शहरं
Join us  
Trending Stories
1
चितगाव बांगलादेशचे 'बलुचिस्तान' होण्याच्या मार्गावर; युनूस सरकारला धक्का बसण्याची शक्यता
2
"पाकिस्तानला POK खाली करावा लागेल, काश्मीरच्या मुद्द्यावर कोणाचीही मध्यस्थी मान्य नाही"
3
Narendra Modi : "आम्ही घरात घुसून मारू, पळून जाण्याची संधीही देणार नाही"; मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
4
Monsoon Update : आनंदाची बातमी! वेळेआधीच मान्सून दाखल होणार? हवामान विभागाने दिली अपडेट
5
Kiran Lahamte: आमदार किरण लहामटे यांच्या कारला ट्रकची जोरदार धडक, थोडक्यात बचावले!
6
ग्लेन मॅक्सेवलशी लग्नासंबंधी चाहत्याने विचारला प्रश्न, प्रिती झिंटाचा राग अनावर, रागारागात म्हणाली...
7
विराट कोहलीच्या रिटायरमेंटनंतर खूप इमोशनल झाली अनुष्का शर्मा, व्हिडीओ होतोय व्हायरल
8
Viral Video: कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल बोलताना भाजप नेत्याची जीभ घसरली, पाहा काय म्हणाले?
9
भारताची S-400 संरक्षण प्रणाली सुरक्षित: पीएम मोदींनी 'त्या' फोटोतून केली पाकिस्तानची पोलखोल
10
निवृत्तीनंतर विराट-अनुष्का प्रेमानंद महाराजांच्या चरणी, हातातील गुलाबी अंगठीनं वेधलं सर्वांचं लक्ष!
11
'हॅलो, तुमच्या विमानात बॉम्ब आहे', एका फोनमुळे विमानतळावर गदारोळ; तत्काळ हाय अलर्ट जारी!
12
कोहलीसाठी कायपण! 'टेस्ट फेअरवेल' देण्यासाठी चाहत्यांनी आखलाय एकदम 'बेस्ट प्लॅन'; जाणून घ्या सविस्तर
13
शाम्पू, लोशन आणि बॉडी सोपमध्ये असतात कॅन्सर होणारे केमिकल्स; धडकी भरवणारा रिसर्च
14
WTC Final : गत चॅम्पियन ऑस्ट्रेलियाला तगडी फाईट देण्यासाठी दक्षिण आफ्रिकेनं केली मजबूत संघ बांधणी
15
जिगरबाज...! समुद्रात बुडणाऱ्या महिलेला वाचविण्यासाठी वाहतूक पोलिसाची पाण्यात उडी
16
'हा भारताचा स्पष्ट विजय', जगातील सर्वात प्रतिष्ठित संरक्षण तज्ज्ञाने पाकिस्तानला दाखवला आरसा
17
“इस व्यक्ति को जानते हैं?” WhatsApp वरचा 'हा' मेसेज अन् फोटो करू शकतो बँक खातं रिकामं
18
Recruitment: भारतीय लष्करात भरती होण्याची संधी; नेमकं काम काय? कोण करू शकतं अप्लाय? कधी? आणि कसं?... इथे वाचा!
19
जुन्या भांडणावरुन बाप-लेकाचा चाकू अन् लोखंडी पाईपने खून, बदनापूरमधील धक्कादायक घटना
20
युद्धविरामानंतरही डिफेन्स स्टॉक्स तेजीत; PM मोदींच्या विधानाने बदललं गणित

प्रदूषणकारी उद्योगांना ‘सर्वोच्च’ चपराक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2020 00:35 IST

