शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
3
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
4
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
5
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
6
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
7
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
8
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
9
हा सदोष मनुष्यवधच!
10
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
11
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
12
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
13
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
14
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
15
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
16
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
17
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
18
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
19
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय

रोहयोची मजुरी नाहीच; केवनाळे आदिवासींची व्यथा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2019 00:37 IST

सीईओ म्हणतात पाहतो

- रवींद्र साळवे मोखाडा : दीड वर्षांचा कालावधी उलटूनही केवनाळेतील आदिवासींना रोहयोची मजुरी अद्याप मिळालेली नाही. प्रशासनाच्या या उदासीन कारभारामुळे पंचायतीचे उंबरठे झिजवूनही आदिवासींना हक्काचा मोबदला मिळालेला नाही. ही बाब गंभीर असून याबाबत पालघरचे मुख्य कार्यकारी अधिकारी महेंद्र वारभुवन यांना विचारले असता त्यांनी आपण यात लक्ष घालू, असे सांगितले.

‘मागेल त्याला काम आणि पंधरा दिवसात दाम’, या धोरणाचा या प्रशासनाला विसर पडल्याचे दिसते आहे. सूर्यमाळ ग्रामपंचायतमधील केवनाळे येथील ५० ते ६० आदिवासी मजुरांनी मे २०१८ मध्ये १५ दिवस रस्त्याचे काम केले आहे. परंतु तब्बल दोन वर्षांचा कालावधी उलटत आला तरी या मजुरांना त्यांच्या हक्काचा मोबदला अद्याप मिळालेला नाही. ग्रामसेवकाने हलगर्जीपणामुळे वेळेत देयके सादर न केल्याने त्यांना त्यांच्या हक्काच्या मोबदल्यापासून वंचित रहावे लागत आहे.

स्थायी समितीत प्रश्न : कार्यवाहीची मागणी

याबाबत ‘लोकमत’ने सातत्याने पाठपुरावा केला आहे. तसेच जिल्हा परिषद सदस्य प्रकाश निकम यांनी देखील स्थायी समितीच्या बैठकीत प्रश्न मांडून कार्यवाहीची मागणी केली आहे. पण, अजूनही या आदिवासींना त्यांची मजुरी मिळालेली नाही. त्यामुळे आदिवासींमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी आहे.

टॅग्स :Vasai Virarवसई विरारMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार