शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbra Train Accident: लोकल ट्रेनमधून पडले, किडे-मुंग्यांसारखा गेला जीव, मृत्यू झालेले कोण? नावे आली समोर
2
"देशात माणसांची किंमत नाही, रेल्वेमंत्र्यांनी तिथं जाऊन ..."; मुंबई लोकल दुर्घटनेवर राज ठाकरे संतापले
3
पती, पत्नी आणि हत्याकांड! राजा रघुवंशीप्रमाणेचे 'या' तरुणांचाही पत्नीने काढला काटा
4
मुंब्र्याच्या 'त्या' धोकादायक वळणाबाबत मनसे कार्यकर्त्याने दिलं होतं पत्र; अपघातात त्यानेच गमावले पाय
5
मुंब्रा अपघात: "प्रवाशांवरच त्यांच्या मृत्यूचे खापर फोडून चालणार नाही"; शरद पवारांचे रोखठोक मत
6
NCP अजित पवार गटाच्या पदाधिकाऱ्याचा मृतदेह स्वत:च्या कारमध्येच आढळला; नेमकं काय घडलं?
7
Mumbai Train Accident: "घटना दुर्दैवी, 'रेल्वे'कडून अपघाताची चौकशी सुरू"; मुख्यमंत्र्यांनी दिली महत्त्वाची माहिती
8
Raja Raghuvanshi :'सोनम माझ्यासोबत बोलत नाही, मला लग्न करायचं नाही'; लग्नाआधीच राजा रघुवंशीने आईला सांगितलं होतं
9
"दुआ लिपासोबत मुलं जन्माला घालायचीत", वादग्रस्त वक्तव्यावर बादशाहचं स्पष्टीकरण, म्हणाला...
10
IND vs ENG: 'तो बुमराहपेक्षाही भारी...' माजी क्रिकेटपटूनं घेतलं 'या' गोलंदाजाचं नाव!
11
Madhavi Latha : कष्टाचं फळ! १७ वर्षांच्या कठोर परिश्रमानंतर चिनाब पुलाचं स्वप्न साकार; कोण आहेत माधवी लता?
12
Swami Samartha: राशीनुसार करा स्वामींची उपासना मिळेल सुख-शांती आणि मिटेल वासना!
13
अचानक मुलगा बनला ८० कोटींचा मालक; १९९५ साली वडिलांनी खरेदी केले होते 'या' कंपनीचे शेअर्स
14
Raja Raghuvanshi : कोणी केला होता राजा रघुवंशीवर पहिला वार? खुनाच्या रात्री नेमकं काय घडलं? 
15
लग्नानंतर घरी कोणालाच बोलवलं नाही, कारण...; उषा नाडकर्णी म्हणाल्या - "घाणेरड्या बिल्डिंगमध्ये राहायला गेले आणि"
16
"प्रवाश्यांनी शिस्त पाळावी एवढीच विनंती"; किरीट सोमय्यांची मुंब्रा रेल्वे अपघातावर प्रतिक्रिया
17
'बेवफा सोनम'नंतर राज कुशवाहला अटक, पण खरा मारेकरी कोण? इंदूर पोलीस म्हणाले...
18
Mumbai Train Accident: ठाण्याजवळ रेल्वे दुर्घटना! धावत्या ट्रेनमधून ट्रॅकवर पडले प्रवासी, चार जणांचा मृत्यू; जखमींवर उपचार सुरु
19
ठाकरे बंधूंच्या युतीची चर्चा अन् थोड्याच वेळात मनसेचा एकनिष्ठ नेता करणार शिंदेसेनेत प्रवेश
20
UIDAI नं विद्यार्थ्यांसाठी आणली इंटर्नशिप ऑफर, महिन्याला मिळणार २० ते ५० हजार रुपये; कधी अर्ज करता येणार

पालघर जि.प.च्या १०३ शिक्षकांच्या ठाण्यामध्ये बदल्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2019 23:50 IST

पालघर जिल्ह्यात शिक्षकांची कमतरता असल्यामुळे जानेवारीत बदली झालेल्या सुमारे १०३ प्राथमिक शिक्षकांची नेमणुक ठाणे जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये केली नव्हती.

ठाणे  - पालघर जिल्ह्यात शिक्षकांची कमतरता असल्यामुळे जानेवारीत बदली झालेल्या सुमारे १०३ प्राथमिक शिक्षकांची नेमणुक ठाणे जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये केली नव्हती. मात्र, रखडलेल्या या बदल्या अखेर पालघर जिल्ह़ा परिषदेने ठाणे जिल्ह्यात केल्या असून ते शिक्षक नेमून दिलेल्या शाळेत हजर झाले आहेत.जिल्हा विभाजनानंतर दोन्ही जिल्ह्यात आकृतीबंधनुसार शिक्षकांची पदे समान ठेवण्याच्या निर्णय मागील वर्षी झाला. त्यास अनुसरून ठाणे जिल्ह्यातील काही शिक्षकांची पालघरमध्ये बदली करण्यात आली. मात्र, पालघर जिल्ह्यात शिक्षकांची कमतरता असल्यामुळे त्यावेळी शिक्षकांच्या बदल्या पालघर जिल्हा परिषदेने थांबवल्या होत्या. आता त्यांच्याकडे पुरेसे शिक्षक असल्यामुळे जिल्हा विभाजनानंतर आवडीच्या जिल्ह्यात राहणे पसंत करणाऱ्या विकल्पानुसार १०३ शिक्षकांच्या बदल्या रखडल्या होत्या असे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सुभाष पवार यांनी सांगितले.जिल्ह्यातील शिक्षकांमध्ये १३८ शिक्षकांच्या बदल्या पालघर जिल्हा परिषदेने ठाणे जिल्ह्यात केल्याची चर्चा शिक्षक वर्गात आहे. परंतु, ते केवळ १०३ शिक्षक असून ते आधीच यायला पाहिजे होते ते आता हजर झाले आहेत. या पालघरच्या शिक्षकांना आता शहराजवळच्या शाळा मिळणार असल्याची चर्चादेखील जिल्ह्यातील शिक्षकांमध्ये आहे. मात्र, यास मुख्य कार्यकारी अधिकारी हिरालाल सोनवणे यांनी दुजोरा दिला नाही.कारण आधीच ठाणे जिल्ह्यात सेवाज्येष्ठतेसह अन्य कारणाखाली काही शिक्षकांवर अन्याय झालेला असून तो दूर करावा, असे न्यायालयाने विभागीय आयुक्तांना आदेश दिले आहेत. त्यानुसार १० मे रोजी विभागीय आयुक्तांकडे या शिक्षकांची सुनावणी होईल. त्यांच्या सेवाज्येष्ठतेनुसार व तक्रारीस अनुसरून या शिक्षकांची प्राधान्याने बदली करण्यात येईल असे सांगितले होते.

टॅग्स :Teacherशिक्षकpalgharपालघरthaneठाणे