शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा तुर्कीला दणका, विमानतळांवर सेवा देणाऱ्या सेलेबी कंपनीची सुरक्षा मंजुरी केली रद्द!
2
बिहार दौऱ्यात राहुल गांधी यांच्याविरोधात दोन गुन्हे दाखल, पोलिसांनी शंभराहून अधिक जणांना केलं आरोपी
3
India Pakistan Ceasefire: "भारत-पाकिस्तान यांच्यात १८ मेपर्यंत शस्त्रसंधी"; पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री डार यांचे विधान
4
आधी ट्रम्प यांच्यावर भडकली, नंतर पोस्ट डिलीट; कंगना म्हणाली, "जेपी नड्डांनी डिलीट करायला सांगितली"
5
ED Raid: 23 कोटींचं सोनं, 8 कोटी रोख; वसई विरार मनपाचे नगररचना उपसंचालक रेड्डीकडे सापडली कोट्यवधींची माया
6
Donald Trump : "मी असं म्हणत नाही की..."; भारत-पाकिस्तान युद्धविरामावर मोठे दावे करणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांची पलटी
7
सुटी रद्द झाल्याने कामावर परतणाऱ्या मेजरवर काळाचा घाला; डोळ्यादेखत पत्नीचा मृत्यू, लेक गंभीर जखमी
8
'पाकिस्तानशी फक्त दहशतवाद अन् PoK वर चर्चा होईल; तिसऱ्याचा हस्तक्षेप खपवून घेणार नाही'
9
'गदर'मधला दरम्यान सिंग आठवतोय का? एका आजारामुळे झालं होत्याचं नव्हतं, अभिनेत्याचा झाला दुर्देवी शेवट
10
व्यापाऱ्यांनी कोणाच्या धमकीला भीक घालू नये; आम्ही तुमच्या पाठीशी आहोत - देवेंद्र फडणवीस
11
इंग्लंड दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा; 'लेडी सेहवाग'ला मिळाली कमबॅकची संधी
12
अटक करण्याची धमकी देत मागितली खंडणी: उल्हासनगर पोलीस ठाण्यातील दोन पोलीस निलंबित
13
Crime: निवृत्त न्यायाधीशाच्या दोन मुले आणि सुनेला जन्मठेपेची शिक्षा; 2007 मधील प्रकरण काय?
14
Motivational Story: वडिलांचं सायकल दुरूस्तीचं दुकान, कष्टाची जाणीव ठेवून मुलानं दहावीत मिळवले घवघवीत यश
15
आश्चर्यकारक! आरोपीने बलात्कार पिडितेला भरकोर्टात केलं 'प्रपोज'; सर्वोच्च न्यायालयातील प्रसंग
16
"बेटा, सरेंडर कर", दहशतवाद्याने चकमकीआधी आईला केलेला Video कॉल; तिने समजावलं पण...
17
Shahapur: डोंगरावरून उडणारा ड्रोन अचानक कोसळला अन् गावात उडाली खळबळ; तो ड्रोन कोणाचा?
18
Nagpur: संधी मिळताच प्रवाशांना लुटायचे, रेल्वे स्थानकांवर चोऱ्या करणारी टोळी अटकेत
19
Ganeshotsav 2025: गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील मूर्तिकारांसाठी बीएमसीची महत्त्वाची पोस्ट
20
"बॉलिवूडमध्ये मंदी आली आहे, छोट्या कलाकारांकडे तर...", कल्कि कोचलीनचा खुलासा

बँकेच्या कर्जापासून आदिवासी अनभिज्ञ, कर्जमाफीनंतर आदिवासींच्या डोक्यावरील कर्ज झाले उघड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2020 00:33 IST

बोगस कर्ज कशी वाटप केली जातात आणि त्याचा लाभ अनेक सामाजिक संस्था, बँका व दलाल कसे आपल्या घशात घालून घेतात याचे जिवंत उदाहरण वाडा तालुक्यातील वि-हे येथील शेतकऱ्यांना दिलेल्या बोगस कर्जावरून उघड झाले आहे.

