शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
4
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
5
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
6
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
7
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
8
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
9
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
10
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
11
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
12
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
13
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
14
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
15
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
16
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
17
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
18
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
19
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
20
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास

शालेय सुट्यांतील अचानक बदलाने शिक्षकांची गोची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2018 02:45 IST

पालघर जिल्हा परिषदेने वर्षाच्या सुरुवातीलाच जानेवारीमध्ये पालघर जिल्ह्यातील जिल्हा परिषद व मान्यताप्राप्त खाजगी प्राथमिक शाळांकरीता सुट्टीच्या यादीला मान्यता दिलेली असतांना अचानक

- सुरेश काटेतलासरी - पालघर जिल्हा परिषदेने वर्षाच्या सुरुवातीलाच जानेवारीमध्ये पालघर जिल्ह्यातील जिल्हा परिषद व मान्यताप्राप्त खाजगी प्राथमिक शाळांकरीता सुट्टीच्या यादीला मान्यता दिलेली असतांना अचानक गणपतीच्या १४ सप्टेंबर ते १९ सप्टेंबर या अगोदरच जाहीर केलेल्या सुट्टीत ११ सप्टेंबरला अचानक बदल करून त्या १२ ते १७ सप्टेंबर अशा केल्याने गौरी गणपतीच्या सणाला गावी जाणार्या शिक्षकांची मात्र चांगलीच गोची झाली.आधीच्या सुट्टयांप्रमाणे सर्वांनी जाण्याचे व परतीचेही रेल्वे, बसची आरक्षणे अगोदरच करून ठेवली होती. त्यामुळे अनेकांना आर्थिक भुर्दंडासह मनस्ताप सहन करावा लागला. अनेकांनी गावी जाणे रद्द केले तर जे गेले त्यांनी अक्षरश: महिला व लहान लहान मुलांसह जीवघेण्या गर्दीतून त्रास सहन करत परतीचा मार्ग धरला. सलग सुट्टी दिल्याने कुटुंबीयां सोबत काही वेळ घालविता येणार अशा आनंदात असलेल्या शिक्षकांच्या आनंदावर विरजण पडले.यापुढे जिल्हा परिषद प्रशासनाने सण, उत्सवाच्या मोठ्या सुट्ट्यांमध्ये बदल करतांना तो अचानक न करता किमान आठवडाभर तरी आधी करावा जेणेकरून तो सर्वसमावेशक राहिल. अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.या सुटटयांमध्ये बदल का केला? हा प्रश्न या निमित्ताने निर्माण झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींवरील चलो जीते हैं हा लघुपट दाखविण्यासाठी हा बदल केल्याची चर्चा आहे. तसे असेल तर हा लघुपट १८ ऐवजी २१ लाही दाखवता आला असता. अनेक जिल्हा परिषदांनी तो लघुपट गणपती सुट्टीनंतर दाखविला आहे. मग येथेच हा अट्टाहास कशासाठी? जाहीर केलेल्या सुट्टीत बदल करून सर्व शिक्षकांची धावपळ उडविणे योग्य नाही,अशी भावना आहे.जीते है नही, ‘मरते है।’इतरवेळी छाती काढून कार्यालयात ठाण मांडून असणारे शिक्षकांचे तथाकथित कैवारी अशा वेळी मात्र कोणतीही ठोस भूमिका घेताना दिसत नाहीत. जीवघेणा परतीचा प्रवास करून नोकरीच्या ठिकाणी परतावे लागल्याने चलो मरते है हा अनुभव शिक्षकांच्या वाट्याला आला.

टॅग्स :Teacherशिक्षकEducationशिक्षण