शहरं
Join us  
Trending Stories
1
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
2
"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
3
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
4
Google नं पहिल्यांदाच आणलं क्रेडिट कार्ड, लगेच मिळणार कॅशबॅक आणि रिवॉर्ड; काय आहे खास?
5
Mumbai Crime: शीतपेयातून गुंगीचा पदार्थ, मुंबईत अल्पवयीन मुलींवर ४५ वर्षाच्या व्यक्तीने...; व्हिडीओही बनवला
6
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
7
Tarot Card: 'ऐकावे जनाचे, करावे मनाचे' याची प्रचिती देणारा आठवडा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य 
8
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
9
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
10
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
11
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
12
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
13
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
14
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
15
"पहिल्यांदाच लेकाला सोडून शहराबाहेर आलोय..." विकी कौशलची भावुक प्रतिक्रिया
16
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
17
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
18
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
19
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
20
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

चर्चेवेळी उमेदवारांवर विविध प्रश्नांचा भडीमार

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 19, 2019 00:50 IST

व्यासपीठावर आरोप-प्रत्यारोप : उमेदवारांनी मांडला लेखाजोखा

वसई : वसईच्या मतदारांना विविध पक्षांची राज्यासाठीची धोरणे समजावी, या उद्देशाने वसईतील न्यू इंग्लिश स्कूल माजी विद्यार्थी महासंघ, जागरु क नागरिक संघटना आणि प्रा. स. गो वर्टी मेमोरिअल ट्रस्ट यांच्यातर्फे ‘विधानसभेसाठी आम्हीच का? ’ या कार्यक्र माचे नुकतेच आयोजन करण्यात आले होते.

यावेळी मंचावर बविआचे अध्यक्ष तथा वसई विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार आ. हितेंद्र ठाकूर, मनसेचे उमेदवार प्रफुल्ल ठाकूर उपस्थित होते. तर, महायुतीचे उमेदवार विजय पाटील अनुपिस्थत असल्याने त्यांच्यातर्फे मिलिंद खानोलकर यांनी आपली भूमिका मांडली.महाराष्ट्र नवानर्माण सेनेचे प्रफुल्ल ठाकूर यांनी पाणीप्रश्न, कचरा व्यवस्थापन, अनधिकृत बांधकामे, मोकळ्या सरकारी जागा, वीजव्यवस्थापन, शिक्षणाच्या सुविधा, परिवहन सेवा, पर्यावरण, आरोग्य सुविधा इत्यादी मुद्द्यांवरून सत्ताधाऱ्यांवर टीकास्त्र सोडले. तर मुसळधार पाऊस पूर्वीही यायचा, परंतु तेव्हा वसई बुडत नव्हती. आता दोन तास जरी पावसाचा शिडकावा झाला तरी अवघी वसई पाण्याखाली जाते. हे कोणाचे अपयश आहे, अशी विचारणा मनसेने केली आहे.

तर सेना-भाजप महायुतीचे उमेदवार विजय पाटील यांचे प्रतिनिधी मिलिंद खानोलकर यांनी यावेळी महापालिकेची परिवहन सेवा कंत्राटदाराच्या सोयीसाठी चालविण्यात येत असल्याचे सांगितले. तर महापालिकेने घरपट्टी आकारताना कायद्याचे उल्लंघन केल्याचा आरोप केला. अशाचप्रकारे ६९ गावांचा पाण्याचा प्रश्न अद्यापही अधांतरीच आहे. याशिवाय वसईत सुसज्ज असे शासकीय रुग्णालय नाही. समुद्रकिनाऱ्यांवर पुरेसे धूपप्रतिबंधक बंधारे नाहीत. परिणामी मच्छीमार आणि बागायतदारांचे मोठे नुकसान होत आहे, अशा अनेक समस्यांना त्यांनी हात घातला.नको त्या गोष्टींचा विरोधक बागुलबुवा करतातया सगळ्या आक्षेपांना आ. हितेंद्र ठाकूर यांनी रोखठोक उत्तर दिले. वसई - विरारमध्ये कोणतीही समस्या असली की त्यामागे आपलेच नाव घेतले जाते. या भागातून विधानपरिषद, शिक्षक, पदवीधर आदी माध्यमांतून निवडून गेलेल्या लोकप्रतिनिधींना अजिबात जाब विचारला जात नाही. मात्र, ही टीका मी सकारात्मकरित्या घेतो. हे मी माझे यश समजतो. आपण शहराच्या विकासावर मते मागत आहोत आणि विरोधकांकडे एकही मुद्दाच नसल्यामुळे ते नको त्या गोष्टींचा बागुलबुवा उभा करून जनतेमध्ये संभ्रम निर्माण करत आहेत, असे त्यांनी सांगितले.