शहरं
Join us  
Trending Stories
1
"ट्रम्प यांनी हस्तक्षेप केला नसता तर...'; शहबाज शरीफ बनले अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचे प्रवक्ते, शांतीदूत म्हणत नोबेल देण्याची मागणी
2
सुपर ओव्हरचा थरार! श्रीलंका २ धावांवर All Out; पहिल्या बॉलवर मॅच जिंकत टीम इंडियाचा विजयी 'षटकार'
3
"सात भारतीय विमानं पाडली...!"; संयुक्त राष्ट्रांच्या मंचावर खोटारड्या शाहबाज शरीफ यांची नुसती 'फेका-फेक'
4
सोनम वांगचुक जोधपूर मध्यवर्ती कारागृहात; अटक केल्यानंतर लेहमधून विमानाने आणलं, CCTV खाली देखरेख
5
Pathum Nissanka Century : पहिली सेंच्युरी अन् श्रीलंकेच्या पठ्ठ्यानं किंग कोहलीचा मोठा विक्रमही मोडला
6
फुल-ऑन ड्रामा! संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत नेतन्याहू भाषणाला येताच अनेक देशांचं 'वॉकआउट'
7
संजूचा गगनचुंबी सिक्सर! चाहतीचे ठुमके अन् ड्रेसिंग रुममध्ये सनथ जयसूर्याला कळायचं झालं बंद (VIDEO)
8
अभिषेक शर्माचा महारेकॉर्ड! T20 आशिया कप स्पर्धेत ३०९ धावांसह पाकच्या रिझवानला दिली 'धोबीपछाड'
9
आशिया कप फायनल आधी ICC कडून सूर्यकुमार यादव याच्यावर कारवाई; PCB नं केली होती तक्रार
10
"त्या डोंगरेला निलंबित करा, माझं नाव खराब करता"; वाहतूक कोंडीवरुन एकनाथ शिंदे अधिकाऱ्यांवर संतापले
11
अग्निशमन दलाचे जवान घरात घुसताच सिलिंडरचा स्फोट; फ्लॅटमध्ये लागलेल्या आगीत मुलाचा मृत्यू, ५ जण जखमी
12
ठरलं, ८-९ ऑक्टोबरला PM मोदी महाराष्ट्रात येणार; CM फडणवीस म्हणाले, “नवी मुंबई विमानतळ...”
13
“राऊतांनी खासदारकीचा एक महिन्याचा पगार दिला असता तर आभार मानले असते”; कुणी केली खोचक टीका?
14
"रशियन सैन्यात जावू नका, तुमच्या जीवाला धोका"; सरकारने दिला इशारा, म्हणाले, "२७ भारतीय..."
15
या एसयूव्हीचं फक्त नावच काफी...! विक्रीच्या बाबतीत पुन्हा ठरली नंबर-1; 38% मार्केट केला एकटीनं 'कॅप्चर'
16
भारताच्या दिग्गज डिफेंस कंपनीला थेट इस्रायलमधून मिळाली मोठी ऑर्डर, अशी आहे शअरची स्थिती
17
VIDEO: बापरे... चिमुरड्याने बसल्या बैठकीला कचाकचा खाल्ल्या हिरव्या मिरच्या, नेटकरीही थक्क
18
कोण आहेत अरुणाचल प्रदेशात पंतप्रधान मोदींचं स्वागत करणाऱ्या या 'डॅशिंग' IAS अधिकारी? सोशल मीडियावर होतायत व्हायरल!
19
“६०० कोटींचा फंड, लोक मरत होते, पण एक पैसा खर्च केला नाही”; CM फडणवीसांचा ठाकरेंवर हल्लाबोल
20
MPSC Exam 2025: विद्यार्थ्यांच्या मागणीला यश, एमपीएससी परीक्षा पुढे ढकलली! आयोगाकडून नवीन तारीख जाहीर

भार्इंदर रविवारच्या बाजारावर कारवाई नाहीच

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2017 18:25 IST

भार्इंदर पश्चिमेच्या बेकायदा विस्तारीत रविवार बाजारास महापालिका व सत्ताधारी पाठीशी घालत असल्याने कारवाईच केली जात नाही.

