शहरं
Join us  
Trending Stories
1
Anil Ambani : अनिल अंबानी अडचणीत? घरासह इतरही ठिकाणांवर सकाळपासूनच छापे; १७००० कोटींच्या बँक कर्ज घोटाळाप्रकरणी CBI ची कारवाई!
2
'भारत-पाकिस्तान मुद्द्यावर कोणतीही मध्यस्थी स्वीकार्य नाही', परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी नाव न घेता ट्रम्प यांना स्पष्टच सांगितले
3
मुंबईत घडामोडींना वेग, शिवसेना शिंदे गटाच्या मंत्र्यांनी घेतली शरद पवारांची भेट; कारण काय?
4
सरकारची 'उपसमिती' म्हणजे 'जुनेच खुळ', आमच्या मागण्यांचे काय? मनोज जरांगेंचा संतप्त सवाल
5
नागपूर: चालकाला येऊ लागली झोप, स्वतःच कार...; अपघातात कुलगुरू हरेराम त्रिपाठी यांचा पत्नीसह मृत्यू
6
एक ऑर्डर पोहोचवण्यासाठी Myntra आणि Amazon च्या डिलिव्हरी बॉयला किती पैसे मिळतात?
7
मुंबईत घडतेय तरी काय? आता अमित ठाकरेंनी घेतली आशिष शेलारांची भेट; राजकीय वर्तुळात चर्चा
8
"छन छन छन...असा आवाज करत ते...", प्रिया बापटनं सांगितला दादरच्या घरातील थरकाप उडवणारा प्रसंग
9
ठरलं! मेस्सी अर्जेंटिनाचा अख्खा वर्ल्ड चॅम्पियन संघ घेऊन भारतात खेळायला येतोय! कधी अन् कुठं रंगणार सामना?
10
विराट आणि रोहित वनडेतून कधी निवृत्त होणार? राजीव शुक्ला स्पष्टच बोलले...
11
भाद्रपद महिन्यात गौरी, गणपती आणि पितृपक्षही; जाणून घ्या या मराठी महिन्याचे महत्त्व!
12
अखेर लग्नाच्या ३८ वर्षांनंतर गोविंदा आणि सुनीताचा होतोय घटस्फोट? चीचीचे वकील म्हणाले...
13
खिलाडी अन् अनाडी १६ वर्षांनंतर एकत्र येणार, अक्षय कुमार-सैफ अली खानच्या 'हैवान'चं शूट सुरु
14
काजोलच्या 'द ट्रायल' सीझन २ चा दमदार ट्रेलर पाहिलात का? सोनाली कुलकर्णीचीही मुख्य भूमिका
15
विराट-धोनी नव्हे, तर हा आहे जगातला सर्वात श्रीमंत क्रिकेटर; बघा टॉप-5 क्रिकेटर्सची लिस्ट...!
16
उपराष्ट्रपती निवडणूक २०२५: “पवार-ठाकरेंची भूमिका विरोधाभासी, राष्ट्रहितविरोधी”; भाजपाची टीका
17
कर्जाचं ओझं कमी करतेय अनिल अंबानींची कंपनी; आता २००० कोटी रुपयांत विकणार पुणे-सातारा टोल रोड प्रोजेक्ट
18
जगदीप धनखड नेमके आहेत तरी कुठे? ते सध्या काय करतात?; महत्त्वाची माहिती समोर आली, पत्ता लागला!
19
काळाचा घाला...! पाटण्यात भीषण अपघात, ट्रक-ऑटोच्या धडकेत गंगा स्नानासाठी जात असलेल्या ७ महिलांसह ८ जणांचा मृत्यू!
20
रात्रभर नोटा जाळल्या, तरीही पैसे संपले नाहीत; अधीक्षक अभियंता निघाला काळ्या धनाचा कुबेर!

