शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विदान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
3
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
4
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
5
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
6
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
7
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
8
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
9
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
10
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
11
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
12
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
13
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
14
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
15
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
16
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
17
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
18
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
19
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले
20
भारतीय संघात निवड होताच वैभव सूर्यवंशीचा रणजी सामन्यात धमाका! पण विक्रमी शतक थोडक्यात हुकलं

पालघरमध्ये अन्न व औषध प्रशासनाचे कार्यालयच नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2020 00:11 IST

जिल्हा निर्मितीला सहा वर्षे उलटूनही प्रतीक्षा । नागरिकांच्या आरोग्याशी भेसळमाफियांचा खेळ

मंगेश कारळे ।

नालासोपरा : पालघर जिल्हा अस्तित्वात येऊ न सहा वर्षे उलटली तरी जिल्ह्यात अद्याप अन्न व औषध प्रशासनाचे कार्यालयच नाही. ठाण्यातील अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांकडेच अतिरिक्त कारभार देऊन वेळ काढला जातो. मात्र पुरेसे मनुष्यबळ नसल्यामुळे भेसळमाफियांचे फावले आहे.वसई तालुक्यात भेसळमाफियांची राजधानी बनत चालली आहे. जिल्ह्यात अन्न व औषध प्रशासनाचे कार्यालय नसल्याने भेसळमाफिया मोकाट झाले आहेत. पाणी, खवा, चीज, मावा, मिठाई, पनीर, बेकरी प्रॉडक्टमध्ये भेसळ करून नागरिकांना स्लो पॉयझन दिले जात आहे. अनियंत्रित नालासोपारा शहरात अनेक बेकायदा धंदे चालत असतात. या धंद्यांमध्ये भेसळमाफियांची भर पडली आहे. तालुक्यात अनेक ठिकाणी छोट्या चाळींत, गोदामांत भेसळयुक्त पदार्थ तयार केले जातात. त्यात नकली माव्यापासून मिठाई बनवली जाते. शिवाय, पनीर, तेल, बेकरी प्रॉडक्ट बनवले जातात. मोठ्या हॉटेलमध्ये वापरलेले तेल आणून विविध पदार्थ बनवले जातात. स्वच्छतेचे नियम धाब्यावर बसवले जातात. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे.

पालघर जिल्ह्याची स्थापना झाल्यापासून अद्याप जिल्ह्याला स्वतंत्र अन्न व औषध प्रशासनाचे कार्यालय मिळालेले नाही. २०१४ मध्ये पालघर जिल्ह्याची स्थापना झाली. तेव्हा खरे तर जिल्ह्याला स्वतंत्र अन्न व औषध प्रशासन कार्यालय मिळणे गरजेचे होते. ठाणे आणि पालघर जिल्ह्यासाठी एकच कार्यालय आहे. ठाण्याच्या अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांकडे पालघर जिल्ह्याचा अतिरिक्त कार्यभार दिलेला असून त्यांच्याकडे मनुष्यबळ नसल्याने शहरात लक्ष ठेवणे कठीण जाते. पोलिसांकडे तक्र ार केल्यावर पोलीस केवळ छापे टाकतात. अन्न व औषध प्रशासनाचे अधिकारी घेतल्याशिवाय त्यांना कारवाई करता येत नसल्याने भेसळमाफियांचे फावते आहे. आगामी दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर भेसळमाफिया सक्रिय झाले आहेत. सध्या वसई तालुक्यात दोन प्रकारचे मावे विकले जात आहेत. एक वैधता संपलेला आणि दुसरा सिंथेटिक मावा. त्यांची आवरणे बदलून विक्र ी होत आहे. घाऊक व्यापारी हा मावा ९० ते १२० रु पये किलोने विकत घेतात तर किरकोळ व्यापारी २५० ते ४०० रु पये किलोने विकत घेतात. तर सामान्य ग्राहकाला याच माव्यापासून बनवलेली व मिठाई आणि अन्य स्वरूपात ३५० ते ८०० रु पये किलोने विकतात. हा बनावटी मावा राजस्थान, गुजरात राज्यातून आणला जातो. मावा आणण्यासाठी चक्क प्रवासी बसचा वापर करून नंतर तो साखळी पद्धतीने वितरितकेला जातो.मावा साठवण्यासाठी आणि विक्र ीसाठी अन्न व औषध प्रशासनाचा परवानगी आवश्यक असते. तसेच माव्याची साठवणूक ठराविक तापमानात करावी लागते. कारण तीन दिवसांत हा मावा खराब होतो. भेसळ करणारे हा मावा अडगळीच्या ठिकाणी गोदामात ठेवतात. नागरिकांच्या आरोग्याशी खेळ खेळत कोटींचा हा गोरखधंदा राजरोस सुरू आहे.टाळेबंदीमुळे काम लांबणीवरपालघर जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाºयांसाठी जागा देण्यात आली. आॅगस्टमध्ये उद्घाटन होऊन कार्यालय सुरू होणार होते. मात्र, टाळेबंदीमुळे ते लांबणीवर गेले आहे. आता हे कार्यालय जानेवारीपासून सुरू होण्याची शक्यता आहे. पालघर जिल्ह्यासाठी स्वतंत्र अन्न व औषध प्रशासन विभाग तयार केल्याशिवाय भेसळमाफियांवर अंकुश लावता येणार नाही.पालघर जिल्ह्यात अन्न व औषध विभागाचे कार्यालय व्हावे, यासाठी अनेक पत्रव्यवहार करून प्रयत्न केले. प्रयत्नामुळे कार्यालयासाठी मान्यताही मिळाली. कार्यालयाला जागा नसल्यामुळे अद्याप सुरू झालेले नाही. आॅगस्टमध्ये सुरू होणार होते, पण ते झालेले नाही. तरीही हे कार्यालय लवकरच सुरू होईल.- राजेंद्र गावित, खासदार, पालघर जिल्हा

टॅग्स :palgharपालघर