शहरं
Join us  
Trending Stories
1
"अन्याय कितीही मोठा असला तरी..." मुंबईत भाजपाच्या माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत
2
मनसेचा पहिला उमेदवार ठरला, राज ठाकरेंनी दिला AB फॉर्म; यशवंत किल्लेदार कुठून लढणार?
3
आता केवळ २ दिवस शिल्लक, PAN Aadhaar लवकर लिंक करा; अन्यथा होईल मोठी डोकेदुखी
4
४ ओव्हर्स, ७ रन्स आणि ८ विकेट्स! या गोलंदाजाने T20I मध्ये सेट केला नवा वर्ल्ड रेकॉर्ड
5
Aadhaar Card : तुमचे 'आधार कार्ड' लॉक करा, नाही तर बँक खाते होईल रिकामे; जाणून घ्या प्रक्रिया
6
एकट्याच्या जीवावर सिनेमा करुन दाखव..., 'दृश्यम ३'च्या दिग्दर्शकाचं अक्षय खन्नाला खुलं आव्हान
7
सोन्या-चांदीच्या किंमतीबाबत बाबा वेंगानी काय म्हटलं; दरांबाबत काय केली भविष्यवाणी? जाणून घ्या
8
पुण्यात भाजपची अळीमिळी गुपचिळी! 'उमेदवारी मिळाली हो...!' उमेदवारांचे समर्थकांना सकाळीच गेले फोन, एबी फॉर्म उद्या मिळणार?
9
BMC Election 2026 Shiv Sena UBT List: उद्धवसेनेकडून मुंबई महापालिकेसाठी ५५ जणांना उमेदवारी, कोणाला मिळाले एबी फॉर्म?
10
सावधान! तुमच्या नावावर भलतेच कोणी सिम वापरत नाहीये ना? 'या' पोर्टलवर घरबसल्या करा तपासणी
11
मकर राशीसाठी नवीन वर्ष 2026: जुन्या आव्हानांचा होणार अंत; प्रगतीसाठी 'हे' सूत्र वापरा आणि यश मिळवा!
12
२०२५ची शेवटची पुत्रदा एकादशी: कसे कराल व्रतपूजन?; ‘या’ गोष्टी आवर्जून करा, पुण्य-लाभ मिळेल!
13
मुंबईत शरद पवारांच्या राष्ट्रवादीला धक्का; मुंबई अध्यक्षा राखी जाधव यांचा भाजपात प्रवेश
14
Silver Price Crash: एका तासात चांदी २१ हजार रुपयांनी आपटली; विक्रमी उच्चांकानंतर किमतीत का आला भूकंप?
15
"माझी शिवसेनेतून हकालपट्टी करा, कारण..."; KDMC च्या माजी सभागृह नेत्याचं एकनाथ शिंदेंना पत्र
16
‘मोदी आणि ईव्हीएमच्या बळावर भाजपा माज करतोय, कोणत्याही परिस्थितीत मुंबईला वाचवायचंय’, राज ठाकरेंचं मोठं विधान 
17
मालेगावात महायुतीचे नेमके अडले कुठे? आता चर्चा वरिष्ठ स्तरावर; स्थानिक पातळीवर एकमत होईना
18
VHT 2025 : टीम इंडियातील 'ध्रुवतारा' चमकला! पांड्याच्या संघातील गोलंदाजांना धु धु धुतलं
19
पश्चिममध्ये तीन प्रभागांत भाजप विरुद्ध भाजप! शिंदेसेना- राष्ट्रवादी एकत्र, महाविकास आघाडीचा प्रभाव
20
५ वर्षांत १०००% चं रिटर्न, आज अचानक जोरदार आपटला हा शेअर; कोणता आहे स्टॉक, कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

सफाई न केल्याने सूर्या कालव्याची कचराकुंडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2020 01:07 IST

