शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Update : आनंदाची बातमी! वेळेआधीच मान्सून दाखल होणार? हवामान विभागाने दिली अपडेट
2
CBSE बोर्डाचा १०वीचा निकाल जाहीर! गेल्या वर्षींपेक्षा जास्त विद्यार्थी उत्तीर्ण, मुली मुलांपेक्षा वरचढ
3
एका झटक्यात चांदी २२५५ रुपयांनी महागली, सोन्याच्या दरातही मोठी तेजी; खरेदीपूर्वी नवे दर
4
सुरक्षा दलाची मोठी कारवाई; जम्मू-काश्मीरमध्ये लष्कर-ए-तैयबाचे 3 दहशतवादी ठार
5
'ऑपरेशन सिंदूर'नंतर रशियाची भारताला मोठी ऑफर; पाकिस्तानसह अमेरिकेचीही झोप उडवणार
6
Viral Video : प्रियकराचं लागत होतं लग्न, ऐन मुहूर्तावर झाली प्रेयसीची एंट्री; पुढं काय झालं बघाच!
7
पाकिस्तानला पाठिंबा देणाऱ्या तुर्कस्थानचा बहिष्कार? भारत कोणत्या वस्तू आयात करतो?
8
सर्वोच्च न्यायलयाने फेटाळला दिल्लीतील व्यावसायिकाचा जामीन अर्ज,ड्रग्ज आणि लष्कर-ए-तोयबाशी आहे कनेक्शन!
9
बारावी नापास डॉक्टर! रुग्णांच्या जीवाशी खेळ; क्लिनिक उघडून मोठे आजार बरे करण्याचा दावा
10
पंतप्रधान मोदींनी आदमपूर एअरबेस का निवडला? एकाच झटक्यात पाकिस्तानची खोट्याची ८ मिसाईल पाडली...
11
डिफेन्समध्ये का आहे तेजी? घसरत्या बाजारातही HAL आणि BEL मध्ये खरेदीदारांची रांग; कारण आहे खास
12
'भूत बंगला'मध्ये अक्षय कुमारसोबत स्क्रीन शेअर करणार 'हा' अभिनेता, फोटो पोस्ट करत म्हणाला...
13
चिनी क्षेपणास्त्रांनी आधी मैदानात मार खाल्ला, आता शेअर बाजारातही लाज निघाली
14
शत्रुला शांतपणे झोप का लागत नाही? पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 'त्या' फोटोद्वारे दिला थेट संदेश...
15
Rambabu Singh : अवघ्या ४ महिन्यांपूर्वी लग्न झालेले जवान रामबाबू सिंह शहीद; पत्नीला अजून सांगितलंच नाही...
16
१० तारखेला वाढदिवस साजरा केला अन् दुसऱ्याच दिवशी...; आईसह २ मुलांचा दुर्दैवी अंत
17
धक्कादायक! अचानक तोल गेला अन् खासदार अजय मंडल पडले खाली; पायाला झालं फ्रॅक्चर
18
₹२३९२ चा 'हा' शेअर आपटून आला ₹५१ वर; सोमवारी दोन मोठे राजीनामे, गुंतवणूकदारांना झटका
19
पाकिस्तानने केलेला एअरबेस उडवल्याचा दावा; PM मोदी तिथेच पोहोचले, जवानांशी साधला संवाद
20
Astro Tips: गाडीच्या डॅशबोर्डवर कोणत्या देवतेची मूर्ती ठेवणे ठरते अधिक लाभदायी?

त्सुनामीचा इशारा आणि प्रशासनाची धावपळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2018 19:25 IST

ठाणे - अरबी समुद्रात इराण जवळ आज सकाळी ९ मॅग्निटयूडचा भूकंपाचा जबरदस्त धक्का बसला.... जमिनीखाली १० किमी अंतरावर भूकंपाचा केंद्रबिंदू असून इतक्या क्षमतेच्या धक्क्यामुळे भारतीय पश्चिम समुद्र तटाला सुनामीचा मोठा धोका पोहचू शकतो, असा  इशारा भारतीय राष्ट्रीय महासागर सूचना केंद्र आणि इंडियन सुनामी अर्ली वॉर्निंग सेंटरने सकाळी ११ वाजून ४५ ...

ठाणे - अरबी समुद्रात इराण जवळ आज सकाळी ९ मॅग्निटयूडचा भूकंपाचा जबरदस्त धक्का बसला.... जमिनीखाली १० किमी अंतरावर भूकंपाचा केंद्रबिंदू असून इतक्या क्षमतेच्या धक्क्यामुळे भारतीय पश्चिम समुद्र तटाला सुनामीचा मोठा धोका पोहचू शकतो, असा  इशारा भारतीय राष्ट्रीय महासागर सूचना केंद्र आणि इंडियन सुनामी अर्ली वॉर्निंग सेंटरने सकाळी ११ वाजून ४५ मिनिटांनी दिला ..... आणि पहाता पहाता अग्निशमन दलाच्या गाड्या, रुग्णवाहिका, पोलिसांच्या गाड्यांनी उत्तन भागातील पाली गावांत प्रवेश केला.

