शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता विजयला पाहण्याचा नादात तमिळनाडूत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा गेला जीव, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता
2
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
3
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय
4
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 
5
Mumbai Rain: मुंबईत उद्या अतिवृष्टीचा इशारा; कामाशिवाय घराबाहेर पडू नका, BMC च्या सूचना
6
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
7
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
8
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
9
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
10
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
11
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
12
विदर्भात 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा फटका, पिकांचे अतोनात नुकसान ! अजून किती दिवस जोर राहणार कायम?
13
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
14
“आई कृपा कर, सरकारला बुद्धी दे!”; बाळासाहेब थोरातांचे मोहटादेवी चरणी साकडे, नुकसानीची पाहणी
15
“सोनू सूद पंजाबच्या मदतीला धावला, मराठी कलावंतांनी मराठवाड्याला मदत करावी”: अमोल मिटकरी
16
“भाजपाला प्रशासन चालवता येत नाही, CM सहायता फंडाबाबत फडणवीसांनी बोलू नये”; ठाकरेंचा पलटवार
17
महाराष्ट्रावर प्रचंड मोठे संकट असताना पंतप्रधान का फिरकले नाहीत? काँग्रेसचा सवाल
18
कंटाळा आला म्हणून मुलींनी मागवले ऑनलाइन जेवण; मद्यधुंद आईला राग अनावर, लेकींना बेदम मारहाण
19
३० सेकंदात रुग्णवाहिका तिथून निघून गेली; आरोपी गगनप्रीत कौरला जामीन मंजूर, कोर्टाने काय म्हटले?
20
१ ऑक्टोबरपासून लागू होणार ट्रेन तिकीट बुकींगचा नवा नियम, झटपट आटोपून घ्या हे काम, अन्यथा...

२८ हजार ग्राहकांनी ५१ कोटी थकवले, थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2018 03:00 IST

वसईतील वीज ग्राहकांवर अवाजवी वीज बिले लादणाऱ्या महावितरणाकडे तब्बल ५१ कोटी रुपयांची वीज थकबाकी आहे. त्यामुळे कंपनीने आॅक्टोबर महिन्यात २८ हजार वीज बिले थकविणा-यांचा वीज पुरवठा खंडीत केला होता.

नालासोपारा - वसईतील वीज ग्राहकांवर अवाजवी वीज बिले लादणाऱ्या महावितरणाकडे तब्बल ५१ कोटी रु पयांची वीज थकबाकी आहे. त्यामुळे कंपनीने आॅक्टोबर महिन्यात २८ हजार वीज बिले थकविणा-यांचा वीज पुरवठा खंडीत केला होता. या थकीत रकमेची वसूली कशी करायची असा प्रश्न आता महावितरणाला पडलेला आहे.वसई तालुक्यात एकूण ८ लाख १४ हजार ७१६ वीज जोडण्या आहेत. त्यात २५ हजार औद्योगिक, ४० हजार व्यावसायिक जोडण्यांचा समावेश आहे. वसई विभागातून तब्बल ५१ कोटी रूपयांची वीज थकबाकी असल्यची माहिती महावितरणाने दिली आहे. त्यामुळे या आॅक्टोबर महिन्यात २८ हजार २२६ थकीत वीज ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला होता. त्यामधील ११ हजार ६३४ ग्राहकांनी वीज बिलांचा भरणा न केल्याने वीजपुरवठा खंडीत करण्यात आला आहे.एकीकडे वीज थकबाकीदारांच्या रकमा कोट्यवधींच्या घरात जात असून वीज चोरीचे प्रमाण वाढले आहे. घरगुती तसेच व्यावसायिक आणि औद्योगिक क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर वीज चोरी होत आहे. त्यामुळे महावितरणाला मोठा आर्थिक फटका बसत आहे.महावितरणची एकूण ५१ कोटी रु पये इतकी वीजबिलांची थकबाकी असून थकबाकी वसूल करण्याचे काम सुरु च आहे. येत्या ३१ आॅक्टोबर पर्यंत ५० टक्के इतकी तरी रक्कम वसूल करण्याचे ध्येय आमच्या विभागाने ठेवले असल्याची माहिती महावितरणाचे अधीक्षक अभियंता दिनेश अग्रवाल यांनी दिली होती. या आकडेवारीचा बोझा कंपनीवर आहे.ज्यांची वीज बिले थकीत आहेत ते मात्र मोकाट फिरत असून त्यांच्यावर अजूनही कारवाई करण्यास महावितरण विभाग कुचकामी ठरला आहे. त्यासाठी येथील ग्राहकांना वीज बील हे वेळेवर न देता ते बिलाची तारीख निघून गेल्यावर देण्यात येत असल्याने सामान्य वीज ग्राहकाला याचा फटका बसत असतो. यावर अनेक वेळा तक्र ारी करूनही वीज ग्राहकांच्या समस्या मार्गी लागत नसल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.१७८ कोटीची आतापर्यंत झाली वसुलीमहावितरण कंपनी बाकी असलेल्या थकीत बिलांची रक्कम योग्य रित्या वसूल करण्याऐवजी सामान्य नागरिकांच्या खिशाला कात्री लावून वसूल करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप वीज ग्राहकांनी केला आहे.वसई, विरार, सोपारा, वाडा अशा तीन विभागात महावितरणाला वीज ग्राहकांकडून उत्पन्न मिळत असते. आॅक्टोबर महिन्यात २१८ कोटीचे उद्दीष्ट असून १७८ कोटी रक्कम जमा करण्यात आली असल्याची माहिती अधिक्षक अभियंत्यांनी दिली.

टॅग्स :electricityवीजVasai Virarवसई विरार