शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्तृत्वशून्य लोकांकडूनच जाती-धर्माच्या नावे राजकारण केले जाते: नितीन गडकरींचा टोला
2
अजित पवार गटाच्या आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाचा भिवंडीजवळ महामार्गवरील अपघातात मृत्यू
3
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
4
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
5
निवडणूक रोख्यांमुळे पंतप्रधान कार्यालय वसुलीचे कार्यालय बनल्याचे स्पष्ट- प्रकाश आंबेडकर
6
महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम यांच्यासाठी मुलगा अनिकेत निकम यांचा घरोघरी जाऊन प्रचार
7
लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्याचे मतदान जवळ येताच सोशल मीडियावर रायगड पोलिसांची करडी नजर
8
डॉक्टर प्रविण अग्रवाल विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल; रुग्ण महिलेसोबत अश्लील वर्तनाचा आरोप
9
अपघात की..? वांद्रे येथे नारळाचे झाड अचानक कोसळले! रिक्षाचालक जखमी, दुकानही जमीनदोस्त
10
मागील दोन महिन्यात झपाट्याने वाढलेल्या सोने-चांदीच्या किंमती घसरल्या, जाणून घ्या भाव
11
ठाण्यात अजब घटना! धक्का लागल्याचा जाब विचारल्याने मद्यपीचा वृद्धावर चाकूने हल्ला
12
धक्कादायक घटना! दहा लाखांमध्ये घराचे आमिष दाखवून एक कोटी ४८ लाखांची फसवणूक
13
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
14
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
15
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
16
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
17
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
18
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

ठाणे वाडा अंतर घटविणाऱ्या पुलाचे काम अखेर झाले सुरु

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2018 11:09 PM

अंतर होणार कमी; मार्चला पूर्ण, २२ गावांतील विद्यार्थ्यांची सोय

वाडा : ठाणे व पालघर जिल्ह्यातील भिवंडी व वाडा तालुक्यातील काही गावांना जोडणाºया या तालुक्यातील उचाट या गावाच्या हद्दीत तानसा नदीवरील पुलाचे काम प्रगतीपथावर असून मार्चअखेर तो वाहतुकीसाठी खुला होणार आहे. या पुलामुळे ठाणे व पालघर या दोन जिल्ह्यातील अंतर १५ कि.मी.ने कमी होणार असून विशेषत: भिवंडी तालुक्यातील २२ गावांतील मुलांच्या शिक्षणाची सोय होणार आहे.उचाट या गावचे पुनर्वसन १९६२ मध्ये तानसा नदीकाठी झाले. त्यानंतर गावातील ग्रामस्थांनी एकत्र येऊन अ‍ॅस्पी विद्यालयाची स्थापना केली. ती मध्ये पहिली ते बारावीपर्यंत तसेच इंग्लिश मिडीयमची शाळा असून एकूण बाराशेहून अधिक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. विशेष म्हणजे सुमारे ६५० विद्यार्थी हे भिवंडी तालुक्यातील सागाव, एकसाल, कुशापूर, माडोशी, सावरोली, देवचोळा, वापे, दुधणी, चिंचवली, दिघाशी, पाश्चापूर, कुंदे, खंबाळा, वेडवहाळ, बासे, मैंदे, शिरोळा, करमाळा आदी २२ गावांतील आहेत. मात्र तानसा नदीवर पुल नसल्याने पावसाळ्यात या विद्यार्थांना अंबाडी मार्गे कुडूस उचाट असा वळसा देऊन दहा बारा किलोमीटर चा फेरा घेऊन शाळा गाठावी लागत होती. या नदीवर उचाट येथे एक बंधारा असून या बंधा-यावरून विद्यार्थी प्रवास करीत असत. मात्र पावसाळ्यात पुराच्या वेळी या विद्यार्थ्यांना जीव धोक्यात घालून शाळेत जावे लागत असे. या बंधा-यावरून पडून एका विद्यार्थांचा मृत्यूही झाला होता तर अनेक जण जखमी झाले होते. त्यामुळे अनेक वर्षांपासून या नदीवर पुल व्हावा अशी मागणी उचाटवासीय करीत होते.येत्या फेब्रुवारी/मार्चपर्यंत या पुलाचे काम पूर्ण होऊन तो वाहतूकीसाठी खुला करण्यात येईल.- प्रकाश पातकर, शाखा अभियंतासार्वजनिक बांधकाम विभाग वाडायेथील पुलाला गेल्या वर्षी मंजूरी मिळून त्याचे काम जानेवारीत सुरू केले आहे. यासाठी २ कोटी दहा लाखांचा निधी मंजूर असून त्याचा ठेका आर. के. सावंत यांना देण्यात आला आहे. नाबार्ड योजनेतून तो मंजूर झाला आहे. त्याचे काम प्रगतीपथावर आहे.

टॅग्स :Vasai Virarवसई विरारroad transportरस्ते वाहतूक