शहरं
Join us  
Trending Stories
1
जैसलमेर दुर्घटनेतील मृतांचा आकडा २० वर; मोदींकडून दुःख व्यक्त, आर्थिक मदतीची घोषणा
2
जनरल झेडच्या आंदोलनामुळे आणखी एका देशात सत्तापालट!
3
'...तर पाकिस्तान उद्ध्वस्त झाला असता', ऑपरेशन सिंदूरबाबत लेफ्टिनेंट जनरल राजीव घईंचा मोठा खुलासा
4
'२५ हजार दिल्याशिवाय पेन्शन नाही!' रेल्वेच्या लाचखोर मुख्य अधीक्षकाला रंगेहाथ पकडलं
5
रुग्णालयात नेताना आजारी मुलाचा वाटेतच मृत्यू; धक्क्याने वडिलांनीही सोडले प्राण!
6
अमरावती-गडचिरोली मार्गावर २२० क्विंटल 'पोर्टिफाईड तांदूळ' घेऊन जाणारा ट्रक पकडला
7
आरमोरी मार्गावर भरधाव ट्रकची दुचाकीला धडक; दोन भाऊ जागीच ठार!
8
सोनं भारतात सव्वा लाखांच्या पार, पाकिस्तानात किंमत काय? भाव ऐकून तुम्हालाही बसेल 'शॉक'
9
निवडणूक न लढवताही कार्यकर्ते झेडपी, पंचायत समितीचे सदस्य बनणार? बावनकुळेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र 
10
भारत-पाक सामना बरोबरीत सुटला! मग दोन्ही संघातील खेळाडूंमध्ये जे घडलं ते चर्चेत
11
"मी तुमची अनेक प्रकरणे पाहिली आहेत; बोललो तर उगाच...", CJI गवईंनी ईडीला फटकारले
12
गायिका मैथिली ठाकूरचा भाजपमध्ये प्रवेश! दुसऱ्या यादीत येणार नाव, कोणत्या मतदारसंघातून लढणार?
13
‘पात्र गावांना सामूहिक वनहक्क देण्याबाबत तातडीने कार्यवाही करावी’, अजित पवार यांचे आदेश
14
IPS पूरन कुमाार यांच्या पत्नीला अटक करा, ASI संदीप यांच्या कुटुंबीयांनी केली मागणी, कारण काय?
15
तो बापाच्या वशिल्यावर टीम इंडियात आलेला नाही, असं का म्हणाले गंभीर? जाणून घ्या त्यामागचं कनेक्शन
16
मनसेचा मविआमध्ये समावेश होणार की नाही? प्रस्तावाबाबत हर्षवर्धन सपकाळ यांनी स्पष्टच सांगितलं  
17
जैसलमेरमध्ये धावत्या बसला भीषण अचानक आग; १०-१२ जणांचा होरपळून मृत्यू झाल्याची भिती
18
घायवळला मोक्का लावला, रोहित पवारांनी तो उठवला; सभापती राम शिंदे यांचा गौप्यस्फोट
19
BJP Candidate list: भाजपने १० विद्यमान आमदारांची तिकिटं कापली, ५ जण आहेत माजी मंत्री; पहिल्या यादीमध्ये कोण?
20
३१ व्या मजल्यावरून पडला, चप्पल, मोबाईल सापडले २४ व्या मजल्यावर, तरुणाच्या मृत्यूचं गुढ वाढलं   

वळीवाच्या पावसाने जव्हारवासियांची दाणादाण, घरांसह जि.प शाळांचीही छपरे उडाली, फळबागांचे नुकसान

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2024 19:31 IST

सोमवारी अन्य तालुक्यांप्रमाणे जव्हारमध्येही जोरदार वारा-पाऊस झाला. त्यातील नुकसानीचे योग्य माहिती घेऊन पंचनामे करण्याची मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.

जव्हार : सोमवारी तालुक्यात वादळीवाऱ्यासह झालेल्या वळीवाच्या पावसाने येथील नागरिकांचे नुकसान झाले. याचे पंचनामे करण्याची मागणी होत असतानाच बुधवारी सायंकाळी पुन्हा या पावसाने जव्हार तालुक्याला झाेडपले. बुधवारी झालेल्या पावसामुळे येथील जनजीवनाची दाणादाण उडालेली पाहायला मिळाली. जव्हार तालुक्यात जवळपास ५०० हून अधिक घरांची छपरे उडून गेल्याने संसार उघड्यावर पडलेत. जि.प. शाळांवरील छप्परे उडून आतील साहित्याचे नुकसान झाले. तर अनेक झाडे उन्मळून पडल्याने फळबागायतदार, शेतकरी संकटात सापडले आहेत.

सोमवारी अन्य तालुक्यांप्रमाणे जव्हारमध्येही जोरदार वारा-पाऊस झाला. त्यातील नुकसानीचे योग्य माहिती घेऊन पंचनामे करण्याची मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे. तर तालुक्यात बुधवारी सायंकाळी पुन्हा वळीवाचा पाऊस झाला. येथील वाळवंडा, वरचा कशीवली येथील जवळपास सर्वच घरांचे पत्रे उडून गावातील अनेक संसार उघड्यावर पडले आहेत. तर अनेक मोठमोठी झाडे उन्मळून पडल्याने अनेक मार्ग बंद पडले होते. तर काही झाडं घरावर पडलीत. त्याचबरोबर तालुक्यातील काही जिल्हा परिषद शाळांचीही छप्परं उडून शाळेतील साहित्याचे नुकसान झाले आहे.

तालुक्यातील वाळवंडा, कशिवली, खडकीपाडा, साखरे, शिरोशी, धानोशी, रामखिंड, विनवळ, जामसर, न्याहाळे, पाथर्डी, झाप, आपटाळे, या गावांमध्ये बुधवारच्या पावसाने मोठे नुकसान झाले आहे.

प्रशासनाकडून पंचनामे करण्याचे काम सुरू आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची संख्या जास्त असल्याने पंचनामे करण्यासाठी किमान तीन ते चार दिवस लागणार असल्याची माहिती महसूल विभागाकडून मिळाली.

सुदैवाने या वादळी पावसाने कुठलीही जीवित हानी अथवा प्राणहानी झालेली नाही. चार ते पाच जणांना किरकोळ मार लागला आहे. नुकसान ग्रस्तांचे पंचनामे करण्याचे काम सुरू असून, दोन ते तीन दिवसांत पंचनामे करून शासनाला अहवाल सादर करण्यात येईल.-लता धोत्रे, तहसीलदार,जव्हार 

टॅग्स :Rainपाऊस