शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरे सोबत आले, तर शिवसेना (UBT) इंडिया आघाडीतून बाहेर पडणार का? उद्धव ठाकरे म्हणाले...
2
'तुमच्याकडे पुरावे आहेत, न्यायालयात का जात नाही?', राहुल गांधींच्या आरोपांवर भाजपचा पलटवार
3
राहुल गांधींनी उल्लेख केलेला आदित्य श्रीवास्तव खरोखरच ३ राज्यांत मतदार आहे? समोर आली अशी माहिती  
4
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
5
Asia Cup 2025 मध्ये IND vs PAK सामना रद्द होणार का? दुबईतून आली मोठी अपडेट
6
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
7
येसूबाई अन् 'शंभुराज'! प्राजक्ता गायकवाडचा झाला साखरपुडा; होणाऱ्या नवऱ्यासोबत फोटोशूट
8
VIDEO : सॉरी सॉरी...! वैभव सूर्यवंशीची पॉवर; गोळीच्या वेगानं मारला चेंडू; बचावासाठी कॅमेरामनची 'कसरत'
9
ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सॅमसंगने आणलाय 5G फोन, किंमतही कमी!
10
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोठा घोटाळा, राहुल गांधी यांनी सादर केले पुरावे, मतदार यादीतील घोळ केला उघड   
11
धुळ्यात ईव्हीएम स्ट्राँगरूम बाहेर ड्युटीवर असताना पोलिसाने स्वतःवरच झाडली गोळी
12
संजू सॅमसन राजस्थानची साथ सोडणार, मॅनेजमेंटकडे रिलीज करण्याची विनंती; पण नियम काय सांगतो?
13
"राहुल गांधी यांचा हा करंटेपणा, त्यांना..."; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे का संतापले?
14
मंदिरात आला, पिंडीवर जल अर्पण केले, हात जोडले आणि तिथली भांडी चोरली, सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली चोरी
15
Asia Cup 2025 Hockey : पाकिस्तानची माघार; भारतात येऊन खेळण्यास दिला नकार, आता...
16
नागरिकांचं आरोग्य महत्त्वाचं, आदेशाचा अवमान करू नका; मुंबई उच्च न्यायालयाने पिळले कान
17
प्रेमाच्या नादात नातंच विसरले! २ मुलांच्या आईने भाच्याशी केलं लग्न, नवऱ्याला पाठवले फोटो
18
Aisa Cup 2025: सूर्यकुमार यादव संघात नसेल तर कर्णधार कोण? 'या' ३ खेळाडूंमध्ये चुरशीची स्पर्धा
19
कुबेरेश्वर धाममध्ये आणखी ३ भाविकांचा मृत्यू; आतापर्यंत ७ जणांनी गमावला जीव, कारण काय..?
20
रशियाचे राष्ट्राध्यक्ष भारतात येणार, ट्रम्प यांच्या 'दबावतंत्रा'वर मोदी-पुतीन तोडगा काढणार!

वायुप्रदूषण तपासणारे तारापूरचे स्टेशन सव्वा वर्षापासून बंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2018 03:51 IST

