शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला
2
बिहार विधानसभा निवडणूक 2025 : NDA चा फॉर्म्युला ठरला! जाणून घ्या, कुणाच्या वाट्याला किती जागा येणार?
3
पोलीस नोकरी सोडली अन् बनला Youtuber; भारतीय क्रिएटर्सला अडकवलं, हेरगिरीसाठी पाकचा नवा डाव
4
सोनिया गांधी रूटीन चेकअपसाठी शिमला येथील IGMC हॉस्पिटलला दाखल; उपचारानंतर घरी सोडले
5
राज ठाकरेंसोबतच्या संबंधावर सोनाली बेंद्रेने मौन सोडलं; पहिल्यांदाच उघडपणे केला खुलासा
6
राहुल गांधींच्या 'महाराष्ट्र निवडणूक फिक्सिंग' लेखावरून राजकारण तापलं, काँग्रेस का हारते? जेपी नड्डा यांनी स्पष्टच सांगितलं!
7
"बापरे..., आम्ही एवढं घाबरलोय की...!"; राज-उद्धव युतीच्या चर्चेवर नितेश राणेंनी उडवली खिल्ली
8
IPL २०२६ मध्ये यंदाच्या विजेत्या RCB टीमवर बंदी आणणार?; बीसीसीआय का घेऊ शकतं मोठा निर्णय?
9
पोलिसांनी घेरताच आरोपी शूटर AK47 ने दिली इमारतीवरून उडी मारण्याची धमकी, नंतर...
10
नको त्या अवस्थेत दुसऱ्यासोबत पाहिले; संतापलेल्या पतीने बायकोचे मुंडके उडविले अन् थेट...
11
बलूचिस्तानात सैन्याला मिळाले बेफाम अधिकार; सर्वसामान्यांविरोधात पाकिस्तानात बनला कठोर कायदा
12
Viral Video: लग्नात नवरदेवाच्या मित्रांनी दिलं 'असं' गिफ्ट; पाहून वधूही लाजली, व्हिडीओ व्हायरल!
13
'टीव्ही बंद करून अभ्यास करायला बस' आईचं बोलणं जिव्हारी, दहावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या!
14
अरेरे! ६ महिन्यांपूर्वीच लग्न करुन घरी आणली पण 'ती' दिरासोबत पळाली, गावात असं काय घडलं?
15
Jalgaon: ह्रदयद्रावक! आई वाट पाहत राहिली अन् तरुण मुलाचा धावत्या रेल्वेतून पडून गेला जीव
16
महाराष्ट्रात विधानसभेची ‘मॅच’ कुणी ‘फिक्स’ केली?; राहुल गांधींचा आरोप, CM फडणवीस म्हणाले...
17
Diabetes Sign: डायबिटीस होण्याआधी शरीरात दिसू लागतात 'हे' पाच बदल; वेळीच सावध व्हा!
18
आमिरच्या घरी आला सचिन तेंडुलकर, सरप्राईज पाहून 'सितारे जमीन पर'मधील दिव्यांग मुलांचा जल्लोष
19
Andre Russell: 'तुम्हाला चांगला पगार मिळतो, पण आम्हाला...' विराटचं बोलणं आंद्रे रसेलला खटकलं!
20
Raja Raghuvanshi : "शुभ मुहूर्ताशिवाय गेले हनिमूनला"; वडिलांनी दरवाज्याला लावला सोनमचा उलटा फोटो, कारण...

भार्इंदर रविवारच्या बाजारावर कारवाई नाहीच

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2017 18:25 IST

भार्इंदर पश्चिमेच्या बेकायदा विस्तारीत रविवार बाजारास महापालिका व सत्ताधारी पाठीशी घालत असल्याने कारवाईच केली जात नाही.

