शहरं
Join us  
Trending Stories
1
आता दोघांनीही थांबावे; डोनाल्ड ट्रम्प यांची भारत-पाकिस्तानमध्ये पुन्हा मध्यस्थीची ऑफर
2
रात्री उशिरा पाकिस्तानी पंतप्रधानांनी त्यांच्या देशाला संबोधित केले; भारताला दिली धमकी...
3
भारताच्या एअर स्ट्राईकमुळे पाकिस्तानमध्ये कितीजण मृत्युमुखी पडले? आकडा आला समोर  
4
बहावलपूरवरील हल्ला पाकिस्तानी सैन्याच्या लागलाय जिव्हारी, कापलं गेलंय नाक, कारण काय?
5
पाकिस्तानच्या गोळीबारात भारतीय जवान शहीद; डॉक्टरांनी वाचविण्याचा खूप प्रयत्न केला...
6
नियंत्रण रेषेवर पाकिस्तानकडून आगळीक, भारतीय नागरिकांच्या मृत्यूनंतर चोख प्रत्युत्तर देण्याचे लष्कराला आदेश 
7
‘ऑपरेशन सिंदूर’ला नागपुरातील ‘नागास्त्र-१’चे बळ ? टेहळणीसोबतच लक्ष्याचा भेद करण्याची क्षमता
8
पॉवरप्लेमध्ये अर्धा संघ तंबूत परतल्यावरही CSK नं काढली मॅच; प्लेऑफ्स शर्यतीत KKR तळ्यात मळ्यात
9
Operation Sindoor 2.0: पाकिस्तानला सहजासहजी सोडणार नाही भारत, आणखी काय-काय घडणार?
10
Thank You Rohit Sharma! हिटमॅनच्या कसोटी निवृत्तीनंतर कोण काय म्हणाले? वाचा सविस्तर
11
ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानचे अवसान गळाले, आता म्हणतात, "आम्ही संयम पाळू, तणाव आणखी वाढता नये’’  
12
मुरिदकेमध्ये बड्या दहशतवाद्याचा खात्मा? पाकिस्तानी सैन्यातील अधिकाऱ्यांची अंत्ययात्रेला हजेरी   
13
Mumbai Local: मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे मुंबई लोकल सेवा विस्कळीत, प्रवाशांची गैरसोय
14
'ऑपरेशन सिंदूर'बद्दल पंतप्रधान मोदींनी कालच दिले होते संकेत? 'त्या' वाक्यावरून रंगलीये चर्चा
15
Rohit Sharma: रोहित शर्माची कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा
16
Operation Sindoor Live Updates: रक्ताच्या एकेक थेंबाचा बदला घेऊन, शाहबाज शरीफ यांची भारताला धमकी
17
"मारुतीरायाच्या आदर्शांचं पालन केलं, आम्ही त्यांनाच मारलं ज्यांनी…’’, राजनाथ सिंह यांचं मोठं विधान  
18
"दहशतवाद्यांना माफी नाही"; 'ऑपरेशन सिंदूर'वर इंग्लंडचे माजी PM ऋषी सुनक यांची रोखठोक प्रतिक्रिया
19
अजिंक्य रहाणेचं अर्धशतक हुकलं; पण IPL मध्ये ५ हजार धावांचा पल्ला गाठत मारली खास क्लबमध्ये एन्ट्री
20
Operation Sindoor : "कलमाबद्दल विचारणाऱ्यांना भारतीय सैन्याने महाभारत सुनावलं, आपल्या शांत झोपेमागे..."

