शहरं
Join us  
Trending Stories
1
'हैदराबाद गॅझेटिअरच्या नावाखाली सरकारने फसवणूक केली'; मराठा गोलमेज परिषदेत आरोप
2
“तुम्ही बोलत नाही, आम्ही ओबीसी आरक्षणासाठी लढायचे नाही का?”; छगन भुजबळांचा शरद पवारांना सवाल
3
Nanded: शांतता बैठकीतच मराठा-ओबीसी वादाला हिंसक वळण, रिसनगावात ४ जखमी
4
हैदराबाद गॅझेटवर हायकोर्टाचा मोठा निर्णय; याचिकाकर्त्यांना सुनावले, आता मराठा आरक्षणाचे काय?
5
डोनाल्ड ट्रम्प यांची माघार! लवकरच भारतावरील शुल्क हटवणार; कुणी केला दावा? पाहा...
6
“GST सुधारणा हा राहुल गांधींच्या दूरदृष्टीचा विजय, २२ तारखेला राज्यभर पेढे वाटणार”: काँग्रेस
7
Sairat: 'सैराट' सिनेमात रिंकू राजगुरुच्या आईवडिलांचीही दिसलेली झलक, कोणता आहे तो सीन?
8
'खोटारडं' पाकिस्तान पुन्हा उघडं पडलं... मॅच रेफरीच्या केबिनमध्ये काय घडलं? सत्य समोर आलं...
9
Kangana Ranaut : "माझ्याच हॉटेलचा काल ५० रुपयांचा धंदा", पूरग्रस्तांसमोर कंगना राणौतने मांडली स्वत:चाची व्यथा
10
अभिमानास्पद! वडील हवाई दलात अधिकारी, लेक झाली लेफ्टनंट; इंजिनिअरिंगनंतर देशसेवेचं स्वप्न
11
ठाकरे बंधू एकत्र आले तर मविआवर काय परिणाम होईल? शरद पवार थेट म्हणाले, “मग आता वेगळे...”
12
Video: उंटाने पहिल्यांदाच चाखली लिंबाची चव अन् 'अशी' झाली अवस्था, पाहून तुम्हालाही येईल हसू
13
Javelin Throw Final : भारताचा गोल्डन बॉय नीरज अन् पाक ऑलिम्पिक चॅम्पियन नदीमवर भारी पडला सचिन; पण...
14
यंदा रावण नाही, सोनम रघुवंशीचा पुतळा जाळणार! इंदूरच्या नागरिकांचा वेगळाच दसरा प्लॅन; राजाच्या कुटुंबालाही आमंत्रण
15
राहुल गांधींच्या हायड्रोजन बॉम्बपूर्वी चंद्रपूरच्या 'राजुरा' मतदारसंघात खळबळ ! निवडणूक आयोगावर मत वगळण्याचे गंभीर आरोप
16
घटस्फोटाचे प्रमाण कमी करण्यासाठी राज्यात दहा ठिकाणी सुरु होणार प्री-मॅरेज काउन्सिलिंग सेंटर
17
भगवान विष्णू यांच्यावरील वक्तव्यासंदर्भात CJI बीआर गवई यांचं स्पष्टिकरण; 'संयम राखायला हवा...', विश्वहिंदू परिषदेचा सल्ला
18
सात दिवस अविरत उपसले कष्ट, तेव्हा हाती लागली मौल्यवान रत्नं, मजूर महिलेचं नशीब उजळलं 
19
IND vs PAK हस्तांदोलन वादाचा खरा आरोपी सापडला... सामनाधिकारी पॉयक्रॉफ्टची चूकच नव्हती!
20
लग्न कधी करणार? श्रिया पिळगावकरला थेट प्रश्न; म्हणाली, "माझे आईबाबा सांगतात की..."

उत्तन समुद्रकिनारी कचऱ्याचे साम्राज्य; महापालिकेच्या नाकर्तेपणावर मच्छीमार संतप्त 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2021 18:05 IST

शहरातील दैनंदिन कचरा उचलणे व साफसफाईची जबाबदारी मीरा-भाईंदर महापालिकेची आहे. या कामासाठी महापालिकेने कोट्यावधी रुपयांचे कंत्राट दिले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क 

मीरा रोड -  सार्वजनिक ठिकाणांची साफसफाईची जबाबदारी मीरा भाईंदर महानगरपालिकेची असताना उत्तन समुद्र किनारी मोठ्या प्रमाणात लाटांनी वाहून आलेल्या कचऱ्या कडे मात्र महापालिकेने दुर्लक्ष केले आहे.  त्यामुळे समुद्रकिनारी कचऱ्याचे साम्राज्य असून दुर्गंधी पसरली आहे. यामुळे मच्छीमारांनी संताप व्यक्त केला आहे.

शहरातील दैनंदिन कचरा उचलणे व साफसफाईची जबाबदारी मीरा-भाईंदर महापालिकेची आहे. या कामासाठी महापालिकेने कोट्यावधी रुपयांचे कंत्राट दिले आहे. सध्या मुसळधार पावसामुळे ठिकठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे.  जेणेकरून समुद्राच्या लाटांनी उत्तनच्या किनाऱ्यावर विविध प्रकारचा कचरा मोठ्या प्रमाणात वाहून आला आहे.  किनाऱ्यावर सध्या कचऱ्याचे साम्राज्य पसरले आहे. 

गेल्या काही दिवसांपासून कचरा किनाऱ्यावर तसाच पडून असल्याने दुर्गंधी पसरली आहे. यामुळे रोगराई पसरण्याची भीती मच्छिमार यांनी व्यक्त केली आहे. समुद्रकिनारी मोठ्या प्रमाणात गोळा झालेल्या कचऱ्यामुळे मच्छिमारांना त्यांच्या दैनंदिन कामांमध्ये अडथळा होत आहे. जाळी विणणे, बोट दुरुस्ती, रंगरंगोटी आदी कामां मध्ये व्यत्यय येत असल्याचे मच्छीमारांचे म्हणणे आहे. 

संपूर्ण शहराचा कचरा आणून उत्तन मध्ये पालिका टाकते. या कचऱ्याच्या बेकायदेशीर डंपिंग मुळे आधीच नागरिक हैराण झाले आहेत. परंतु संपूर्ण शहराचा कचरा आणून टाकणाऱ्या महापालिकेला उत्तन - पाली समुद्र किनारी साचलेले कचऱ्याचे ढीग मात्र साफ करावेसे वाटत नाही हे संतापजनक असल्याचे स्थानिक नगरसेविका शर्मिला बगाजी यांनी म्हटले आहे. 

टॅग्स :Mira Bhayander Municipal Corporationमीरा-भाईंदर महापालिका निवडणुक