 मीरारोड - भार्इंदर पश्चिमेच्या बेकायदा विस्तारीत रविवार बाजारास महापालिका व सत्ताधारी पाठीशी घालत असल्याने कारवाईच केली जात नाही. पालिकेचे अधिकारीच न फिरकल्याने बाऊंसर असुन ही फेरीवाल्यांवर कारवाई झाली नाही. बेकेयदा बाजारा मुळे वाहतुकीची नेहमीच मोठी कोंडी होऊन चोरटे व उनाडटप्पुंचा सुळसुळाट झाला असताना सत्ताधारी - पालिकेला मात्र फेरीवाले व बाजार वसुली ठेके दाराचे हित जोपासण्यात स्वारस्य असल्याचे स्पष्ट झालंय. दुसरी कडे भार्इंदर पोलीस ठाणे व वाहतुक शाखा सुध्दा या गंभीर समस्ये कडे पाहण्यास तयार नाही.भार्इंदर पश्चिमेस पोलीस ठाण्या पासुन देना बँके पर्यंत पुर्वीचा रवीवार आठवडा बाजार भरत असे. पण आता सदरचा बाजार अवास्तव फोफावला असुन थेट शिवसेना गल्ली पर्यंत भरु लागला आहे. भार्इंदर रेल्वे स्थानका का कडे जाणारा तसेच तेथुन अगदी मुर्धा पासुन थेट उत्तन, चौक व गोराई पर्यंतचा हाच एकमेव रस्ता आहे. हा मुख्य रस्ता असल्याने बेस्ट, एसटी, एमबीएमटी सह रिक्षा, दुचाकी , चारचाकी वाहनांची नेहमीच मोठी वाहतुक या मार्गावर असते.शहराचा मुख्य रस्ता असल्याने वाहनांची सतत वर्दळ असताना या मार्गावर सर्रास बेकायदा वाहनं पार्क केली जातात. फेरीवाले व हातगाड्या देखील बेधडक लावल्या जातात. या मुळे नेहमीच या भागात वाहतुकीची मोठी कोंडी होत असताना रवीवारच्या या बेकायदा फेरीवाल्यां मुळे तर प्रवाशांच्या हालात प्रचंड भर पडते. वाहतुक कोंडी होऊन वाहनांच्या लांबच लांब रांगा लागतात.रवीवार बाजार म्हणजे भुरटे चोर, पाकिटमार यांचा सुळसुळाट झाला असुन उनाडटप्पु देखील महिला - मुलींची छेड काढत फिरत असतात. गुन्हेगारी कारवाया वाढत असतानाच दुसरी कडे बाजारात बसणारया फेरीवाल्यां कडुन प्लॅस्टीक, भाज्या आदी अन्य कचरा येथेच टाकला जातो. त्यामुळे साफसफाईसाठी पालिकेलाच भुर्दंड सोसावा लागतो.शिवाय डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्गावर सद्या रस्त्याचे काम सुरु असल्याने या मुख्य रस्त्यावर वाहतुकीचा आणखीनच ताण पडतोय.वास्तविक सत्ताधारी भाजपाने त्यावेळी शिवसेना, बविआ सोबत मिळुन डिसेंबर २०१५ रोजीच्या महासभेत बेकायदा विस्तारीत रवीवार बाजार बंद करण्याचा ठराव केला होता. देना बँक पर्यंतच बाजार बसु द्यावा. स्थानिक सुकी मासळी विक्रेते, स्थानिक भाजीपाला व दैनंदिन वापरातले घरगुती खाद्यपदार्थ विक्रेत्यांनाच बाजारात बसु देण्याचे ठरावात नमुद केले होते. सुरवातीला कारवाईचे नाटक पण नंतर मात्र क्रॉस गार्डन पर्यंत व पुढे थेट शिवसेना गल्ली पर्यंत सर्रास बेकायदा फेरीवाले बसु लागल्याने वाहतुक कोंडी होऊन प्रवाशी व पादचारी नागरीकांना जाच होतोय.दोन वर्ष होऊन देखील ठरावा वर पालिका अधिकारी नियमीत कारवाई करत नसतानाच नुकताच मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या फेरीवाले हटवण्याच्या आदेशाला देखील पालिकेने केराची टोपली दाखवली आहे.जेवढे फेरीवाले वाढणार तेवढी जास्त बाजार शुल्क वसुली पालिकेने नेमलेल्या बाजार वसुली ठेकेदाराची होते. सदर ठेकेदारास सत्ताधारी व स्थानिक नेतृत्वाचा वरदहस्त असल्याने ठेकेदाराचा फायदा बुडु नये म्हणुन देखील पालिका प्रशासनासह सत्ताधारी भाजपा या बेकायदा बाजारा विरोधात मुग गिळुन गप्प असल्याचे आरोप केले जातात.त्यातच प्रभाग अधिकारी व पालिका कर्मचारी आज सकाळी रवीवार बाजारात कारवाईची कल्पना असुन देखील कुठे दिसले नाहित. दुसरी कडे पालिकेचे ठेक्याने घेतलेले बाऊंसर व पालिकेचा टॅम्पो मात्र फेरया मारत होता. पण कारवाई मात्र केली जात नव्हती. पालिका अधिकारयांचे खिसे भरले असुन त्या मुळे ते कारवाई करणार नसल्याचे आरोप काहींनी केले. तर या प्रकरणी विभागप्रमुख संजय दोंदे व प्रभाग अधिकारी जगदिश भोपतराव यांच्याशी संपर्क साधला असता गुळमुळीत उत्तरं देउन फेरीवाल्यांवर कारवाई मात्र केलीच गेली नाही.

टॅग्स :Mira Bhayander Municipal Corporationमीरा-भाईंदर महापालिका निवडणुक