शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

पानेरी बचावसाठी माहिम, वडराईकर सरसावले! एकेकाळची जीवनवाहिनी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2018 02:36 IST

माहीम-वडराईकरांचा ‘श्वास’ असलेली पानेरी नदी कारखान्यांचे रासायनिक प्रदूषित पाणी आणि पालघर शहाराच्या सांडपाण्यामुळे काळी-पिवळी पडली असून गुदमरू लागली आहे.

- हितेंन नाईकपालघर : माहीम-वडराईकरांचा ‘श्वास’ असलेली पानेरी नदी कारखान्यांचे रासायनिक प्रदूषित पाणी आणि पालघर शहाराच्या सांडपाण्यामुळे काळी-पिवळी पडली असून गुदमरू लागली आहे. तिला पुनर्जिवित करून शुद्धावस्था प्राप्त करून देण्यासाठी माहीम-वडराईकर आता पेटून उठले असून ठिकठिकाणी बैठका, पथनाट्ये, जनजागृतीच्या माध्यमातून ‘एकीचे बळ’निर्माण केले जात आहे.पूर्वेच्या डोंगरावरून झुळझुळत येणारी आणि छोटे बागायतदार, गरीब मच्छीमारांची जीवनवाहिनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पानेरी नदीमुळे अनेक कुटुंबीयांचा उदरिनर्वाह त्यातील स्वच्छ पाणी आणि मच्छीवर चालत होता. परंतु २०-२२ वर्षांपासून संपूर्ण पालघर शहराचे सांडपाणी आणि बिडको, आदी औद्योगिक वसाहती मधून बाहेर फेकले जाणारे प्रदूषित,रासायनिक सांडपाणी पाणेरीत जाऊन ही नदी मरणपंथाला लागली आहे. ह्या आपल्या नदीला पुनर्जिवित करण्यासाठी स्थानिकांनी पानेरी बचाव संघर्ष समितीची स्थापना करून फेब्रुवारी २०१४ साली पालघर तहसीलदार कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले होते.या उपोषणा दरम्यान स्थानिक नागरिकांमध्ये प्रचंड असंतोष खदखदत असल्याचे पहावयास मिळाले होते. हा असंतोष पाहता ह्या प्रदूषणाला कारणीभूत असलेल्या पालघर नगर परिषदेने आम्ही आमच्या सांडपाण्यावर प्रक्रि या करण्याची स्वतंत्र व्यवस्था उभारू तर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने प्रदूषण करणाºया कंपन्यांवर कारवाई करून जीरो डिस्चार्ज, इटीपी आणि सीइटीपी प्लँट उभारण्या बाबत आदेश देऊन पुढील कार्यवाही ३ महिन्यात करण्याचे आश्वासन दिले होते.त्यावर विश्वास ठेवून तत्कालीन राज्यमंत्री राजेंद्र गावितांच्या उपस्थितीत हे उपोषण मागे घेण्यात आले होते.मात्र ह्याला ५ वर्षाचा कालावधी उलटून गेल्या नंतरही नगरपरिषदेकडून अजूनही स्वतंत्र यंत्रणा उभारली गेली तर नाहीच उलट दुप्पटीने सांडपाणी नदीत सोडले जात असून भ्रष्टाचाराच्या आरोपांच्या विळख्यात जखडलेल्या प्रदूषण नियंत्रण मंडळानेही आजपर्यंत आपला शब्द पाळलेला नाही. तर दुसरीकडे दिवसेंदिवस वाढत चाललेले हे प्रदूषण रोखण्या संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयाकडे अनेकदा पत्रव्यवहार करून ही आज पर्यंत पानेरीचे प्रदूषण रोखण्याबाबत एकही बैठक जिल्हाधिकाºयांनी घेतली नसल्याचे पानेरी बचाव संघर्ष समिती प्रमुख निलेश म्हात्रे यांनी लोकमतला सांगितले. माहिममधील पानेरी नदीच्या प्रदूषणाचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आल्या नंतर ग्रामस्थांमधील तीव्र असंतोषाला योग्य दिशा देण्यासाठी माहीम ग्रामस्थांतर्फे वडराई मच्छीमार सहकारी संस्थेच्या आवारात शनिवारी जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी राज्यात जलनायक म्हणून परिचित असलेले राहुल तिवरेकर आणि पालघर जिल्हा पाणथळ जमीन समितीचे माजी सदस्य प्रा. भूषण भोईर यांनी तिला मार्गदर्शन केले.पानेरी वाचवायची असेल किंवा परिसरातील प्रदूषण थांबवायचे असेल तर बाहेरून कोणी येऊन आपल्याला मदत करेल ही अपेक्षा दूर करून ग्रामस्थांना सर्वप्रकारचे मतभेद टाळून आरपारची लढाई लढावी लागणार असल्याचे मत तिवरेकर ह्यांनी व्यक्त केले. लोकशाही व्यवस्थेतील सर्वात सक्षम अशा ग्रामसभेच्या व्यासपीठाचा वापर करून प्रदूषणाविरुद्ध एकमताने आवाज उठवावाच लागेल असे त्यांनी शेवटी सांगितले. गोदावरी नदी प्रदूषणाविरुद्ध दिलेल्या यशस्वी लढ्याची माहिती देत याअनुषंगाने पानेरी प्रदूषणाविरुद्ध लढा उभारण्याचे आवाहन केले, याबाबत शासनाच्या विविध विभागाकडे दाद मागण्याबरोबरीने प्रदूषणग्रस्त मच्छीमार, शेतकरी, महिला या घटकांच्या स्वतंत्र ग्रामसभा आयोजित करून नंतर एका मोठ्या ग्रामसभेत प्रदूषणाविरुद्ध एकमताने निर्णय घेण्याचे आवाहन तिवरेकर यांनी केले.गावातील तरुणवर्गाने पाणेरी प्रदूषणाविरुद्ध ठिकठिकाणी चावडी बैठका घेऊन केलेल्या जनजागृतीमुळे या गावाच्या अस्तित्वाच्या प्रश्नावर झालेल्या सभेला सुमारे चारशेहून अधिक ग्रामस्थ उपस्थित होते.प्रदूषणामागे हात कुणाचा?प्रा. भूषण भोईर यांनी खाडी परिसरात दहा वर्षांपूर्वीच्या आणि आताच्या मच्छीच्या उपलब्धते बाबतची तफावत दाखवून दिली. पानेरीच्या दोन्ही बाजूकडील शेती, बागायती बंद झाल्याने व्यथित झालेल्या शेतकºयांनी आपल्या जमीनी मोठ मोठ्या गृहसंकुल व्यावसायिकांना विकून टाकल्या असून ह्या प्रदूषणामागे भूमाफियांचा हात असण्याची शक्यताही त्यांनी लोकमत पुढे व्यक्त केली. त्यामुळे आपल्या जमिनी विकू नका, असे आवाहन करून शेतीपूरक पर्यायी व्यवसाय सुरू करा असे आवाहनही त्यांनी केले.

टॅग्स :pollutionप्रदूषणVasai Virarवसई विरार