शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rains: मुंबईला ऑरेंज अलर्ट जारी, उपनगरात जोरदार हजेरी; अंधेरी सबवे बंद!
2
धावत्या बसमध्येच प्रसूती, नंतर बाळाला बाहेर फेकलं; कथित पती-पत्नीचा अमानुष प्रकार
3
अमेरिकेने भारताला दिले गिफ्ट, पाकिस्तानचा थयथयाट; घातक फायटर जेटसाठी पाठवले खास इंजिन
4
SBI च्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! या तारखेला ATM, UPI, IMPS, NEFT सेवा राहणार बंद; पाहा डिटेल्स
5
Ganpati Extra Buses for Konkan : गुड न्यूज! चाकरमान्यांना बाप्पा पावला; गणेशोत्सवासाठी कोकणात STच्या जादा ५ हजार बस धावणार
6
Air India Plane Crash : मोठा दावा! विमान अपघातापूर्वीच इंधन नियंत्रण स्विच खराब असल्याचा इशारा'CAA'ने दिला होता
7
Raigad Heavy Rain: रायगडमध्ये पावसाचा कहर! सहा तालुक्यांमधील शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी
8
पत्नीला जाळून मारल्याप्रकरणी पतीला अटक, पण ती प्रियकरासोबत सापडली जिवंत, सोलापूरातील धक्कादायक प्रकार
9
Accident Video: मृत्यूचा थरार कॅमेऱ्यात कैद! दोन तरुणांना कारने उडवले, एकाचा जागीच मृत्यू
10
...तर निम्मे होतील टोलचे दर, 'अशा' रस्त्यांवर वाहन चालवणाऱ्यांना दिलासा; सरकारनं बनवला नवा प्लॅन
11
Ramayana : तब्बल ४ हजार कोटींमध्ये बनतोय रणबीरचा 'रामायण'; निर्माते म्हणाले, "हॉलिवूडच्या जवळपासही..."
12
संपत्तीवरून वाढला वाद, पत्नीने अवघी १० लाख लावली पतीच्या जीवाची बोली! सुपारी दिली अन्...  
13
नवजात बाळाला मालिश करणं का महत्त्वाचं, कोणतं तेल आहे सर्वात बेस्ट?
14
Bitcoin Return Chart: ५ वर्षांत बनवलं राजा! तुम्हीही १००-२०० रुपयांत खरेदी करू शकता बिटकॉईन
15
जयशंकर यांनी चीनच्या राष्ट्राध्यक्षांना दिला पीएम मोदींचा संदेश; पाकिस्तानला लागणार मिरची..!
16
सरकार बदलणार MRP चा फॉर्म्युला; वस्तूंच्या किंमती कमी होणार की महागणार? ग्राहकांवर होणार परिणाम
17
धक्कादायक! हरवलेला क्रिकेटचा बॉल शोधत होता, बंद घरात मानवी सांगाडा पाहून हादरला
18
Video - जीवघेणा प्रवास! शाळेत जाण्यासाठी चिमुकलीची धडपड; पाय घसरून चिखलात पडली अन्...
19
व्रत-वैकल्यांचा राजा श्रावणमास, प्रत्येक दिवसाचे महत्त्व खास; पाहा, सण-उत्सवांचे महात्म्य
20
वय ३५? काळजी करू नका! 'या' ३ सोप्या स्टेप्सने कमवू शकता १ कोटीचा फंड, गुंतवणुकीचा सिक्रेट रोडमॅप!

प्रदूषणकारी उद्योगांना ‘सर्वोच्च’ चपराक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2020 00:35 IST

दंडाच्या रकमेपैकी ३० टक्के महिनाभरात भरा : ...तरच म्हणणे विचारात घेण्याचे निर्देश

n  लोकमत न्यूज नेटवर्कबोईसर : तारापूर एमआयडीसीतील प्रदूषणामुळे परिसरातील पर्यावरणाच्या केलेल्या नुकसानीच्या भरपाईसाठी राष्ट्रीय हरित लवादाने तारापूरच्या प्रदूषणकारी उद्योगांना ठोठावलेल्या १६० कोटी रुपये दंडात्मक रकमेच्या ३० टक्के रक्कम एक महिन्याच्या आत भरली तरच पुढील म्हणणे विचारात घेतले जाईल, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने तारापूरच्या उद्योजकांच्या संघटनेला (टीमा)  दिले आहेत. राष्ट्रीय हरित लवादाने ठोठावलेल्या दंडाविरोधात टीमाने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केल्यानंतर सुनावणीपूर्वी १४ डिसेंबरला हे निर्देश दिल्याने देशातील सर्वांत प्रदूषणकारी तारापूर औद्योगिक क्षेत्रात प्रदूषण करणाऱ्या उद्योगांना चांगलीच चपराक बसली आहे.अखिल भारतीय मांगेला समाज व इतर संस्थांनी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ व इतर संबंधित संस्थांविरुद्ध मे २०१६ मध्ये राष्ट्रीय हरित लवादाकडे याचिका दाखल केली होती. तारापूर औद्योगिक क्षेत्रातील २५ दशलक्ष घनमीटर प्रतिदिन (एमएलडी) क्षमतेच्या सामुदायिक सांडपाणी प्रक्रिया केंद्रातून (सीईटीपी) नवापूरच्या समुद्रात मोठ्या प्रमाणात प्रक्रिया न करताच रासायनिक सांडपाणी सोडले जात असल्याने समुद्र किनारपट्टीवरील जैवविविधतेवर गंभीर परिणाम होत आहेत. या हानीबरोबरच नागरिकांच्या आरोग्यावरही परिणाम होत असल्याने ही याचिका करण्यात आली होती. या याचिकेवर मागील वर्षी १७ सप्टेंबर रोजी झालेल्या सुनावणीनंतर पर्यावरणाची झालेली हानी भरून काढण्याकरिता प्रदूषण करणाऱ्या सुमारे १०२ उद्योग व सामुदायिक सांडपाणी प्रक्रिया केंद्र असे सर्व मिळून १६० कोटी रुपये दंड महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे जमा करण्याचे निर्देश दिले होते.पर्यावरणाच्या झालेल्या ऱ्हासाच्या स्थितीत सुधारण्यासाठी नुकसानभरपाई म्हणून तारापूर येथील प्रदूषणकारी उद्योगांकडून १६० कोटी रुपये गोळा करण्यात यावेत, असे राष्ट्रीय हरित लवादाने नेमलेल्या समितीने सर्वोच्च न्यायालयात सादर केलेल्या अहवालात नमूद केले होते. दरम्यान, १६० कोटी दंडात्मक रकमेपैकी ३० टक्के एक महिन्यात भरा, तरच पुढचे म्हणणे विचारात घेण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिल्याने स्थानिकांना दिलासा मिळाला आहे. न्यायालयाने केलेल्या सूचना या याचिकेत नोंदवण्यात आलेल्या आक्षेपांची माहिती राष्ट्रीय हरित लवादाने स्थापन केलेल्या नियंत्रण समिती आणि  अखिल भारतीय मांगेला समाज परिषदेला दिल्यानंतर ते हरित लवादाकडे सादर करावे.  नुकसानभरपाईची ३०  टक्के रक्कम महिनाभरात जमा केली तरच या दंडात्मक रकमेच्या स्थगितीसाठी  अर्जदारांची बाजू विचारात  घेण्यात येईल.  तारापूरचे  प्रदूषण नियंत्रणात आणण्यासाठी उद्योगांनी केलेल्या उपाययोजनांची सविस्तर  माहिती राष्ट्रीय हरित लवादाकडे तीन आठवड्यात सादर करा.