शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

साखरा धरणाजवळ अज्ञातांनी टाकले घातक रसायन?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2020 23:27 IST

वाणगावजवळ असलेले साखरा धरण तालुक्यातील सुमारे २९ गावांना पाणीपुरवठा करणारे महत्त्वाचे धरण आहे.

डहाणू : लाखो लोकांची तहान भागविणाऱ्या डहाणू तालुक्यातील साखरा धरणापासून अवघ्या २५० ते ३०० मीटर अंतरावर अज्ञात टँकरमधून घातक रसायन रस्त्यालगत टाकल्याचे समोर आले आहे.

वाणगावजवळ असलेले साखरा धरण तालुक्यातील सुमारे २९ गावांना पाणीपुरवठा करणारे महत्त्वाचे धरण आहे. डहाणू नगर परिषद, वाणगाव, चिंचणी यासह लाखो लोकांना या धरणातून पाणीपुरवठा केला जातो. मात्र धरणापासून काही अंतरावर टँकरमधून घातक रसायन रस्त्यावर सोडल्याने त्याची दुर्गंधी सर्वत्र पसरली आहे.

धरणालगतच वाणगाव-चारोटीकडे जाणाºया रस्त्यावर सुमारे एक किलोमीटर परिसरात अवैधपणे टँकरद्वारे हे रसायन सोडले आहे. त्यामुळे रस्त्यालगत असलेली झाडेझुडपे जळून गेली आहेत. तसेच रसायनाची दुर्गंधी वातावरणात पसरल्याने परिसरातील नागरिक त्रस्त झाले आहेत. या मार्गावरून प्रवास करणारे वाहनचालक, प्रवासी, ग्रामस्थ, विद्यार्थी यांनादेखील त्याचा त्रास होत आहे.

हे घातक केमिकल रात्रीच्या सुमारास टाकण्यात आल्याने ते कोणी टाकले हे समजू शकलेले नाही. तरीही बाजूलाच असलेल्या धरण परिसरात रसायन टाकल्याने ग्रामस्थांकडून संताप व्यक्त केला जात आहे. लाखो लोकांना पाणीपुरवठा करणारे या धरणाची सुरक्षाव्यवस्था यानिमित्ताने ऐरणीवर आली आहे. या घटनेची सखोल चौकशी व्हावी व संबंधितांवर कारवाई करण्यात यावी, अशी ग्रामस्थांची मागणी आहे. संबंधित प्रशासन याबाबत कोणती कारवाई होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

टॅग्स :Vasai Virarवसई विरारMaharashtraमहाराष्ट्रWaterपाणी