी ७ ऑगस्टपासून, पाकचा कर घटवला
17
जनता दल सेक्युलरचे माजी खासदार प्रज्वल रेवण्णा दोषी, आज होणार शिक्षा; मोलकरणीचा लढा यशस्वी
18
आक्रमक खासदारांना रोखण्यासाठी थेट कमांडो; लोकशाही इतिहासातील हा एक काळा दिवस: काँग्रेस
19
युतीबाबत कुठेही भाष्य नको, महापालिका निवडणूक...; राज ठाकरे यांच्या पदाधिकाऱ्यांना कानपिचक्या
20
ST महामंडळ पेट्रोल-डिझेल विकणार; केंद्र व राज्य सरकारचा भागीदारी प्रकल्प: प्रताप सरनाईक

स्वच्छतेत वसई महापालिका ३६ वी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2019 23:59 IST

स्वच्छ सर्वेक्षण 2019 अंतर्गत केलेल्या सर्वेक्षणाचा निकाल बुधवारी जाहिर करण्यात आला

वसई : स्वच्छ सर्वेक्षण 2019 अंतर्गत केलेल्या सर्वेक्षणाचा निकाल बुधवारी जाहिर करण्यात आला असून, स्वच्छतेच्या बाबतीत देशातले तिसरे सर्वाधिक चांगली कामगिरी करणारे राज्य होण्याचा मान महाराष्ट्राने मिळवला आहे. या यादीत पहिला क्र मांक छत्तीसगड तर दुसऱ्या क्र मांकावर झारखंड आहे. वसई विरार महानगरपालिका या सर्वेक्षणात देशात ३६ व्या स्थानी आहे.देशातील ४२३७ शहरांमध्ये हे सर्वेक्षण करण्यात आलं होतं. २८ दिवस डिजीटल पद्धतीने करण्यात आलेल्या या सर्वेक्षणाचे निकाल राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी दिल्ली येथे घोषित केले.स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत वसई विरार शहर महानगपालिकेला यंदाचा कचरा मुक्त महापालिका म्हणून राज्यातून तिसऱ्या क्रमांकाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. तर स्वच्छ सर्वेक्षण अभियानात देशभरातून ३६ वा क्र मांक मिळाला आहे. गतवर्षी सर्वेक्षणात पालिका ६७ व्या क्रमांकावर आली होती. वसई विरार महापालिकेचे महापौर रूपेश जाधव यांनी बुधवारी दिल्ली येथे हा पुरस्कार स्वीकारला असून गेल्या पाच वर्षात पालिकेचा स्वच्छ भारत अभियानामधील आलेख वाढत असल्याने समाधान व्यक्त करण्यात येत आहे.केंद्र शासनातर्फे स्वच्छ भारत अभियान स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या सर्वेक्षणात देशभारीत ४ हजार २३७ शहराचे सर्वेक्षण करण्यात आले होते. ६४ लाख प्रतिसाद आणि ४ कोटी लोकांनी समाजमाध्यमावरून या सर्वेक्षणात भाग घेता होता. या सर्वेक्षणात कचरामुक्त महानगरपालिका म्हणून वसई विरार महानगरपालिकेला महाराष्ट्रातून तिसरा क्रमांक मिळाला आहे. तर स्वच्छ सर्वेक्षणमध्ये संपूर्ण देशभरातून ३६ वा क्रमांक महानगरपालिकेला मिळाला. त्याचा पुरस्कार प्रधान सोहळा आज विज्ञान भवन दिल्ली येथे संपन्न झाला. यावेळी वसई विरार शहर महापालिकेचे महापौर रुपेश जाधव, उपमहापौर प्रकाश रॉड्रिग्ज, तत्कालीन आयुक्त सतीश लोखंडे, पालिका आयुक्त बळीराम पवार, शहर अभियंता माधव जवादे यांनी पालिकेतर्फे पुरस्कार स्वीकारला.महानगरपालिकेचे क्षेत्र ३४६३१ हेक्टर इतके आहे. महानगरपालिकेची लोकसंख्या सद्यस्थीतीत १७ लाखाच्या आसपास आहे. महानगरपालिका निवडून आलेले सदस्य ११५इतके असून ५ स्वीकृत नगरसेवक मिळून १२० सदस्य आहेत. २०१४ साली सुरु झालेल्या स्वच्छ भारत मिशन मध्ये महानगरपालिका प्रत्येक सर्वेक्षणात भाग घेत असून त्यासाठी मोठ्या प्रमाणावर प्रयत्न देखील केलेले आहेत.>गोल्डन बुक आॅफ रेकॉर्डमध्ये नोंद२०१७ या वर्षी लोक सहभागातून राबविलेल्या स्वच्छता मोहीमेत २७ हजाराहून अधिक नागरीकांनी भाग घेतला व त्याची नोंद गोल्डन बुक आॅफ वर्ल्ड रेकार्ड मध्ये झाली. केंद्र शासनाच्या स्वच्छ भारत अभियांना अंतर्गत हगणदारी मुक्त शहर म्हणून गेल्या वर्षी महापालिकेला घोषित करण्यांत आले होते. १० हजार ६०७वैयक्तीक शौचालये बांधली असून ५६४ सामुदायिक शौचालये बांधून पूर्ण झाली आहेत. स्वच्छ भारत अभियांना अंतर्गत आतापर्यंत वसई विरार शहर महानगरपालिकेला २०१६ साली ३५ वा , २०१७ साली १३९ वा क्रमांक, २०१८साली ६१ वा आणि यंदा ३६ वा क्र मांक अशी मानांकने मिळाली आहेत. तसेच यंदा स्वच्छ भारत अभियांना अंतर्गत कचरा मुक्त महापालिका म्हणून राज्यातून तिसरा क्र मांक मिळाला आहे. नागरीकांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्यानेच हे यश मिळाल्याचे महापालिकेने सांगितले.

टॅग्स :Vasai Virarवसई विरार