शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
IND vs PAK U19 Asia Cup Final Live Streaming: भारत-पाक महामुकाबला कुठे आणि कसा पाहता येईल?
4
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
5
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

२८ हजार ग्राहकांनी ५१ कोटी थकवले, थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2018 03:00 IST

वसईतील वीज ग्राहकांवर अवाजवी वीज बिले लादणाऱ्या महावितरणाकडे तब्बल ५१ कोटी रुपयांची वीज थकबाकी आहे. त्यामुळे कंपनीने आॅक्टोबर महिन्यात २८ हजार वीज बिले थकविणा-यांचा वीज पुरवठा खंडीत केला होता.

नालासोपारा - वसईतील वीज ग्राहकांवर अवाजवी वीज बिले लादणाऱ्या महावितरणाकडे तब्बल ५१ कोटी रु पयांची वीज थकबाकी आहे. त्यामुळे कंपनीने आॅक्टोबर महिन्यात २८ हजार वीज बिले थकविणा-यांचा वीज पुरवठा खंडीत केला होता. या थकीत रकमेची वसूली कशी करायची असा प्रश्न आता महावितरणाला पडलेला आहे.वसई तालुक्यात एकूण ८ लाख १४ हजार ७१६ वीज जोडण्या आहेत. त्यात २५ हजार औद्योगिक, ४० हजार व्यावसायिक जोडण्यांचा समावेश आहे. वसई विभागातून तब्बल ५१ कोटी रूपयांची वीज थकबाकी असल्यची माहिती महावितरणाने दिली आहे. त्यामुळे या आॅक्टोबर महिन्यात २८ हजार २२६ थकीत वीज ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला होता. त्यामधील ११ हजार ६३४ ग्राहकांनी वीज बिलांचा भरणा न केल्याने वीजपुरवठा खंडीत करण्यात आला आहे.एकीकडे वीज थकबाकीदारांच्या रकमा कोट्यवधींच्या घरात जात असून वीज चोरीचे प्रमाण वाढले आहे. घरगुती तसेच व्यावसायिक आणि औद्योगिक क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर वीज चोरी होत आहे. त्यामुळे महावितरणाला मोठा आर्थिक फटका बसत आहे.महावितरणची एकूण ५१ कोटी रु पये इतकी वीजबिलांची थकबाकी असून थकबाकी वसूल करण्याचे काम सुरु च आहे. येत्या ३१ आॅक्टोबर पर्यंत ५० टक्के इतकी तरी रक्कम वसूल करण्याचे ध्येय आमच्या विभागाने ठेवले असल्याची माहिती महावितरणाचे अधीक्षक अभियंता दिनेश अग्रवाल यांनी दिली होती. या आकडेवारीचा बोझा कंपनीवर आहे.ज्यांची वीज बिले थकीत आहेत ते मात्र मोकाट फिरत असून त्यांच्यावर अजूनही कारवाई करण्यास महावितरण विभाग कुचकामी ठरला आहे. त्यासाठी येथील ग्राहकांना वीज बील हे वेळेवर न देता ते बिलाची तारीख निघून गेल्यावर देण्यात येत असल्याने सामान्य वीज ग्राहकाला याचा फटका बसत असतो. यावर अनेक वेळा तक्र ारी करूनही वीज ग्राहकांच्या समस्या मार्गी लागत नसल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.१७८ कोटीची आतापर्यंत झाली वसुलीमहावितरण कंपनी बाकी असलेल्या थकीत बिलांची रक्कम योग्य रित्या वसूल करण्याऐवजी सामान्य नागरिकांच्या खिशाला कात्री लावून वसूल करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप वीज ग्राहकांनी केला आहे.वसई, विरार, सोपारा, वाडा अशा तीन विभागात महावितरणाला वीज ग्राहकांकडून उत्पन्न मिळत असते. आॅक्टोबर महिन्यात २१८ कोटीचे उद्दीष्ट असून १७८ कोटी रक्कम जमा करण्यात आली असल्याची माहिती अधिक्षक अभियंत्यांनी दिली.

टॅग्स :electricityवीजVasai Virarवसई विरार