शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune: लक्ष्मी रोडवरील थरार... गर्दीत बस येताच चालकाला ह्रदयविकाराचा झटका; पोलीस धावले अन्...
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा हट्टीपणा, अतिरिक्त २५ टक्के टॅरिफ लागू; भारत 'चौफेर' पलटवार करणार?
3
Nikki Murder Case : निक्कीला जाळणाऱ्या विपिनच्या कुटुंबाचं सर्वात मोठं खोटं पकडलं; तपासात 'अशी' झाली पोलखोल
4
Sharvari Shende: महाराष्ट्राच्या शर्वरी शेंडेनं रचला इतिहास; तिरंदाजी स्पर्धेत देशासाठी सुवर्णपदक जिंकले!
5
भयंकर! बांगलादेशात नदीमध्ये सापडतायेत मृतदेह; आतापर्यंत ७५० बॉडी पोलिसांनी मोजल्या, कारण काय?
6
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला यांच्या नावाने केली शिष्यवृत्तीची घोषणा
7
"माझी हत्या होऊ शकते..." हकालपट्टी झालेल्या सपाच्या आमदार पूजा पाल यांचा धक्कादायक दावा
8
नीरज चोप्रा डायमंड लीग २०२५च्या अंतिम फेरीत; अँडरसन पीटर्स, ज्युलियन वेबरशी लढत!
9
Saurabh Bharadwaj: आप नेते सौरभ भारद्वाज यांच्या घरासह १३ ठिकाणी ईडीचे छापे, नेमकं प्रकरण काय?
10
सरकार उलथून टाकायला 'सलाईन वीर' जरांगेंकडे किती आमदार? लक्ष्मण हाकेंचा खोचक सवाल
11
‘या’ ३ तारखांना जन्मलेले लोक भाग्यवान, पैसा कमी पडत नाही; गणपती देतो अपार सुख, लक्ष्मी वरदान!
12
Vikram Solar IPO: विक्रम सोलर शेअर बाजारात करणार धमाकेदार एंट्री! प्रीमियमसह लिस्टिंग होण्याची शक्यता; ग्रे मार्केटमध्ये काय स्थिती?
13
Ganesh Chaturthi 2025:अपरिहार्य कारणाने गणपती आणता आला नाही, तर शास्त्रात काय असतो पर्याय?
14
४ मुलांची आई बॉयफ्रेंडसोबत पळाली, सासरच्यांनी शोधून घरी आणलं; त्यानंतर असं काय घडलं, पतीने FB Live केले, मग...
15
गणपती २०२५: ६ मूलांकांना ८ राजयोग शुभ, दुपटीने चौफेर लाभ; धनलक्ष्मी-गणेश कृपेचा वरदहस्त!
16
सपा आमदाराच्या कारला अपघात, अचानक गाडीचे स्टेअरिंग तुटले अन्...
17
८ शुभ योगात गणपती २०२५: ८ राशींना अष्टविनायक वरदान, समृद्धी-ऐश्वर्य; वैभव-सुबत्ता, मंगल-कल्याण!
18
शेअर बाजाराचा धोका नको, पण परतावा बंपर हवा? मग 'या' ५ योजना आहेत बेस्ट, कमी जोखीमीत दुप्पट पैसे
19
"तिला घेऊ नको, ती काळी आहे...", मराठी अभिनेत्रीला करावा लागलेला वर्णभेदाचा सामना
20
सनातन धर्म आणि संस्कृतीच्या रक्षणासाठी शीख गुरूंनी बलिदान दिलं -CM योगी आदित्यनाथ 

तारापूर,पामगावात मॉकड्रिल

By admin | Updated: December 17, 2015 00:26 IST

तारापूर अणुऊर्जा केंद्र एक व दोनमध्ये भूकंपामुळे आपत्कालीन परिस्थिती उद्भवून किरणोत्सर्ग बाहेर पडल्याचे गृहीत धरून केंद्र परिसर व पाम गावामध्ये आज आॅफ साईट इमर्जन्सी

