शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
3
आता मनमानी चालणार नाही! रुग्णालयांना आधीच सांगावा लागणार आयसीयू-व्हेंटिलेटरचा खर्च; 'यांची' मंजुरीही आवश्यक
4
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
5
सैराटची पुनरावृत्ती! आंतरजातीय विवाहामुळे बदल्याची आग; बापानेच केली गर्भवती लेकीची हत्या
6
रस्त्यांवर झाडू मारतोय भारतीय 'सॉफ्टवेअर डेव्हलपर'! महिना सव्वा लाखाची कमाई; कंपनी का देते इतके पैसे?
7
विधवा वहिनीचं दीरासोबतच सुरू झालं अफेअर अन् अचानक घरातून झाली गायब! एक महिन्यानंतर जे समोर आलं... 
8
तुम्ही वापरत असलेला चार्जर FAKE तर नाहीये ना? कसा ओळखायचा ओरिजनल चार्जर, टाळू शकता मोबाइलचं होणारं नुकसान
9
Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
10
भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू
11
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
12
बॉलिवूडचे चर्चेतले चेहरे अक्षय खन्ना-सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र दिसणार? 'या' सिनेमाची चर्चा
13
Budh Gochar 2025: २०२५ ला निरोप देताना 'या' ७ राशींचे नशीब चमकणार, आयुष्यात येणार सुवर्णकाळ
14
लग्नाच्या आदल्या रात्री वडील ओरडले; नवरदेवाच्या लागलं मनाला, वरातीऐवजी घरातून निघाली अंत्ययात्रा!
15
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
16
KVP Scheme: पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
17
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
18
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
19
एस एस राजामौलींच्या 'वाराणसी'चं बजेट १३०० कोटी? प्रियंका चोप्रा म्हणाली, "अर्धे पैसे माझ्या..."
20
शरीफ उस्मान हादीचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
Daily Top 2Weekly Top 5

सूर्याचे ५ दरवाजे उघडले, उधाणाचा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2018 03:06 IST

डहाणू तालुक्यात जोरदार पाऊस झाला असल्याने कासा भागातील जनजीवन विस्कळीत झाले होते.

- शशिकांत ठाकूरकासा : डहाणू तालुक्यात जोरदार पाऊस झाला असल्याने कासा भागातील जनजीवन विस्कळीत झाले होते. धामणी धरणाचे सर्व पाचही दरवाजे उघडले असून सूर्या नदीत १७४३४ क्यूसेक पाणी सोडले आहे. त्यामुळे मोठा पूर आला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून तालुक्यातील सतत पाऊस पडत होता. गेल्या दोन दिवसांपासून जोरदार पाऊस पडल्याने सूर्या नदीला मोठा पूर आला आहे. धामणी धरण ७८ टक्के भरले असून धरणक्षेत्रात दिवस भरात १४४ मी मी पाऊस झाला आहे. धरणातील पाण्याची पातळी ११४ मीटर आहे. धरणाचे सर्व पाचही दरवाजे दोन फुटणे उघडले आहेत. त्या खालील दुसरे कवडास धरण भरून वाहते आहे.दोन दिवसांपासून सूर्या नदीला पूर आल्याने पेठ म्हसाड जवळील पूल दोन दिवस पाण्याखाली आहे.त्या परिसरातील गावांचा संपर्क तुटला आहे. तसेच कासा भागातील गुलजारी व चिखली नदीलाही पूर आल्याने त्या खालील लहान पूल व मोº्या पाण्याखाली गेल्या होत्या.सतत पावसामुळे शेती पाण्याखाली गेली आहे त्यामुळे शेतकऱ्यांची भात रोपणीची कामे थांबली आहेत.पूरसदृश्य स्थिती कायम असल्याने अजूनही पूर, मोºया पाण्याखाली असल्याने तर कुठे चिखल, दलदल असल्याने वाहतूक विस्कळीत झालेली आहे. किनाºयावरील गावे, पाडे यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून प्रशासनही कोणत्याही स्थितीला तोंड देण्यास सज्ज ठेवण्यात आले आहे. पाऊस सतत सुरू असल्याने कोणत्याही क्षणी धरणातून होणारा विसर्ग वाढू शकतो. तसेच पावसाच्या पाण्याचा प्रवाह आणि ओघ वाढू शकत असल्यामुळे त्यावर पूर नियंत्रक कक्ष लक्ष ठेवून आहे.

वसईत पावसाची जोरदार हजेरी, हजारो हेक्टर पिके पाण्याखालीपारोळ : वसईकरांच्या मनावरील पुराचे भय कायम असतांनाच शनिवार व रविवारी पावसाने पुन्हा एकदा जोरदार हजेरी लावल्याने वसई पांढर तारा, मेढे हे पूल पाण्याखाली गेले. शेकडो हेक्टर मधील भाताच्या पेरण्या पाण्यात गेल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. दुबार पेरणी करावी लागण्याची शक्यता आहे. तर शहरी भागात पावसाचा जोर कमी असल्याने पूरस्थिती निर्माण झाली नाही.या वर्षी वसईला पावसाने मोठा तडाखा दिला, यामुळे वसई, विरार, नालासोपारा, तीन दिवस जलमय झाली. वीज नसल्याने नागरिकांना अंधारात राहावे लागले, अनेक कुटुंबांवर अन्न पाण्याशिवाय राहण्याची वेळ आली. रस्ते पाण्याखाली, वाहतूक बंद, जलमय झाल्याने बाजार बंद, रेल्वे ठप्प, अशी स्थिति पावसाने निर्माण केल्याने व्यापारी, उद्योजक व शेतकºयांचे नुकसान झाले. हजारो घरात ४-५ फूट पांणी शिरल्याने रहिवाशांच्या अन्नधान्य व इतर वस्तूचे मोठे नुकसान झाले. या पुराच्या वसईकरांच्या मनात जखमा ताज्या असतानाच रविवारी सकाळ पासूनच पावसाने जोरदार सुरुवात केल्याने आता हा पाऊस देखील पुन्हा तीन दिवस घरात बसवतो की काय? अशी भीती वसईकरांना भेडसावू लागली आहे. तिच्यावर सध्या तरी कोणताही उतारा नाही.>तडीयाळे गुंगवाडा धाकटी डहाणूमध्ये भरतीचे पाणी घुसलेडहाणू : मुसळधार पाऊस आणि समुद्राची भरती यामुळे समुद्रकिनारच्या डहाणू किनारपट्टीवरील वाढवण, तडियाळे, गुंगवाडा, या गावांमध्ये पाणी शिरुन मोठे नुकसान झाले. धाकटी डहाणू चिंचपाडामध्ये तर समुद्राच्या भरतीच्या माºयामुळे ठिकठिकाणी झाडे उन्मळून पडली तर भरतीचे पाणी थेट गावात शिरल्याने रहिवाशांची त्रेधातिरपीट उडाली. घरात पाणी शिरण्याच्या भितीने ग्रामस्थांनी आपल्या घरातील साहित्य उंचावर सुरक्षित ठिकाणी ठेवले. त्यातच कोसळणाºया मुसळधार पावसामुळे भीतीचे वातावरण पसरले. तिडयाळे येथील किनारपट्टी ५ मीटर उंचीच्या समुद्राच्या लाटांनी वाहून नेली. त्यामुळे किनारा असुरक्षित झाला आहे.>तिडयाळे तसेच धाकटी डहाणू येथे मच्छीमारांच्या घरांचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले आहे. शासनाने पंचनामे करु न त्यांना तातडीने भरपाई मिळवून देण्याची आवश्यकता आहे-वशीदास अंभिरे मच्छीमार नेते