शहरं
Join us  
Trending Stories
1
"रडायचं नाही लढायचं! बिहार निकालानं खचून जाऊ नका; मुंबई महापालिकेवर काँग्रेसचा झेंडा फडकवा"
2
Rohini Acharya: "मी राजकारण सोडतेय आणि कुटुंबासोबतचे संबंधही तोडत आहे", लालू प्रसाद यादवांच्या मुलीच्या पोस्टने खळबळ
3
अखेर 'या' तारखेपासून नवी मुंबई विमानतळावरुन विमाने झेपावणार! पहिल्या टप्प्यात 10 शहरांसाठी सेवा सुरू होणार
4
IPL 2026 Retention Full List : KKR नं महागड्या खेळाडूला दिल्ला धक्का; कुणी कुणावर ठेवला भरवसा?
5
बिहारचा मुख्यमंत्री कोण होणार? जेडीयू म्हणतोय नीतीशच राहणार, भाजप म्हणतोय आमदार ठरवणार!
6
चीन-पाकिस्तानशी 'इलेक्ट्रोमॅग्नेटिक युद्ध'?; मुंबईनजीक GPS साठी भारताकडून NOTAM जारी, अर्थ काय?
7
Viral Video : एका दिवसात किती कमाई करतो मोमो विक्रेता? आकडा ऐकून हैराण व्हाल!
8
वीज बिल न भरल्याने कनेक्शन तोडले; रागात तरुणाने अख्ख्या शहराची लाईट बंद केली, वीज कर्मचाऱ्यांना रात्रभर कामाला लावलं
9
घरात दोन बायका असतानाही तिसरीशी लग्न; चौथी आणायच्या तयारीत होता नवरदेव, पण चांगलाच फसला!
10
IND vs SA 1st Test Day 2 Stumps : जड्डूसह कुलदीप-अक्षरचा जलवा! तिसरा दिवस ठरणार निकालाचा?
11
मासिक पाळी येण्यापूर्वी चिडचिड, रडू येतं, मूड जातो, त्याची ५ कारणं- शरीरातले बदल ओळखा पटकन
12
“काँग्रेस-मनसे एकमेकांचा दर्जा ठरवायला लागले तर आपण लांबून हसलेले बरे”; भाजपा नेत्यांचा टोला
13
सोम प्रदोष २०२५: सोम प्रदोषाने आठवड्याची सुरुवात होणार; 'या' ८ राशींना शिवकृपेचे संकेत मिळणार
14
थरारक! विवाहित प्रेयसीची हत्या, मृतदेहाचे तुकडे केले; शीर अन् अवयव बसच्या चाकाखाली चिरडले, मग..
15
कोण आहे डॉ. मुजफ्फर? ज्याला पकडण्यासाठी सीबीआय घेतेय इंटरपोलची मदत! अफगाणिस्तानाशी आहे कनेक्शन
16
"बिहारमध्ये भाजपचा जो स्ट्राइक रेट आला, तसा तर आमचा 1984 मध्येही नव्हता"; काँग्रेसला अजूनही निकालावर विश्वास बसेना 
17
"मला नितीश कुमार मुख्यमंत्री व्हावेत असे वाटते...", बिहारच्या सीएम पदावर चिराग पासवान यांनी स्पष्टच सांगितले
18
बिहारमध्ये सर्वाधिक जागा जिंकूनही भाजपाची वाढली डोकेदुखी; मंत्रिपदाचा फॉर्म्युला बदलावा लागणार?
19
“तुम्ही चांगल्या योजना आणल्या नाहीत, जो जीता वहीं सिकंदर”; CM फडणवीसांचे शरद पवारांना उत्तर
20
इंदुरीकर महाराजांच्या लेकीच्या साखरपुड्यात किती लोक आले होते? जावयानेच सांगितला खरा आकडा
Daily Top 2Weekly Top 5

पालघर जि.प.च्या १०३ शिक्षकांच्या ठाण्यामध्ये बदल्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2019 23:50 IST

पालघर जिल्ह्यात शिक्षकांची कमतरता असल्यामुळे जानेवारीत बदली झालेल्या सुमारे १०३ प्राथमिक शिक्षकांची नेमणुक ठाणे जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये केली नव्हती.

ठाणे  - पालघर जिल्ह्यात शिक्षकांची कमतरता असल्यामुळे जानेवारीत बदली झालेल्या सुमारे १०३ प्राथमिक शिक्षकांची नेमणुक ठाणे जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये केली नव्हती. मात्र, रखडलेल्या या बदल्या अखेर पालघर जिल्ह़ा परिषदेने ठाणे जिल्ह्यात केल्या असून ते शिक्षक नेमून दिलेल्या शाळेत हजर झाले आहेत.जिल्हा विभाजनानंतर दोन्ही जिल्ह्यात आकृतीबंधनुसार शिक्षकांची पदे समान ठेवण्याच्या निर्णय मागील वर्षी झाला. त्यास अनुसरून ठाणे जिल्ह्यातील काही शिक्षकांची पालघरमध्ये बदली करण्यात आली. मात्र, पालघर जिल्ह्यात शिक्षकांची कमतरता असल्यामुळे त्यावेळी शिक्षकांच्या बदल्या पालघर जिल्हा परिषदेने थांबवल्या होत्या. आता त्यांच्याकडे पुरेसे शिक्षक असल्यामुळे जिल्हा विभाजनानंतर आवडीच्या जिल्ह्यात राहणे पसंत करणाऱ्या विकल्पानुसार १०३ शिक्षकांच्या बदल्या रखडल्या होत्या असे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सुभाष पवार यांनी सांगितले.जिल्ह्यातील शिक्षकांमध्ये १३८ शिक्षकांच्या बदल्या पालघर जिल्हा परिषदेने ठाणे जिल्ह्यात केल्याची चर्चा शिक्षक वर्गात आहे. परंतु, ते केवळ १०३ शिक्षक असून ते आधीच यायला पाहिजे होते ते आता हजर झाले आहेत. या पालघरच्या शिक्षकांना आता शहराजवळच्या शाळा मिळणार असल्याची चर्चादेखील जिल्ह्यातील शिक्षकांमध्ये आहे. मात्र, यास मुख्य कार्यकारी अधिकारी हिरालाल सोनवणे यांनी दुजोरा दिला नाही.कारण आधीच ठाणे जिल्ह्यात सेवाज्येष्ठतेसह अन्य कारणाखाली काही शिक्षकांवर अन्याय झालेला असून तो दूर करावा, असे न्यायालयाने विभागीय आयुक्तांना आदेश दिले आहेत. त्यानुसार १० मे रोजी विभागीय आयुक्तांकडे या शिक्षकांची सुनावणी होईल. त्यांच्या सेवाज्येष्ठतेनुसार व तक्रारीस अनुसरून या शिक्षकांची प्राधान्याने बदली करण्यात येईल असे सांगितले होते.

टॅग्स :Teacherशिक्षकpalgharपालघरthaneठाणे