शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

भरावामुळे वसई बुडाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2018 23:10 IST

जलप्रलय नैसर्गिक नव्हता; अवैध बांधकामे, भूमाफिया हेच कारणीभूत

पारोळ : वसईतील शेकडो कोटींची मालमत्ता व चौघे बळी जाण्यास कारणीभूत ठरलेला जलप्रलय हा निसर्ग निर्मित नव्हता तर बेकायदेशीर माती भराव आणि पाणथळ जागांवरील अतिक्र मणे, भू माफिया यामुळेच वसई बुडल्याचा आरोप शिवसेनेचे पालघर उपजिल्हाप्रमुख विवेक पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात केला असून, बेकायदेशीर माती भराव करणाऱ्या भूमाफीयांबाबत वेळोवेळी पूर्वकल्पना देऊनही उपाय योजना न करणाºया प्रशासकीय अधिकाºयांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी त्यांनी केली आहे. गेल्या आठवड्यात अतिवृष्टी होऊन वसई-विरार नालासोपारा पाण्याखाली गेले. त्यामुळे अनेक नागरिकांचे संसारच उघड्यावर पडले. अजूनही वसईतील नागरिकांना या घटनेपासून सावरता आलेले नाही.त्याचे तीव्र पडसाद येथे उमटत आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिलेल्या सविस्तर निवेदनात पाटील यांनी म्हटले आहे की, वसई पूर्वेच्या राजावली ग्रामंपचायतीच्या हद्दीत सर्व्हे नंबर १ ते १००, २७२, २७४, २८०, २८१, २६६ व ३३१ मध्ये झालेल्या बेकायदेशीर माती भरावामुळेच बºयाच ठिकाणी पूरस्थिती निर्माण होऊन मोठा परिसर पाण्याखाली गेला.येथील खार जमिनीत (राजाळखार) सहारा ग्रुपने मोठ्या प्रमाणात माती भरावाचे काम केलेले असून हा भराव जवळजवळ शेतजमिनीपासून आठ ते दहा फूट उंच आहे. येथूनच सोपारा-वालीव, सातिवली मार्गे पाणी येते ते नायगाव खाडीला, अर्थात समुद्राला मिळते. पावसाळ्यात तुंगारेश्वर डोंगराचे पाणी, नालासोपारा-विरार शहरातील पाणी, गोखिवरे भागातील पाणी या सर्व ठिकाणच्या पावसाळी पाण्याचा निचरा याच सोपारा-वसई खाडीमार्गे होत असतो. पेल्हार धरण जेव्हा ओव्हर फ्लो होते त्याचे पाणी येथूनच येते. ज्या ठिकाणी भराव झालेला आहे, पूर्वी पूरपरिस्थितीतही त्या ठिकाणाहून जवळजवळ तीन मैल अंतरापर्यंत पाणी त्या शेतजमिनीवरून पसरून वाहत असे! आता फक्त सोपारा-वसई-नायगाव खाडीतूनच पाण्याचा निचरा होतो. त्यामुळे नवघर पूर्व भागातील कारखाने आदी भाग पाण्याखाली गेला. कारण विस्तृत पाणी वहायचे बंद झाले. आधी ज्या पाण्याचा निचरा एक दिवसात व्हायचा, त्याला आता पाच दिवस लागले.त्यांनी दिलेल्या या निवेदनात पुढे म्हटले आहे की, आम्ही दि. ६/६/२०१५ व दि. ७/७/२०१५ रोजी याबाबतीत जिल्हाधिकारी जिल्हा ठाणे व स्थानिक प्राधिकरणाला निवेदने देऊन तक्रार केली असता तहसीलदार, वसई तालुका यांनी संंबंधित ‘सहारा’ बिल्डरला बेकायदेशीर माती भराव केल्याप्रकरणी ४ कोटींची दंडात्मक नोटीस बजावली व ते काम बंद केले. पण सिडकोची परवानगी न घेता बेकायदेशीरपणे केलेला भराव तसाच आहे. जर आम्ही आधीच दिलेल्या निवेदनानुसार शासनाने तो भराव काढून टाकला असता तर आज जी वसई पाण्यात बुडाली ती बुडाली नसती दृश्य दिसले नसते तो भराव बेकायदेशीर आहे.

दोषी संबंधित अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात यावेत. तसेच या भागातून पाणी जाण्याचे मार्ग मोकळे करावेत, याची चौकशी करु न दोषींविरोधात गुन्हे दाखल करावेत. नागरिकांची भविष्यात होणाºया माती भरावाच्या धोक्यापासून मुक्तता करावी, असेही त्यांनी निवेदनात म्हटले आहे. ​​​​​​​‘वसई का बुडाली’; आज होणार परिसंवाद ...वसई प्रतिनिधी : अतिवृष्टीच्या काळात वसई विरार शहरातील अनेक भाग पाण्याखाली गेले होते, या तालुक्याची वाताहात का झाली,याची नेमकी कोणती कारणे आहेत ती शोधायला हवीत. या पार्श्वभूमीवर ‘वसई का बुडाली’ या विषयांवर पर्यावरण संवर्धन समितीतर्फे रविवारी दि. २२ जुलै सायंकाळी ५ वाजता माणिकपूर येथील समाज उन्नती मंडळ सभागृहात परिसंवाद होणार आहे.या परिसंवादात जेष्ठ साहित्यिक व हरित वसईसाठी लढा देणारे फादर फ्रान्सिस दिब्रिटो ,नगररचनाकार आणि माजी मंत्री चंद्रशेखर प्रभू मार्गदर्शन करतील. तसेच या परिसंवादासाठी पालघर जिल्हाधिकारी डॉ.प्रशांत नारनवरे यांचीही उपस्थिती लाभणार असल्याची माहिती पर्यावरण संवर्धन समितीचे समन्वयक समीर वर्तक यांनी दिली.

टॅग्स :Vasai Virarवसई विरारRainपाऊस