शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025 IND vs PAK Final : ठरलं! इतिहासात पहिल्यांदाच भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल
2
'संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना NDRF निधीतून भरीव मदत द्या'; CM फडणवीसांची अमित शाहांकडे मागणी
3
इस्रायलची राजधानी तेलअवीव येथे कारमध्ये मोठा स्फोट, अनेक जण जखमी झाल्याची शक्यता
4
संकट अद्याप टळलेले नाही, पुढील २ दिवस पाऊस वाढण्याचा अंदाज; विदर्भ, मराठवाड्यात काय होणार?
5
लडाख हिंसाचारानंतर सोनम वांगचुक यांच्यावर मोठी कारवाई; सरकारने रद्द केला एनजीओचा परवाना
6
Saim Ayub : आफ्रिदीच्या जावयाला टक्कर देण्याच्या नादात फजिती; सर्वाधिक वेळा पदरी पडला भोपळा!
7
कोथरूड मारहाण प्रकरणात निलेश घायवळही आरोपी; दहशत वाढवण्यासाठी दिली होती पिस्तुल
8
Suryakumar Yadav Hearing On PCB Complaint : सूर्याला फक्त वॉर्निंग की... फायनल आधी होणार फैसला!
9
'शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी PM केअर फंड वापरा'; उद्धव ठाकरेंची सरकारकडे मोठी मागणी
10
कपड्यांवरून ट्रोलिंगबाबत अखेर अमृता फडणवीस यांनी सोडलं मौन, म्हणाल्या- "ज्या महिलेकडे..."
11
झुबिन गर्गच्या मृत्यू प्रकरणात नवं वळण; संगीतकार ज्योती गोस्वामीला अटक, अनेकांची चौकशी सुरु
12
Taskin Ahmed 100 Wickets : पाक विरुद्ध बांगलादेशी गोलंदाजाची कमाल! पहिल्याच षटकात साधला 'शतकी' डाव
13
“विद्यार्थ्यांची परीक्षा देण्याची मानसिकता नाही, MPSC पुढे ढकला”; कुणी केली सरकारकडे मागणी? 
14
Maharashtra Flood: “महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना पूर्ण मदत करावी, मदतकार्याला गती द्यावी”; राहुल गांधींचे आवाहन
15
Asia Cup 2025 Final: सूर्यकुमार यादवच्या विरोधात पाकची तक्रार; टीम इंडियाचा कर्णधार फायनलला मुकणार? जाणून घ्या प्रकरण
16
लालबागचा राजा संकटात धावून आला; शेतकरी बांधव, पूरग्रस्तांना मंडळाकडून ५० लाखांची मदत घोषित
17
17 पैकी 12 जणांची मंत्रिमंडळातून होणार 'सुट्टी'! या राज्यात भाजप करणार मोठी 'सर्जरी'? मंत्रीपदासाठी या नव्या नावांची चर्चा!
18
VIDEO: दिसण्यावर जाऊ नका... काकांनी गायलेलं रोमँटिंक गाणं ऐका, नक्कीच त्यांचे 'फॅन' व्हाल
19
Video - बदल्याची आग! लिव्ह-इन पार्टनर झाला हैवान; Ex गर्लफ्रेंडला एक्टिव्हाने दिली धडक
20
Pranjal Khewalkar: रोहिणी खडसेंचे पती प्रांजल खेवलकर यांना पुणे न्यायालयाकडून जामीन मंजूर

फळ वाइन व्यवसायाला पर्यटनाची जोड?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2019 00:09 IST

२०० प्रशिक्षणार्थ्यांचा सहभाग : बागायती क्षेत्राचा तोटा नफ्यात परावर्तित होणार?

