शहरं
Join us  
Trending Stories
1
५ जूनलाच केलेली मोठ्या विमान अपघाताची भविष्यवाणी; अ‍ॅस्ट्रो शर्मिष्ठाची पोस्ट होतेय व्हायरल... 
2
Ahmedabad Plane Crash : सुनील तटकरे यांच्या कुटुंबातील व्यक्ती एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर...
3
Ahmedabad Plane Crash: विमानाने टेक ऑफ केले अन् काही वेळात क्रॅश झाले; त्या ८ मिनिटांत नेमके काय झाले?
4
"माझ्या मुलाने दुसऱ्या मजल्यावरून मारली उडी अन्...! ज्या वस्तिगृहावर विमान कोसळलं तेथेच जेवणासाठी गेला होता"
5
अहमदाबाद विमान अपघातावर पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया, बिलावल भुट्टो म्हणाले...
6
Air India Plane Crash: अनेकांचे गेले जीव, आतापर्यंत १०० जणांचे मृतदेह मिळाले! विमान पडले तेव्हा वसतिगृहात होते ५० विद्यार्थी
7
Ahmedabad Plane Crash Live Updates: "हे दुःख शब्दांत सांगता येणार नाही", एअर इंडिया विमान अपघातावर मोदींची प्रतिक्रिया
8
Ahmedabad Plane Crash: कोणती अशी २ कारणे, ज्यामुळं टेकऑफ घेताच प्लेन क्रश होऊ शकतं?; तज्ज्ञांनी सांगितले
9
विजय रुपाणींचा विमानात बसलेला फोटो समोर आला; पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदाबादकडे रवाना 
10
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत २० मेडिकल विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची भीती
11
Ahmedabad Plane Crash : "माझी वहिनी लंडनला जात होती, १ तासातच मला..."; अपघातानंतर कुटुंबीयांची रुग्णालयात धाव
12
डॉक्टरांच्या वसतिगृहावर कोसळलं एअर इंडियाचं विमान, इमारतीवर अडकलेला दिसला प्लेनचा मागचा भाग
13
MAYDAY कॉल म्हणजे काय?, तो तीन वेळाच का देतात? अहमदाबादहून 'टेक ऑफ'नंतर पायलटने दिलेल्या 'त्या' कॉलबद्दल...
14
भारतातील सर्वात आव्हानात्मक विमानतळ, लँडिंग-टेक ऑफ करताना पायलटचाही हात कापतो
15
Ahmedabad Plane Crash: अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर्सची यादी आली समोर; दोन मराठी नावे, खासदार तटकरेंच्या नातेवाईकांचा समावेश
16
अहमदाबाद विमान अपघात : मृतांच्या कुटुंबियांना किती पैसे मिळतील? जाणून घ्या कायदा काय सांगतो!
17
Plane Crash Incident: पायलटकडे केवळ एका मिनिटाचाच वेळ होता, पण..., एअर इंडियाच्या विमान अपघाताचे कारण समोर आले
18
Air India Plane Crash: विमानातून प्रवास करणारे कोण? भारतीय आणि परदेशी नागरिक किती होते?
19
मेडिकल कॉलेजचे डॉक्टर मेसमध्ये जेवण करत होते, तेवढ्यात...; २० इंटर्न डॉक्टरांच्या मृत्यूची भीती व्यक्त
20
जोरदार आवाज, सगळीकडे धूर अन् समोर मृतदेहांचा खच; प्रत्यक्षदर्शींनी विमान अपघातावेळी काय पाहिलं?