तारापूर,पामगावात मॉकड्रिल

By admin | Updated: December 17, 2015 00:26 IST

तारापूर अणुऊर्जा केंद्र एक व दोनमध्ये भूकंपामुळे आपत्कालीन परिस्थिती उद्भवून किरणोत्सर्ग बाहेर पडल्याचे गृहीत धरून केंद्र परिसर व पाम गावामध्ये आज आॅफ साईट इमर्जन्सी

बोईसर : तारापूर अणुऊर्जा केंद्र एक व दोनमध्ये भूकंपामुळे आपत्कालीन परिस्थिती उद्भवून किरणोत्सर्ग बाहेर पडल्याचे गृहीत धरून केंद्र परिसर व पाम गावामध्ये आज आॅफ साईट इमर्जन्सी एक्झरसाईजची रंगीत तालीम घेण्यात आली तर याबाबत अनभिज्ञ असलेल्या ग्रामस्थांमध्ये काही काळाकरिता घबराट पसरली तरी या तालमी बाबतची संपूर्ण माहिती ग्रामस्थांना देण्यात आल्याचे ग्रामपंचायतीकडून सांगण्यात आले.अशी कल्पना करण्यात आली की विरारच्या पुढे केंद्रबिंदू असलेला तीव्र क्षमतेचा भूकंप येथे झाला असून त्यामुळे महाराष्ट्रातील विद्युत व दळण-वळण यंत्रणा विस्कळीत झाल्या आहेत. त्यामुळे तारपूर रिअ‍ॅक्टर्स बंद पडले आहेत. अशा स्थितीत इमर्जन्सी डिझेल जनरेटर्स आपोआप सुरू होतात. ज्या द्वारे रिअ‍ॅक्टर सुरक्षित ठेवण्यासाठी आवश्यक तो विद्युतपुरवठा केला जातो. तद्नंतर डिझेल जनरेटर्स वेगवेगळ्या कारणास्तव बंद पडून अणुभट्टीला जोडणाऱ्या पाइपलाइन भूकंपामुळे फेल्युअर झाल्याने रिअ‍ॅक्टरमधील कुलींग यंत्रणा ठप्प होऊन इंधन थंड करण्याची प्रक्रिया थांबल्याचे गृहीत धरण्यात आले.या काल्पनीक घटनेमुळे किरणोत्सर्ग बाहेर पडून प्रथम अणुकेंद्रात पसरून तो वाऱ्याच्या दिशेने झपाट्याने पसरून पाम गावापर्यत पोहचत असल्याचे गृहीत धरून सकाळी साडेसात वाजता आपत्कालीन परिस्थितीची घोषणा तारापूरच्या डीएई सेंटर कडून करण्यात आली. त्यानंतर जिल्हाप्रशासन, पोलीस, जिल्हापरिषद, आरोग्य विभाग, वाहतूक व्यवस्थापन, परीवहन महामंडळ, महसूल,नागरी संरक्षण दल, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन समिती कार्यरत होऊन बाधीत पाम गावात दाखल होऊन आॅफ साईट इमर्जन्सी एक्झरसाईजची रंगीत तालीम सुरू झाली.वेगवेगळ्या टीम बाधीत पाम गावात दाखल झाल्यानंतर नागरीकांना नाकातोंडावर रूमाल बांधण्याची सूचना देऊन घराच्या दरवाजे खिडक्या बंद करून घरातच बसण्याची विनंती करण्यात आली. बाधीत सेक्टर वाहतुकीसाठी बंद करण्यात येऊन रेडियोधर्मी आयोडीनपासून थायरॉईडला धोका पोहचू नये म्हणून आयोडीनच्या गोळ्याच्या रूपात चॉकलेटचे वाटप करण्यात आले.एक्सरसाईजच्या तिसऱ्या टप्प्यात गावातील ४६ पुरूष व २१ महिला अशा ६७ नागरीकांना किरणोत्सर्गाची किती बाधा झाली आहे ते तपासून दोन एस.टी च्या बसेस मधून सोळा कि. मी. त्रिज्येच्या बाहेर जि.प. शाळा चारोटी येथे सुरक्षित स्थळी हलविण्यात आले तर बाधीत गावातून आलेल्या एस.टी बसही डीकंडामेशन करण्यात आली. ही प्रक्रिया दुपारी साडेबारा वाजता यशस्वीपणे झाल्याचे जाहीर करण्यात आली.अनेक ग्रामस्थांना हा प्रकार नवा असल्याने त्यांची चांगलीच तारांबळ उडाली. तारापूरचा हा भाग राष्ट्रीय सुरक्षेचा विषय असल्याने या ठिंकाणी सुरक्षेचा उपाय म्हणून अशी मॉकड्रिल घेण्यात येते.