शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील चुरशीच्या लढतीत आणखी एक ट्विस्ट; शेवटच्या दिवशी नवा उमेदवार मैदानात!
2
“राजकारणात माझा जन्म ४ दिवसांचा, पण...”; उज्ज्वल निकम मैदानात, विरोधकांना थेट आव्हान
3
"काँग्रेसने आपला पराभव स्वीकारला..."; स्मृती इराणींचा राहुल गांधींवर जोरदार निशाणा
4
बारामतीत 'इमोशनल इम्पॅक्ट' ओसरतोय?; सुनेत्रा पवारांच्या प्रचारातील 'या' फॅक्टर्समुळे वारं फिरण्याची शक्यता
5
कोविशील्ड लसीचे नेमके किती दुष्परिणाम?; कोरोना काळातील 'सुपरमॅन'ने सांगितलं 'सत्य'
6
"टीएमसी बंगालचे नाव खराब करत आहे", नरेंद्र मोदींचा ममता सरकारवर हल्लाबोल
7
Jairam Ramesh : "राहुल गांधी हे राजकारणातील अनुभवी खेळाडू, बुद्धिबळाच्या काही चाली बाकी आहेत"
8
अमिताभ बच्चन यांची एक पोस्ट अन् भाजप-ठाकरे गटात रंगलं ट्विटर वॉर, नेमकं काय घडलं ?
9
उद्धव ठाकरेंनी शब्द दिला अन् ऐनवेळी फिरवला; विजय करंजकरांनी भरला अपक्ष अर्ज
10
Share Market : शेअर बाजारात हाहाकार; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; रिलायन्स आपटला
11
MRF Share Price: एमआरएफ देणार आतापर्यंतचा सर्वाधिक डिविडंड, मोठ्या विक्रीमुळे शेअर्स ४ टक्क्यांपर्यंत घसरले
12
वृषभ संक्रांती: ७ राशींवर सूर्यकृपा, नोकरी-व्यवसायात फायदा; पद-पैसा वृद्धी, लाभाचा काळ!
13
तनिष्क प्रस्तुत करत आहे 'ग्लॅमडेज' - रोज वापरण्याजोग्या दागिन्यांची श्रेणी 
14
अ‍ॅडव्हान्स फीचर्ससह पल्सरचे नवीन मॉडेल लाँच, टॉप स्पीड पाहून बसेल धक्का!
15
पराभव, भीती की रणनीती...! राहुल गांधींनी अमेठीऐवजी रायबरेली मतदारसंघ का निवडला?
16
Apple नं केला कमाईचा रकॉर्ड; एका दिवसात Mukesh Ambani यांच्या नेटवर्थपेक्षा अधिक वाढलं मार्केट कॅप
17
Share Market Upcoming IPO : पैसे तयार ठेवा! या महिन्यात कमाईची संधी; कंपन्या IPO मधून १० हजार कोटी उभारणार
18
'माफी मागा, तुमच्या घाणेरड्या आरोपांनी...'; चित्रा वाघ यांना 'त्या' अभिनेत्याचा कारवाईचा इशारा
19
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : ठाकरे गटाच्या अडचणीत वाढ, विजय करंजकर अपक्ष उमेदवारी अर्ज भरणार
20
Chaitra Amavasya 2024: वास्तूला आणि कुटुंबियांना कायम निरोगी ठेवण्यासाठी चैत्र अमावस्येपासून सुरू करा 'हे' व्रत!

वसई ते भाईंदर १० मिनिटांत, ११०० कोटी रु पयांचा प्रकल्प पुढील दोन वर्षांत पूर्ण होणार

By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2019 12:15 AM

वसई-विरार उपप्रदेश आता भार्इंदर खाडी मार्गे मुंबई शहराला जोडण्याचा मार्ग े मोकळा झाला आहे. भार्इंदर खाडीवर हलक्या वाहनांसाठी सहा पदरी पूल बांधण्याच्या कामाची निविदा नुकतीच मंगळवारी एमएमआरडी ए प्राधिकरणने प्रसिद्ध केली.