उद्धवांचे बविआवर टीकास्त्र, राजेंद्र गावितांच्या प्रचारसभेत तोफ डागली

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2019 03:29 IST

मच्छीमारांच्या व प्रकल्पग्रस्तांच्या समस्या : आताच कळल्याचा ठाकरे यांचा दावा

हितेंन नाईक

पालघर : बहिष्काराचा प्रश्न उपस्थित करून किनारपट्टीवरील सेनेच्या बालेकिल्ल्याला भगदाडे पाडुन आपले मतदान कमी करण्याचे कट-कारस्थान विरोधकांकडून शिजवले जात असल्याचे सांगून पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी बहुजनविकास आघाडीवर निशाणा साधला. त्यामुळे शिवसैनिकांनी बहिष्कार हे एक थोतांड असल्याचे जनतेला पटवून देण्याचे आदेश पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी पालघर मध्ये दिले.

पालघर लोकसभा निवडणुकीत सेना-भाजप महायुतीचे उमेदवार राजेंद्र गावित यांच्या प्रचार सभे निमित्ताने ते सार्वजनिक बांधकाम आणि आरोग्य मंत्री एकनाथ शिंदे, राज्यमंत्री रवींद्र चव्हाण, आ.रवींद्र फाटक आदींचा दौरा वसई मधून मंगळवार पासून सुरू असून रात्री १० वाजता ते पालघरमध्ये पोचले.आचारसंहितेचे पालन व्हावे ह्यासाठी ठाकरे यांनी मच्छीमारांचे शिष्ट मंडळ, जिंदाल विरोधी समिती आदींची भेट ठाणे जिल्हा मच्छीमार संघाच्या कार्यालयात घेऊन त्यांच्याशी संवाद साधला. मच्छीमारांच्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या समस्या वाचल्यावर या मला पहिल्यांदाच कळल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे इथल्या लोकप्रतिनिधींनी आपल्या भागातल्या समस्या उद्धव ठाकरे पर्यंत पोचवल्याच नसल्याचे स्पष्ट झाले. मच्छीमार समाजाचा शिवसेनेवर पूर्ण विश्वास असल्याने कित्येक वर्षांपासून आपल्यातले नाते दृढ बनले आहे. त्यामुळेच किनारपट्टी हा भाग कित्येक वर्षांपासून सेनेचा बालेकिल्ला राहिला आहे. या आपल्या भागात तुमच्या भावनेला हात घालीत तुम्हाला बहिष्कार घालायला लाऊन आपले मताधिक्य घटविण्याचा हा विरोधकांचा डाव असल्याचे सांगून त्यांनी थेट बहुजन विकास आघाडीवर निशाणा साधला.तुम्ही बहिष्कार टाकल्यास मग तुमच्या समस्या सुटणार कशा? असा प्रश्न उपस्थित करून आपले नाते घट्ट ठेवा, मी तुमचा कधीही विश्वासघात करणार नाही असा विश्वास ही त्यांनी शिष्टमंडळाला दिला. यावेळी सहकारी संस्थेचे अध्यक्ष राजकुमार भाय, अशोक नाईक, कृती समितीचे सरचिटणीस रामकृष्ण तांडेल, ज्योती मेहेर,दर्शना पागधरे आदींनी निवेदन सादर केले.मच्छीमारांची सर्व प्रलंबित प्रकरणे निकाली काढण्यासाठी भाजप-शिवसेना सरकार सकारात्मक असल्याचे त्यांनी सांगितले.जेट्टी विरोधात कोर्टातच्नांदगाव येथे प्रस्तावित असलेल्या जिंदाल जेट्टीला पर्यावरण विभागाने काही शर्ती-अटीवर परवानगी दिल्याने या विरोधात लढणाऱ्या स्थानिक भूमीपुत्रावर मोठे संकट कोसळले असून त्यांनी ह्या निर्णया विरोधात उच्च न्यायालयात जाण्याचा निश्चय केला आहे.च्वाढवण बंदराला जनतेचा विरोध पाहता यापूर्वीच मी विरोध दर्शविला असून जिंदाल जेट्टी बाबत जनतेच्या भावना जर राज्यकर्ते ऐकत नसतील तर त्या समजून घेण्यासाठी मी निवडणुकी नंतर पुन्हा येतो असा शब्द त्यांनी स्थानिकांना दिला.

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv Senaशिवसेना