शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
3
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
4
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
5
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
6
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
7
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
8
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
9
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
10
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
11
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
12
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
13
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
14
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
15
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
16
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
17
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
18
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
19
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

ठक्कर बाप्पा भ्रष्टाचार : भोये निलंबित

By admin | Updated: October 4, 2016 02:12 IST

ठक्कर बाप्पा योजनेमध्ये १००कोटींचा भ्रष्टाचार झाला असल्याचा आरोप झाल्यानंतर जिल्हाधिकारी अभिजीत बांगर व आदिवासी विकास चे अप्पर आयुक्त मिलींद गवांदे

राहुल वाडेकर,  विक्रमगडठक्कर बाप्पा योजनेमध्ये १००कोटींचा भ्रष्टाचार झाला असल्याचा आरोप झाल्यानंतर जिल्हाधिकारी अभिजीत बांगर व आदिवासी विकास चे अप्पर आयुक्त मिलींद गवांदे यांनी तत्काळ या भ्रष्टाचाराची चौकशी करण्याचे आदेश दिले होते. या चौकशीमध्ये भ्रष्टाचार झाल्याचे प्रथमदर्शनी सिद्ध झाल्याने जव्हार आदिवासी विकास प्रकल्पातील आदिवासी विकास निरीक्षक सखाराम गोपाळ भोये यांना दि. २९ सप्टेंबर रोजी निलंबीत करून त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई मिलींद गवांदे यांनी केली आहे. या भ्रष्टाचारामध्ये सामील असणाऱ््या सर्व अधिकाऱ्यांवर व कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करून या भ्रष्टाचाराची स्वतंत्र यंत्रणेमार्फत चौकशी करावी, अशी मागणी होते आहे.जव्हार आदिवासी विकास प्रकल्पांतर्गत येणाऱ्या चार तालुक्यांतील ४२९ गावांमध्ये १५८७ विकास कामे झाल्याचे व त्यावर १५४ कोटी ३३ लाख रु पये खर्च केल्याचे दाखवण्यात आले आहे. मात्र यातील निम्म्याहून अधिक कामे झालीच नसल्याचा आरोप करून २००७-०८ ते २०१४-१५ या दरम्यांन १०० कोटींचा भ्रष्टाचार झाला आहे, असा आरोप मुख्यमंत्र्यांकडे केला गेला होता. खुडेद - घोडीचा पाडा येथे मंगल कार्यालयाची इमारत न बांधताच १० लाख रु पयांचा निधी हडप केला गेला असल्याचा जो गौप्यस्फोट लोकमतने प्रसिद्ध केला होता. तो ही पुरावा म्हणून दिला गेला होता. चौकशी होऊन भ्रष्टाचार झाल्याचे सिद्ध होताच जव्हारचे आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी बाबासाहेब पारधे यांची मुंबई येथे बदली करण्यात आली होती. त्यांच्या जागी तातडीने अप्पर आयुक्त कार्यालयातील उपायुक्त किरण माळी यांना आणण्यात आले. त्यांनी या प्रकरणाचा समाधानकारक तपास करून अहवाल अप्पर आयुक्तांना पाठवला. त्या अहवालावरून काम पूर्ण झाल्याचे खोटे पाहाणी अहवाल सादर करणाऱ्या सखाराम भोये यांना निलंबीत करण्यात आले आहे. ते सध्या डहाणू येथील आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयामध्ये कार्यरत होते.जव्हार आदिवासी विकास प्रकल्पामध्ये अनागोंदी कारभार सुरु असून कुणाचा पायपोस कुणाला नाही. म्हणूनच ठाणे अप्पर आयुक्त कार्यालयाबरोबरच १३ जिल्ह्यांतील कार्यालयांमध्ये पुरेसा कर्मचारी वर्ग नेमावा, अशीही मागणी मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली आहे.