शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
2
अग्नितांडव! दिल्लीतील रुग्णालयाला भीषण आग; एकाचा मृत्यू, काचा फोडून रुग्णांना वाचवलं
3
ओलाची लाली उतरू लागली! ईलेक्ट्रीक मोटरसायकल आणली तरी खरेदीदार मिळेनात, जुलैची विक्री पहाल तर...
4
जगदीप धनखड बेपत्ता? उपराष्ट्रपती पदाचा राजीनामा दिल्यापासून संपर्कात नाहीत; विरोधकांनी सरकारला घेरले
5
एका घरात दोनच 'लाडक्या बहिणी', इतरांचा होणार पत्ता कट; सरकारच्या नियमानं महिला धास्तावल्या
6
मायेची सावली! भावासाठी बहीण झाली ढाल; किडनी डोनेट करुन दिलं जीवदान, रक्षाबंधन झालं खास
7
मर्चंट नेव्ही अधिकाऱ्याच्या पत्नीचा लग्नानंतर ६ महिन्यातच मृत्यू; प्रकरणात आला नवा ट्विस्ट
8
ऑपरेशन सिंदूरवेळी एकट्या S-400 ने पाकिस्तानची एवढी विमाने पाडली, हवाईदलप्रमुखांचा मोठा गौप्यस्फोट
9
Salim Pistol: बेकायदेशीर शस्त्रांचा पुरवठा करणाऱ्या 'सलीम पिस्तूल'ला नेपाळमधून अटक!
10
PIB Fact Check: रजिस्टर्ड पोस्ट सेवा बंद करण्यात आलीये का? पाहा व्हायरल दाव्यामागील सत्य
11
टीम इंडियाचा कॅप्टन गिल इथंही टॉपला! क्रिकेटच्या पंढरीत घातलेली जर्सी लिलावात ठरली लाख मोलाची
12
Video - २ रुपयांची राखी १०० रुपयांना; दुकानदाराने सांगितला व्यवसायामागच्या 'चालूगिरी'चा खेळ
13
Monsoon Travel : कुर्ग की मुन्नार; पावसाळी पिकनिकसाठी कोणतं ठिकाण ठरेल बेस्ट?
14
अमेरिका १, सिंगापुर २, नॉर्वे ३... ही यादी पाहून डोनाल्ड ट्रम्प डोकं पकडतील, कोणती आहे यादी? जाणून घ्या
15
मध्यमवर्गीयांना गरिबीच्या खाईत लोटतात या पाच सवयी, त्वरित न बदलल्यास होईल पश्चाताप
16
शरणूसोबत 'मस्साजोग' करायचं होतं; सोबत ट्रिमर, साडी, ब्लाऊज अन् कंडोम होतं, सत्य समजताच पोलीस चक्रावले
17
काश्मीर मुद्द्यावर पाकिस्तानचं पुन्हा रडगाणं; आता म्हणतायत "अमेरिका किंवा इतर कोणत्याही देशाची मध्यस्थी चालेल पण..."  
18
रेल्वेची राऊंड ट्रिप योजना...! तिकिटांवर २० टक्के डिस्काऊंट देणार, अटी एवढ्या की...; एवढे करून मिळाले जरी...
19
ICC नं टीम इंडियाला दिली होती वॉर्निंग; तरीही कोच गंभीर राहिला 'खंबीर', अन्... पडद्यामागची गोष्ट
20
अतूट नातं! १७ वर्षांपासून 'या' अभिनेत्याला राखी बांधतेय ऐश्वर्या राय; प्रेमाने मारते 'अशी' हाक

पानेरी बचावसाठी माहिम, वडराईकर सरसावले! एकेकाळची जीवनवाहिनी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2018 02:36 IST

माहीम-वडराईकरांचा ‘श्वास’ असलेली पानेरी नदी कारखान्यांचे रासायनिक प्रदूषित पाणी आणि पालघर शहाराच्या सांडपाण्यामुळे काळी-पिवळी पडली असून गुदमरू लागली आहे.