वसई  - वसई-विरार उपप्रदेश आता भार्इंदर खाडी मार्गे मुंबई शहराला जोडण्याचा मार्ग े मोकळा झाला आहे. भार्इंदर खाडीवर हलक्या वाहनांसाठी सहा पदरी पूल बांधण्याच्या कामाची निविदा नुकतीच मंगळवारी एमएमआरडी ए प्राधिकरणने प्रसिद्ध केली. वर्ष २०१३ ला या कामाला मंजुरी देण्यात आली होती. सुमारे ११०० कोटी रु पयांचा हा प्रकल्प पुढील दोन वर्षांत पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. तर परिणामी या कामामुळे चक्क वसई ते भार्इंदर अंतर अवघ्या दहा मिनिटांत पार करू शकता येणार आहे.पश्चिम रेल्वे मार्गाने वसई-विरार शहर मुंबईला जोडले गेले असले तरी मात्र वाहन घेऊन मुंबईला जायचे असेल तर महामार्गावरून खाडीला वळसा घालून जावे लागत होते. त्यात भार्इंदरला जरी जायचे असेल तर काशिमिरा महामार्गावरून जावे लागत होते. वसई हून भार्इंदरला रेल्वेने जाण्यासाठी आतापर्यंत केवळ दहा मिनिटे लागत असून महामार्गावरून जाण्यासाठी सुमारे एक ते दीड तास लागत होता.त्यामुळे रस्तामार्गे जाताना नागरिकांचा वेळ आणि इंधनाचा अधिक खर्च होत असे. भार्इंदर-नायगाव दरम्यानचा ब्रिटिशकालीन लोखंडी पूल वापरासाठी देण्याची बरीच वर्षे नागरिकांची मागणी होती, परंतु तो कमकुवत असल्याने त्याला परवानगी मिळाली नाही. त्यामुळे भार्इंदर खाडीवर रेल्वे पुलाला समांतर असा पूल बांधावा, अशी पर्यायी मागणी समोर आली. तत्कालीन नवघर माणिकपूर नगर परिषदेने १०० कोटी रु पये खर्चाच्या पुलाचा प्रस्ताव तत्कालीन एमएमआरडीए अध्यक्ष रत्नाकर गायकवाड यांना सादर केला होता.वसईचे आमदार हितेंद्र ठाकूर यांनी एम एम आर डीए कडे खाडीवरून वाहनांच्या पुलाच्या मागणीसाठी पाठपुरावा सुरू केला होता. २०१३ मध्ये एमएमआरडीएने या पुलाच्या कामाला मंजुरी दिली होती. मात्र विविध कारणांमुळे पुलाच्या कामाच्या निविदा निघत नव्हत्या. अखेर मंगळवारी एमएमआरडीएने कामाच्या निविदा प्रसिद्ध केल्या आहेत. १६ आॅक्टोबर २०१९ पर्यंत निविदेला अंतिम मंजुरी मिळणार आहे. त्यामुळे या पुलासंदर्भातील सर्व प्रक्रि या पूर्ण झाल्या असून आम्ही निविदा प्रसिद्ध केल्याची माहिती प्रकल्प संचालक दिलीप कवठकर यांनी दिली.पाणजू वासीयांना बऱ्यापैकी आनंद : नायगाव व भार्इंदर या दरम्यान असणाºया पाणजू बेटावर जाण्यासाठी फेरीबोट हाच एकमेव पर्याय आहे. पावसाळ्यात बोटीने प्रवास करणे धोक्याचे असते. त्यामुळे पाणजूचे रहिवासी भार्इंदर खाडीवरील जुन्या रेल्वे पुलावरून जीव धोक्यात घालून चालत जातात. भार्इंदर खाडीवरील नव्या पुलाला पाणजू गावात उतार देण्यात आला आहे. त्यामुळे त्याची समस्या दूर झाली आहे. पुलाच्या सर्व प्रक्रि या पूर्ण झाल्या असून निविदा मंगळवारी प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. दोन वर्षांत पुलाचे काम पूर्ण होईल.पूल असा जोडणारनायगावला या पुलाला उतार मिळाल्यानंतर तो रिंगरूटला जोडला जाणार आहे. तेथून तो वसईमार्गे विरारच्या नारिंगीपर्यंत जोडला जाणार आहे. नारिंगी ते पालघर तालुक्यातील दातीवरे या खाडीवरील पुलाला मंजुरी मिळाली असल्याने पालघरातील नागरिकांनाही या मार्गाने मुंबई खूपच जवळ पडणार आहे. भार्इंदरला हा पूल नेताजी सुभाषचंद्र मार्गाला जोडून पुढे दिहसरपर्यंत जाणार आहे. यामुळे वसईहून वाहनाने निघालेली व्यक्ती थेट भार्इंदरला १० मिनिटांत आणि तेथून पुढे मुंबईला जाऊ शकणार आहे.

टॅग्स :Vasai Virarवसई विरारbhayandarभाइंदर