शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

वळीवाच्या पावसाने जव्हारवासियांची दाणादाण, घरांसह जि.प शाळांचीही छपरे उडाली, फळबागांचे नुकसान

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2024 19:31 IST

सोमवारी अन्य तालुक्यांप्रमाणे जव्हारमध्येही जोरदार वारा-पाऊस झाला. त्यातील नुकसानीचे योग्य माहिती घेऊन पंचनामे करण्याची मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.

जव्हार : सोमवारी तालुक्यात वादळीवाऱ्यासह झालेल्या वळीवाच्या पावसाने येथील नागरिकांचे नुकसान झाले. याचे पंचनामे करण्याची मागणी होत असतानाच बुधवारी सायंकाळी पुन्हा या पावसाने जव्हार तालुक्याला झाेडपले. बुधवारी झालेल्या पावसामुळे येथील जनजीवनाची दाणादाण उडालेली पाहायला मिळाली. जव्हार तालुक्यात जवळपास ५०० हून अधिक घरांची छपरे उडून गेल्याने संसार उघड्यावर पडलेत. जि.प. शाळांवरील छप्परे उडून आतील साहित्याचे नुकसान झाले. तर अनेक झाडे उन्मळून पडल्याने फळबागायतदार, शेतकरी संकटात सापडले आहेत.

सोमवारी अन्य तालुक्यांप्रमाणे जव्हारमध्येही जोरदार वारा-पाऊस झाला. त्यातील नुकसानीचे योग्य माहिती घेऊन पंचनामे करण्याची मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे. तर तालुक्यात बुधवारी सायंकाळी पुन्हा वळीवाचा पाऊस झाला. येथील वाळवंडा, वरचा कशीवली येथील जवळपास सर्वच घरांचे पत्रे उडून गावातील अनेक संसार उघड्यावर पडले आहेत. तर अनेक मोठमोठी झाडे उन्मळून पडल्याने अनेक मार्ग बंद पडले होते. तर काही झाडं घरावर पडलीत. त्याचबरोबर तालुक्यातील काही जिल्हा परिषद शाळांचीही छप्परं उडून शाळेतील साहित्याचे नुकसान झाले आहे.

तालुक्यातील वाळवंडा, कशिवली, खडकीपाडा, साखरे, शिरोशी, धानोशी, रामखिंड, विनवळ, जामसर, न्याहाळे, पाथर्डी, झाप, आपटाळे, या गावांमध्ये बुधवारच्या पावसाने मोठे नुकसान झाले आहे.

प्रशासनाकडून पंचनामे करण्याचे काम सुरू आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची संख्या जास्त असल्याने पंचनामे करण्यासाठी किमान तीन ते चार दिवस लागणार असल्याची माहिती महसूल विभागाकडून मिळाली.

सुदैवाने या वादळी पावसाने कुठलीही जीवित हानी अथवा प्राणहानी झालेली नाही. चार ते पाच जणांना किरकोळ मार लागला आहे. नुकसान ग्रस्तांचे पंचनामे करण्याचे काम सुरू असून, दोन ते तीन दिवसांत पंचनामे करून शासनाला अहवाल सादर करण्यात येईल.-लता धोत्रे, तहसीलदार,जव्हार 

टॅग्स :Rainपाऊस