शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
2
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
3
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
4
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
5
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
6
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
7
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
8
दहशतवादी हल्लानंतर मृत्यू पावलेल्या पर्यटकांसाठी श्रद्धांजली यात्रा, मकरंद देशपांडे म्हणाले...
9
"मी १५ दिवस स्वतःचीच लघवी प्यायलो, कारण...; परेश रावल यांचा खुलासा, अजय देवगणच्या वडिलांनी दिला होता सल्ला
10
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
11
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
12
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
13
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
14
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
15
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
16
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
17
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
18
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
19
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
20
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात

महामार्गावर भीषण अपघात दोघांचा मृत्यू तर दोघे गंभीर जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2023 18:16 IST

या अपघातात दोघांचा मृत्यू झाला तर दोघे गंभीर जखमी असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने मिरा रोडच्या वॉकर्ड हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. 

- मंगेश कराळे

नालासोपारा :  मुंबई-अहमदाबाद महामार्गावर अतिवेगामुळे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने डिव्हायडरला ठोकर मारून भीषण अपघात सकवार गावाच्या हद्दीत गुरुवारी सकाळी झाला आहे. या अपघातात दोघांचा मृत्यू झाला तर दोघे गंभीर जखमी असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने मिरा रोडच्या वॉकर्ड हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. 

मुंबईच्या प्रभादेवी येथे राहणारे अशोक मुसळे (७१), रमेश मुसळे (५१), माधुरी मुसळे (५०) आणि रुचिक देसाई (३०) हे चौघे मुंबई अहमदाबाद महामार्गावरून पालघरला ह्युंदाई क्रेटा एम एच ०१ डीटी ९९१९ या क्रेटा कारने गुरुवारी सकाळी जात होते. सकाळी साडे दहाच्या सुमारास सकवर गावाच्या हद्दीतील पेट्रोल पंपापासून ४०० मीटर अंतरावर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने महामार्गावरील डिव्हायडरला ठोकर दिल्याने अपघात झाला. 

जखमींना तत्काळ पेल्हारच्या गॅलेक्सी हॉस्पिटल येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान रमेश मुसळे (५१) आणि रुचिक देसाई (३०) या दोघांचा तीन वाजता उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर अशोक मुसळे (७१) आणि माधुरी मुसळे (५०) या दोघाची प्रकृती चिंताजनक असल्याने पुढील उपचारासाठी रवाना करण्यात आले आहे. 

महामार्गावर अतिवेगामुळे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने डिव्हायडरला ठोकर मारून भीषण अपघातात दोघांचा मृत्यू तर दोघे गंभीर जखमी आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. - प्रफुल वाघ (पोलीस निरीक्षक, मांडवी पोलीस ठाणे)

टॅग्स :Accidentअपघात