- वसंत भोईरवाडा : तालुक्यातील दुर्गम भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भागातील अनेक आदिवासी शेतकऱ्यांना आपण मोठ्या रकमेचे बँकेकडून कर्ज घेतले असल्याबद्दल माहितीच नसून शासनाने केलेल्या कर्जमाफीनंतर त्यांच्या नावे हजारो रुपयांचे कर्ज होते व ते माफ झाले असल्याचे निदर्शनास आले आहे. यामुळे बोगस कर्ज कशी वाटप केली जातात आणि त्याचा लाभ अनेक सामाजिक संस्था, बँका व दलाल कसे आपल्या घशात घालून घेतात याचे जिवंत उदाहरण वाडा तालुक्यातील वि-हे येथील शेतकऱ्यांना दिलेल्या बोगस कर्जावरून उघड झाले आहे. यातील फसवल्या गेलेल्या अनेक शेतकऱ्यांनी वाडा तहसीलदार यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे तक्रार करत या कर्ज प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाईची मागणी केली आहे.वाडा शहरापासून सुमारे ४० कि.मी. अंतरावरील वि-हे गावातील काही शेतकºयांना एका व्यक्तीने येऊन तुम्हाला कर्जमाफी मिळाली आहे. तुम्ही फॉर्म भरून लाभ घ्या आणि पावती आमच्या कार्यालयात आणून द्या, असे सांगितले. यानंतर येथील वसंत देऊ वातास, देवीदास गौड, सुरेश बोंगे, रमेश लक्ष्मण बोंगे, लखमा लक्ष्मण रिंजड, सोन्या रामू भोये, दामू देऊ बर्डे, बंधू सोनू बरफ या शेतकऱ्यांनी येऊन कर्जमाफीचे फॉर्म भरले असता आपण ३९ हजार तर कुणी ४२ हजार रुपये कर्ज घेतले होते आणि ते माफ झाले असे समजले. बंधू बरफ व वसंत वातास यांनी प्रत्यक्षात एकही रु पयांचे कर्ज घेतले नसून त्यांच्या नावे हजारो रुपयांचे कर्ज घेऊन ते माफ केले आहे असे उघड झाले. शेतकºयांनी दिलेल्या माहितीनुसार, काही वर्षांपूर्वी सिंजेंटा फाउंडेशनने येथील स्थानिक व्यक्ती भारत लहांगे यांना सोबत घेऊन शेतकºयांकडून एक फार्म भरून घेतला होता तसेच यानंतर काहींकडून धनादेश व कागद सह्या करून घेतले होते. यातील काही शेतकºयांना मोटार व बियाणे यासाठी ८ ते १९ हजार देण्यात आले होते. काहींनी यातील ठराविक रक्कम परत देखील केली तर मागील वर्षी झालेल्या कर्जमाफीत आपली कर्ज माफ झाली असतील असा समज या शेतकऱ्यांचा झाला. नुकताच झालेल्या कर्जमाफीत मात्र याच शेतकºयांच्या नावाने ३९ ते ४२ हजार अशा रक्कमेचे कर्ज काढलेले आहे हे पाहून शेतकरी अचंबित झाले आहेत. आपल्या अशिक्षितपणाचा फायदा घेत सह्या व अंगठे यांचा दुरुपयोग करून शेतकरी व कर्जमाफी करणाऱ्यां सरकारची घोर फसवणूक केल्याची तक्रार या शेतकऱ्यांनी केली आहे.शासनाच्या आदेशानुसार कर्जमाफी देण्याचे काम सुरू आहे. तालुक्यातील विºहे येथील शेतकºयांच्या कर्ज घेतलेच नसल्याबाबतच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. त्या अनुषंगाने चौकशी करु न वरिष्ठांच्या सूचनांनुसार कार्यवाही करू.- डॉ. उद्धव कदम, तहसीलदार, वाडा.वाडा तालुक्यातील भारत लहांगे याच्या पत्नीच्या नावे औषधे, खते व औजारे देण्यासाठी प्रयत्न केले होते, यात शेतकºयांची फसवणूक करण्यात आली असेल तर आम्हाला काही माहिती नाही. सविस्तर माहिती घेऊन कारवाही करू.- अविनाश वामन, प्रोजेक्ट आॅफिसर ,सिजेंटा फाउंडेशन

टॅग्स :palgharपालघरVasai Virarवसई विरार