शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

प्रांत कार्यालयावर आदिवासींचा मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2019 22:22 IST

मागण्या मान्य न झाल्यास बेमुदत उपोषण : विकासाच्या नावाखाली सरकारने जमिनी हडपल्याचा आरोप

वसई : तालुक्यातील आदिवासी समाजाचे वास्तव्य असलेले पाडे विकासाच्या नावाखाली सरकार व धनदांडगे लोक उद्वस्त करण्याचा प्रयत्न करीत आहेत. आपल्या अस्तित्वाची लढाई लढत येणाऱ्या पुढच्या पिढीच्या भविष्यासाठी आता आदिवासी समाज गांधिजींच्या मार्गाने उपोषणाचे शस्त्र हाती घेऊन निद्रीस्त सरकारला जागे करण्याचा प्रयत्न करीत आहे. त्यासाठी सोमवारी तालुक्यातील आदिवासी एकता परिषदेच्यावतीने एका विराट मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. हजारोंच्या संख्येने हा मोर्चा प्रात कार्यालयावर धडकला. तेथे परिषदेच्यावतीने मागण्या मान्य न झाल्यास बेमूदत उपोषणाचा इशारा देण्यात आला आहे.

आदिवासी समाजाच्या अनेक मागण्या गेल्या काही वर्षापासून प्रलंबीत आहेत. वर्षानुवर्षे हा समाज राहत असलेल्या सरकारी व शेठ सावकारांच्या जागेवर आजही शर्णार्थी असल्या सारखी गत आहे. तो भूमिहीन शेतमजूराचे जिवन जगत असल्याने त्यांना राहत असलेल्या व वहिवाटीच्या जमिनीचे सातबारे जावे अशी त्यांची प्रमूख मागणी आहे. महाराष्ट्र शासनाची व वनखात्याच्या जागेवरील भात शेतीचे अतिक्र मण त्विरत नियमानुकूल करण्याची कार्यवाही करणे, वर्ष २००० च्या शासननियमानुसार आदिवासी समाजाच्या जातीच्या दाखल्यावर कुठल्याही धर्माचा उल्लेख न करता दाखले देण्यात यावे, अशिक्षीत आदिवासी समाजाच्या लोकांना जातीचे दाखले दिले जावे, गास गावातील शासनाची जमीन आदिवासी समाजाच्या भूमिहीन व शेतमजुरांना भातशेती करण्यास देण्यात यावी, गिरीज येथील सरकारी जमीनिवरील अतिक्रमण हटविण्यात यावे अशा विविध मागण्यांसाठी आदिवासी एकता परिषदेचे तालुका अध्यक्ष दत्ता सांबरे व तालुका उपाध्यक्ष वंदना जाधव यांच्या नेतृत्वाखाली वसई डेपो ते प्रांत कार्यालयापर्यंत मोर्चा काढला होता. प्रांत कार्यालयावर हा मोर्चा पोहचताच तेथे सभेत रूपांतर झाले. आमच्या मागण्या जोपर्यंत मान्य होत नाहित, तोपर्यंत आंम्ही बेमूदत आमरण उपोषण करणार असल्याचे सांबरे यांनी सांगीतले. याबाबत प्रांताधिकारी दिपक क्षिरसागर यांनी मोर्चेकऱ्यांना आश्वस्त केले.५६ पाड्यांवरील बांधवांचा अर्जवाघोली, निर्मळ, भुईगांव बुद्रूक, भुईगांव खुर्द, गास, गिरीज, सालोली, चुळणे, रानगांव, बाभोळा, नाळे, आगाशी, अर्नाळा, कोफराड, बोळींज विरार पूर्व,कळंब, सत्पाळा,पापडी या गावांमधील तब्बल ५६ आदिवासी पाड्यांवरील शेकडो बांधवांनी आदिवासी बांधवांच्या घराखालील जागा नावें करण्यासाठी अर्ज केलेले आहेत.च्आदिवासी समाजाच्या विकासासाठी अनेक वर्षापासून शासन योजना राबविण्याबाबत निर्णय झालेले आहेत. राहिल त्याचे घर, कसेल त्याची जमीन मात्र ज्या आदिवासी लोकांकडे जमीनच नाही अशांना सरकार चार एकर जमीन भातशेतीसाठी देते. मात्र, या योजनेसाठी जातीच्या दाखल्याची आवश्यकता असते. ते दाखले शासनानेच उपलब्ध करून द्यावे अशी मागणी आता करण्यात येत आहे.च् तालुक्यातील पारंपारिक आदिवासी पाडे विकासाच्या नावाखाली उद्वस्त करत त्यांना देशोधडीला लागले जात असून, भूमिहीन आदिवासी समाजाला कसण्यासाठी जमीन न देता ती धनदांडग्यांना कोळंबी प्रकल्पासाठी व वेगवेगळ्या विकासाच्या प्रकल्पासाठी देत आदिवासी पाड्यांवर वरवंटे फिरवले जात असल्यामूळे आदिवासी समाज संतप्त झाला आहे.च्गिरीज येथे सर्वे नंबर १४२ या जागेत अतिक्र मण केले गेले आहे. याबाबत वसई पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आलेला असतानाही कारवाई केली जात नाही. सदरे अतिक्र मण त्वरीत हटविण्यात यावे अशी मागणी के ली आहे.