- हितेंन नाईकपालघर : माहीम-वडराईकरांचा ‘श्वास’ असलेली पानेरी नदी कारखान्यांचे रासायनिक प्रदूषित पाणी आणि पालघर शहाराच्या सांडपाण्यामुळे काळी-पिवळी पडली असून गुदमरू लागली आहे. तिला पुनर्जिवित करून शुद्धावस्था प्राप्त करून देण्यासाठी माहीम-वडराईकर आता पेटून उठले असून ठिकठिकाणी बैठका, पथनाट्ये, जनजागृतीच्या माध्यमातून ‘एकीचे बळ’निर्माण केले जात आहे.पूर्वेच्या डोंगरावरून झुळझुळत येणारी आणि छोटे बागायतदार, गरीब मच्छीमारांची जीवनवाहिनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पानेरी नदीमुळे अनेक कुटुंबीयांचा उदरिनर्वाह त्यातील स्वच्छ पाणी आणि मच्छीवर चालत होता. परंतु २०-२२ वर्षांपासून संपूर्ण पालघर शहराचे सांडपाणी आणि बिडको, आदी औद्योगिक वसाहती मधून बाहेर फेकले जाणारे प्रदूषित,रासायनिक सांडपाणी पाणेरीत जाऊन ही नदी मरणपंथाला लागली आहे. ह्या आपल्या नदीला पुनर्जिवित करण्यासाठी स्थानिकांनी पानेरी बचाव संघर्ष समितीची स्थापना करून फेब्रुवारी २०१४ साली पालघर तहसीलदार कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले होते.या उपोषणा दरम्यान स्थानिक नागरिकांमध्ये प्रचंड असंतोष खदखदत असल्याचे पहावयास मिळाले होते. हा असंतोष पाहता ह्या प्रदूषणाला कारणीभूत असलेल्या पालघर नगर परिषदेने आम्ही आमच्या सांडपाण्यावर प्रक्रि या करण्याची स्वतंत्र व्यवस्था उभारू तर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने प्रदूषण करणाºया कंपन्यांवर कारवाई करून जीरो डिस्चार्ज, इटीपी आणि सीइटीपी प्लँट उभारण्या बाबत आदेश देऊन पुढील कार्यवाही ३ महिन्यात करण्याचे आश्वासन दिले होते.त्यावर विश्वास ठेवून तत्कालीन राज्यमंत्री राजेंद्र गावितांच्या उपस्थितीत हे उपोषण मागे घेण्यात आले होते.मात्र ह्याला ५ वर्षाचा कालावधी उलटून गेल्या नंतरही नगरपरिषदेकडून अजूनही स्वतंत्र यंत्रणा उभारली गेली तर नाहीच उलट दुप्पटीने सांडपाणी नदीत सोडले जात असून भ्रष्टाचाराच्या आरोपांच्या विळख्यात जखडलेल्या प्रदूषण नियंत्रण मंडळानेही आजपर्यंत आपला शब्द पाळलेला नाही. तर दुसरीकडे दिवसेंदिवस वाढत चाललेले हे प्रदूषण रोखण्या संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयाकडे अनेकदा पत्रव्यवहार करून ही आज पर्यंत पानेरीचे प्रदूषण रोखण्याबाबत एकही बैठक जिल्हाधिकाºयांनी घेतली नसल्याचे पानेरी बचाव संघर्ष समिती प्रमुख निलेश म्हात्रे यांनी लोकमतला सांगितले. माहिममधील पानेरी नदीच्या प्रदूषणाचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आल्या नंतर ग्रामस्थांमधील तीव्र असंतोषाला योग्य दिशा देण्यासाठी माहीम ग्रामस्थांतर्फे वडराई मच्छीमार सहकारी संस्थेच्या आवारात शनिवारी जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी राज्यात जलनायक म्हणून परिचित असलेले राहुल तिवरेकर आणि पालघर जिल्हा पाणथळ जमीन समितीचे माजी सदस्य प्रा. भूषण भोईर यांनी तिला मार्गदर्शन केले.पानेरी वाचवायची असेल किंवा परिसरातील प्रदूषण थांबवायचे असेल तर बाहेरून कोणी येऊन आपल्याला मदत करेल ही अपेक्षा दूर करून ग्रामस्थांना सर्वप्रकारचे मतभेद टाळून आरपारची लढाई लढावी लागणार असल्याचे मत तिवरेकर ह्यांनी व्यक्त केले. लोकशाही व्यवस्थेतील सर्वात सक्षम अशा ग्रामसभेच्या व्यासपीठाचा वापर करून प्रदूषणाविरुद्ध एकमताने आवाज उठवावाच लागेल असे त्यांनी शेवटी सांगितले. गोदावरी नदी प्रदूषणाविरुद्ध दिलेल्या यशस्वी लढ्याची माहिती देत याअनुषंगाने पानेरी प्रदूषणाविरुद्ध लढा उभारण्याचे आवाहन केले, याबाबत शासनाच्या विविध विभागाकडे दाद मागण्याबरोबरीने प्रदूषणग्रस्त मच्छीमार, शेतकरी, महिला या घटकांच्या स्वतंत्र ग्रामसभा आयोजित करून नंतर एका मोठ्या ग्रामसभेत प्रदूषणाविरुद्ध एकमताने निर्णय घेण्याचे आवाहन तिवरेकर यांनी केले.गावातील तरुणवर्गाने पाणेरी प्रदूषणाविरुद्ध ठिकठिकाणी चावडी बैठका घेऊन केलेल्या जनजागृतीमुळे या गावाच्या अस्तित्वाच्या प्रश्नावर झालेल्या सभेला सुमारे चारशेहून अधिक ग्रामस्थ उपस्थित होते.प्रदूषणामागे हात कुणाचा?प्रा. भूषण भोईर यांनी खाडी परिसरात दहा वर्षांपूर्वीच्या आणि आताच्या मच्छीच्या उपलब्धते बाबतची तफावत दाखवून दिली. पानेरीच्या दोन्ही बाजूकडील शेती, बागायती बंद झाल्याने व्यथित झालेल्या शेतकºयांनी आपल्या जमीनी मोठ मोठ्या गृहसंकुल व्यावसायिकांना विकून टाकल्या असून ह्या प्रदूषणामागे भूमाफियांचा हात असण्याची शक्यताही त्यांनी लोकमत पुढे व्यक्त केली. त्यामुळे आपल्या जमिनी विकू नका, असे आवाहन करून शेतीपूरक पर्यायी व्यवसाय सुरू करा असे आवाहनही त्यांनी केले.

टॅग्स :pollutionप्रदूषणVasai Virarवसई विरार