शहरं
Join us  
Trending Stories
1
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
2
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
3
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
4
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
5
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
6
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
7
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
8
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
9
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
10
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
11
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
12
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
13
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
14
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
15
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
16
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
17
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
18
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
19
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
20
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग

चर्चेवेळी उमेदवारांवर विविध प्रश्नांचा भडीमार

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 19, 2019 00:50 IST

व्यासपीठावर आरोप-प्रत्यारोप : उमेदवारांनी मांडला लेखाजोखा

वसई : वसईच्या मतदारांना विविध पक्षांची राज्यासाठीची धोरणे समजावी, या उद्देशाने वसईतील न्यू इंग्लिश स्कूल माजी विद्यार्थी महासंघ, जागरु क नागरिक संघटना आणि प्रा. स. गो वर्टी मेमोरिअल ट्रस्ट यांच्यातर्फे ‘विधानसभेसाठी आम्हीच का? ’ या कार्यक्र माचे नुकतेच आयोजन करण्यात आले होते.

यावेळी मंचावर बविआचे अध्यक्ष तथा वसई विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार आ. हितेंद्र ठाकूर, मनसेचे उमेदवार प्रफुल्ल ठाकूर उपस्थित होते. तर, महायुतीचे उमेदवार विजय पाटील अनुपिस्थत असल्याने त्यांच्यातर्फे मिलिंद खानोलकर यांनी आपली भूमिका मांडली.महाराष्ट्र नवानर्माण सेनेचे प्रफुल्ल ठाकूर यांनी पाणीप्रश्न, कचरा व्यवस्थापन, अनधिकृत बांधकामे, मोकळ्या सरकारी जागा, वीजव्यवस्थापन, शिक्षणाच्या सुविधा, परिवहन सेवा, पर्यावरण, आरोग्य सुविधा इत्यादी मुद्द्यांवरून सत्ताधाऱ्यांवर टीकास्त्र सोडले. तर मुसळधार पाऊस पूर्वीही यायचा, परंतु तेव्हा वसई बुडत नव्हती. आता दोन तास जरी पावसाचा शिडकावा झाला तरी अवघी वसई पाण्याखाली जाते. हे कोणाचे अपयश आहे, अशी विचारणा मनसेने केली आहे.

तर सेना-भाजप महायुतीचे उमेदवार विजय पाटील यांचे प्रतिनिधी मिलिंद खानोलकर यांनी यावेळी महापालिकेची परिवहन सेवा कंत्राटदाराच्या सोयीसाठी चालविण्यात येत असल्याचे सांगितले. तर महापालिकेने घरपट्टी आकारताना कायद्याचे उल्लंघन केल्याचा आरोप केला. अशाचप्रकारे ६९ गावांचा पाण्याचा प्रश्न अद्यापही अधांतरीच आहे. याशिवाय वसईत सुसज्ज असे शासकीय रुग्णालय नाही. समुद्रकिनाऱ्यांवर पुरेसे धूपप्रतिबंधक बंधारे नाहीत. परिणामी मच्छीमार आणि बागायतदारांचे मोठे नुकसान होत आहे, अशा अनेक समस्यांना त्यांनी हात घातला.नको त्या गोष्टींचा विरोधक बागुलबुवा करतातया सगळ्या आक्षेपांना आ. हितेंद्र ठाकूर यांनी रोखठोक उत्तर दिले. वसई - विरारमध्ये कोणतीही समस्या असली की त्यामागे आपलेच नाव घेतले जाते. या भागातून विधानपरिषद, शिक्षक, पदवीधर आदी माध्यमांतून निवडून गेलेल्या लोकप्रतिनिधींना अजिबात जाब विचारला जात नाही. मात्र, ही टीका मी सकारात्मकरित्या घेतो. हे मी माझे यश समजतो. आपण शहराच्या विकासावर मते मागत आहोत आणि विरोधकांकडे एकही मुद्दाच नसल्यामुळे ते नको त्या गोष्टींचा बागुलबुवा उभा करून जनतेमध्ये संभ्रम निर्माण करत आहेत, असे त्यांनी सांगितले.