शहरं
Join us  
Trending Stories
1
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
2
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
3
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
4
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
5
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
6
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
7
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
8
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
9
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
10
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
11
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
12
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
13
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
14
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
15
स्टायलिश लूकसह रॉयल एनफील्ड हंटर ३५० बाजारात; बघताच प्रेमात पडाल!
16
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
17
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
18
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
19
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
20
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय

आदिवासी महिलांना पाण्यासाठी करावी लागते पायपीट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2021 23:48 IST

गेल्या अनेक वर्षात तालुक्यात नळपाणीपुरवठा योजनांवर करोडोचा खर्च करण्यात आला.

रवींद्र साळवेमोखाडा : मुंबई राजधानीपासून १०० किमी अंतरावरील पालघर जिल्ह्यातील मोखाडा तालुका हा विकासापासून कोसो दूर आहे. येथील आदिवासींना पाण्यासाठी तीन किमीची पायपीट करावी लागत आहे. गेल्या अनेक अर्थसंकल्पात आदिवासींच्या विकासासाठी मोठमोठ्या आकड्यांची तरतूद केली जाते. परंतु खऱ्या अर्थाने येथील आदिवासींचा विकास होताना दिसत नाही. अनेक योजना कागदावरच राबवल्या जातात. यामुळे आदिवासींचा विकास हा फक्त प्रशासन व लोकप्रतिनिधींच्या तोंडून ऐकायला मिळतो. 

गेल्या अनेक वर्षात तालुक्यात नळपाणीपुरवठा योजनांवर करोडोचा खर्च करण्यात आला, परंतु नावालाच राबवलेल्या योजनांमुळे आदिवासींच्या पाचवीला पुजलेली पाणीटंचाईची समस्या अद्याप सुटलेली नाही. तालुक्याच्या मुख्यालयाला लागून पाच किमी अंतरावर असलेले ३१३ आदिवासी लोकवस्तीचे चास हे गाव.

या ठिकाणी फेब्रुवारी महिना उजडताच भीषण पाणीटंचाईचा सामना  करावा लागत असून, तीन किमीचा डोंगर पार करून पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागते. यामुळे येथील पाणीटंचाईचा प्रश्न  सोडवण्यासाठी पाणीपुरवठा विभागाने ५५ लाख रुपये खर्चून २०१८ ते २०१९ मध्ये नळपाणीपुरवठा योजनेचे काम हाती घेतले आहे, परंतु ठेकेदाराच्या मनमानी कारभारामुळे  हे काम अपूर्णच आहे.  या योजनेत फक्त विहिरीचे काम पूर्ण करण्यात आले आहे, परंतु अजूनपर्यंत विहिरीवरून गावापर्यंत पाणी पोहोचलेच नाही. 

यामुळे पुढील काळात तरी गावकऱ्यांना पाणी भेटेल का,  असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. तसेच येथे टाकीच्या बांधकामाचा शुभारंभ करण्यात आला व खड्डा खोदून ठेवला आहे. मागील पावसाळ्यात या खड्ड्यात  गाय पडून जखमी झाली होती. यामुळे गावकऱ्यांकडून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. या वर्षीदेखील येथील महिलांच्या डोक्यावरील हंडा उतरणार नसल्याची चिन्ह आहेत. 

टॅग्स :Vasai Virarवसई विरारWaterपाणी