शहरं
Join us  
Trending Stories
1
Raj Thackeray : मोर्चाला कोण येणार नाही हेही मला बघायचंय; राज ठाकरेंची हिंदी सक्तीविरोधात भव्य मोर्चाची घोषणा
2
इराण-इस्त्रायल युद्धातून भारताने घेतला धडा; आता 'ही' क्षमता दुप्पट करण्याची तयारी
3
७२ वर्षांपूर्वी असं काय घडलं की, इराण आणि अमेरिका बनले एकमेकांचे कट्टर शत्रू?
4
कर्ज घेऊन कार खरेदी करणे अधिक फायदेशीर ठरते का?
5
'इराणकडे भरपूर तेल...', ट्रम्प यांचा इराणी तेलावर डोळा; तीन दिवसात तीनवेळा केला उल्लेख
6
ती मुलगी मला पसंत नव्हती, तरी...; २३ वर्षांच्या नवरदेवाने सोशल मीडियावर पोस्ट लिहिली अन् केलं कांड!
7
भारताच्या मित्र देशात सत्तांतराचं मोठं षडयंत्र अयशस्वी; प्रमुख आर्कबिशप यांच्यासह १४ जण अटकेत
8
Two Wheeler Toll: आता दुचाकींनाही टोल; १५ ऑगस्टपासून 'या' मार्गांवरून जाण्यासाठी मोजावे लागणार पैसे
9
"मला आणि माझ्या मुलाला इच्छामरणाचा अधिकार द्या" मुंबईकराचं फडणवीसांना पत्र, कारणही सांगितलं!
10
युद्धविराम झाला तरी...! इराणचे खामेनी बेपत्ता, इस्रायलचे सिक्रेट ऑपरेशन सुरूच
11
लाखावर दर गेल्यावर युरोप मागतोय अमेरिकेकडे सोने; रस्त्याच्या खाली आहे लाखो टन सोने...
12
"...तर आईची भाषा घरा बाहेर गेलीच समजा’’, वैभव मांगलेंची खरमरीत पोस्ट, उपस्थित केले असे प्रश्न 
13
'नमस्कार फ्रॉम स्पेस...', अंतराळातून शुभांशू शुक्लांचा नवीन Video; काय म्हणाले पाहा...
14
'या' तरुणीने रील बनवून कमावले ४१ कोटी! रोज कमावते अडीच लाख रुपये! कोण आहे 'द रिबेल किड'?
15
‘यूं ही चला चल…’ गाणे ऐकले अन्...; हवाई दलाचे वैमानिक ते अंतराळवीर अशी भरारी, असा आहे शुभांशू शुक्ला यांचा प्रवास
16
'शांत हो श्रीगुरुदत्ता' हे विनवणीपर कवन टेंबे स्वामींना का लिहिले? त्याक्षणी नेमके घडले तरी काय?
17
"दिवा विझल्यावर.…’’, भास्कर जाधवांची नाराजी व्यक्त करण्यासाठी ‘स्टेटस’नीती, चर्चांना उधाण
18
Maharashtra Politics : “तुझ्या अंगावरचे कपडे आम्ही दिलेत, बापाला पेरणीला पैसेही”, भाजपाच्या लोणीकरांचं वादग्रस्त विधान
19
मुंबईत ३० व्या मजल्यावरून उडी घेत अल्पवयीन मुलीची आत्महत्या; कुटुंबीयांकडून घातपाताचा संशय
20
FASTag वापरणाऱ्यांसाठी खूशखबर! आता फक्त टोल नाही, तर पार्किंग-चार्जिंगसह 'या' कामांसाठीही वापरता येणार?

तारापूरच्या १६ कंपन्या बंद, प्रदूषण नियंत्रण मंडळाने बजाविल्या नोटिसा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2018 02:14 IST

तारापूर एम आय डी सी मधील १६ उद्योगांवर उत्पादन बंदची कारवाई करण्यात आली असून महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून शुक्रवारी संध्याकाळपासून संबंधित उद्योगांना नोटीसा बजावण्याचे कामही सुरू झाले आहे.

