शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
3
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
4
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
5
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
6
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
7
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
8
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने आपला उमेदवार मागे घ्यावा; सुप्रिया सुळेंची काँग्रेसला विनंती
9
मस्करीची कुस्करी! मित्राच्या गुप्तांगात भरली एअर कॉम्प्रेसरने हवा; आतड्यांचा अक्षरशः गोळा झाला अन्...
10
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
11
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
12
Kruthika Reddy : इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
13
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
14
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
15
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
16
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
17
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
18
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
19
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
20
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
Daily Top 2Weekly Top 5

वसई-विरार शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या सूर्या-धामणी धरणात 32.62 टक्के पाणीसाठा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 29, 2020 21:24 IST

वसई-विरार शहराला सूर्या-धामणी प्रकल्पातून 100 एमएलडी, सूर्या टप्पा -3 मधून 100  एमएलडी तर उसगाव 20  एमएलडी आणि पेल्हार धरणातून 10 एमएलडी पाणी म्हणजेच एकूण 230 एमएलडी पाणी प्रतिदिन मिळत आहे.

- आशिष राणे

वसई -  वसई-विरार शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या वसई तालुक्यातील दोन धरणा मधील पाणीसाठा खालावला असून जेमे-तेम महिना पुरेल इतकाच पाणीसाठा या धरणात शिल्लक असून पालघर मधील सूर्या-धामणी धरणातील साठा हा मुबलक असल्याने तो बहुतांशी वर्षभर पुरेल अशी आकडेवारी दर्शवणारी स्थिती असल्याची माहिती पाणीपुरवठा विभागाच्या सहायक अभियंताने लोकमत ला दिली . याउलट उसगाव व पेल्हार मधील पाण्याची पातळी फारच कमी झाली असून जेम-तेम 20 दिवसच पुरेल इतका पाणीसाठा या दोन्ही धरणात राहिला आहे.त्यामुळे वसई विरार शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या सूर्या धामणी हे मुख्य धरण वगळता दोन्ही धरणातला पाणी साठ्याची पातळी कमी होऊन देखील यंदा हि पाणीकपात केली जाणार आहे कि नाही याबाबत आयुक्त तथा उपअभियंता पाणीपुरवठा सुरेंद्र ठाकरे यांना संपर्क केला असता तो झाला नाही.  वसई-विरार शहराला सूर्या-धामणी प्रकल्पातून 100 एमएलडी, सूर्या टप्पा -3 मधून 100  एमएलडी तर उसगाव 20  एमएलडी आणि पेल्हार धरणातून 10 एमएलडी पाणी म्हणजेच एकूण 230 एमएलडी पाणी प्रतिदिन मिळत आहे.परंतु आता जून संपत आला तरी वरुणराजाने अल्प हजेरी लावली असून हवी तशी दणकेबाज वृष्टी केलेली नाही.त्यामुळे गतवर्षी पडलेल्या पावसाच्या धरणातील पाण्याचा साठा आता खालावत चालला असून या तीन धरणांपैकी जिल्ह्यातील पालघरच्या सूर्या-धामणी धरणात 276.35 घनमीटर दशलक्ष लिटर (90.141 दशलक्ष ) म्हणजेच 32.62 टक्के तर वसई तालुक्यातील उसगाव मध्ये 4.96 घनमीटर दशलक्ष (0.562 दशलक्ष), 11.33 टक्के आणि पेल्हार धरणात 3.56 दशलक्ष घनमीटर, (0.118 दशलक्ष ) म्हणजेच 3.31 टक्के इतकाच साठा शिल्लक आहे.पावसाने जून संपला तरी अद्याप केवळ तोंडच दाखवले आहे, मात्र वसई विरारच्या शहरी व ग्रामीण भागात पुढील काही दिवसात पाणी कपातीचे मोठे संकट उभे राहणार हे तर नक्की आहे.त्यामुळे सूर्या-धामणी धरणातील पाण्याचा विचार करून वसई विरार शहरात कुठेही पाणीकपात केली जाणार नाही, असे पाणीपुरवठा विभागाने स्पष्ट केले असले तरीही याकरिता वसई विरार महापालिकेला धरणात असलेल्या या पाण्याच्या पातळीनुसार धरण क्षेत्रात पाऊस पडेपर्यंत अतिशय काटेकोरपणे नियोजन करावे लागणार आहे.म्हणजेच सूर्याच्या दोन्ही योजनांतून 200 दशलक्ष लिटर प्रतिदिन पाणीपुरवठा होत असून तो साधारण 365 दिवस पुरेल, तर उसगाव धरणातून 20 तर पेल्हार मधून 10 दशलक्ष लिटर प्रतिदिन पाणीपुरवठा होत आहे. यात आता उसगाव धरणांत 18 दिवस आणि पेल्हार धरणात केवळ 8  दिवस पुरेल इतकाच असल्याचे हि आकडेवारीवरून स्पष्ट होते असल्याचे सांगितले .पाणीपुरवठा विभागाचे आवाहन !तसेच वसई-विरार शहर महापालिका क्षेत्रातील नागरिकांना पाण्याची समस्या किमान काही महिने भेडसावणार नाही, इतका साठा असल्याचे स्पष्ट केले असून नागरिकांनी देखील पाण्याचा अपव्यय न करता काटकसरीने पाणी वापरावे, असे आवाहन महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने केले आहे.‘वसई-विरार शहराला पाणीपुरवठा करणाºया वसई तालुक्यातील दोन धरणामधील पाण्याची पातळी खालावली असून जेमतेम महिनाभर पुरेल इतकाच पाणीसाठा शिल्लक आहे. तरी मात्र पालघर जिल्ह्यातील सूर्या- धामणी धरणात अजूनही वर्षभर पुरेल इतका म्हणजेच 32.62 टक्के पाणीसाठा शिल्लक असल्याची माहिती पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने दिली.’नियोजन व गळतीबाबत पथक फिरती करा-नागरिकवसई-विरार शहर महापालिकेने धरणातील पाण्याची पातळीचे निरीक्षण करून आणि शहरात होणारी पाण्याची गळती रोखण्यासाठी अभ्यासपूर्ण नियोजन करणे आवश्यक आहे, तसे प्रयत्न न केल्यास हजारो लिटर पाणी वाया जाईल व धरणातील साठा पाहता पाणी संकट निर्माण होण्याची शक्यता अधिक होईल, असे मत स्थानिक नागरिक व्यक्त करीत आहेत, तर याबाबत महापालिकेने गळती प्रतिबंधक पथक तयार करून ते ठिकठिकाणी फिरते ठेवले पाहिजे. 

टॅग्स :WaterपाणीVasai Virarवसई विरार