शहरं
Join us  
Trending Stories
1
इम्रान खान आणि बुशरा बीबीला १७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा; 'तोशाखाना-२' प्रकरणात पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना मोठा धक्का!
2
२००० किमी दूर रशियाच्या जहाजावर युक्रेनचा सर्वात मोठा हल्ला; याचा बदला घेणारच, पुतिन संतापले
3
“काँग्रेसमध्ये पाठिंबा नाही, काम करणे कठीण; शिंदेसेनेत येताच महिला नेत्यांनी सगळे सांगितले
4
"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
5
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
6
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
7
Google नं पहिल्यांदाच आणलं क्रेडिट कार्ड, लगेच मिळणार कॅशबॅक आणि रिवॉर्ड; काय आहे खास?
8
अयोध्या राम मंदिरात ७० नवे पुजारी घेतले जाणार, ट्रस्टचा निर्णय; परिसरातील मंदिरात सेवा करणार
9
२१ डिसेंबर रोजी सुरु होणार पौष मास 'भाकड मास' का म्हटला जातो? शुभ कार्यालाही लागतो विराम!
10
पतीनं पत्नीकडून घरखर्चाचा हिशोब मागणं क्रूरता?; सुप्रीम कोर्टाने सुनावला महत्त्वाचा निकाल
11
Mumbai Crime: शीतपेयातून गुंगीचा पदार्थ, मुंबईत अल्पवयीन मुलींवर ४५ वर्षाच्या व्यक्तीने...; व्हिडीओही बनवला
12
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
13
Tarot Card: 'ऐकावे जनाचे, करावे मनाचे' याची प्रचिती देणारा आठवडा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य 
14
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
15
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
16
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
17
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
18
अकोला महापालिका: भाजप-शिंदेंच्या शिवसेनेचं युतीबाबत निर्णय कधी? ठाकरेंची शिवसेना-मनसेची बोलणी सुरू
19
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
20
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

पानेरी बचावसाठी माहिम, वडराईकर सरसावले! एकेकाळची जीवनवाहिनी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2018 02:36 IST

माहीम-वडराईकरांचा ‘श्वास’ असलेली पानेरी नदी कारखान्यांचे रासायनिक प्रदूषित पाणी आणि पालघर शहाराच्या सांडपाण्यामुळे काळी-पिवळी पडली असून गुदमरू लागली आहे.

