शहरं
Join us  
Trending Stories
1
गुड बाय इंडिया...अपघातापूर्वी ब्रिटिश नागरिकांने काढला होता शेवटचा व्हिडिओ; विजय रुपाणीही दिसले
2
"प्रवास टाळा, शेल्टरजवळच रहा अन्...!" इराणच्या आण्विक तळांवर इस्रायलचा हल्ला, भारताकडून अ‍ॅडव्हायजरी जारी; नेतन्याहूही स्पष्टच बोलले
3
Air India: मुंबईहून लंडनला निघालेलं विमान एअर इंडियानं अर्ध्यातूनच माघारी बोलावलं, कारण काय?
4
शनि - मंगळ षडाष्टक योग अन् विमान अपघाताचे भाकित; २०२४ च्या दिवाळी अंकातील भविष्यवाणी व्हायरल
5
पायलट होता अनुभवी, मात्र विमान उतरविण्यासाठी वेळ मिळाला नाही, हवाई वाहतूक तज्ज्ञ शनिल देसाई यांचे मत
6
शेअर बाजारात हाहाकार, Sensex १२६४ तर निफ्टी ४१५ अंकांनी घसरला; काय आहेत यामागची कारणं?
7
आजचे राशीभविष्य, १३ जून २०२५: आजचा दिवस अनुकूलतेचा, घरात आनंदाचे वातावरण राहील!
8
Sunjay Kapur : एअर इंडिया विमान अपघातावर केलं ट्वीट, काही तासातच संजय कपूर यांचं हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
9
Jio आणि Airtel चा ३० दिवसांचा व्हॅलिडिटी प्लान, कोण देतंय उत्तम सर्व्हिस; किमतीत फरक इतकाच
10
बंद पडलेलं बँक अकाऊंट सुरू करणं होणार सोपं, RBI नं सोपे केले KYC नियम; होम ब्रान्चला जायची गरज नाही
11
होत्याचं नव्हतं झालं..!! विमान अपघातात जोडप्याचा मृत्यू; भावाला शेवटचा फोन, म्हणाले होते...
12
Nagpur Murder: गुटखा न देण्यावरून पेटला वाद, रागाच्या भरात मित्रालाच संपवलं, दोघांना अटक!
13
Finn Allen: अवघ्या ४९ चेंडूत १५० धावा! फिन अ‍ॅलेननं इतिहास रचला, ख्रिस गेलचाही विक्रम मोडला 
14
पहिल्या कारपासून ते प्रवासाच्या तारखेपर्यंत... विजय रुपानींसाठी '१२०६' लकी नंबर ठरला दुर्दैवी
15
Ahmedabad Plane Crash : महाराष्ट्रातील अनेक कुटुंबांवर कोसळले ‘दुःखाचे आकाश’
16
Ahmedabad Plane Crash :विद्यार्थी जेवण करत होते अन् अंगावर पडले विमान 
17
Ahmedabad Plane Crash : ...तर वाचला असता यशा, रुद्र अन् रक्षा यांचा जीव
18
विमान थोडे पुढे गेले असते तर साबरमती नदीत उतरवले असते...
19
इस्राइलकडून इराणवर मोठा हवाई हल्ला, तेहरानवर डागली क्षेपणास्त्रे आणि ड्रोन 
20
Sunjay Kapur Death: करिश्मा कपूरचा Ex पती संजय कपूर यांचं निधन, पोलो गेम खेळताना आला हृदयविकाराचा झटका

वळीवाच्या पावसाने जव्हारवासियांची दाणादाण, घरांसह जि.प शाळांचीही छपरे उडाली, फळबागांचे नुकसान

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2024 19:31 IST

सोमवारी अन्य तालुक्यांप्रमाणे जव्हारमध्येही जोरदार वारा-पाऊस झाला. त्यातील नुकसानीचे योग्य माहिती घेऊन पंचनामे करण्याची मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.

जव्हार : सोमवारी तालुक्यात वादळीवाऱ्यासह झालेल्या वळीवाच्या पावसाने येथील नागरिकांचे नुकसान झाले. याचे पंचनामे करण्याची मागणी होत असतानाच बुधवारी सायंकाळी पुन्हा या पावसाने जव्हार तालुक्याला झाेडपले. बुधवारी झालेल्या पावसामुळे येथील जनजीवनाची दाणादाण उडालेली पाहायला मिळाली. जव्हार तालुक्यात जवळपास ५०० हून अधिक घरांची छपरे उडून गेल्याने संसार उघड्यावर पडलेत. जि.प. शाळांवरील छप्परे उडून आतील साहित्याचे नुकसान झाले. तर अनेक झाडे उन्मळून पडल्याने फळबागायतदार, शेतकरी संकटात सापडले आहेत.

सोमवारी अन्य तालुक्यांप्रमाणे जव्हारमध्येही जोरदार वारा-पाऊस झाला. त्यातील नुकसानीचे योग्य माहिती घेऊन पंचनामे करण्याची मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे. तर तालुक्यात बुधवारी सायंकाळी पुन्हा वळीवाचा पाऊस झाला. येथील वाळवंडा, वरचा कशीवली येथील जवळपास सर्वच घरांचे पत्रे उडून गावातील अनेक संसार उघड्यावर पडले आहेत. तर अनेक मोठमोठी झाडे उन्मळून पडल्याने अनेक मार्ग बंद पडले होते. तर काही झाडं घरावर पडलीत. त्याचबरोबर तालुक्यातील काही जिल्हा परिषद शाळांचीही छप्परं उडून शाळेतील साहित्याचे नुकसान झाले आहे.

तालुक्यातील वाळवंडा, कशिवली, खडकीपाडा, साखरे, शिरोशी, धानोशी, रामखिंड, विनवळ, जामसर, न्याहाळे, पाथर्डी, झाप, आपटाळे, या गावांमध्ये बुधवारच्या पावसाने मोठे नुकसान झाले आहे.

प्रशासनाकडून पंचनामे करण्याचे काम सुरू आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची संख्या जास्त असल्याने पंचनामे करण्यासाठी किमान तीन ते चार दिवस लागणार असल्याची माहिती महसूल विभागाकडून मिळाली.

सुदैवाने या वादळी पावसाने कुठलीही जीवित हानी अथवा प्राणहानी झालेली नाही. चार ते पाच जणांना किरकोळ मार लागला आहे. नुकसान ग्रस्तांचे पंचनामे करण्याचे काम सुरू असून, दोन ते तीन दिवसांत पंचनामे करून शासनाला अहवाल सादर करण्यात येईल.-लता धोत्रे, तहसीलदार,जव्हार 

टॅग्स :Rainपाऊस