शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थच्या व्यवहाराचे ४२ कोटी कोण भरणार? मुंढव्यातील वादग्रस्त व्यवहार आज रद्द होणार?
2
आजचे राशीभविष्य,१० नोव्हेंबर २०२५: दुपार नंतर समस्या कमी होऊ लागतील; सामाजिक प्रतिष्ठेत वाढ होईल
3
तीन शहरांत रेकी, विषही तयार; अतिरेक्यांचा मोठा कट उधळला, गुजरात एटीएसने पकडले ३ अतिरेकी
4
विशेष लेख: 'हमारी छोरिया छोरो से कम हैं के?'
5
महाराष्ट्र्रात १३ हजार बोगस कंपन्यांना टाळे; जीएसटीविरोधीत मोहीम
6
मुस्लिम आणि ख्रिश्चन RSS चे सदस्य होऊ शकतात का? मोहन भागवत म्हणाले, "शाखेत येऊ शकतात, पण..."
7
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
8
तक्रारदारासोबत गैरवर्तन, २ पोलिस अधिकारी निलंबित
9
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
10
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
11
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
12
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
13
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
14
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
15
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
16
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
17
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
18
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
19
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
20
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?

सफाई न केल्याने सूर्या कालव्याची कचराकुंडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2020 01:07 IST

आठवडाभर उशिरा पाणीपुरवठा; दुर्लक्षामुळे सूर्या कालवे रुतले गाळात

- शशिकांत ठाकूरकासा : डहाणू, पालघर तालुक्यातील गावातील शेतीला उन्हाळ्यात सूर्या कालव्यातून पाणीपुरवठा केला जातो. मात्र, या कालव्यात साठलेला गाळ, दगड - गोटे, गवत, झाडेझुडपे यामुळे कालव्याची अक्षरश: कचराकुंडी झाली आहे. पाच वर्षांत कालव्यांची साफसफाई न केल्याने अशी परिस्थिती झाली आहे. त्यातही सोमवार, ३० डिसेंबर रोजी उशिरा कालव्यातून शेतीसाठी पाणी सोडण्यात आले.सिंचन या प्रमुख उद्देशाने हे धरण बांधण्यात आले होते. या कालव्यातून १४ हजार ५०० हेक्टर जमीन सिंचनाखाली आणली आहे. दरवर्षी १५ डिसेंबरला सूर्या कालव्यातून पाणी सोडले जाते. मात्र चालू वर्षी तब्बल पंधरा दिवस उशिरा डाव्या कालव्यातून ३० डिसेंबरला पाणी सोडण्यात आले आहे तर उजव्या कालव्यातून ते ३१ डिसेंबरला सोडण्यात येणार आहे. त्यामुळे शेतीचा हंगाम लांबणीवर जाणार असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. दरम्यान, मुख्य कालव्यात तसेच उपकालव्यात गाळ, कचरा, गवत, दगडगोटे साचले आहेत. तरीही त्याची सफाई न करता पाणी सोडले आहे. आधीच कालव्याचे प्लास्टर, बांधकाम वाहून गेल्याने दुरवस्था झाली आहे. त्यामुळे कालव्यातून पाण्याचा निचरा होत असल्याने अपुरा पाणीपुरवठा होतो आणि पाणी सोडल्यानंतर आठवडाभरात पाणी शेवटच्या गावापर्यंत पोहचते. मात्र, आता तर कालव्यात मोठ्या प्रमाणावर गाळ आहे आणि दुरवस्था झाली आहे.दरम्यान, २००९ पासून कालवे दुरुस्ती आणि साफसफाई करण्यास मंजुरी दिली जात नाही तसेच ती हातीही घेतली जात नाही. त्यामुळे गाळ काढण्याची तसेच साफसफाईची कामे यांत्रिकी विभागामार्फत केली जात असल्याचे जलसंपदा विभागाचे अधिकारी सांगतात.आदिवासी भागातील डहाणू, पालघर आणि विक्रमगड आदी तालुक्यातील गावांना पाणीपुरवठा केला जातो. यामध्ये डहाणूतील पेठ, तवा, धामटने, कोल्हान, कासा, सूर्यनगर, वेती, वरोती, मुरबाड, वांगर्जे, उर्से, सारणी, म्हसाड, आंबिवली, साये, आंबिस्ते, सोनाळे, वाघाडी, ऐना, साखरे तर पालघरमधील बºहाणपूर, आंबेदा, नानीवली, चिंचारे, बोरशेती, अकेगव्हान, रावते, कुकडे, महागाव आदी सुमारे ७० ते ८० गावांना पाणीपुरवठा केला जातो.निवडणूक प्रशिक्षणासाठी कर्मचारी गेल्याने कालव्यातून उशिरा पाणीपुरवठा झाला असून डाव्या कालव्यातून पाणी सोडले असून ३१ डिसेंबरला उजव्या कालव्यातून पाणी सोडले जाणार आहे.- प्रवीण भुसारे, उपअभियंता,सूर्या प्रकल्प वाणगाव शाखासूर्या कालव्याची मशिनरीने गाळ काढण्याची कामे सुरू असून बाकी गाळ काढण्याची कामेही केली जातील.- रवी पवार, कार्यकारी अभियंता, सूर्या प्रकल्प