- हितेंन नाईकपालघर : माहीम-वडराईकरांचा ‘श्वास’ असलेली पानेरी नदी कारखान्यांचे रासायनिक प्रदूषित पाणी आणि पालघर शहाराच्या सांडपाण्यामुळे काळी-पिवळी पडली असून गुदमरू लागली आहे. तिला पुनर्जिवित करून शुद्धावस्था प्राप्त करून देण्यासाठी माहीम-वडराईकर आता पेटून उठले असून ठिकठिकाणी बैठका, पथनाट्ये, जनजागृतीच्या माध्यमातून ‘एकीचे बळ’निर्माण केले जात आहे.पूर्वेच्या डोंगरावरून झुळझुळत येणारी आणि छोटे बागायतदार, गरीब मच्छीमारांची जीवनवाहिनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पानेरी नदीमुळे अनेक कुटुंबीयांचा उदरिनर्वाह त्यातील स्वच्छ पाणी आणि मच्छीवर चालत होता. परंतु २०-२२ वर्षांपासून संपूर्ण पालघर शहराचे सांडपाणी आणि बिडको, आदी औद्योगिक वसाहती मधून बाहेर फेकले जाणारे प्रदूषित,रासायनिक सांडपाणी पाणेरीत जाऊन ही नदी मरणपंथाला लागली आहे. ह्या आपल्या नदीला पुनर्जिवित करण्यासाठी स्थानिकांनी पानेरी बचाव संघर्ष समितीची स्थापना करून फेब्रुवारी २०१४ साली पालघर तहसीलदार कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले होते.या उपोषणा दरम्यान स्थानिक नागरिकांमध्ये प्रचंड असंतोष खदखदत असल्याचे पहावयास मिळाले होते. हा असंतोष पाहता ह्या प्रदूषणाला कारणीभूत असलेल्या पालघर नगर परिषदेने आम्ही आमच्या सांडपाण्यावर प्रक्रि या करण्याची स्वतंत्र व्यवस्था उभारू तर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने प्रदूषण करणाºया कंपन्यांवर कारवाई करून जीरो डिस्चार्ज, इटीपी आणि सीइटीपी प्लँट उभारण्या बाबत आदेश देऊन पुढील कार्यवाही ३ महिन्यात करण्याचे आश्वासन दिले होते.त्यावर विश्वास ठेवून तत्कालीन राज्यमंत्री राजेंद्र गावितांच्या उपस्थितीत हे उपोषण मागे घेण्यात आले होते.मात्र ह्याला ५ वर्षाचा कालावधी उलटून गेल्या नंतरही नगरपरिषदेकडून अजूनही स्वतंत्र यंत्रणा उभारली गेली तर नाहीच उलट दुप्पटीने सांडपाणी नदीत सोडले जात असून भ्रष्टाचाराच्या आरोपांच्या विळख्यात जखडलेल्या प्रदूषण नियंत्रण मंडळानेही आजपर्यंत आपला शब्द पाळलेला नाही. तर दुसरीकडे दिवसेंदिवस वाढत चाललेले हे प्रदूषण रोखण्या संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयाकडे अनेकदा पत्रव्यवहार करून ही आज पर्यंत पानेरीचे प्रदूषण रोखण्याबाबत एकही बैठक जिल्हाधिकाºयांनी घेतली नसल्याचे पानेरी बचाव संघर्ष समिती प्रमुख निलेश म्हात्रे यांनी लोकमतला सांगितले. माहिममधील पानेरी नदीच्या प्रदूषणाचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आल्या नंतर ग्रामस्थांमधील तीव्र असंतोषाला योग्य दिशा देण्यासाठी माहीम ग्रामस्थांतर्फे वडराई मच्छीमार सहकारी संस्थेच्या आवारात शनिवारी जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी राज्यात जलनायक म्हणून परिचित असलेले राहुल तिवरेकर आणि पालघर जिल्हा पाणथळ जमीन समितीचे माजी सदस्य प्रा. भूषण भोईर यांनी तिला मार्गदर्शन केले.पानेरी वाचवायची असेल किंवा परिसरातील प्रदूषण थांबवायचे असेल तर बाहेरून कोणी येऊन आपल्याला मदत करेल ही अपेक्षा दूर करून ग्रामस्थांना सर्वप्रकारचे मतभेद टाळून आरपारची लढाई लढावी लागणार असल्याचे मत तिवरेकर ह्यांनी व्यक्त केले. लोकशाही व्यवस्थेतील सर्वात सक्षम अशा ग्रामसभेच्या व्यासपीठाचा वापर करून प्रदूषणाविरुद्ध एकमताने आवाज उठवावाच लागेल असे त्यांनी शेवटी सांगितले. गोदावरी नदी प्रदूषणाविरुद्ध दिलेल्या यशस्वी लढ्याची माहिती देत याअनुषंगाने पानेरी प्रदूषणाविरुद्ध लढा उभारण्याचे आवाहन केले, याबाबत शासनाच्या विविध विभागाकडे दाद मागण्याबरोबरीने प्रदूषणग्रस्त मच्छीमार, शेतकरी, महिला या घटकांच्या स्वतंत्र ग्रामसभा आयोजित करून नंतर एका मोठ्या ग्रामसभेत प्रदूषणाविरुद्ध एकमताने निर्णय घेण्याचे आवाहन तिवरेकर यांनी केले.गावातील तरुणवर्गाने पाणेरी प्रदूषणाविरुद्ध ठिकठिकाणी चावडी बैठका घेऊन केलेल्या जनजागृतीमुळे या गावाच्या अस्तित्वाच्या प्रश्नावर झालेल्या सभेला सुमारे चारशेहून अधिक ग्रामस्थ उपस्थित होते.प्रदूषणामागे हात कुणाचा?प्रा. भूषण भोईर यांनी खाडी परिसरात दहा वर्षांपूर्वीच्या आणि आताच्या मच्छीच्या उपलब्धते बाबतची तफावत दाखवून दिली. पानेरीच्या दोन्ही बाजूकडील शेती, बागायती बंद झाल्याने व्यथित झालेल्या शेतकºयांनी आपल्या जमीनी मोठ मोठ्या गृहसंकुल व्यावसायिकांना विकून टाकल्या असून ह्या प्रदूषणामागे भूमाफियांचा हात असण्याची शक्यताही त्यांनी लोकमत पुढे व्यक्त केली. त्यामुळे आपल्या जमिनी विकू नका, असे आवाहन करून शेतीपूरक पर्यायी व्यवसाय सुरू करा असे आवाहनही त्यांनी केले.

टॅग्स :pollutionप्रदूषणVasai Virarवसई विरार