आठवडाभर उशिरा पाणीपुरवठा; दुर्लक्षामुळे सूर्या कालवे रुतले गाळात

- शशिकांत ठाकूरकासा : डहाणू, पालघर तालुक्यातील गावातील शेतीला उन्हाळ्यात सूर्या कालव्यातून पाणीपुरवठा केला जातो. मात्र, या कालव्यात साठलेला गाळ, दगड - गोटे, गवत, झाडेझुडपे यामुळे कालव्याची अक्षरश: कचराकुंडी झाली आहे. पाच वर्षांत कालव्यांची साफसफाई न केल्याने अशी परिस्थिती झाली आहे. त्यातही सोमवार, ३० डिसेंबर रोजी उशिरा कालव्यातून शेतीसाठी पाणी सोडण्यात आले.सिंचन या प्रमुख उद्देशाने हे धरण बांधण्यात आले होते. या कालव्यातून १४ हजार ५०० हेक्टर जमीन सिंचनाखाली आणली आहे. दरवर्षी १५ डिसेंबरला सूर्या कालव्यातून पाणी सोडले जाते. मात्र चालू वर्षी तब्बल पंधरा दिवस उशिरा डाव्या कालव्यातून ३० डिसेंबरला पाणी सोडण्यात आले आहे तर उजव्या कालव्यातून ते ३१ डिसेंबरला सोडण्यात येणार आहे. त्यामुळे शेतीचा हंगाम लांबणीवर जाणार असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. दरम्यान, मुख्य कालव्यात तसेच उपकालव्यात गाळ, कचरा, गवत, दगडगोटे साचले आहेत. तरीही त्याची सफाई न करता पाणी सोडले आहे. आधीच कालव्याचे प्लास्टर, बांधकाम वाहून गेल्याने दुरवस्था झाली आहे. त्यामुळे कालव्यातून पाण्याचा निचरा होत असल्याने अपुरा पाणीपुरवठा होतो आणि पाणी सोडल्यानंतर आठवडाभरात पाणी शेवटच्या गावापर्यंत पोहचते. मात्र, आता तर कालव्यात मोठ्या प्रमाणावर गाळ आहे आणि दुरवस्था झाली आहे.दरम्यान, २००९ पासून कालवे दुरुस्ती आणि साफसफाई करण्यास मंजुरी दिली जात नाही तसेच ती हातीही घेतली जात नाही. त्यामुळे गाळ काढण्याची तसेच साफसफाईची कामे यांत्रिकी विभागामार्फत केली जात असल्याचे जलसंपदा विभागाचे अधिकारी सांगतात.आदिवासी भागातील डहाणू, पालघर आणि विक्रमगड आदी तालुक्यातील गावांना पाणीपुरवठा केला जातो. यामध्ये डहाणूतील पेठ, तवा, धामटने, कोल्हान, कासा, सूर्यनगर, वेती, वरोती, मुरबाड, वांगर्जे, उर्से, सारणी, म्हसाड, आंबिवली, साये, आंबिस्ते, सोनाळे, वाघाडी, ऐना, साखरे तर पालघरमधील बºहाणपूर, आंबेदा, नानीवली, चिंचारे, बोरशेती, अकेगव्हान, रावते, कुकडे, महागाव आदी सुमारे ७० ते ८० गावांना पाणीपुरवठा केला जातो.निवडणूक प्रशिक्षणासाठी कर्मचारी गेल्याने कालव्यातून उशिरा पाणीपुरवठा झाला असून डाव्या कालव्यातून पाणी सोडले असून ३१ डिसेंबरला उजव्या कालव्यातून पाणी सोडले जाणार आहे.- प्रवीण भुसारे, उपअभियंता,सूर्या प्रकल्प वाणगाव शाखासूर्या कालव्याची मशिनरीने गाळ काढण्याची कामे सुरू असून बाकी गाळ काढण्याची कामेही केली जातील.- रवी पवार, कार्यकारी अभियंता, सूर्या प्रकल्प