पालघर : कोकणासह जिल्ह्यात आंबा, काजू, चिकू, जांभूळ, केळी, फणस यांची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. या फळांचा स्वाद, चव यांचा उपयोग फळ वाईन व्यवसायात केल्यास याचा शेतकऱ्यांना फायदा होईल. पर्यटन व्यवसायाला याची जोड दिल्यास शेतकऱ्यांना निश्चितच फायदा होईल. फळ प्रक्रि या उद्योग आणि फळ वाईन निर्मितीद्वारे तोट्यात जाणारे बागायती क्षेत्र नफ्यात रूपांतरित करण्यासंदर्भात आयोजित प्रशिक्षण शिबिराला तरुण वर्गातून चांगला प्रतिसाद लाभला.दरम्यान, शेतकºयांकडे उत्पादित होणाºया या नाशवंत शेतीमालापैकी बरेच उत्पादन वेळेत विकले न गेल्याने तसेच योग्य प्रकारे प्रक्रिया करून साठवणूक न केल्याने वाया जाते. कोकणातील ५ टक्के इतके क्षेत्रफळ हे फळ लागवडीखाली येत आहे. यामध्ये प्रामुख्याने आंबा, काजू, चिकू, जांभूळ, केळी, फणस यांची लागवड मोठ्या प्रमाणात होते. परदेशी पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी कोकणात फळ वाईन व्यवसाय हा पर्यटन व्यवसायासोबत जोडल्यास कोकणातील प्रमुख व्यवसाय असलेले शेती, मत्स्य, पर्यटन यांना त्याचा जास्त फायदा होईल. मलबेरी, ब्लूबेरी, पीच या फळांचा तुलनेने कोकणातील फळांना नैसर्गिक स्वाद, चव, मधूर वास असल्याने यातून तयार होणारी वाईन, सरबते जास्त स्वादीष्ट असतील आणि हे अनुभवण्यासाठी मुंबई, देशाअंतर्गत पर्यटक इतकेच मर्यादित न राहता परदेशी पर्यटक सुद्धा मोठ्या संख्येने कोकणात येऊ शकतील. यातून कोकणातील शेती, मत्स्य व पर्यटन पूरक सर्वच व्यवसायांना रोजगार वाढीसाठी फायदा होईल, असे मत समृद्ध कोकण संस्था पालघरचे अध्यक्ष रोहित पाटील यांनी व्यक्त केले. यामुळे तोट्यात जाऊ शकणारी शेती - वाडी या प्रक्रिया उद्योग आणि फळ वाईन निर्मितीमुळे नफ्यात रूपांतरित होऊ शकेल. ‘कोकणातील फळ व्यावसायिकांना हमी भाव मिळावा म्हणून वाईन क्लबची निर्मिती केली आहे. या वाईन क्लबच्या माध्यमातून पुढील काही वर्षांत शंभराहून अधिक वायनरी प्रकल्प आपण उभे करणार आहोत. यामुळे कोकणातील काजूची बोंडे, आंबा, जांभूळ, चिकू बागायतदारांना याचा फायदा होऊ शकेल’, असे मत समृद्ध कोकण संघटने संस्थापक संजय यादवराव यांनी व्यक्त केले.महाराष्ट्र राज्य शासनाने १६ सप्टेंबर २०१९ रोजी प्रसिद्ध केलेल्या राजपत्रात महाराष्ट्रात उत्पादित होणाºया द्राक्ष वगळून इतर फळांना उत्पादन शुल्कातून प्रती बल्क लीटरला एक रुपया इतकी सूट देण्यात आली आहे. या कार्यक्र माला प्रमुख मार्गदर्शक म्हणून निलेश लेले, अध्यक्ष, असोसिएशन आॅफ फूड सायंटिस्ट अ‍ॅण्ड टेक्नॉलॉजिस्ट असोसिएशन, मुंबई विभाग आणि प्रियंका सावे, फ्रिजांतो वाईनच्या सर्वेसर्वा उपस्थित होत्या. निलेश लेले यांनी फळांवरील प्रक्रिया आणि पॅकेजिंगची माहिती दिली तर प्रियंका सावे यांनी या व्यवसायातील अनुभव व शासकीय परवानगीविषयी माहिती दिली.या प्रशिक्षण शिबिरात फळ प्रक्रिया आणि या उद्योगातील संधी, फळ वाईन निर्मिती व्यवसाय, या विषयातीस विविध शासकीय योजनांची माहिती प्रशिक्षणार्थ्यांना देण्यात आली. सोबत प्रमाणपत्रही देण्यात आले. या प्रशिक्षण शिबिरात पालघर-ठाणे सोबत रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, कल्याण, डोंबिवली, मुंबई या भागातून २०० प्रशिक्षणार्थी सहभागी झाले होते.