शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
2
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
3
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
4
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
5
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
6
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
7
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
8
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
9
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
10
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
11
Asia Cup 2025 : बाबरनं षटकार मारत रुबाब झाडला! पण दुसऱ्याच चेंडूवर गोलंदाजानं असा घेतला बदला (VIDEO)
12
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
13
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
14
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
15
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
16
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
17
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
18
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
19
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
20
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन

प्रांत कार्यालयावर आदिवासींचा मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2019 22:22 IST

मागण्या मान्य न झाल्यास बेमुदत उपोषण : विकासाच्या नावाखाली सरकारने जमिनी हडपल्याचा आरोप

वसई : तालुक्यातील आदिवासी समाजाचे वास्तव्य असलेले पाडे विकासाच्या नावाखाली सरकार व धनदांडगे लोक उद्वस्त करण्याचा प्रयत्न करीत आहेत. आपल्या अस्तित्वाची लढाई लढत येणाऱ्या पुढच्या पिढीच्या भविष्यासाठी आता आदिवासी समाज गांधिजींच्या मार्गाने उपोषणाचे शस्त्र हाती घेऊन निद्रीस्त सरकारला जागे करण्याचा प्रयत्न करीत आहे. त्यासाठी सोमवारी तालुक्यातील आदिवासी एकता परिषदेच्यावतीने एका विराट मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. हजारोंच्या संख्येने हा मोर्चा प्रात कार्यालयावर धडकला. तेथे परिषदेच्यावतीने मागण्या मान्य न झाल्यास बेमूदत उपोषणाचा इशारा देण्यात आला आहे.

आदिवासी समाजाच्या अनेक मागण्या गेल्या काही वर्षापासून प्रलंबीत आहेत. वर्षानुवर्षे हा समाज राहत असलेल्या सरकारी व शेठ सावकारांच्या जागेवर आजही शर्णार्थी असल्या सारखी गत आहे. तो भूमिहीन शेतमजूराचे जिवन जगत असल्याने त्यांना राहत असलेल्या व वहिवाटीच्या जमिनीचे सातबारे जावे अशी त्यांची प्रमूख मागणी आहे. महाराष्ट्र शासनाची व वनखात्याच्या जागेवरील भात शेतीचे अतिक्र मण त्विरत नियमानुकूल करण्याची कार्यवाही करणे, वर्ष २००० च्या शासननियमानुसार आदिवासी समाजाच्या जातीच्या दाखल्यावर कुठल्याही धर्माचा उल्लेख न करता दाखले देण्यात यावे, अशिक्षीत आदिवासी समाजाच्या लोकांना जातीचे दाखले दिले जावे, गास गावातील शासनाची जमीन आदिवासी समाजाच्या भूमिहीन व शेतमजुरांना भातशेती करण्यास देण्यात यावी, गिरीज येथील सरकारी जमीनिवरील अतिक्रमण हटविण्यात यावे अशा विविध मागण्यांसाठी आदिवासी एकता परिषदेचे तालुका अध्यक्ष दत्ता सांबरे व तालुका उपाध्यक्ष वंदना जाधव यांच्या नेतृत्वाखाली वसई डेपो ते प्रांत कार्यालयापर्यंत मोर्चा काढला होता. प्रांत कार्यालयावर हा मोर्चा पोहचताच तेथे सभेत रूपांतर झाले. आमच्या मागण्या जोपर्यंत मान्य होत नाहित, तोपर्यंत आंम्ही बेमूदत आमरण उपोषण करणार असल्याचे सांबरे यांनी सांगीतले. याबाबत प्रांताधिकारी दिपक क्षिरसागर यांनी मोर्चेकऱ्यांना आश्वस्त केले.५६ पाड्यांवरील बांधवांचा अर्जवाघोली, निर्मळ, भुईगांव बुद्रूक, भुईगांव खुर्द, गास, गिरीज, सालोली, चुळणे, रानगांव, बाभोळा, नाळे, आगाशी, अर्नाळा, कोफराड, बोळींज विरार पूर्व,कळंब, सत्पाळा,पापडी या गावांमधील तब्बल ५६ आदिवासी पाड्यांवरील शेकडो बांधवांनी आदिवासी बांधवांच्या घराखालील जागा नावें करण्यासाठी अर्ज केलेले आहेत.च्आदिवासी समाजाच्या विकासासाठी अनेक वर्षापासून शासन योजना राबविण्याबाबत निर्णय झालेले आहेत. राहिल त्याचे घर, कसेल त्याची जमीन मात्र ज्या आदिवासी लोकांकडे जमीनच नाही अशांना सरकार चार एकर जमीन भातशेतीसाठी देते. मात्र, या योजनेसाठी जातीच्या दाखल्याची आवश्यकता असते. ते दाखले शासनानेच उपलब्ध करून द्यावे अशी मागणी आता करण्यात येत आहे.च् तालुक्यातील पारंपारिक आदिवासी पाडे विकासाच्या नावाखाली उद्वस्त करत त्यांना देशोधडीला लागले जात असून, भूमिहीन आदिवासी समाजाला कसण्यासाठी जमीन न देता ती धनदांडग्यांना कोळंबी प्रकल्पासाठी व वेगवेगळ्या विकासाच्या प्रकल्पासाठी देत आदिवासी पाड्यांवर वरवंटे फिरवले जात असल्यामूळे आदिवासी समाज संतप्त झाला आहे.च्गिरीज येथे सर्वे नंबर १४२ या जागेत अतिक्र मण केले गेले आहे. याबाबत वसई पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आलेला असतानाही कारवाई केली जात नाही. सदरे अतिक्र मण त्वरीत हटविण्यात यावे अशी मागणी के ली आहे.