शहरं
Join us  
Trending Stories
1
बिळातून बाहेर पडले, पाकिस्तानी सैन्य अधिकारी उघडपणे दहशतवाद्यांसोबत दिसले; हा घ्या पुरावा
2
Lahore Blast: पाकिस्तानमध्ये अचानक सायरन वाजला! विमानतळाजवळ तीन मोठे स्फोट, लाहोरमध्ये घबराट
3
Operation Sindoor : जम्मूमध्ये अलर्ट, जोधपूरमध्ये शाळा बंद! सीमेवर लष्कर सतर्क; हवाई संरक्षण युनिट्स सक्रिय केल्या
4
बँकांमध्ये तुमचे पैसे किती सुरक्षित? जर बँक बुडाली तर तुम्हाला पैसे परत मिळतात का?
5
कुख्यात आतंकवादी हाफिज सईदचं तळच उडवलं! मिसाईल स्ट्राईकने मुरिदकेत हाहाकार; पाहा व्हिडीओ
6
‘ऑपरेशन सिंदूर’वर राज ठाकरेंनी केलेल्या विधानावर CM फडणवीसांचे स्पष्ट भाष्य; म्हणाले...
7
द्वेषाचं बीज उखडून फेकणाऱ्या कर्नल सोफिया कुरेशी यांचा पगार किती? कुठून घेतलं शिक्षण? काय मिळतात सुविधा?
8
Helicopter Crash: गंगोत्रीकडे जाणारे हेलिकॉप्टर उत्तरकाशीच्या डोंगरात कोसळले, पाच भाविक ठार
9
Cheapest Home Loan: 'या' बँका देताहेत स्वस्त होम लोन; ७.९९% पासून सुरुवात, अर्ज करण्यापूर्वी चेक करा
10
"शेवटचे दोन महिने सोपे नव्हते", दीपिका पादुकोणने केला प्रेग्नंसीत आलेल्या अडचणींचा खुलासा
11
“भारत-पाकने संयम राखावा”; ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर रशियाशी युद्ध करत असलेल्या युक्रेनचे आवाहन
12
"हम अल्लाह की कसम खाते है...."; 'ऑपरेशन सिंदूर'नंतर अल कायदाची भारताला धमकी
13
Operation Sindoor: भारताचा एक घाव अन् उरले भग्न अवशेष! मसूद अजहरच्या अड्ड्याचे सॅटेलाईट फोटो
14
भारतानं ८० लढाऊ विमानांनी केला हल्ला; बिथरलेल्या पाकिस्तानी पंतप्रधानांचा कांगावा
15
भारत, पाकिस्तानात जाऊ नका; अमेरिका, चीनसह बड्या देशांनी दिल्या नागरिकांना सूचना
16
Asim Munir Net Worth: रियल इस्टेट, बँक, डेअरी... कंगाल पाकिस्तानचे सेना प्रमुख १०० कंपन्यांचे CEO; किती आहे संपत्ती?
17
२४ तासांत दुसऱ्यांदा बलुच बंडखोरांचा पाकिस्तानी सैन्यावर हल्ला, रिमोटने वाहन उडवले, ७ सैनिकांना ठार मारल्याचा दावा
18
मनसेशी युती केली तर उद्धवसेनेला बळ? ठाकरेंना शह देणे महायुतीला जाईल जड; राजकीय गणिते बदलणार
19
कोहलीने दिला हात, अनुष्का थेट दुर्लक्ष करुन पुढे गेली; 'विरुष्का'चा बंगळुरुमधील Video व्हायरल
20
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळेल ₹८९,९८९ चं फिक्स व्याज; मिळेल सरकारची गॅरेंटी

दलाल घेताहेत वाड्यातील टोमॅटो कवडीमोल दराने

By admin | Updated: April 10, 2016 00:50 IST

तालुक्यात या वर्षी मोठ्या प्रमाणात टोमॅटोची लागवड केली असून उत्पन्नही भरपूर आले आहे. मात्र, या शेतपिकाला तालुक्यात बाजारपेठ उपलब्ध नसल्याने व माल साठवून ठेवण्यासाठी गोडाऊन

