शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

वसईत CAB आणिNRC विरोधात हजारोंच्या संख्येने सर्वधर्मीय संविधान बचाव समितीचा धडकला मोर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2019 22:02 IST

बहुचर्चित CAB आणि NRC च्या विरोधात शुक्रवारी वसईत सर्व धर्मीय संविधान बचाव समितीच्या वतीने वसई तहसिलदार कार्यालयावर मूक मोर्चा काढून केंद्र सरकारच्या या निर्णयाविरोधात प्रखर निषेध नोंदवण्यात आला.

वसई -  बहुचर्चित CAB आणि NRC च्या विरोधात शुक्रवारी वसईत सर्व धर्मीय संविधान बचाव समितीच्या वतीने वसई तहसिलदार कार्यालयावर मूक मोर्चा काढून केंद्र सरकारच्या या निर्णयाविरोधात प्रखर निषेध नोंदवण्यात आला.वसई पापडी येथील हुतात्मा स्मारक तथा टी.बी.कॉलेज येथून एनआरसी तसेच नागरिकत्व दुरुस्ती कायदा- 2019 हा त्वरित रद्द व्हावा,तसेच भारतीय संविधांनाच्या संरक्षणासाठी काढण्यात आलेल्या या मूक मोर्चामध्ये, जवळपास वीस हजारांच्या संख्येने सर्वधर्म बांधव आणि खास करून मुस्लिम समाज बांधवांनी मोठा सहभाग नोंदवला होता.अवघ्या वसई तालुक्याच्या पूर्व पश्चिम भागातून समस्त मुस्लिम समुदाय मोठ्या संख्येने हजर राहिला, एकूणच शुक्रवारी दुपारी 3 वाजता वसई पूर्व येथून आणि पुढे वसई शहरातील पापडी भागात मुख्य रस्त्यावरून हा मूक मोर्चा वसई तहसीलदार कार्यालयावर धडकला.  यावेळी केंद्र सरकार,देशाचे पंतप्रधान,गृहमंत्री यांच्या विरोधात तीव्र निषेध नोंदवला गेला,यावेळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात ठेवण्यात आला होता.तर दुपारी वसईच्या पूर्व आणि पश्चिम भागातील बहुतांशी शहरातून निघालेल्या या मोर्च्या मुळे वसई नालासोपारा विरार आदी शहरवासीयांना मोठ्या वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागले.हा मूक मोर्चा साधारण संध्याकाळी 6 वाजता वसई तहसीलदार यांच्या कार्यालयाबाहेर पोहचल्यावर या मोर्च्याचे छोट्या सभेत रूपांतर झाले आणि त्यांनतर आपल्या मागण्यांचे निवेदन केंद्र सरकारचा निषेध नोंदवत वसई तहसीलदार किरण सुरवसे यांच्या मार्फत भारताचे राष्ट्रपती रामनाथजी कोविंद यांना देण्यात आले,याप्रसंगी वसई तहसीलदार यांच्याकडे आपल्या प्रतिक्रिया नोंदवताना सर्वधर्मीय प्रतिनिधींनी केंद्र सरकार जाणीवपूर्वक ठराविक इतर समाज व खास करून मुस्लिम समाजाला घाबरवण्यासाठी अशा प्रकारचा कायदा आणत असल्याचा गंभीर आरोप, यावेळी समस्त सर्वधर्मीय मोर्चेकऱ्यांनी केला.दुपारी 3  वाजता काढण्यात आलेल्या या प्रशस्त मूक मोर्चामध्ये, मुस्लीम समाजासोबत अन्य समाजातील अनेक धर्मीय नेते ,पदाधिकारी ,कार्यकर्त्ते आणि हजारो नागरिक बहुसंखेने सहभागी झाले असल्याची माहिती सर्वधर्मीय संविधान बचाव समितीच्या वतीने समनव्यक समीर वर्तक यांनी लोकमत दिली, याउलट हा मूक मोर्चा वसईच्या कानाकोपऱ्यातून निघाला होता.तरी हा मोर्चा वसई गावात पोहचे पर्यंत अत्यंत शांततेत तो गेला कुठंही कुठलाही अनुचित प्रकार अथवा हिसंक वळण त्यास लागले नसल्याचे पोलीस अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले,तर सोबत या मोर्च्याला वसईत मोठा पोलीस बंदोबस्त असल्यानं हा मोर्चा यशस्वीरीत्या व उत्तम शिस्त बद्ध नियोजन असल्यानं आम्ही वसई तहसील पर्यंत पोहचलो असल्याची प्रतिक्रिया समितीनं लोकमत ला दिली,."केंद्र सरकारच्या संविधान विरोधी कृतीमुळे संपूर्ण देश आज रस्त्यावर उतरला असून संबंध देश व राज्यभर तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत.पूर्वोत्तर राज्यापासून सुरु झालेले हे आंदोलन आता संपूर्ण देशात पसरले आहे,तर देशातला तरुण परिणामांची चिंता व पर्वा न करता आपला देश ,आपले संविधान वाचविण्यासाठी खऱ्या अर्थी आज भारत मातेच्या या भूमीवरील रस्त्यावर उतरला आहे.समन्वयक - समीर वर्तकसर्वधर्म संविधान बचाव समिती,वसई तालुका     ."या मूक मोर्च्या साठी आम्ही अगोदरच वसईत मोठा पोलीस बंदोबस्त ठेवला होता,त्यातच  वाहतुकीचे उत्तम नियोजन व त्याची आखणी करून हि ठेवली होती.त्यामुळे कुठंही फार काळ वाहतूक कोंडी राहिली नाही,अथवा वसई विरार मध्ये कुठंही अनुचित प्रकार अथवा काही अप्रिय घटना घडली नाही सर्वत्र शांतते त हा मोर्चा गेला सर्वांनी सहकार्य केल्यानेच आम्ही उत्तम नियोजन करू शकलो,"-  विजयकांत सागर  अप्पर पोलीस अधीक्षक,वसई

टॅग्स :citizen amendment billनागरिकत्व सुधारणा विधेयकVasai Virarवसई विरार