- पंकज राऊतबोईसर : तारापूर एम आय डी सी मधील १६ उद्योगांवर उत्पादन बंदची कारवाई करण्यात आली असून महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून शुक्रवारी संध्याकाळपासून संबंधित उद्योगांना नोटीसा बजावण्याचे कामही सुरू झाले आहे. अजूनही काही उद्योगांवर अशी कारवाई होण्याची शक्यता आहे तर मागील वर्षापासून अशा पद्धतीची अनेक वेळा कारवाई करूनही पर्यावरणाचे नियम उद्योगांकडून धाब्यावर बसविण्यात येत असल्याने सर्वत्र आश्चर्य व संतापही व्यक्त करण्यात येत आहे.सामुदायिक सांडपाणी प्रक्रि या केंद्रातून तसेच नाल्यावाटे प्रक्रिया न करताच रासायनिक प्रदूषित पाणी सरळ नवापूरच्या खाडीत सोडण्यात येत असल्याने त्याचा गंभीर परिणाम किनारपट्टीवरील मच्छिमार व नागरिकांवर होत असल्याने अखिल भारतीय मांगेला परिषदेने राष्ट्रीय हरित लवादाकडे याचिका दाखल केली होतीराष्ट्रीय हरित लवादाकडील ९ जुलैच्या सुनावणी दरम्यान लवादाने तारापूरचे २५ एमएलडी क्षमतेचे सामुदायिक सांडपाणी प्रक्रिया केंद्र पूर्ण क्षमतेने कार्यरत आहे का? तसेच उद्योगांमध्ये सांडपाणी प्रक्रि येदरम्यान निर्माण होणाऱ्या घातक घनकचºयाची (स्लज) अधिकृतरित्या विल्हेवाट लावण्यात येते का? दिलेल्या परवानगी पेक्षा उद्योगातून (कन्सेट) अधिक प्रमाणात सांडपाण्याचा विसर्ग होतो का ? इत्यादीसह प्रदूषण नियंत्रणाच्या अनुषंगाने उद्योगांची संपूर्ण तपासणी करून अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले होते. त्या नंतर मागील आठवड्यात महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या ८ अधिकाºयांच्या पथकाने तारापूरला येऊन सुमारे ६० उद्योगाची तपासणी केली असे समजतेत्या पैकी कॅलीक्स केमिकल्स अँड फार्मास्युटीकल्स प्रा. ली. नायकेम आॅर्गेनिक्स, सिरॉन ड्रग्ज अँड फार्मास्युटीकल्स पॅरामाऊंट, उज्वल फार्मा, सुनील ग्रेट (एच. वाय. के. ) प्रोसेसर प्रा. ली. केमिकल डिव्हीजन एस .डी. फाईन केम ली.,डी आर व्ही आॅर्गेनिक्स , अ‍ॅरो लॅबरोटरीज ली, श्री चक्र आॅर्गेनिक्स प्रा. ली., लोविनो कपूर कॉटन प्रा. ली , रॅडीअँट इंटरिमडीएट प्रा. ली., पेंटागॉन ड्रग्ज प्रा. ली ,न्यूट्राप्लस इंडिया ली., पंचामृत केमिकल्स प्रा .ली.,एलेक्सो केमिकल्स.हे १६ उद्योग पर्यावरणाचे नियम वेग वेगवेगळ्या पद्धतीने पायदळी तुडवून तर काही कन्सेंटच्या चौकटीत उत्पादन प्रक्रिया करीत नसल्याचे निदर्शनास आल्यामुळे यांच्यावर उत्पादन बंदच्या कारवाईचा बडगा उचलण्यात आला आहे . यापूर्वी अशा स्वरुपाची कारवाई अनेकदा केली गेली तरी तिला उद्योग भीक घालत नाहीत असेच स्पष्ट झाले आहे. अनेकदा तर वीज आणि पाणीपुरवठा तोडण्याची कारवाई देखील अशा उद्योगांवर झाली. परंतु काळांतराने थातूरमातूर दंड करून अथवा कारवाई करून असे उद्योग पुन्हा सुरू केले जातात असा अनुभव आहे त्यामुळे आता काय होणार? हा प्रश्नच आहे.संपर्क झाला नाहीमहाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे (ठाणे) प्रादेशिक अधिकारी एम आर लाड यांच्या मोबाईल वर कॉल तसेच मेसेज द्वारे संपर्क साधून जो सर्व्ह करण्यात आला त्या संदर्भात माहिती देण्याची विनंती केली परंतु त्यांनी प्रतिसाद न दिल्याने सर्व्हेचा तपशील मिळाला नाही. रात्रीही त्यांच्याशी संपर्क साधता आला नाही. 

टॅग्स :Vasai Virarवसई विरारpollutionप्रदूषण