शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
3
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
4
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
5
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
6
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
7
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
8
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
9
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
10
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
11
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
12
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
13
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
14
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
15
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
16
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
17
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
18
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
19
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
20
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?

आदिवासी महिलांना पाण्यासाठी करावी लागते पायपीट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2021 23:48 IST

गेल्या अनेक वर्षात तालुक्यात नळपाणीपुरवठा योजनांवर करोडोचा खर्च करण्यात आला.

रवींद्र साळवेमोखाडा : मुंबई राजधानीपासून १०० किमी अंतरावरील पालघर जिल्ह्यातील मोखाडा तालुका हा विकासापासून कोसो दूर आहे. येथील आदिवासींना पाण्यासाठी तीन किमीची पायपीट करावी लागत आहे. गेल्या अनेक अर्थसंकल्पात आदिवासींच्या विकासासाठी मोठमोठ्या आकड्यांची तरतूद केली जाते. परंतु खऱ्या अर्थाने येथील आदिवासींचा विकास होताना दिसत नाही. अनेक योजना कागदावरच राबवल्या जातात. यामुळे आदिवासींचा विकास हा फक्त प्रशासन व लोकप्रतिनिधींच्या तोंडून ऐकायला मिळतो. 

गेल्या अनेक वर्षात तालुक्यात नळपाणीपुरवठा योजनांवर करोडोचा खर्च करण्यात आला, परंतु नावालाच राबवलेल्या योजनांमुळे आदिवासींच्या पाचवीला पुजलेली पाणीटंचाईची समस्या अद्याप सुटलेली नाही. तालुक्याच्या मुख्यालयाला लागून पाच किमी अंतरावर असलेले ३१३ आदिवासी लोकवस्तीचे चास हे गाव.

या ठिकाणी फेब्रुवारी महिना उजडताच भीषण पाणीटंचाईचा सामना  करावा लागत असून, तीन किमीचा डोंगर पार करून पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागते. यामुळे येथील पाणीटंचाईचा प्रश्न  सोडवण्यासाठी पाणीपुरवठा विभागाने ५५ लाख रुपये खर्चून २०१८ ते २०१९ मध्ये नळपाणीपुरवठा योजनेचे काम हाती घेतले आहे, परंतु ठेकेदाराच्या मनमानी कारभारामुळे  हे काम अपूर्णच आहे.  या योजनेत फक्त विहिरीचे काम पूर्ण करण्यात आले आहे, परंतु अजूनपर्यंत विहिरीवरून गावापर्यंत पाणी पोहोचलेच नाही. 

यामुळे पुढील काळात तरी गावकऱ्यांना पाणी भेटेल का,  असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. तसेच येथे टाकीच्या बांधकामाचा शुभारंभ करण्यात आला व खड्डा खोदून ठेवला आहे. मागील पावसाळ्यात या खड्ड्यात  गाय पडून जखमी झाली होती. यामुळे गावकऱ्यांकडून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. या वर्षीदेखील येथील महिलांच्या डोक्यावरील हंडा उतरणार नसल्याची चिन्ह आहेत. 

टॅग्स :Vasai Virarवसई विरारWaterपाणी