शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

पाच रुपयांच्या तिकिटासाठी मोजतात ५० रुपये

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2019 00:18 IST

वसंतनगरी आणि एवरशाइन या झपाट्याने नागरीकरण झालेल्या परिसरात टपाल कार्यालय नसल्यामुळे या भागातील नागरिकांची मोठी गैरसोय झाली आहे.

वसई : वसंतनगरी आणि एवरशाइन या झपाट्याने नागरीकरण झालेल्या परिसरात टपाल कार्यालय नसल्यामुळे या भागातील नागरिकांची मोठी गैरसोय झाली आहे. पाच रूपयांच्या टपाल तिकीटासाठी या ठिकाणी ज्येष्ठ नागरिकांना ५० रूपये रिक्षाभाडे देऊन वसई रोड पूर्वेकडील टपाल कार्यालयात यावे लागते.या भागात टपाल कार्यालय सुरू व्हावे, यासाठी वसई रोड प्रवासी संघटनेने केंद्रीय माहिती प्रसारण मंत्री रविशंकर प्रसाद यांच्याकडे पाठपुरावा सुरू केला आहे. वसईच्या पूर्वेकडील भागात वेगाने नागरीकरण झाले असून या भागातील लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे.तर हा भाग वसई रोड आणि नालासोपारा या दोन्हींच्या मध्यभागी येत असून येथील लोकसंख्या दहा लाखाच्या आसपास आहे. या भागात टपाल कार्यालय नाही. पूर्वी या भागातील नागरिक पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या गौवराई पाडा टपाल कार्यालयात जात असत. मात्र या कार्यालयाच्या इमारतीची दुरवस्था झाल्यानंतर या कार्यालयाचे वसई रोड पूर्वेकडील टपाल कार्यालयात विलीनीकरण करण्यात आले. हे कार्यालयही एवरशाईन आणि वसंतनगरी पासून तब्बल चार किलोमीटर अंतरावर आहे. एकाच टपाल कार्यालयातून दोन कार्यालयाचा कारभार सुरू झाल्यामुळे या कार्यालयात असंख्य टपाल व अन्य कागदपत्रांचा खच दिसून येतो.काही वेळा टपाल पत्र तपासणीचे काम कार्यालयाबाहेरील ओट्यावर केली जाते. या वेळी टपाल आणि काही महत्वाच्या कागदपत्रांचे गठ्ठे कर्मचारी तथा टपाल कार्यालयात येणाऱ्या अभ्यंगत यांच्या पायाखाली तुडवली जात असल्याचेही दिसून येते. विशेष म्हणजे एवरशाइननगर येथील ज्येष्ठ नागरिकांना पाच रूपयांच्या टपाल तिकीटीसाठी वसई रोड पूर्वेकडील टपाल कार्यालयपर्यंत पोहचण्यासाठी तब्बल पन्नास रु पये प्रवासावर खर्च करावे लागतात.।कोंदट असे कार्यालय वसई रोड पूर्वेकडे मोठी औद्योगिक वसाहत असून येथील टपाल कार्यालयात टपाल आणि पार्सल येतात. कागदपत्रांमुळे कार्यालयात पाणी ठेवण्यासाठीही जागा नसते तर या कार्यालयातील कर्मचारी कशीबशी कसरत करून स्वत:ला बसण्यासाठी जागा करतात. दरम्यान, कार्यालयात येणाऱ्यांना कार्यालयात धड उभेही राहता येत नाही असी संतप्त प्रतिक्रि या वसई रोड प्रवासी संघटनेचे सचिव अशोक भाटिया यांनी दिली आहे.