शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने आमची शस्त्रास्त्रे, सैनिकी तळ उद्ध्वस्त केले, युद्धविरामानंतर शाहबाज शरीफ यांची कबुली
2
“भारताला युद्ध नको, पण...”; अजित डोवाल यांनी चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांना स्पष्टच सांगितले
3
पाकिस्तानकडून युद्धविरामाचं घोर उल्लंघन, भारताची संतप्त प्रतिक्रिया, दिला सक्त इशारा
4
मोहम्मद युनूस यांचा मोठा निर्णय; शेख हसीन यांच्या ‘अवामी लीग’वर आणली बंदी
5
Pakistan Ceasefire Violations : पाकिस्तानकडून जम्मूमध्ये गोळीबार, BSF जवान मोहम्मद इम्तियाज शहीद, सात जण जखमी
6
"पाकिस्तानी लोक 'ऑफिशियल भिकमंगे'..."; असदुद्दीन ओवेसींनी पाकड्यांची पार लक्तरं काढली!
7
Pakistan Violates Ceasefire: पाकिस्तानचं शेपूट वाकडंच!! चार तासांतच शस्त्रसंधीचे उल्लंघन; जम्मूमध्ये पुन्हा ड्रोन हल्ले, गोळीबार
8
"युद्धविरामाचं झालं काय? श्रीनगरमध्ये अनेक स्फोट’’, पाकिस्तानच्या आगळीकीनंतर ओमर अब्दुल्ला संतप्त 
9
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
10
पाकिस्तानशी 'युद्धविराम' करण्याच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..."
11
सकाळपर्यंत डागली जात होती क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, अचानक संध्याकाळी युद्धविराम कसा झाला? मागच्या ४८ तासांत काय घडलं
12
पाकिस्तानसोबतच्या युद्धविरामावर असदुद्दीन ओवेसींनी उपस्थित केलं प्रश्नचिन्ह, सरकारला विचारले चार सवाल  
13
India Pakistan Ceasefire: युद्धविराम! देशासाठी सर्वात मोठी बातमी; भारत-पाकिस्तान संघर्षात सहमतीने तोडगा; दोन्हीकडून हल्ले बंद
14
"काँग्रेस पक्षाचा आणि देशाचा डीएनए एकच, काँग्रेस कधीही न संपणारा पक्ष’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास   
15
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा खरंच तुरुंगात मृत्यू झाला? जाणून घ्या काय आहे सत्य
16
पुढे धोका आहे! रात्री मोबाईलचा जास्त वापर करणं 'डेंजर'; शरीरातील 'हा' हार्मोन होतो कमी अन्...
17
India Pakistan Ceasefire: भारत-पाकिस्तान संघर्षात अखेर 'युद्धविराम', हल्ले पूर्ण थांबणार! सिंधू पाणी वाटप करारचं काय?
18
Operation Sindoor Live Updates: दिल्ली विमानतळाकडून प्रवाशांना मार्गदर्शक सूचना जारी
19
Vyomika Singh : कडक सॅल्यूट! "डॅडी, मम्मीला सांगू नका, ती मला जाऊ देणार नाही"; व्योमिका सिंह यांची संघर्षकथा
20
हृदयस्पर्शी! "पप्पा..."; ड्युटीवर जाणाऱ्या जवानाला लेकीने मारली मिठी, डोळे पाणावणारा Video

वाडा औद्योगिक क्षेत्रावर बेकारीची कुऱ्हाड

By admin | Updated: September 21, 2015 03:44 IST

शेतकऱ्यांचा तालुका म्हणून ओळख असणाऱ्या वाड्यामध्ये वीस वर्षांपूर्वी औद्योगिक विकासाला सुरुवात झाल्याने त्याची फळे खेड्यापाड्यांपर्यंत पोहोचली

वसंत भोईर, वाडाशेतकऱ्यांचा तालुका म्हणून ओळख असणाऱ्या वाड्यामध्ये वीस वर्षांपूर्वी औद्योगिक विकासाला सुरुवात झाल्याने त्याची फळे खेड्यापाड्यांपर्यंत पोहोचली. मात्र, वीज सवलतीला कात्री लागल्याने अनेक उद्योजकांनी आपले व्यवसाय येथून गुंडाळले आहेत. एकंदरीतच यामुळे येथील हजारो कामगारांवर बेकारीची कुऱ्हाड कोसळली आहे. स्थानिक व परगावचे कामगार या भागात उपजीविकेसाठी वेगवेगळ्या लघू व मोठ्या उद्योगांमध्ये काम करतात. हातांवर पोट असणाऱ्या या कामगारांवर यामुळे उपासमारीची वेळ आहे. कारखाने सुरू ठेवण्यासाठी सरकारने काही ठोस पावले उचलावीत, अशी मागणी कामगार आणि उद्योजकांकडून होत आहे.येथील ग्रामीण आदिवासी भागाचा विकास करण्यासाठी सरकारने २० वर्षांपूर्वी या भागात ‘डी प्लस झोन योजना’ जाहीर केली. या योजनेत कारखानदारांना अनेक सवलती देण्यात आल्या. यामध्ये १३ वर्षे विक्रीकरात सूट, ३० टक्के प्रकल्पांत रोख अनुदान, वीजदरात १० ते १२ टक्के सवलत अशा अनेक सवलती देण्यात आल्या. त्यामुळे अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय कंपन्यांनी येथे आपले बस्तान बसविले. मात्र, काही महिन्यांपूर्वी विजेच्या दरात अचानक वाढ करण्यात आल्याने लोखंडाचे अनेक कारखाने बंद झाले आहेत. विजेच्या वाढीव दरामुळे उत्पादनासाठी जास्त खर्च येत असल्याने कारखानदारांनी कारखाने बंद ठेवले आहेत. विजेचे दर वाढल्याने एकेक कारखाना बंद होत असल्याने वाड्यातील सर्वच पक्ष आणि इंडस्ट्रीयल असोसिएशन यांच्या वतीने मोठे आंदोलन गेल्या काही महिन्यांपूर्वी छेडले होते. या आंदोलनाची दखल घेत किरकोळ प्रमाणात विजेचे दर कमी केले होते. मात्र, आता पुन्हा तसेच दर सुरू झाल्याने कारखान्यांना कुलूप लागले आहे. आशिया खंडातील लोखंडाची महत्त्वाची बाजारपेठ वाडा आता शेवटची घटका मोजत आहे.तालुक्यातील घोणसई व डाकिवली या ग्रामपंचायतींच्या हद्दीतील मोनाटोना ही टायर उत्पादन करणारी कंपनी असून यात सुमारे एक हजारांच्या आसपास स्थानिक (मराठी) कामगार आहेत. मात्र, ही कंपनीसुद्धा कधी सुरू तर कधी बंद असते. त्यामुळे हजारो स्थानिक कामगारांवर बेकारीची वेळ येऊ शकते.