शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

त्सुनामीचा इशारा आणि प्रशासनाची धावपळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2018 19:25 IST

ठाणे - अरबी समुद्रात इराण जवळ आज सकाळी ९ मॅग्निटयूडचा भूकंपाचा जबरदस्त धक्का बसला.... जमिनीखाली १० किमी अंतरावर भूकंपाचा केंद्रबिंदू असून इतक्या क्षमतेच्या धक्क्यामुळे भारतीय पश्चिम समुद्र तटाला सुनामीचा मोठा धोका पोहचू शकतो, असा  इशारा भारतीय राष्ट्रीय महासागर सूचना केंद्र आणि इंडियन सुनामी अर्ली वॉर्निंग सेंटरने सकाळी ११ वाजून ४५ ...

ठाणे - अरबी समुद्रात इराण जवळ आज सकाळी ९ मॅग्निटयूडचा भूकंपाचा जबरदस्त धक्का बसला.... जमिनीखाली १० किमी अंतरावर भूकंपाचा केंद्रबिंदू असून इतक्या क्षमतेच्या धक्क्यामुळे भारतीय पश्चिम समुद्र तटाला सुनामीचा मोठा धोका पोहचू शकतो, असा  इशारा भारतीय राष्ट्रीय महासागर सूचना केंद्र आणि इंडियन सुनामी अर्ली वॉर्निंग सेंटरने सकाळी ११ वाजून ४५ मिनिटांनी दिला ..... आणि पहाता पहाता अग्निशमन दलाच्या गाड्या, रुग्णवाहिका, पोलिसांच्या गाड्यांनी उत्तन भागातील पाली गावांत प्रवेश केला.

त्सुनामी येतेय.. सुरक्षित ठिकाणी चला अशी हाकाटी मारत पोलीस पाटील मेलविन पॉल आंद्रादे धावू लागले. २५ मिनिटांच्या आत एनडीआरएफ आणी पोलीस यांनी गावाचा अक्षरश: ताबा घेतला आणि सुमारे शंभरावर लोकांना सुरक्षित स्थळी म्हणजे उत्तन मच्छीमार वाहतूक सोसायटीच्या मदार तेरेसा हॉलमध्ये आणले.   

विशेष म्हणजे ठाण्याहून ३६ किलोमीटर अंतरावरील या गावातील प्रत्येक जण जिल्हा प्रशासनाने सकाळपासून घेतलेल्या या मॉक ड्रिलमध्ये होता. महिलांची उपस्थितीही खूप होती. उपजिल्हाधिकारी पुनर्वसन उपेंद्र तामोरे, उपविभागीय अधिकारी सुदाम परदेशी, तहसीलदार अधिक पाटील, एनडीआरएफचे सिंग, मीरा भाईंदर महानगरपालिका उपायुक्त  पुजारी, पोलीस निरीक्षक पवार, नायब तहसीलदार नंदकिशोर देशमुख, मंडळ अधिकारी अनारे, तलाठी शेडगे, हे अधिकारी व कर्मचारी यात गावकऱ्यांना मार्गदर्शन करीत होते. यात दोन अग्निशमन गाड्या, दोन रुग्णवाहिका, दोन शहर बसेस देखील सहभागी झाल्या होत्या.

काही जखमींना तत्काळ रुग्णवाहिकेत आणण्यात आले तर बसेसमधून सुमारे शंभर एक लोकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले.      

भारतीय राष्ट्रीय महासागर सुचना केंद्र, हैद्राबाद  ( इंडियन नेशनल सेंटर फॉर ओशन इन्फोर्मेशन सर्व्हिसेस) तसेच राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांच्या संयुक्त विद्यमाने आज देशातील पश्चिम समुद किनाऱ्यांवरील राज्यांमध्ये ही रंगीत तालीम घेण्यात आली. पालघर जिल्ह्यात येडवन, ठाणे जिल्ह्यात पाली, रत्नागिरीत पाजपंढरी, रायगड जिल्ह्यात बोरली, सिंधुदुर्ग येथे जामडूल येथे सुनामी आल्यास किनार्यावरील गावकऱ्यांनी काय काळजी घ्यावी व कसा बचाव करावा तसेच स्थानिक प्रशासनाने देखील कसा समन्वय ठेवून काम करावे असा उद्देश या तालमीमागे होता.

या मॉक ड्रिलची पूर्व तयारी काही दिवसांपासून जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात सुरु होती व त्यात महसूल विभागाचे कर्मचारी, प्रांत अधिकारी, तहसीलदार पोलीस, मीरा भाईंदर पालिका, अग्निशमन दल, स्थानिक मच्छीमार, असे अनेक जण सहभागी होते अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी शिवाजी पाटील यांनी दिली.

गावांतील महिलांनी उत्स्फुर्तपणे या रंगीत तालमीच्या वेळी प्रशासनाला व पोलिसाना सहकार्य केले तसेच त्सुनामी मध्ये घ्यावयाची काळजी यावर राष्ट्रीय आपत्ती निवारण पथकाच्या जवानांनी दाखविलेल्या प्रात्यक्षिकांना दाद दिली. या जवानांनी संकटांमध्ये होड्या, जीव रक्षक साधनांचा कसा वापर करायचा ते प्रत्यक्ष सर्वाना दाखविले.

उपेंद्र तामोरे हे नुकतेच सुनामी संदर्भात हैद्राबाद येथे प्रशिक्षण घेऊन आले आहेत, त्यांनी गावकऱ्यांना या रंगीत तालमीमागची भूमिका समजावून सांगितली. उपविभागीय अधिकारी सुदाम परदेशी यांनी सुनामीचा इशारा मिळाल्यानंतर निश्चितपणे रहिवाशांनी काय करायला पाहिजे आणि या आपत्तीचा वेग आणि व्याप्ती किती मोठी असू शकते ते सांगितले.

या रंगीत तालमीची काय आवश्यकता होती असे सुरुवातीला आम्हाला वाटले पण खरोखरच या सगळ्यांचे ऐकल्यानंतर त्याची गरज पातळी, आम्हाला खूप महत्वाची माहिती मिळाली, सुनामीच नव्हे तर पूर परिस्थिती देखील आपण काय काळजी घ्यावी हे कळल्याचे नागरिक डिमेलो यांनी सांगितले.

टॅग्स :palgharपालघरnewsबातम्या