शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
2
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
3
"...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
4
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
5
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
6
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
7
GT विरुद्धही भावाला प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळाली नाही जागा; तरी LSG ला सपोर्ट करताना दिसली सारा तेंडुलकर
8
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
9
भारतीय संगीतातील चिरतरुण स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
10
Payal Nag : नियतीला झुकवणाऱ्या पायलची सुवर्णगाथा! अपघातात हात-पाय गमावले, तिरंदाजीतून जग जिंकले
11
LSG vs GT : पंतसमोर पहिला डाव जिंकला; गिलचा आनंद गगनात मावेना! 'तो' व्हिडिओ व्हायरल
12
युद्धविराम रद्द झाला तर जगावर मोठे संकट येणार; जागतिक बँकेचे प्रमुख अजय बंगा यांचा इशारा
13
सोशल मीडियाचा अतिवापर आणि अश्लील कंटेंटला बसणार लगाम! इन्स्टाग्रामने आणले नवीन 'टीन रूल्स'
14
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
15
US-इराणमधील चर्चा फिस्कटली, पुन्हा युद्धाचे ढग; भारत अलर्ट मोडवर, 'स्पेशल ऑपरेशन' लॉन्च
16
अमेरिका-इराण चर्चा निष्फळ! पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया आली समोर; परराष्ट्र मंत्री इशाक डार म्हणाले...
17
“चंदेरी दुनियेच्या सफरीचा आनंद देणारा दैवी आवाज शांत झाला”; DCM शिंदेंकडून आशाताईंना आदरांजली
18
Asha Bhosale Songs: आशा भोसलेंची 'ही' गाणी प्रचंड गाजली! आजही ऐकली की चेहऱ्यावर हसू अन् डोळ्यांत पाणी येतं
19
आशा ताईंना सर्वात जास्त प्रिय होता 'डाळ-भात', स्वतः बनवायच्या 'हे' खास लोणचं; साध्या राहणीमानानंही जिंकली चाहत्यांची मनं
20
२० भाषा अन् १२ हजारांहून अधिक गाणी! 'असा' होता आशा भोसले यांचा संगीत विश्वातील प्रवास
Daily Top 2Weekly Top 5

वसईत CAB आणिNRC विरोधात हजारोंच्या संख्येने सर्वधर्मीय संविधान बचाव समितीचा धडकला मोर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2019 22:02 IST

बहुचर्चित CAB आणि NRC च्या विरोधात शुक्रवारी वसईत सर्व धर्मीय संविधान बचाव समितीच्या वतीने वसई तहसिलदार कार्यालयावर मूक मोर्चा काढून केंद्र सरकारच्या या निर्णयाविरोधात प्रखर निषेध नोंदवण्यात आला.

