शहरं
Join us  
Trending Stories
1
'दिवाळीत जीएसटीमध्ये होणार मोठे बदल, सामान्यांसाठी अनेक गोष्टी स्वस्त'; पंतप्रधान मोदींची घोषणा
2
“भारताच्या पाण्याने शत्रूंची शेती समृद्ध, सिंधू करार अन्यायकारक”; PM मोदींनी पाकला सुनावले
3
मेक इन इंडिया फायटर जेट इंजिन निर्मितीचे लक्ष्य; PM मोदींचे शास्त्रज्ञांना आवाहन, म्हणाले...
4
"दहशतवाद्यांचे तळ नाहीसे केले, पाकिस्तानची झोप अजूनही उडलेली आहे", PM मोदींनी केले 'ऑपरेशन सिंदूर'वर भाष्य
5
पतीला मारलं अन् तुरुंगात गेली, नवा बॉयफ्रेंड बनवला; कैदेतून बाहेर येताच सासऱ्याचाही खेळ खल्लास केला! नेमकं झालं काय?
6
सचिन तेंडुलकरच्या होणाऱ्या सुनेची पहली झलक; सानिया चांडोकचा सर्वात लेटेस्ट फोटो आला समोर
7
डोनाल्ड ट्रम्प आणि व्लादिमीर पुतिन यांची भेट भारतासाठी फायदेशीर ठरणार? टॅरिफवर होऊ शकतो मोठा निर्णय!
8
आजचे राशीभविष्य, १५ ऑगस्ट २०२५: ५ राशींना शुभ, आर्थिक लाभ; स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घ्याल
9
भारत जगात भारी... अमेरिकेच्या टॅरिफचा परिणाम होणार नाही; एस अँड पी ग्लोबल रेटिंग्सचा दावा
10
मुंबईत फक्त मनसे आणि उद्धवसेनेचीच ताकद, तयारीला लागा; राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
11
किश्तवाडमध्ये लंगर सुरू असतानाच अचानक ढगफुटी, ४६ जण दगावले; १२० जणांना वाचविले
12
६२ आयआयटी उभ्या राहतील इतके पैसे भारतीयांकडून परदेशी शिक्षणावर खर्च; देशातील शिक्षणाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह
13
सरकारला त्यांची जागा दाखवण्याचा निर्धार करू, जनतेला जाणीव करून देण्याची गरज: शरद पवार
14
राज ठाकरेंविरोधात जनहित याचिका; भाषण करु न देण्याची मागणी, लवकरच सुनावणीची शक्यता
15
मुंबईतील घरे विकू नका, बहिणीचेही नाव लावा; धारावीचाही दर्जेदार पुनर्विकास: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
16
तीन हजार कोटींचा घोटाळा; परिमॅच अॅपप्रकरणी ११० कोटींची मालमत्ता जप्त, ईडीची कारवाई
17
अनिल कुंभारे, नवीनचंद्र रेड्डी यांना राष्ट्रपती पदक जाहीर; महाराष्ट्राच्या ४९ पोलिसांचा गौरव, ७ पोलिसांना शौर्य पदक
18
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
19
वसई-विरार पालिका क्षेत्राची हद्द वाढ; अधिसूचना प्रसिद्ध, अखेर २९ गावांचा महानगरपालिकेत समावेश
20
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले

वनहक्क कायद्याने मिळालेल्या जमिनीवर आदिवासींना हवा घरे बांधण्याचा अधिकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2020 00:16 IST

कष्टकरी संघटनेची मागणी : राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी काढावे विशेष आदेश

जव्हार : अनुसूचित क्षेत्रात गावठाण विस्तारासाठी वन जमीन उपलब्ध करून दिली जाईल या राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या निर्णयाचे कष्टकरी संघटनेने स्वागत केले आहे. मात्र वन हक्क कायद्यांतर्गत मिळालेल्या जमिनीवर आदिवासींना घराच्या अधिकाराला वन विभागाकडून आजही रोखले जात आहे. त्यामुळे वन विभागाने अशा प्लॉटधारकांना घरासाठी मान्यता द्यावी, राज्यपालांनी यासाठी विशेष आदेश काढावे, अशी मागणी कष्टकरी संघटनेचे ब्रायन लोबो यांनी केली आहे.

मागील काही वर्षांत पालघर जिल्ह्यातील जव्हार वन विभागाने आदिवासींना वन जमिनीवर घर बांधण्याच्या अधिकारास मान्यता देण्यास नकार दिला होता. वन जमिनी कसणाऱ्या आदिवासींनी या जमिनीवरही पीक व झाडांच्या रक्षणासाठी तेथे घर बांधली आहेत. मात्र वन विभागाने आदिवासींनी बांधलेली घरे बेकायदेशीर असल्याचे कारण देऊन पाडून टाकली असून आदिवासी विरोधात गुन्हेही दाखल केले आहेत. आदिवासींना वन हक्क कायद्यांतर्गत प्राप्त जमिनीवर वस्ती करण्याच्या हक्काची तरतूद असतानाही हे घडत आहे. दरम्यान नवीन अधिसूचना स्वागतार्ह असली तरी या अधिसूचनेत वन हक्क कायद्याअंतर्गत मिळालेल्या जमिनीवर घराचा अधिकार मिळणे ही बाब दुर्लक्षित केलेली आहे. म्हणून राज्यपालांनी वन हक्क कायद्यांतर्गत मिळालेल्या जमिनीवर आदिवासींना घराच्या अधिकाराला मान्यता द्यावी, यासाठी विशेष आदेश काढावे. तसेच अशा जमिनीवर उभारलेली घरे पाडून टाकण्यापासून व गुन्हे दाखल करण्यापासून रोखावे, अशी मागणी कष्टकरी संघटनेचे ब्रायन लोबो यांनी राज्यपालांना केली आहे.८ ते १० पाडे मिळून बनलेल्या आदिवासी गावात आज केवळ २ ते ३ वस्त्यांसाठी गावठाण उपलब्ध आहे. परिणामी अशा ठिकाणी घरांसाठी जागांची मोठी कमतरता भासते. यातच कुटुंबाचा जसा विस्तार होत जातो तसे ही समस्या अधिक भेडसावू लागते. ही अधिसूचना जंगलाच्या राजाला त्याच्याच राज्यात राहायला जागा आहे याला मान्यता देत असून, हा निर्णय आदिवासींच्या हिताचा ठरला आहे.

टॅग्स :Vasai Virarवसई विरारTrible Development Schemeआदिवासी विकास योजना