बोईसर : तारापूर अणुऊर्जा केंद्र एक व दोनमध्ये भूकंपामुळे आपत्कालीन परिस्थिती उद्भवून किरणोत्सर्ग बाहेर पडल्याचे गृहीत धरून केंद्र परिसर व पाम गावामध्ये आज आॅफ साईट इमर्जन्सी एक्झरसाईजची रंगीत तालीम घेण्यात आली तर याबाबत अनभिज्ञ असलेल्या ग्रामस्थांमध्ये काही काळाकरिता घबराट पसरली तरी या तालमी बाबतची संपूर्ण माहिती ग्रामस्थांना देण्यात आल्याचे ग्रामपंचायतीकडून सांगण्यात आले.अशी कल्पना करण्यात आली की विरारच्या पुढे केंद्रबिंदू असलेला तीव्र क्षमतेचा भूकंप येथे झाला असून त्यामुळे महाराष्ट्रातील विद्युत व दळण-वळण यंत्रणा विस्कळीत झाल्या आहेत. त्यामुळे तारपूर रिअ‍ॅक्टर्स बंद पडले आहेत. अशा स्थितीत इमर्जन्सी डिझेल जनरेटर्स आपोआप सुरू होतात. ज्या द्वारे रिअ‍ॅक्टर सुरक्षित ठेवण्यासाठी आवश्यक तो विद्युतपुरवठा केला जातो. तद्नंतर डिझेल जनरेटर्स वेगवेगळ्या कारणास्तव बंद पडून अणुभट्टीला जोडणाऱ्या पाइपलाइन भूकंपामुळे फेल्युअर झाल्याने रिअ‍ॅक्टरमधील कुलींग यंत्रणा ठप्प होऊन इंधन थंड करण्याची प्रक्रिया थांबल्याचे गृहीत धरण्यात आले.या काल्पनीक घटनेमुळे किरणोत्सर्ग बाहेर पडून प्रथम अणुकेंद्रात पसरून तो वाऱ्याच्या दिशेने झपाट्याने पसरून पाम गावापर्यत पोहचत असल्याचे गृहीत धरून सकाळी साडेसात वाजता आपत्कालीन परिस्थितीची घोषणा तारापूरच्या डीएई सेंटर कडून करण्यात आली. त्यानंतर जिल्हाप्रशासन, पोलीस, जिल्हापरिषद, आरोग्य विभाग, वाहतूक व्यवस्थापन, परीवहन महामंडळ, महसूल,नागरी संरक्षण दल, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन समिती कार्यरत होऊन बाधीत पाम गावात दाखल होऊन आॅफ साईट इमर्जन्सी एक्झरसाईजची रंगीत तालीम सुरू झाली.वेगवेगळ्या टीम बाधीत पाम गावात दाखल झाल्यानंतर नागरीकांना नाकातोंडावर रूमाल बांधण्याची सूचना देऊन घराच्या दरवाजे खिडक्या बंद करून घरातच बसण्याची विनंती करण्यात आली. बाधीत सेक्टर वाहतुकीसाठी बंद करण्यात येऊन रेडियोधर्मी आयोडीनपासून थायरॉईडला धोका पोहचू नये म्हणून आयोडीनच्या गोळ्याच्या रूपात चॉकलेटचे वाटप करण्यात आले.एक्सरसाईजच्या तिसऱ्या टप्प्यात गावातील ४६ पुरूष व २१ महिला अशा ६७ नागरीकांना किरणोत्सर्गाची किती बाधा झाली आहे ते तपासून दोन एस.टी च्या बसेस मधून सोळा कि. मी. त्रिज्येच्या बाहेर जि.प. शाळा चारोटी येथे सुरक्षित स्थळी हलविण्यात आले तर बाधीत गावातून आलेल्या एस.टी बसही डीकंडामेशन करण्यात आली. ही प्रक्रिया दुपारी साडेबारा वाजता यशस्वीपणे झाल्याचे जाहीर करण्यात आली.अनेक ग्रामस्थांना हा प्रकार नवा असल्याने त्यांची चांगलीच तारांबळ उडाली. तारापूरचा हा भाग राष्ट्रीय सुरक्षेचा विषय असल्याने या ठिंकाणी सुरक्षेचा उपाय म्हणून अशी मॉकड्रिल घेण्यात येते.