शहरं
Join us  
Trending Stories
1
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
2
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
3
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
4
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
5
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
6
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
7
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
8
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
9
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
10
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
11
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
12
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
13
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
14
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
15
6 एअरबॅगची सुरक्षा, 23Km चे मायलेज अन् ₹70000 + ₹1.10 लाखाचा डिस्काउंट, आताच करा बुक...
16
“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
17
"जेव्हा कोणतंच काम नव्हतं तेव्हा..."; लोकप्रिय अभिनेत्याने केला ७ वर्षे खूप स्ट्रगल
18
Asia Cup 2025: जो मॅटर गाजला तोच पॅटर्न! IND vs PAK हायहोल्टेज सामन्यासंदर्भात मोठा निर्णय
19
त्र्यंबकेश्वर: पत्रकारांवर हल्ला करणाऱ्या गुंडांचा तातडीने बंदोबस्त करा; काँग्रेसची मागणी
20
अवघ्या युरोपच्या विमानतळांवर मोठा सायबर हल्ला; विमाने अडकली, प्रवाशांच्या गर्दीने एअरपोर्ट खचाखच भरले...

निवडणूक ओळखपत्र लिंक करण्यासाठी दमछाक; महसूल व पालिका कर्मचारी सापडले कात्रीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2018 23:56 IST

मतदारांचे ओळखपत्रे अद्यावत करण्याचे आदेश नुकतेच वसई उपविभागीय अधिकाऱ्यांनी दिले आहेत.

वसई : मतदारांचे ओळखपत्रे अद्यावत करण्याचे आदेश नुकतेच वसई उपविभागीय अधिकाऱ्यांनी दिले आहेत. एकीकडे पालिकेचे काम करायचे आणि दुसरीकडे महसूल खात्याअंतर्गत निवडणुकीचे काम दिलेल्या वेळेत पार पाडायचे, किंबहुना निवडणुकीच्या कामात हयगय झाली तर प्रांताधिकाºयांकडून कठोर कारवाई आणि पालिकेचे काम नाही झाले तर पालिका आयुक्तांकडून कारवाईचा बडगा उगारला जाईल या दोघांच्या भीती पोटी पालिकेचे शेकडो कर्मचारी विचित्र कात्रीत सापडले आहेत.आधारकार्ड, पॅनकार्ड आणि निवडणूक ओळखपत्र एकमेकांशी लिंक करण्याचे काम शासनाने युध्द पातळीवर सुरु केले आहे. त्यासाठी सर्वप्रथम मतदारांचे ओळखपत्रे अद्यावत करण्यास निवडणूका आयोगाने सुरवात केली आहे.ओळखपत्रावर फोटो नसलेल्या आणि ओळखपत्रावर कृष्ण धवल फोटो असलेल्या मतदारांकडून रंगीत फोटो गोळा करणे, त्यांचा मोबाईल क्र मांक टिपणे, त्यांचा पत्ता, नाव दुरु स्त करणे अशी कामे बी.एल.ओ. मार्फत हाती घेण्यात आली आहेत. या निवडणुकीच्या कामकाजासाठी वसई-विरार महापालिकेच्या विविध विभागातील म्हणजेच एकूण ९ प्रभागातील एकूण २१६ कर्मचाºयांची नियुक्ती करण्यात आली असल्याची माहिती पालिकेचे आस्थापन प्रमुख रवी पाटील यांनी दिली आहे.दरम्यान, नुकतीच वसई प्रांताधिकारी दिपक क्षीरसागर यांनी या संदर्भात एक महत्वपूर्ण बैठक घेवून महसुल विभागाच्या कर्मचाºयांसहित पालिका कर्मचाºयांना प्रत्येकी दीड ते दोन हजार मतदार आठ दिवसांत गाठण्याचे टार्गेट दिले असल्याचे या बैठकीत स्पष्ट केले.३० जुलै पासून या कामाला सुरवात झाली असून या कामात कुठलीही हयगय कुणाकडून चालणार नाही अन्यथा अशा बेजबाबदार कर्मचाºयावर गुन्हे दाखल करण्याची तंबीही त्यांनी दिली आहे.एकूणच वसई विरार शहर महापालिकेच्या प्रत्येक प्रभाग समिती कार्यालयात २० ते २५ कर्मचाºयांकडून त्या विभागाचे कामकाज चालत असते त्यात या कर्मचारीवर्गाला बी.एल.आ.े चे काम त्यामुळे पालिकेचेही काम करायचे व निवडणुकीचेही कामे करायचे या दुहेरी कात्रीत महसूल कर्मचारी व पालिका कर्मचारी सापडले असून हे सर्व करताना या दोघांची चांगलीच दमछाक होत आहे. या वर कुणी तोडगा काढायचा असा पेचही त्यांच्या पुढे आहे.पालिका कर्मचार्यांनी त्यांचे काम करून हे निवडणुकीचे काम तत्परतेने करणे आवश्यक आहे या संदर्भात मा.उच्च न्यायालयाचे तसे आदेशच आहेत.त्यामुळे ज्या महसूल, पालिका,शिक्षक आदी इतर कर्मचार्यांनी या कामास सुरु वात केली नसेल त्यांनी हि बाब गंभीरतेने घ्यावी.- दीपक क्षीरसागर, वसई प्रांताधिकारी, वसई उपविभाग

टॅग्स :Vasai Virarवसई विरार