शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
2
ठाकरे बंधूंना निवडणूक ‘बेस्ट’ ठरणार नाही? उमेदवारीवरून शिवसैनिकांत नाराजी; ‘समृद्धी’चे आव्हान
3
"रशियाने मोठा तेल ग्राहक गमावला..."; पुतिन यांच्यासोबतची बैठक अयशस्वी, अलास्कातून ट्रम्प यांचं भारतासंदर्भात मोठं विधान!
4
SBI चा ग्राहकाना दिलासा, कर्जाचा हप्ता होणार कमी; होमलोन, कार लोन स्वस्तात मिळणार
5
मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस, विक्रोळीत दरड कोसळली; दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
6
LIC च्या ‘या’ स्कीममध्ये दररोज करा ४५ रुपयांची गुंतवणूक; जमा होईल २५ लाखांचा फंड, कोणती आहे योजना?
7
Dahi Handi 2025: कलियुगात टिकून राहायचे असेल तर कृष्णाच्या 'या' पाच गोष्टी आजपासून फॉलो करा!
8
'रामायण' हॉलिवूडपेक्षा कमी नाही...सनी देओलने दिली प्रतिक्रिया; हनुमानाच्या भूमिकेत दिसणार
9
उपराष्ट्रपती निवडणूक: रविवारी ठरणार NDA उमेदवार, PM मोदी निर्णय घेणार; २१ तारखेला अर्ज भरणार!
10
लाडक्या बहि‍णींमुळे STची एकाच दिवशी ३९ कोटींची कमाई; ४ दिवसांत ८८ लाख महिलांचा प्रवास
11
चैनीच्या वस्तू महागणार? जीएसटी कररचनेत मोठे बदल, काही वस्तूंवरील कर वाढणार
12
आजचे राशीभविष्य : शनिवार १६ ऑगस्ट २०२५; आज ज्या-ज्या क्षेत्रात वावराल त्या-त्या क्षेत्रात आपली प्रशंसा होईल, प्रिय व्यक्तीच्या सहवासाने आनंदित व्हाल
13
Dahi Handi 2025: गोपाळकाल्याचा प्रसाद खाऊन झाल्यावर हात न धुण्याच कारण काय?
14
किश्तवाड ढगफुटीत ६५ जणांचा गेला जीव, ३८ जणांची प्रकृती गंभीर; १०० अजूनही बेपत्ता
15
मालाडमध्ये इतके लोक राहतात? ट्रॅफिकला कंटाळून कश्मीरा शाहने शेअर केला मजेशीर व्हिडीओ
16
ठाकरे बंधू महापालिका निवडणुका एकत्र लढणार, मुंबई, ठाण्यात सत्ता; संजय राऊत यांचा दावा
17
पूर्णा नदीत आंदोलनकर्ता गेला वाहून, अद्याप शोध लागलेला नाही; स्वातंत्र्यदिनी आंदोलनाला लागले गालबोट
18
गणेशोत्सवात मराठी गाणी वाजवा; सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीची आग्रही भूमिका
19
'पती-पत्नी संकल्पना' व्याख्येत समलैंगिकांचाही समावेश व्हावा; हायकोर्टात गिफ्ट टॅक्स नियमाविरुद्ध याचिका
20
मध्य रेल्वेवर आज रात्री, तर 'परे'वर उद्या ब्लॉक; २१ मेल-एक्स्प्रेस फेऱ्यांना फटका, काही लोकल रद्द

दलाल घेताहेत वाड्यातील टोमॅटो कवडीमोल दराने

By admin | Updated: April 10, 2016 00:50 IST

तालुक्यात या वर्षी मोठ्या प्रमाणात टोमॅटोची लागवड केली असून उत्पन्नही भरपूर आले आहे. मात्र, या शेतपिकाला तालुक्यात बाजारपेठ उपलब्ध नसल्याने व माल साठवून ठेवण्यासाठी गोडाऊन

- वसंत भोईर,  वाडा तालुक्यात या वर्षी मोठ्या प्रमाणात टोमॅटोची लागवड केली असून उत्पन्नही भरपूर आले आहे. मात्र, या शेतपिकाला तालुक्यात बाजारपेठ उपलब्ध नसल्याने व माल साठवून ठेवण्यासाठी गोडाऊन शेतकऱ्यांकडे नसल्याचा फायदा दलालांनी उठवला आहे. ते मातीमोल भावाने शेतकऱ्यांकडून खरेदी करून व्यापाऱ्यांना विकत असल्याने त्यांचा धंदा तेजीत आहे. या व्यापारी अडकित्त्यात अडकलेला बळीराजा मात्र आर्थिक संकटात सापडला आहे.तालुक्यात देवघर या गावात ३० शेतकऱ्यांनी १५० ते २०० एकर जागेत टोमॅटो पिकवला आहे. तर बुधावली, गुंज, काटी, गौरापूर, बिलोशी, बिलावली, घोडमाल, पालसई, कोठे, तुसा, बोरांडा आदी गावांतील शेकडो शेतकऱ्यांनी या वर्षी टोमॅटो शेती केली असून त्यांना उत्पन्नही विक्रमी मिळाले आहे. मात्र, या मालाला दलाल भावच देत नसल्याने टोमॅटोची विक्री मातीमोल किमतीत होऊ लागली आहे. तालुका कृषी कार्यालय मात्र नावापुरतेच असून येथील अधिकारी कार्यालयातील अधिकारी शेतकऱ्यांना पूरक होईल, अशी कोणतीही कामगिरी करताना दिसत नाहीत. कृषीसंदर्भातील अनेक योजना शासन राबवत असते. मात्र, येथील शेतकऱ्यांपर्यंत त्या पोहोचतच नसल्याने त्यांचा फारसा उपयोग होत नाही. सरकारी बाबू फक्त कागद व फायली रंगवून सर्वकाही आलबेल असल्याचे वरिष्ठांना कळवत असल्याने परिस्थिती बिकट आहे. गेल्या अनेक वर्षांपासून वाडा तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीची मागणी आम्ही सातत्याने करत आहोत. परंतु, ती आजवर पूर्ण झालेली नसल्याने उत्पादन केलेल्या मालाला योग्य मोबदला मिळत नसल्याची खंत देवघर येथील शेतकरी किशोर पाटील, प्रकाश पाटील, रामचंद्र पाटील यांनी व्यक्त केली.कर्जबाजारी : एकरी एक लाख तोटाएका एकराला ५०० कॅरेट टोमॅटो निघतात. त्यासाठी २५०० ते ३००० रु.चे ५ पॅकेट बियाणे लागते. फवारणी तसेच मजुरी हा खर्च एक एकरासाठी दीड ते दोन लाख रु. येतो. ५०० कॅरेटचा माल ५० हजार रु.चा होतो. त्यामुळे एका एकराला एक लाख रु.चा तोटा या वर्षी येथील शेतकऱ्यांना झाला असल्याने शेतकऱ्यांच्या डोक्यावर कर्जाचा बोजा चढला आहे. टोमॅटो लागवडीसाठी सेवा सहकारी सोसायट्यांकडून घेतलेले कर्ज फेडायचे कसे, ही समस्या शेतकऱ्यांपुढे उभी आहे. निसर्गाच्या लहरीपणावर मात करून येथील शेतकऱ्यांनी टोमॅटोची उत्तम शेती केली. पीकही चांगले आले, मात्र ते दलालांमार्फत विकावे लागल्याने मिळणारा नफा दलालांच्या खिशात जात आहे.