त्सुनामी येतेय.. सुरक्षित ठिकाणी चला अशी हाकाटी मारत पोलीस पाटील मेलविन पॉल आंद्रादे धावू लागले. २५ मिनिटांच्या आत एनडीआरएफ आणी पोलीस यांनी गावाचा अक्षरश: ताबा घेतला आणि सुमारे शंभरावर लोकांना सुरक्षित स्थळी म्हणजे उत्तन मच्छीमार वाहतूक सोसायटीच्या मदार तेरेसा हॉलमध्ये आणले.   

विशेष म्हणजे ठाण्याहून ३६ किलोमीटर अंतरावरील या गावातील प्रत्येक जण जिल्हा प्रशासनाने सकाळपासून घेतलेल्या या मॉक ड्रिलमध्ये होता. महिलांची उपस्थितीही खूप होती. उपजिल्हाधिकारी पुनर्वसन उपेंद्र तामोरे, उपविभागीय अधिकारी सुदाम परदेशी, तहसीलदार अधिक पाटील, एनडीआरएफचे सिंग, मीरा भाईंदर महानगरपालिका उपायुक्त  पुजारी, पोलीस निरीक्षक पवार, नायब तहसीलदार नंदकिशोर देशमुख, मंडळ अधिकारी अनारे, तलाठी शेडगे, हे अधिकारी व कर्मचारी यात गावकऱ्यांना मार्गदर्शन करीत होते. यात दोन अग्निशमन गाड्या, दोन रुग्णवाहिका, दोन शहर बसेस देखील सहभागी झाल्या होत्या.

काही जखमींना तत्काळ रुग्णवाहिकेत आणण्यात आले तर बसेसमधून सुमारे शंभर एक लोकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले.      

भारतीय राष्ट्रीय महासागर सुचना केंद्र, हैद्राबाद  ( इंडियन नेशनल सेंटर फॉर ओशन इन्फोर्मेशन सर्व्हिसेस) तसेच राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांच्या संयुक्त विद्यमाने आज देशातील पश्चिम समुद किनाऱ्यांवरील राज्यांमध्ये ही रंगीत तालीम घेण्यात आली. पालघर जिल्ह्यात येडवन, ठाणे जिल्ह्यात पाली, रत्नागिरीत पाजपंढरी, रायगड जिल्ह्यात बोरली, सिंधुदुर्ग येथे जामडूल येथे सुनामी आल्यास किनार्यावरील गावकऱ्यांनी काय काळजी घ्यावी व कसा बचाव करावा तसेच स्थानिक प्रशासनाने देखील कसा समन्वय ठेवून काम करावे असा उद्देश या तालमीमागे होता.

या मॉक ड्रिलची पूर्व तयारी काही दिवसांपासून जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात सुरु होती व त्यात महसूल विभागाचे कर्मचारी, प्रांत अधिकारी, तहसीलदार पोलीस, मीरा भाईंदर पालिका, अग्निशमन दल, स्थानिक मच्छीमार, असे अनेक जण सहभागी होते अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी शिवाजी पाटील यांनी दिली.

गावांतील महिलांनी उत्स्फुर्तपणे या रंगीत तालमीच्या वेळी प्रशासनाला व पोलिसाना सहकार्य केले तसेच त्सुनामी मध्ये घ्यावयाची काळजी यावर राष्ट्रीय आपत्ती निवारण पथकाच्या जवानांनी दाखविलेल्या प्रात्यक्षिकांना दाद दिली. या जवानांनी संकटांमध्ये होड्या, जीव रक्षक साधनांचा कसा वापर करायचा ते प्रत्यक्ष सर्वाना दाखविले.

उपेंद्र तामोरे हे नुकतेच सुनामी संदर्भात हैद्राबाद येथे प्रशिक्षण घेऊन आले आहेत, त्यांनी गावकऱ्यांना या रंगीत तालमीमागची भूमिका समजावून सांगितली. उपविभागीय अधिकारी सुदाम परदेशी यांनी सुनामीचा इशारा मिळाल्यानंतर निश्चितपणे रहिवाशांनी काय करायला पाहिजे आणि या आपत्तीचा वेग आणि व्याप्ती किती मोठी असू शकते ते सांगितले.

या रंगीत तालमीची काय आवश्यकता होती असे सुरुवातीला आम्हाला वाटले पण खरोखरच या सगळ्यांचे ऐकल्यानंतर त्याची गरज पातळी, आम्हाला खूप महत्वाची माहिती मिळाली, सुनामीच नव्हे तर पूर परिस्थिती देखील आपण काय काळजी घ्यावी हे कळल्याचे नागरिक डिमेलो यांनी सांगितले.

टॅग्स :palgharपालघरnewsबातम्या