 मीरारोड - भार्इंदर पश्चिमेच्या बेकायदा विस्तारीत रविवार बाजारास महापालिका व सत्ताधारी पाठीशी घालत असल्याने कारवाईच केली जात नाही. पालिकेचे अधिकारीच न फिरकल्याने बाऊंसर असुन ही फेरीवाल्यांवर कारवाई झाली नाही. बेकेयदा बाजारा मुळे वाहतुकीची नेहमीच मोठी कोंडी होऊन चोरटे व उनाडटप्पुंचा सुळसुळाट झाला असताना सत्ताधारी - पालिकेला मात्र फेरीवाले व बाजार वसुली ठेके दाराचे हित जोपासण्यात स्वारस्य असल्याचे स्पष्ट झालंय. दुसरी कडे भार्इंदर पोलीस ठाणे व वाहतुक शाखा सुध्दा या गंभीर समस्ये कडे पाहण्यास तयार नाही.भार्इंदर पश्चिमेस पोलीस ठाण्या पासुन देना बँके पर्यंत पुर्वीचा रवीवार आठवडा बाजार भरत असे. पण आता सदरचा बाजार अवास्तव फोफावला असुन थेट शिवसेना गल्ली पर्यंत भरु लागला आहे. भार्इंदर रेल्वे स्थानका का कडे जाणारा तसेच तेथुन अगदी मुर्धा पासुन थेट उत्तन, चौक व गोराई पर्यंतचा हाच एकमेव रस्ता आहे. हा मुख्य रस्ता असल्याने बेस्ट, एसटी, एमबीएमटी सह रिक्षा, दुचाकी , चारचाकी वाहनांची नेहमीच मोठी वाहतुक या मार्गावर असते.शहराचा मुख्य रस्ता असल्याने वाहनांची सतत वर्दळ असताना या मार्गावर सर्रास बेकायदा वाहनं पार्क केली जातात. फेरीवाले व हातगाड्या देखील बेधडक लावल्या जातात. या मुळे नेहमीच या भागात वाहतुकीची मोठी कोंडी होत असताना रवीवारच्या या बेकायदा फेरीवाल्यां मुळे तर प्रवाशांच्या हालात प्रचंड भर पडते. वाहतुक कोंडी होऊन वाहनांच्या लांबच लांब रांगा लागतात.रवीवार बाजार म्हणजे भुरटे चोर, पाकिटमार यांचा सुळसुळाट झाला असुन उनाडटप्पु देखील महिला - मुलींची छेड काढत फिरत असतात. गुन्हेगारी कारवाया वाढत असतानाच दुसरी कडे बाजारात बसणारया फेरीवाल्यां कडुन प्लॅस्टीक, भाज्या आदी अन्य कचरा येथेच टाकला जातो. त्यामुळे साफसफाईसाठी पालिकेलाच भुर्दंड सोसावा लागतो.शिवाय डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्गावर सद्या रस्त्याचे काम सुरु असल्याने या मुख्य रस्त्यावर वाहतुकीचा आणखीनच ताण पडतोय.वास्तविक सत्ताधारी भाजपाने त्यावेळी शिवसेना, बविआ सोबत मिळुन डिसेंबर २०१५ रोजीच्या महासभेत बेकायदा विस्तारीत रवीवार बाजार बंद करण्याचा ठराव केला होता. देना बँक पर्यंतच बाजार बसु द्यावा. स्थानिक सुकी मासळी विक्रेते, स्थानिक भाजीपाला व दैनंदिन वापरातले घरगुती खाद्यपदार्थ विक्रेत्यांनाच बाजारात बसु देण्याचे ठरावात नमुद केले होते. सुरवातीला कारवाईचे नाटक पण नंतर मात्र क्रॉस गार्डन पर्यंत व पुढे थेट शिवसेना गल्ली पर्यंत सर्रास बेकायदा फेरीवाले बसु लागल्याने वाहतुक कोंडी होऊन प्रवाशी व पादचारी नागरीकांना जाच होतोय.दोन वर्ष होऊन देखील ठरावा वर पालिका अधिकारी नियमीत कारवाई करत नसतानाच नुकताच मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या फेरीवाले हटवण्याच्या आदेशाला देखील पालिकेने केराची टोपली दाखवली आहे.जेवढे फेरीवाले वाढणार तेवढी जास्त बाजार शुल्क वसुली पालिकेने नेमलेल्या बाजार वसुली ठेकेदाराची होते. सदर ठेकेदारास सत्ताधारी व स्थानिक नेतृत्वाचा वरदहस्त असल्याने ठेकेदाराचा फायदा बुडु नये म्हणुन देखील पालिका प्रशासनासह सत्ताधारी भाजपा या बेकायदा बाजारा विरोधात मुग गिळुन गप्प असल्याचे आरोप केले जातात.त्यातच प्रभाग अधिकारी व पालिका कर्मचारी आज सकाळी रवीवार बाजारात कारवाईची कल्पना असुन देखील कुठे दिसले नाहित. दुसरी कडे पालिकेचे ठेक्याने घेतलेले बाऊंसर व पालिकेचा टॅम्पो मात्र फेरया मारत होता. पण कारवाई मात्र केली जात नव्हती. पालिका अधिकारयांचे खिसे भरले असुन त्या मुळे ते कारवाई करणार नसल्याचे आरोप काहींनी केले. तर या प्रकरणी विभागप्रमुख संजय दोंदे व प्रभाग अधिकारी जगदिश भोपतराव यांच्याशी संपर्क साधला असता गुळमुळीत उत्तरं देउन फेरीवाल्यांवर कारवाई मात्र केलीच गेली नाही.

टॅग्स :Mira Bhayander Municipal Corporationमीरा-भाईंदर महापालिका निवडणुक