लाखो खर्चून केली होती उभारणी; प्र.नि.मंडळ म्हणते पुन्हा चालू करू

- पंकज राऊतबोईसर : तारापूरला वायू प्रदूषणाची प्रचंड समस्या असतांनाच महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या तारापूर कार्यालयाच्या इमारतीवरील हवेची गुणवत्ता तपासणारे व २०१२ साली लाखो रुपये खर्चून कार्यान्वित केलेले स्टेशन सव्वा वर्षा पासून अक्षरश: धूळ खात पडले आहे ते पूर्ववत सुरू करण्या संदर्भात काहीही हालचाल सव्वा वर्षा पासून दिसत नसल्याने ते बंद ठेवण्या मागे कुणाचे हित जपले जाते आहे? असा प्रश्न नागरिक विचारीत आहेत.तारापूर एमआयडीसीच्या औद्योगिक क्षेत्रामध्ये जे.एस.डब्ल्यू.स्टील लि. ( जिंदाल स्टील) या कारखान्याने सप्टेंबर २००९ साली ३० मेगावॅट क्षमतेचे कोळशावर चालणारे थर्मल पॉवर स्टेशन सुरू केल्या नंतर हवा व ध्वनी प्रदूषणाची मोठया प्रमाणात समस्या निर्माण होऊ लागल्याच्या तक्रारी म.प्र. नि. मंडळाकडे येताच प्रदूषण होऊ नये म्हणून काही उपाय योजना व सुधारणा सुचवून मंडळाने हवेची गुणवत्ता तपासणारी तीन स्टेशन्स एमआयडीसी मध्ये वेगवेगळ्या ठिकाणी इन्स्टॉल करण्याचे निर्देश जे.एस.डब्ल्यू.स्टीलला दिले त्या पैकी हे एक स्टेशन होते.सुमारे साठ लाखाचे एक अशी तीन युनिट कार्यान्वित केली गेली त्या पैकी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या तारापूर कार्यालयाच्या इमारती वर दिनांक २४ एप्रिल २०१२ रोजी हे पहिले स्टेशन सुरू केले गेले. या स्टेशन मधील अद्यावत तंत्राद्वारे पीएम २.५ (हवेतील तरंगणारे धूलीकण पीएम २.५ मायक्रोन ) पीएम १० (हवेतील तरंगणारे धुलीकण १० मायक्रोन ), सीओ (कार्बन मोनोआॅक्साईड), एस ओ २ (सल्फर डायआॅक्साईड), एन ओ २ (नायट्रोजन डाय आॅक्साईड) इत्यादींचे हवेतील प्रमाण मोजून हवेची गुणवत्ता तपासली जाऊन ती कार्यालया बाहेरील फलकावर लिहिण्यात येत होते. आता स्टेशन बंद झाल्याने तो फलक ही धूळ खात पडला आहे सुरुवातीची काही वर्ष सोडल्या नंतर त्या स्टेशन मध्ये संकलित होणाऱ्या वायू प्रदूषणाच्या नोंदी (रिपोर्ट) धोक्याच्या पातळीच्या आत आहेत की त्यांनी पातळी ओलांडली आहे याची कोणतीही माहिती दिली जात नाही. म.प्र. नि. मंडळ हे एम. आय. डी. सी तिल उद्योगाची तपासणी करून दोषींवर कारवाईचा बडगा उचलते मग आपल्याच इमारती वर असलेले स्टेशन सव्वा वर्षा पासून बंद राहण्यास जबाबदार कोण याचा शोध ते कधी घेणार व दोषींवर कारवाई कधी करणार? असा प्रश्न आहे.आता जबाबदारी येऊन पडली मंडळावरसर्वात महत्त्वाचा प्रश्न आता असा आहे की जे. एस. डब्ल्यू. स्टील लि. या कारखान्याने ३० मेगावॅट क्षमतेचे कोळशावर चालणारे सप्टेंबर २००९ साली सुरू केलेले थर्मल पॉवर स्टेशन बंद केले डिसेंबर २०१७ ला त्याचा संपूर्ण गाशा गुंडाळून तामिळनाडू मध्ये त्याचा प्लांट उभारला.तारापूर येथील त्या थर्मल पॉवर स्टेशनची कन्सेंट ही महाराष्टÑ प्रदूषण नियंत्रण मंडळा कडे सरेंडर केल्याने आता हवेची गुणवत्ता तपासणारे स्टेशन चालविण्याची जबाबदारी जे एस डब्ल्यूवर न राहिल्याने ते स्टेशन पुन्हा चालू करून कार्यान्वित करण्याची कायदेशीर जबाबदारी म.प्र. नि. मंडळावर आली आहे.बंद असलेले स्टेशन जे. एस. डब्ल्यू . स्टील किंवा अन्य एखाद्या उद्योगाच्या साहाय्याने पुन्हा सुरू करण्यात येईल आणि या माध्यमातून ते सुरू करण्यास यश न आल्यास म.प्र. नि.मंडळ ते चालवेल- एम .आर. लाड, प्रादेशिक अधिकारी, म.प्र. नि.मंडळ ठाणे

टॅग्स :air pollutionवायू प्रदूषण