शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्ही फोन करा आम्ही तयार आहोत"; ऑपरेशन सिंदूरला घाबरलेल्या पाकिस्तानने युद्धबंदीसाठी घेतली सौदीची मदत
2
इराणच्या अस्थिरतेला पाकिस्तान घाबरला! म्हणाला,'इस्रायली हल्ला आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन'
3
पॅन कार्ड बनवण्यासाठी आता आवश्यक झालं 'हे' डॉक्युमेंट, आधार लिंक करायची अखेरची तारीखही जाणून घ्या
4
Eknath Shinde: "...हे पाप तुमचे आहे!" एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
5
"शिवसेनाप्रमुखांचा ब्रँड पुसून टाकण्याचा प्रयत्न कराल तर नामोनिशान पुसून टाकू"
6
भाषेवरून राजकारण पेटले, उद्धव ठाकरेंची सडकून टीका, एकनाथ शिंदेंचा जोरदार पलटवार!
7
Mumbai Local: मुंबईकरांचा प्रवास आणखी सुखकर होणार, रेल्वेमंत्र्यांची लोकल ट्रेनबाबत मोठी घोषणा
8
आजचे राशीभविष्य : २० जून २०२५; विनाकारण खर्च वाढतील, प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
9
निधनानंतर ७ दिवसांनी संजय कपूर यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, भावुक झाली करिश्मा, मुलांना अश्रू अनावर
10
samruddhi mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर अपघातात दोघांचा मृत्यू, जीपचालकाला डुलकी लागल्याने दुर्घटना!
11
Bombay High Court: ‘त्या’ एसआरए योजनेत ३५ टक्के जागा खुल्या ठेवा
12
MSRTC: ऐन हंगामात एसटीकडे प्रवाशांची पाठ, उत्पन्नात मोठी घट!
13
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
14
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
15
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
16
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
17
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
18
मीरा- भाईंदर ते गायमुख उन्नत, भुयारी मार्गासाठी एल अँड टी कंपनीकडून अंदाजपत्रक नाहीच 
19
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
20
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल

शालेय सुट्यांतील अचानक बदलाने शिक्षकांची गोची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2018 02:45 IST

पालघर जिल्हा परिषदेने वर्षाच्या सुरुवातीलाच जानेवारीमध्ये पालघर जिल्ह्यातील जिल्हा परिषद व मान्यताप्राप्त खाजगी प्राथमिक शाळांकरीता सुट्टीच्या यादीला मान्यता दिलेली असतांना अचानक

- सुरेश काटेतलासरी - पालघर जिल्हा परिषदेने वर्षाच्या सुरुवातीलाच जानेवारीमध्ये पालघर जिल्ह्यातील जिल्हा परिषद व मान्यताप्राप्त खाजगी प्राथमिक शाळांकरीता सुट्टीच्या यादीला मान्यता दिलेली असतांना अचानक गणपतीच्या १४ सप्टेंबर ते १९ सप्टेंबर या अगोदरच जाहीर केलेल्या सुट्टीत ११ सप्टेंबरला अचानक बदल करून त्या १२ ते १७ सप्टेंबर अशा केल्याने गौरी गणपतीच्या सणाला गावी जाणार्या शिक्षकांची मात्र चांगलीच गोची झाली.आधीच्या सुट्टयांप्रमाणे सर्वांनी जाण्याचे व परतीचेही रेल्वे, बसची आरक्षणे अगोदरच करून ठेवली होती. त्यामुळे अनेकांना आर्थिक भुर्दंडासह मनस्ताप सहन करावा लागला. अनेकांनी गावी जाणे रद्द केले तर जे गेले त्यांनी अक्षरश: महिला व लहान लहान मुलांसह जीवघेण्या गर्दीतून त्रास सहन करत परतीचा मार्ग धरला. सलग सुट्टी दिल्याने कुटुंबीयां सोबत काही वेळ घालविता येणार अशा आनंदात असलेल्या शिक्षकांच्या आनंदावर विरजण पडले.यापुढे जिल्हा परिषद प्रशासनाने सण, उत्सवाच्या मोठ्या सुट्ट्यांमध्ये बदल करतांना तो अचानक न करता किमान आठवडाभर तरी आधी करावा जेणेकरून तो सर्वसमावेशक राहिल. अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.या सुटटयांमध्ये बदल का केला? हा प्रश्न या निमित्ताने निर्माण झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींवरील चलो जीते हैं हा लघुपट दाखविण्यासाठी हा बदल केल्याची चर्चा आहे. तसे असेल तर हा लघुपट १८ ऐवजी २१ लाही दाखवता आला असता. अनेक जिल्हा परिषदांनी तो लघुपट गणपती सुट्टीनंतर दाखविला आहे. मग येथेच हा अट्टाहास कशासाठी? जाहीर केलेल्या सुट्टीत बदल करून सर्व शिक्षकांची धावपळ उडविणे योग्य नाही,अशी भावना आहे.जीते है नही, ‘मरते है।’इतरवेळी छाती काढून कार्यालयात ठाण मांडून असणारे शिक्षकांचे तथाकथित कैवारी अशा वेळी मात्र कोणतीही ठोस भूमिका घेताना दिसत नाहीत. जीवघेणा परतीचा प्रवास करून नोकरीच्या ठिकाणी परतावे लागल्याने चलो मरते है हा अनुभव शिक्षकांच्या वाट्याला आला.

टॅग्स :Teacherशिक्षकEducationशिक्षण