शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
3
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
4
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
5
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
6
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
7
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
8
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
9
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
10
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
11
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
12
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
13
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
14
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
15
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
16
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
17
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
18
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
19
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
20
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...

राज्यपाल, जिल्हाधिकाऱ्यांचे दौरे संपले; महामार्गावरील वाहतूककोंडीची समस्या कायम

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2024 12:44 IST

महामार्गावरील निकृष्ट दर्जाच्या कामामुळे वाहतूककोंडीचे रडगाणे कायम आहे.

सुनील घरत

पारोळ : मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील निकृष्ट दर्जाचे काम, वाढती वाहतूककोंडी, माती भराव याबाबत अलीकडेच पालघरचे जिल्हाधिकारी डॉ. गोविंद बोडके यांनी महामार्गाचा घोडबंदर ते डहाणू असा दौरा केला. या दौऱ्यानंतर लगोलग राज्यपाल रमेश बैस यांनी पालघर दौरा केला, मात्र त्यानंतरही महामार्गावरील मालजीपाडा ते चिंचोटी या दरम्यान खराब रस्त्यामुळे वाहतूककोंडी कायम असल्याने ती सुटणार तरी कधी? असा प्रश्न वाहनचालक व प्रवासी यांना पडला आहे.

महामार्गावरील निकृष्ट दर्जाच्या कामामुळे वाहतूककोंडीचे रडगाणे कायम आहे. जिल्हाधिकारी डॉ. गोविंद बोडके व राज्यपालांनी पालघरचा दौरा केल्यानंतर सुरक्षा म्हणून वाहतुककोंडीची समस्या दोन दिवस निवळली होती, मात्र हे दौरे संपल्यानंतर पुन्हा एकदा महामार्गावर वाहतूककोंडीचे रडगाणे कायम सुरू झाले आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी महामार्गावरील समस्यांचा आढावा घेतल्यानंतर महामार्गावर खड्डे भराव मोहिमेला सुरुवात झाली आहे. मात्र या खड्डे भराव मोहिमेत केवळ खड्डे बुजवण्याची थुकपट्टी सुरू आहे. महामार्गावरून वसई-विरारपासून घोडबंदर गाठण्यासाठी किमान 2 तास लागतात. त्यात पावसाची संततधार असेल तर कोंडीत आणखीच वाढ होते. या समस्या दिवसेंदिवस वाढत असल्याने चाकरमानी व वाहतुकदार अक्षरश: मेटाकुटीला आला आहे.

टॅग्स :Vasai Virarवसई विरार