शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
2
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
3
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
4
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
5
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
6
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
7
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
8
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
9
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
10
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
11
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
12
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
13
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
14
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
15
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
16
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
17
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
18
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
19
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
20
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!

‘सूर्या’चा एक थेंब मिळणार नाही

By admin | Updated: March 18, 2017 03:06 IST

सूर्या प्रकल्पाचे पाणी वसई-विरार, भार्इंदर आणि मुंबईला पळवून नेल्याने भविष्यात पालघर सह ग्रामीण भागातील सिंचनासह, पिण्याच्या पाण्यासाठी लोकांचे होणारे हाल सर्वसामान्या

पालघर : सूर्या प्रकल्पाचे पाणी वसई-विरार, भार्इंदर आणि मुंबईला पळवून नेल्याने भविष्यात पालघर सह ग्रामीण भागातील सिंचनासह, पिण्याच्या पाण्यासाठी लोकांचे होणारे हाल सर्वसामान्यासह लोक प्रतिनिधींच्या लक्षात येऊ लागले असून त्याचे पडसाद पालघरच्या आमसभेत उमटले. त्यामुळे सूर्याचा एकही थेंब बाहेर जाऊ न देण्या बाबत सभेत एकमताने ठराव मंजूर करण्यात आला.पालघर पंचायत समितीच्यावतीने लायन्स क्लब हॉलमध्ये शुक्रवारी बोईसरचे आमदार विलास तरे आणि सह अध्यक्ष आ.अमित घोडा ह्यांच्या अध्यक्षतेखाली आमसभेचे आयोजन करण्यात आले होते. ह्यावेळी सभापती रवींद्र पागधरे, उपसभापती मनोज संखे, नगराध्यक्ष उत्तम पिंपळे, तहसीलदार महेश सागर, गटविकास अधिकारी वाय डी जाधव, मुख्याधिकारी प्रशांत ठोंबरे आदि मान्यवर उपस्थित होते.सभेच्या सुरु वातीलाच आपल्या विभागाचे प्रतिनिधी पाठवून गैरहजर राहिलेल्या ८ ते ९ अधिकाऱ्या विरोधात ठराव घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्याबाबतचा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांकडे पाठविण्याची मागणी माजी सभापती ह्यांनी केली. याच वेळी २४ आॅगस्ट २०१५ च्या आमसभेत दोषी अधिकाऱ्यावर कारवाई करण्या संदर्भात घेतलेल्या ठरावाचे काय झाले? असा प्रश्न माजी आमदार मनीषा निमकर यांनी उपस्थित केला. ज्या अधिकाऱ्यांना कारवाई करण्याचे किंवा निर्णय घेण्याचे अधिकार नसतील त्यांनी कृपया बाहेर जाण्याची मागणी ही सभागृहाने केली.सफाळे पारगावच्या पुलाचे काम संथगतीने चालल्या बाबत प्रश्न उपस्थित करण्यात आल्यानंतर हे काम पावसाळ्या पूर्वी पूर्ण होऊन वाहतुकीसाठी खुला होणार असल्याची माहिती उपभियंते उदय पालवे ह्यांनी दिली. मात्र, तारापूर अणू ऊर्जा प्रकल्पामुळे आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास वाहतुकीसाठी महत्वपूर्ण ठरणाऱ्या बाणगंगा पुलाचे काम निकृष्ट दर्जाचे आणि अपूर्णावस्थेत पडून असल्या बाबत विचारणा झाल्यावर रस्त्या आड येणाऱ्या एका मंदिरामुळे हे काम थांबल्याची माहिती पालवे ह्यांनी दिली. ह्या बाबत सर्वांची बैठक बोलावून येत्या १० दिवसात निर्णय घेऊ असे आश्वासन तहसीलदार सागर ह्यांनी दिले. ह्यावेळी पंचायत समिती मधील निधी वाटपा बाबत होणारा दुजाभाव निमकर ह्यांनी दाखवून देत ह्याबाबत योग्य तो निर्णय न घेतल्यास आपण न्यायालयात याचिका दाखल करू असेही त्यांनी सांगितले. तर या प्रकरणी विधी मंडळ अधिवेशनात आम्ही दोघे आमदार आवाज उठवू असे सांगितले. (प्रतिनिधी)दोन कोटींची काम अन साडेचार कोटींचे काढले बिल : केळवे पर्यटना साठी शासनाने ४ कोटी २८ लाखाचा निधी मंजूर केला होता. त्यातील २ कोटींची कामे झाली असताना ४ कोटी २८ लाखाची बिले काढण्यात आली आहेत.त्यामुळे ह्यात झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशीची मागणी सभेत करण्यात आली.एडवण,दातीवरे जिप शाळेत वर्ष २०१३ पासून अनेक शिक्षकाची कमतरता असून विद्यार्थ्यांच्या शैक्षणकि भवितव्याशी खेळणाऱ्या गटशिक्षणाधिकाऱ्यांना ग्रामस्थांनी फैलावर घेऊन त्यांची जिल्ह्याबाहेर बदली करण्याची मागणी केली.‘त्या’ ठेकेदारांवर ‘कृपा’ कशासाठी- सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत कामे ही मर्जीतील ठेकेदारांना दिली जात असून निकृष्ट दर्जाचे कामे करूनही त्यांची बिले काढली जात असल्याचा आरोप जितू राऊळ ह्यांनी करून सर्व रस्त्यांचे स्ट्रक्चर आॅडिट करण्याची मागणी केली. तिघरे, अंबोडे, दांडी-खटाळी ह्या रस्त्यासाठी बविआचे आमदार विलास तरे ह्यांच्या आमदार निधीतून ५० लाखाचा निधी दिल्याने अनेक वर्षांपासून ग्रामस्थाची मागणी पूर्ण होणार आहे.