दंडाच्या रकमेपैकी ३० टक्के महिनाभरात भरा : ...तरच म्हणणे विचारात घेण्याचे निर्देश

n  लोकमत न्यूज नेटवर्कबोईसर : तारापूर एमआयडीसीतील प्रदूषणामुळे परिसरातील पर्यावरणाच्या केलेल्या नुकसानीच्या भरपाईसाठी राष्ट्रीय हरित लवादाने तारापूरच्या प्रदूषणकारी उद्योगांना ठोठावलेल्या १६० कोटी रुपये दंडात्मक रकमेच्या ३० टक्के रक्कम एक महिन्याच्या आत भरली तरच पुढील म्हणणे विचारात घेतले जाईल, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने तारापूरच्या उद्योजकांच्या संघटनेला (टीमा)  दिले आहेत. राष्ट्रीय हरित लवादाने ठोठावलेल्या दंडाविरोधात टीमाने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केल्यानंतर सुनावणीपूर्वी १४ डिसेंबरला हे निर्देश दिल्याने देशातील सर्वांत प्रदूषणकारी तारापूर औद्योगिक क्षेत्रात प्रदूषण करणाऱ्या उद्योगांना चांगलीच चपराक बसली आहे.अखिल भारतीय मांगेला समाज व इतर संस्थांनी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ व इतर संबंधित संस्थांविरुद्ध मे २०१६ मध्ये राष्ट्रीय हरित लवादाकडे याचिका दाखल केली होती. तारापूर औद्योगिक क्षेत्रातील २५ दशलक्ष घनमीटर प्रतिदिन (एमएलडी) क्षमतेच्या सामुदायिक सांडपाणी प्रक्रिया केंद्रातून (सीईटीपी) नवापूरच्या समुद्रात मोठ्या प्रमाणात प्रक्रिया न करताच रासायनिक सांडपाणी सोडले जात असल्याने समुद्र किनारपट्टीवरील जैवविविधतेवर गंभीर परिणाम होत आहेत. या हानीबरोबरच नागरिकांच्या आरोग्यावरही परिणाम होत असल्याने ही याचिका करण्यात आली होती. या याचिकेवर मागील वर्षी १७ सप्टेंबर रोजी झालेल्या सुनावणीनंतर पर्यावरणाची झालेली हानी भरून काढण्याकरिता प्रदूषण करणाऱ्या सुमारे १०२ उद्योग व सामुदायिक सांडपाणी प्रक्रिया केंद्र असे सर्व मिळून १६० कोटी रुपये दंड महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे जमा करण्याचे निर्देश दिले होते.पर्यावरणाच्या झालेल्या ऱ्हासाच्या स्थितीत सुधारण्यासाठी नुकसानभरपाई म्हणून तारापूर येथील प्रदूषणकारी उद्योगांकडून १६० कोटी रुपये गोळा करण्यात यावेत, असे राष्ट्रीय हरित लवादाने नेमलेल्या समितीने सर्वोच्च न्यायालयात सादर केलेल्या अहवालात नमूद केले होते. दरम्यान, १६० कोटी दंडात्मक रकमेपैकी ३० टक्के एक महिन्यात भरा, तरच पुढचे म्हणणे विचारात घेण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिल्याने स्थानिकांना दिलासा मिळाला आहे. न्यायालयाने केलेल्या सूचना या याचिकेत नोंदवण्यात आलेल्या आक्षेपांची माहिती राष्ट्रीय हरित लवादाने स्थापन केलेल्या नियंत्रण समिती आणि  अखिल भारतीय मांगेला समाज परिषदेला दिल्यानंतर ते हरित लवादाकडे सादर करावे.  नुकसानभरपाईची ३०  टक्के रक्कम महिनाभरात जमा केली तरच या दंडात्मक रकमेच्या स्थगितीसाठी  अर्जदारांची बाजू विचारात  घेण्यात येईल.  तारापूरचे  प्रदूषण नियंत्रणात आणण्यासाठी उद्योगांनी केलेल्या उपाययोजनांची सविस्तर  माहिती राष्ट्रीय हरित लवादाकडे तीन आठवड्यात सादर करा.