शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

निवडणूक ओळखपत्र लिंक करण्यासाठी दमछाक; महसूल व पालिका कर्मचारी सापडले कात्रीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2018 23:56 IST

मतदारांचे ओळखपत्रे अद्यावत करण्याचे आदेश नुकतेच वसई उपविभागीय अधिकाऱ्यांनी दिले आहेत.

वसई : मतदारांचे ओळखपत्रे अद्यावत करण्याचे आदेश नुकतेच वसई उपविभागीय अधिकाऱ्यांनी दिले आहेत. एकीकडे पालिकेचे काम करायचे आणि दुसरीकडे महसूल खात्याअंतर्गत निवडणुकीचे काम दिलेल्या वेळेत पार पाडायचे, किंबहुना निवडणुकीच्या कामात हयगय झाली तर प्रांताधिकाºयांकडून कठोर कारवाई आणि पालिकेचे काम नाही झाले तर पालिका आयुक्तांकडून कारवाईचा बडगा उगारला जाईल या दोघांच्या भीती पोटी पालिकेचे शेकडो कर्मचारी विचित्र कात्रीत सापडले आहेत.आधारकार्ड, पॅनकार्ड आणि निवडणूक ओळखपत्र एकमेकांशी लिंक करण्याचे काम शासनाने युध्द पातळीवर सुरु केले आहे. त्यासाठी सर्वप्रथम मतदारांचे ओळखपत्रे अद्यावत करण्यास निवडणूका आयोगाने सुरवात केली आहे.ओळखपत्रावर फोटो नसलेल्या आणि ओळखपत्रावर कृष्ण धवल फोटो असलेल्या मतदारांकडून रंगीत फोटो गोळा करणे, त्यांचा मोबाईल क्र मांक टिपणे, त्यांचा पत्ता, नाव दुरु स्त करणे अशी कामे बी.एल.ओ. मार्फत हाती घेण्यात आली आहेत. या निवडणुकीच्या कामकाजासाठी वसई-विरार महापालिकेच्या विविध विभागातील म्हणजेच एकूण ९ प्रभागातील एकूण २१६ कर्मचाºयांची नियुक्ती करण्यात आली असल्याची माहिती पालिकेचे आस्थापन प्रमुख रवी पाटील यांनी दिली आहे.दरम्यान, नुकतीच वसई प्रांताधिकारी दिपक क्षीरसागर यांनी या संदर्भात एक महत्वपूर्ण बैठक घेवून महसुल विभागाच्या कर्मचाºयांसहित पालिका कर्मचाºयांना प्रत्येकी दीड ते दोन हजार मतदार आठ दिवसांत गाठण्याचे टार्गेट दिले असल्याचे या बैठकीत स्पष्ट केले.३० जुलै पासून या कामाला सुरवात झाली असून या कामात कुठलीही हयगय कुणाकडून चालणार नाही अन्यथा अशा बेजबाबदार कर्मचाºयावर गुन्हे दाखल करण्याची तंबीही त्यांनी दिली आहे.एकूणच वसई विरार शहर महापालिकेच्या प्रत्येक प्रभाग समिती कार्यालयात २० ते २५ कर्मचाºयांकडून त्या विभागाचे कामकाज चालत असते त्यात या कर्मचारीवर्गाला बी.एल.आ.े चे काम त्यामुळे पालिकेचेही काम करायचे व निवडणुकीचेही कामे करायचे या दुहेरी कात्रीत महसूल कर्मचारी व पालिका कर्मचारी सापडले असून हे सर्व करताना या दोघांची चांगलीच दमछाक होत आहे. या वर कुणी तोडगा काढायचा असा पेचही त्यांच्या पुढे आहे.पालिका कर्मचार्यांनी त्यांचे काम करून हे निवडणुकीचे काम तत्परतेने करणे आवश्यक आहे या संदर्भात मा.उच्च न्यायालयाचे तसे आदेशच आहेत.त्यामुळे ज्या महसूल, पालिका,शिक्षक आदी इतर कर्मचार्यांनी या कामास सुरु वात केली नसेल त्यांनी हि बाब गंभीरतेने घ्यावी.- दीपक क्षीरसागर, वसई प्रांताधिकारी, वसई उपविभाग

टॅग्स :Vasai Virarवसई विरार