शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

पालघरमध्ये अन्न व औषध प्रशासनाचे कार्यालयच नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2020 00:11 IST

जिल्हा निर्मितीला सहा वर्षे उलटूनही प्रतीक्षा । नागरिकांच्या आरोग्याशी भेसळमाफियांचा खेळ

मंगेश कारळे ।

नालासोपरा : पालघर जिल्हा अस्तित्वात येऊ न सहा वर्षे उलटली तरी जिल्ह्यात अद्याप अन्न व औषध प्रशासनाचे कार्यालयच नाही. ठाण्यातील अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांकडेच अतिरिक्त कारभार देऊन वेळ काढला जातो. मात्र पुरेसे मनुष्यबळ नसल्यामुळे भेसळमाफियांचे फावले आहे.वसई तालुक्यात भेसळमाफियांची राजधानी बनत चालली आहे. जिल्ह्यात अन्न व औषध प्रशासनाचे कार्यालय नसल्याने भेसळमाफिया मोकाट झाले आहेत. पाणी, खवा, चीज, मावा, मिठाई, पनीर, बेकरी प्रॉडक्टमध्ये भेसळ करून नागरिकांना स्लो पॉयझन दिले जात आहे. अनियंत्रित नालासोपारा शहरात अनेक बेकायदा धंदे चालत असतात. या धंद्यांमध्ये भेसळमाफियांची भर पडली आहे. तालुक्यात अनेक ठिकाणी छोट्या चाळींत, गोदामांत भेसळयुक्त पदार्थ तयार केले जातात. त्यात नकली माव्यापासून मिठाई बनवली जाते. शिवाय, पनीर, तेल, बेकरी प्रॉडक्ट बनवले जातात. मोठ्या हॉटेलमध्ये वापरलेले तेल आणून विविध पदार्थ बनवले जातात. स्वच्छतेचे नियम धाब्यावर बसवले जातात. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे.

पालघर जिल्ह्याची स्थापना झाल्यापासून अद्याप जिल्ह्याला स्वतंत्र अन्न व औषध प्रशासनाचे कार्यालय मिळालेले नाही. २०१४ मध्ये पालघर जिल्ह्याची स्थापना झाली. तेव्हा खरे तर जिल्ह्याला स्वतंत्र अन्न व औषध प्रशासन कार्यालय मिळणे गरजेचे होते. ठाणे आणि पालघर जिल्ह्यासाठी एकच कार्यालय आहे. ठाण्याच्या अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांकडे पालघर जिल्ह्याचा अतिरिक्त कार्यभार दिलेला असून त्यांच्याकडे मनुष्यबळ नसल्याने शहरात लक्ष ठेवणे कठीण जाते. पोलिसांकडे तक्र ार केल्यावर पोलीस केवळ छापे टाकतात. अन्न व औषध प्रशासनाचे अधिकारी घेतल्याशिवाय त्यांना कारवाई करता येत नसल्याने भेसळमाफियांचे फावते आहे. आगामी दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर भेसळमाफिया सक्रिय झाले आहेत. सध्या वसई तालुक्यात दोन प्रकारचे मावे विकले जात आहेत. एक वैधता संपलेला आणि दुसरा सिंथेटिक मावा. त्यांची आवरणे बदलून विक्र ी होत आहे. घाऊक व्यापारी हा मावा ९० ते १२० रु पये किलोने विकत घेतात तर किरकोळ व्यापारी २५० ते ४०० रु पये किलोने विकत घेतात. तर सामान्य ग्राहकाला याच माव्यापासून बनवलेली व मिठाई आणि अन्य स्वरूपात ३५० ते ८०० रु पये किलोने विकतात. हा बनावटी मावा राजस्थान, गुजरात राज्यातून आणला जातो. मावा आणण्यासाठी चक्क प्रवासी बसचा वापर करून नंतर तो साखळी पद्धतीने वितरितकेला जातो.मावा साठवण्यासाठी आणि विक्र ीसाठी अन्न व औषध प्रशासनाचा परवानगी आवश्यक असते. तसेच माव्याची साठवणूक ठराविक तापमानात करावी लागते. कारण तीन दिवसांत हा मावा खराब होतो. भेसळ करणारे हा मावा अडगळीच्या ठिकाणी गोदामात ठेवतात. नागरिकांच्या आरोग्याशी खेळ खेळत कोटींचा हा गोरखधंदा राजरोस सुरू आहे.टाळेबंदीमुळे काम लांबणीवरपालघर जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाºयांसाठी जागा देण्यात आली. आॅगस्टमध्ये उद्घाटन होऊन कार्यालय सुरू होणार होते. मात्र, टाळेबंदीमुळे ते लांबणीवर गेले आहे. आता हे कार्यालय जानेवारीपासून सुरू होण्याची शक्यता आहे. पालघर जिल्ह्यासाठी स्वतंत्र अन्न व औषध प्रशासन विभाग तयार केल्याशिवाय भेसळमाफियांवर अंकुश लावता येणार नाही.पालघर जिल्ह्यात अन्न व औषध विभागाचे कार्यालय व्हावे, यासाठी अनेक पत्रव्यवहार करून प्रयत्न केले. प्रयत्नामुळे कार्यालयासाठी मान्यताही मिळाली. कार्यालयाला जागा नसल्यामुळे अद्याप सुरू झालेले नाही. आॅगस्टमध्ये सुरू होणार होते, पण ते झालेले नाही. तरीही हे कार्यालय लवकरच सुरू होईल.- राजेंद्र गावित, खासदार, पालघर जिल्हा

टॅग्स :palgharपालघर