शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
2
आजचे राशीभविष्य- १८ सप्टेंबर २०२५: नोकरी- व्यवसायात अडचणी येतील; अनपेक्षित घटना घडण्याची शक्यता
3
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
4
लोकशाहीचा पाचोळा होऊ नये !... तर लोकशाही केवळ नावापुरती उरेल
5
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
6
नोकरीच्या नावाखाली बनवले ‘गुलाम’, थायलंडमध्ये नोकरीचे आमिष दाखवून केली फसवणूक
7
उपराष्ट्रपतींची निवडणूक : ‘कोऱ्या’ मतपत्रिकांचे रहस्य!
8
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
9
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
10
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल
11
विरार-डहाणू रोडदरम्यान सात स्टेशन; चौपदरीकरणामुळे गर्दी टाळण्यास मदत
12
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
13
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
14
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
15
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
16
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
17
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
18
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
19
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
20
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख

...तर वसई - विरार महापालिका आम्ही विसर्जित करू - उच्च न्यायालय

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2021 07:07 IST

Vasai-Virar Municipal Corporation : वसई - विरार महापालिकेच्या हद्दीत ९,००० बेकायदा बांधकामे असल्याचे समजताच उच्च न्यायालयाने संताप व्यक्त केला. २०११मध्ये स्थापित केलेली वसई - विरार पालिका अन्य पालिकांच्या तुलनेने नवी आहे.

मुंबई : वसई - विरार महापालिकेच्या हद्दीत ९,००० बेकायदा बांधकामे असल्याचे समजताच उच्च न्यायालयाने संताप व्यक्त केला. २०११मध्ये स्थापित केलेली वसई - विरार पालिका अन्य पालिकांच्या तुलनेने नवी आहे. तरीही नऊ वर्षात ९००० बेकायदेशीर बांधकामे? इतक्या झपाट्याने विनापरवानगी बेकायदा इमारती उभ्या राहात असतील तर पालिकेचा फायदा काय? निवडणूक हव्या कशाला? राज्य सरकारलाच प्रशासकामार्फत पालिकेचा कारभार सांभाळायला सांगू, अशा शब्दांत उच्च न्यायालयाने पालिकेला खडसावले.वसई - विरार पालिका क्षेत्रात बेकायदेशीर बांधकामांमुळे पाणी साचते. पूरस्थिती निर्माण होते. पाण्याचा निचरा होत नाही. शासनाच्या राखीव भूखंडांवरही अतिक्रमण सुरू आहे. त्यामुळे पालिकेच्या हद्दीतील सर्व बेकायदा बांधकामांवर कारवाई करण्याची मागणी टेरेन्स हॅन्ड्रिक्स यांनी केली आहे. या याचिकेवरील सुनावणी मुख्य न्या. दीपांकर दत्ता व न्या. गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठापुढे होती.या याचिकेवरील सुनावणीदरम्यान पालिकेच्या वकिलांनी न्यायालयाला सांगितले की, कोरोना संकटामुळे वसई - विरार पालिकेची निवडणूक होऊ शकली नाही. त्यामुळे सध्या या पालिकेचा कारभार प्रशासक सांभाळत असल्याचे न्यायालयाला सांगितले.त्यावेळी त्यांनी पालिकेच्या हद्दीत नऊ हजार अवैध बांधकामे असल्याचे न्यायालयाला सांगितले. हे ऐकताच न्यायालयाने संताप व्यक्त केला.आम्ही वसई - विरार पालिका विसर्जित करू. निवडणूक हव्या तरी कशाला? पालिका नागरिकांचे आयुष्य सुकर करण्यासाठी असतात. त्यांना त्रास देण्यासाठी नाही. नागरिकांत दोन गट आहेत. एक बेकायदा कामे करणारा आणि दुसरा कायद्याचे पालन करणारा. त्यामुळे कायद्याचे पालन करणाऱ्यांना त्रास व्हायला नको,'' असे न्यायालयाने म्हटले. वसई -विरार पालिकेच्या प्रशासकांना या बेकायदा बांधकामांवर कायद्याप्रमाणे कारवाई करण्याची पावले उचलावीत आणि कशी कारवाई करणार, याबाबत दोन आठवड्यांत प्रतिज्ञापत्र सादर करा, असे निर्देश न्यायालयाने पालिकेच्या प्रशासकांना दिले

टॅग्स :Vasai Virarवसई विरारMumbai High Courtमुंबई हायकोर्ट