- वसंत भोईर,  वाडा तालुक्यात या वर्षी मोठ्या प्रमाणात टोमॅटोची लागवड केली असून उत्पन्नही भरपूर आले आहे. मात्र, या शेतपिकाला तालुक्यात बाजारपेठ उपलब्ध नसल्याने व माल साठवून ठेवण्यासाठी गोडाऊन शेतकऱ्यांकडे नसल्याचा फायदा दलालांनी उठवला आहे. ते मातीमोल भावाने शेतकऱ्यांकडून खरेदी करून व्यापाऱ्यांना विकत असल्याने त्यांचा धंदा तेजीत आहे. या व्यापारी अडकित्त्यात अडकलेला बळीराजा मात्र आर्थिक संकटात सापडला आहे.तालुक्यात देवघर या गावात ३० शेतकऱ्यांनी १५० ते २०० एकर जागेत टोमॅटो पिकवला आहे. तर बुधावली, गुंज, काटी, गौरापूर, बिलोशी, बिलावली, घोडमाल, पालसई, कोठे, तुसा, बोरांडा आदी गावांतील शेकडो शेतकऱ्यांनी या वर्षी टोमॅटो शेती केली असून त्यांना उत्पन्नही विक्रमी मिळाले आहे. मात्र, या मालाला दलाल भावच देत नसल्याने टोमॅटोची विक्री मातीमोल किमतीत होऊ लागली आहे. तालुका कृषी कार्यालय मात्र नावापुरतेच असून येथील अधिकारी कार्यालयातील अधिकारी शेतकऱ्यांना पूरक होईल, अशी कोणतीही कामगिरी करताना दिसत नाहीत. कृषीसंदर्भातील अनेक योजना शासन राबवत असते. मात्र, येथील शेतकऱ्यांपर्यंत त्या पोहोचतच नसल्याने त्यांचा फारसा उपयोग होत नाही. सरकारी बाबू फक्त कागद व फायली रंगवून सर्वकाही आलबेल असल्याचे वरिष्ठांना कळवत असल्याने परिस्थिती बिकट आहे. गेल्या अनेक वर्षांपासून वाडा तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीची मागणी आम्ही सातत्याने करत आहोत. परंतु, ती आजवर पूर्ण झालेली नसल्याने उत्पादन केलेल्या मालाला योग्य मोबदला मिळत नसल्याची खंत देवघर येथील शेतकरी किशोर पाटील, प्रकाश पाटील, रामचंद्र पाटील यांनी व्यक्त केली.कर्जबाजारी : एकरी एक लाख तोटाएका एकराला ५०० कॅरेट टोमॅटो निघतात. त्यासाठी २५०० ते ३००० रु.चे ५ पॅकेट बियाणे लागते. फवारणी तसेच मजुरी हा खर्च एक एकरासाठी दीड ते दोन लाख रु. येतो. ५०० कॅरेटचा माल ५० हजार रु.चा होतो. त्यामुळे एका एकराला एक लाख रु.चा तोटा या वर्षी येथील शेतकऱ्यांना झाला असल्याने शेतकऱ्यांच्या डोक्यावर कर्जाचा बोजा चढला आहे. टोमॅटो लागवडीसाठी सेवा सहकारी सोसायट्यांकडून घेतलेले कर्ज फेडायचे कसे, ही समस्या शेतकऱ्यांपुढे उभी आहे. निसर्गाच्या लहरीपणावर मात करून येथील शेतकऱ्यांनी टोमॅटोची उत्तम शेती केली. पीकही चांगले आले, मात्र ते दलालांमार्फत विकावे लागल्याने मिळणारा नफा दलालांच्या खिशात जात आहे.