वसई -  बहुचर्चित CAB आणि NRC च्या विरोधात शुक्रवारी वसईत सर्व धर्मीय संविधान बचाव समितीच्या वतीने वसई तहसिलदार कार्यालयावर मूक मोर्चा काढून केंद्र सरकारच्या या निर्णयाविरोधात प्रखर निषेध नोंदवण्यात आला.वसई पापडी येथील हुतात्मा स्मारक तथा टी.बी.कॉलेज येथून एनआरसी तसेच नागरिकत्व दुरुस्ती कायदा- 2019 हा त्वरित रद्द व्हावा,तसेच भारतीय संविधांनाच्या संरक्षणासाठी काढण्यात आलेल्या या मूक मोर्चामध्ये, जवळपास वीस हजारांच्या संख्येने सर्वधर्म बांधव आणि खास करून मुस्लिम समाज बांधवांनी मोठा सहभाग नोंदवला होता.अवघ्या वसई तालुक्याच्या पूर्व पश्चिम भागातून समस्त मुस्लिम समुदाय मोठ्या संख्येने हजर राहिला, एकूणच शुक्रवारी दुपारी 3 वाजता वसई पूर्व येथून आणि पुढे वसई शहरातील पापडी भागात मुख्य रस्त्यावरून हा मूक मोर्चा वसई तहसीलदार कार्यालयावर धडकला.  यावेळी केंद्र सरकार,देशाचे पंतप्रधान,गृहमंत्री यांच्या विरोधात तीव्र निषेध नोंदवला गेला,यावेळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात ठेवण्यात आला होता.तर दुपारी वसईच्या पूर्व आणि पश्चिम भागातील बहुतांशी शहरातून निघालेल्या या मोर्च्या मुळे वसई नालासोपारा विरार आदी शहरवासीयांना मोठ्या वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागले.हा मूक मोर्चा साधारण संध्याकाळी 6 वाजता वसई तहसीलदार यांच्या कार्यालयाबाहेर पोहचल्यावर या मोर्च्याचे छोट्या सभेत रूपांतर झाले आणि त्यांनतर आपल्या मागण्यांचे निवेदन केंद्र सरकारचा निषेध नोंदवत वसई तहसीलदार किरण सुरवसे यांच्या मार्फत भारताचे राष्ट्रपती रामनाथजी कोविंद यांना देण्यात आले,याप्रसंगी वसई तहसीलदार यांच्याकडे आपल्या प्रतिक्रिया नोंदवताना सर्वधर्मीय प्रतिनिधींनी केंद्र सरकार जाणीवपूर्वक ठराविक इतर समाज व खास करून मुस्लिम समाजाला घाबरवण्यासाठी अशा प्रकारचा कायदा आणत असल्याचा गंभीर आरोप, यावेळी समस्त सर्वधर्मीय मोर्चेकऱ्यांनी केला.दुपारी 3  वाजता काढण्यात आलेल्या या प्रशस्त मूक मोर्चामध्ये, मुस्लीम समाजासोबत अन्य समाजातील अनेक धर्मीय नेते ,पदाधिकारी ,कार्यकर्त्ते आणि हजारो नागरिक बहुसंखेने सहभागी झाले असल्याची माहिती सर्वधर्मीय संविधान बचाव समितीच्या वतीने समनव्यक समीर वर्तक यांनी लोकमत दिली, याउलट हा मूक मोर्चा वसईच्या कानाकोपऱ्यातून निघाला होता.तरी हा मोर्चा वसई गावात पोहचे पर्यंत अत्यंत शांततेत तो गेला कुठंही कुठलाही अनुचित प्रकार अथवा हिसंक वळण त्यास लागले नसल्याचे पोलीस अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले,तर सोबत या मोर्च्याला वसईत मोठा पोलीस बंदोबस्त असल्यानं हा मोर्चा यशस्वीरीत्या व उत्तम शिस्त बद्ध नियोजन असल्यानं आम्ही वसई तहसील पर्यंत पोहचलो असल्याची प्रतिक्रिया समितीनं लोकमत ला दिली,."केंद्र सरकारच्या संविधान विरोधी कृतीमुळे संपूर्ण देश आज रस्त्यावर उतरला असून संबंध देश व राज्यभर तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत.पूर्वोत्तर राज्यापासून सुरु झालेले हे आंदोलन आता संपूर्ण देशात पसरले आहे,तर देशातला तरुण परिणामांची चिंता व पर्वा न करता आपला देश ,आपले संविधान वाचविण्यासाठी खऱ्या अर्थी आज भारत मातेच्या या भूमीवरील रस्त्यावर उतरला आहे.समन्वयक - समीर वर्तकसर्वधर्म संविधान बचाव समिती,वसई तालुका     ."या मूक मोर्च्या साठी आम्ही अगोदरच वसईत मोठा पोलीस बंदोबस्त ठेवला होता,त्यातच  वाहतुकीचे उत्तम नियोजन व त्याची आखणी करून हि ठेवली होती.त्यामुळे कुठंही फार काळ वाहतूक कोंडी राहिली नाही,अथवा वसई विरार मध्ये कुठंही अनुचित प्रकार अथवा काही अप्रिय घटना घडली नाही सर्वत्र शांतते त हा मोर्चा गेला सर्वांनी सहकार्य केल्यानेच आम्ही उत्तम नियोजन करू शकलो,"-  विजयकांत सागर  अप्पर पोलीस अधीक्षक,वसई

टॅग्स :citizen amendment billनागरिकत्व सुधारणा विधेयकVasai Virarवसई विरार