शहरं
Join us  
Trending Stories
1
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सहज जिंकला सामना, गुजरात टायटन्सला नमवून Mumbai Indians ला दिला धक्का 
2
२५ धावांत ६ विकेट्स ! RCB ने पायावर धोंडा मारला, जॉश लिटल GT चा नायक ठरला 
3
जम्मू-काश्मीर: हवाई दलाच्या वाहनांवर दहशतवाद्यांचा गोळीबार; लष्कराचे काही जवान जखमी
4
विराट कोहलीचा भीमपराक्रम! उत्तुंग षटकार पाहताच भारी होती अनुष्का शर्माची रिॲक्शन, Video
5
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
6
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
7
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
8
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
9
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
10
लोकसभेचा निकाल लागताच चित्र बदलणार; थरूर यांनी सांगितला 'इंडिया' आघाडीचा प्लॅन
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

सहा महिन्यांची बिले थकली; अमृत आहार योजनेत निधीची वानवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 29, 2020 5:45 AM

अमृत आहार योजनेसाठीच्या निधीसंदर्भात जिल्हा नियोजन समितीमध्ये कष्टकरी संघटनेचे ब्रायन लोबो यांनी प्रश्न उपस्थित केल्यानंतर जिल्हा प्रशासन जागे झाले.

- हितेन नाईकपालघर : कुपोषण निर्मूलनाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरलेल्या अमृत आहार योजनेसाठी आवश्यक निधीची वानवा असल्याचे स्पष्ट झाले आहे. याचा फटका अंगणवाड्यांना पोषण आहार पुरविणाऱ्या बचत गटांना बसला आहे. कुपोषण निर्मूलनाच्या दृष्टीने महत्त्वाच्या व महत्त्वाकांक्षी अशा या अमृत आहार योजनेसाठी जिल्हा यंत्रणेला १२ कोटींचा आवश्यक निधी उपलब्ध करून दिला असला तरी या योजनेअंतर्गत पोषण आहार पुरविणाºया अंगणवाड्यांना जूनपासून गेले सहा महिने बिले देण्यात आलेली नसल्याची तसेच अंगणवाड्यांमधील बालकांना गरम व ताजा असा आहार पुरवणाºया बचत गटांनाही वर्षभरापासून निधी उपलब्ध झाला नसल्याची बाब उघड झाली आहे. दरम्यान, जिल्हाधिकाऱ्यांनी तत्काळ याची दखल घेत २४ जानेवारीच्या पत्राने ८ कोटींचा निधी महिला बालकल्याण विभागाकडे वर्ग केला असून त्याचे वाटप लवकरच केले जाणार आहे.अमृत आहार योजनेसाठीच्या निधीसंदर्भात जिल्हा नियोजन समितीमध्ये कष्टकरी संघटनेचे ब्रायन लोबो यांनी प्रश्न उपस्थित केल्यानंतर जिल्हा प्रशासन जागे झाले. पालघर जिल्हा हा आदिवासीबहुल जिल्हा म्हणून ओळखला जात असून या जिल्ह्यातील कुपोषित बालकांची तसेच गरोदर व स्तनदा मातांना योग्य पोषण आहार मिळावा यासाठी शासनाने डॉ. एपीजे अब्दुल कलाम अमृत आहार योजना सुरू केली आहे. या योजनेंतर्गत गरोदरपणात व स्तनदा मातांना बाळंतपणानंतर ६ महिने, ७ महिने ते ६ वर्ष वयोगटातील बालकांना एक वेळचा आठवड्यातून ४ दिवस चौरस आहार दिला जातो.जिल्हा नियोजन समितीच्या सभेत राज्यपाल नियुक्त सदस्य व कष्टकरी संघटनेचे अ‍ॅड. ब्रायन लोबो यांनी पालकमंत्री दादा भुसे आणि जिल्हाधिकाºयांच्या निदर्शनास आणून दिली होती. लोबो यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांची समाधानकारक उत्तरे मात्र संबंधित आयसीडीएस विभागाचे अधिकारी देऊ शकले नव्हते. यावर माविमच्या अध्यक्षा ज्योती ठाकरे यांनी आपली नाराजी व्यक्त करीत बचत गटातील महिलांना सक्षम करण्याच्या उद्देशाला हरताळ फासण्याचा हा प्रयत्न असून खाजगी ठेकेदाराला ठेके देण्याचा हा डाव असल्याची शंकाही व्यक्त केली होती. आ. राजेश पाटील, जि.प. सदस्य काशिनाथ चौधरी यांनी अमृत आहार योजनेकडे होणारे दुर्लक्ष ही गंभीर बाब असल्याचे सांगितले.अमृत आहार योजनेसाठी आदिवासी विकास विभागामार्फत २० कोटींची तरतूद करण्यात आली होती. त्यातील महिला व बालकल्याण विभागाच्या आयुक्तालयातून प्रथम ६ कोटी ६६ लाखाचा निधी तर त्यानंतर दोन महिन्यात ५ कोटी ३३ लाख असा एकूण सुमारे १२ कोटींचा निधी प्राप्त झाला होता. मात्र उर्वरित ८ कोटींचा निधी वेळीच मिळत नसल्याने अंगणवाड्यांना मिळणारा आहार आणि हा आहार पुरवणारे बचत गट अडचणीत सापडले होते.फेब्रुवारीच्या आत टप्प्याटप्प्याने निधी वितरित करणारजिल्हाधिकाºयांनी २४ जानेवारी रोजीच्या पत्रान्वये उर्वरित ८ कोटींचा निधी वर्ग केला आहे. हा निधी टप्प्याटप्प्याने फेब्रुवारीच्या आत वितरित करण्यात येईल, असे महिला व बालकल्याण विभागाचे अधिकारी राजेंद्र पाटील यांनी ‘लोकमत’ला सांगितले.जिल्ह्यातील स्तनदा गरोदर मातांना व बालकांना डॉ. अब्दुल कलाम अमृत आहार योजना अंतर्गत पोषण आहार पुरविला जातो. २५ रुपये दराने आदिवासी विकास विभाग अमृत आहारासाठी निधी उपलब्ध करून देत असली तरी ही रक्कम अपुरी आहे.अंगणवाडी सेविका व मदतनीस पोषण आहार पुरविण्याचे काम करीत असताना या कामांचा त्यानुसार मोबदलाही दिला जातो. मात्र जिल्ह्यातील अंगणवाड्यांना मागील सहा महिन्यापासून आहार पुरविण्यापोटीचा झालेला खर्च मिळालेला नाही.

टॅग्स :palgharपालघर