शहरं
Join us  
Trending Stories
1
आधार, पॅन बाळगले म्हणून कुणी भारतीय ठरत नाही; बांगलादेशी नागरिकाचे १० वर्षे वास्तव्य, जामीन नाकारला
2
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
3
'आमदार असल्याने मारहाण करण्याचे लायसन्स मिळत नाही'; बच्चू कडू यांना ३ महिन्यांची शिक्षा
4
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
5
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
6
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
7
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
8
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
9
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
10
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
11
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
12
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
13
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
14
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
15
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
16
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
17
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
18
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
19
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
20
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं

२८ हजार ग्राहकांनी ५१ कोटी थकवले, थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2018 03:00 IST

वसईतील वीज ग्राहकांवर अवाजवी वीज बिले लादणाऱ्या महावितरणाकडे तब्बल ५१ कोटी रुपयांची वीज थकबाकी आहे. त्यामुळे कंपनीने आॅक्टोबर महिन्यात २८ हजार वीज बिले थकविणा-यांचा वीज पुरवठा खंडीत केला होता.

नालासोपारा - वसईतील वीज ग्राहकांवर अवाजवी वीज बिले लादणाऱ्या महावितरणाकडे तब्बल ५१ कोटी रु पयांची वीज थकबाकी आहे. त्यामुळे कंपनीने आॅक्टोबर महिन्यात २८ हजार वीज बिले थकविणा-यांचा वीज पुरवठा खंडीत केला होता. या थकीत रकमेची वसूली कशी करायची असा प्रश्न आता महावितरणाला पडलेला आहे.वसई तालुक्यात एकूण ८ लाख १४ हजार ७१६ वीज जोडण्या आहेत. त्यात २५ हजार औद्योगिक, ४० हजार व्यावसायिक जोडण्यांचा समावेश आहे. वसई विभागातून तब्बल ५१ कोटी रूपयांची वीज थकबाकी असल्यची माहिती महावितरणाने दिली आहे. त्यामुळे या आॅक्टोबर महिन्यात २८ हजार २२६ थकीत वीज ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला होता. त्यामधील ११ हजार ६३४ ग्राहकांनी वीज बिलांचा भरणा न केल्याने वीजपुरवठा खंडीत करण्यात आला आहे.एकीकडे वीज थकबाकीदारांच्या रकमा कोट्यवधींच्या घरात जात असून वीज चोरीचे प्रमाण वाढले आहे. घरगुती तसेच व्यावसायिक आणि औद्योगिक क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर वीज चोरी होत आहे. त्यामुळे महावितरणाला मोठा आर्थिक फटका बसत आहे.महावितरणची एकूण ५१ कोटी रु पये इतकी वीजबिलांची थकबाकी असून थकबाकी वसूल करण्याचे काम सुरु च आहे. येत्या ३१ आॅक्टोबर पर्यंत ५० टक्के इतकी तरी रक्कम वसूल करण्याचे ध्येय आमच्या विभागाने ठेवले असल्याची माहिती महावितरणाचे अधीक्षक अभियंता दिनेश अग्रवाल यांनी दिली होती. या आकडेवारीचा बोझा कंपनीवर आहे.ज्यांची वीज बिले थकीत आहेत ते मात्र मोकाट फिरत असून त्यांच्यावर अजूनही कारवाई करण्यास महावितरण विभाग कुचकामी ठरला आहे. त्यासाठी येथील ग्राहकांना वीज बील हे वेळेवर न देता ते बिलाची तारीख निघून गेल्यावर देण्यात येत असल्याने सामान्य वीज ग्राहकाला याचा फटका बसत असतो. यावर अनेक वेळा तक्र ारी करूनही वीज ग्राहकांच्या समस्या मार्गी लागत नसल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.१७८ कोटीची आतापर्यंत झाली वसुलीमहावितरण कंपनी बाकी असलेल्या थकीत बिलांची रक्कम योग्य रित्या वसूल करण्याऐवजी सामान्य नागरिकांच्या खिशाला कात्री लावून वसूल करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप वीज ग्राहकांनी केला आहे.वसई, विरार, सोपारा, वाडा अशा तीन विभागात महावितरणाला वीज ग्राहकांकडून उत्पन्न मिळत असते. आॅक्टोबर महिन्यात २१८ कोटीचे उद्दीष्ट असून १७८ कोटी रक्कम जमा करण्यात आली असल्याची माहिती अधिक्षक अभियंत्यांनी दिली.

टॅग्स :electricityवीजVasai Virarवसई विरार