विक्रमगडमध्ये उन्हाळी भात लागवड पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2020 23:33 IST

भातपिकाचे शास्त्रीय पद्धतीने व्यवस्थापन : पाटबंधाऱ्याच्या पाण्यावर प्रयोगशील शेतकऱ्यांकडून उपक्रम

राहुल वाडेकर

विक्रमगड : कष्टप्रद आणि त्रासाची ठरत असल्याच्या सबबीखाली शेती करण्याचे टाळले जात आहे. त्यामुळे गावातील पडिक क्षेत्रात वाढ होत आहे. मात्र काही गावांतील शेतकºयांचा शेती हाच श्वास असल्याने शेतीसाठी ते काहीही करायला सदैव तत्पर असतात. विक्रमगड तालुका हा भात लागवडीत प्रमुख आहे. सिंचनाच्या विशेष सुविधा उपलब्ध नसतानाही खरिपात तर भात लागवड होतेच, परंतु उन्हाळी हंगामात सुद्धा मुहू खुर्द लघु पाटबंधारा व खांड लघु पाटबंधाºयाच्या पाटाच्या पाण्यावर सजन, झडपोली, खांड, वाकडूपाडा गावात भातपिकाची लागवड करून येथील प्रयोगशील शेतकरी भाताचे उत्पादन घेत आहेत.

या वर्षी तालुक्यात अवकाळी पावसाने भातपिकाची पुरती वाट लावली. त्यात भातपिकाचे मोठे नुकसान झाले. त्यामुळे तालुक्यातील शेतकºयांचे भातपिकाचे ५० टक्के उत्पन्न घटल्याने लागवडीचा खर्चही निघाला नाही. पीककर्ज कसे फेडायचे या चिंतेत असतानाच आपले मनोबल खचू न देता पुन्हा उभारी घेत झडपोली, सजन गावातील शेतकºयांनी उन्हाळी भात शेतीची लागवड केली आहे.झडपोली, सजन गावातील प्रयोगशील शेतकरी सेवक सांबरे, अंकुश सांबरे, नरेश सांबरे, शरद सांबरे, श्रीधर सांबरे, सुभाष सांबरे, रमेश सांबरे, नारायण सांबरे, मधुकर सांबरे, पंडित सांबरे अशा अनेक शेतकºयांनी आपल्या शेतात उन्हाळी हंगामात भाताचे पीक घेतले आहे. त्याकरिता त्यांनी वर्षानुवर्ष भात लागवडीच्या अनुभवाच्या जोरावर शेतात सुधारित पद्धतीने भातपिकाची केली आहे.उन्हाळ्यात उत्पादन अधिकच्पावसाळी हंगामात जुलै व आॅगस्ट महिन्यात प्रखर सूर्यप्रकाश काळ कमी असतो. या उलट उन्हाळी हंगामात भातपिकाच्या वाढीच्या काळात म्हणजेच जानेवारी व फेब्रुवारी महिन्यात प्रखर सूर्यप्रकाश भरपूर असतो. त्यामुळे खतास प्रतिसादजास्त असतो.च्उन्हाळी हंगामातील जास्त तापमान व कमी आर्द्रतेचे प्रमाण यामुळे प्रतिकूल हवामानामुळे पावसाळी भात पिकापेक्षा रोगांचे प्रमाण कमी राहते. उन्हाळी हंगामात भातपिकाची उंची पावसाळी पिकापेक्षा कमी असते. तसेच पावसाळी भातापेक्षा उन्हाळी भातात तांदळाचे प्रमाण अधिक असते.या वर्षी तालुक्यात अवकाळी पावसाने थैमान घातले. त्यामुळे पावसाळी भातपिकाचे मोठे नुकसान झाले असून पीक कर्जे कशी फेडायची ही चिंता शेतकºयांना असताना मोठी हिंमत करून उन्हाळी भात पिकाची लागवड आम्ही केली आहे.- सुभाष सांबरे, शेतकरी, सजनगाव.स्थानिक जातीची लागवड : उन्हाळी भात लागवडीसाठी स्थानिक जातींबरोबरच कर्जत १८४, कर्जत ३, कर्जत ४, रत्नागिरी, रत्ना, सह्याद्री, पालघर- १ आदी साडेतीन ते चार महिन्यात तयार होणाºया जाती वापर केला आहे.

टॅग्स :Vasai Virarवसई विरारFarmerशेतकरी