शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०२७मध्ये गोव्यात ‘आप’ स्वबळावर सरकार स्थापन करेल”: अरविंद केजरीवाल; भाजपा-काँग्रेसवर टीका
2
आणखी एका मुलीने गमावला जीव, मृतांचा आकडा १० वर; काँग्रेसची ५० लाख भरपाई देण्याची मागणी
3
“RSS-BJPने ओबीसींचा घात केला, मोहन भागवत कधी गजानन महाराजांच्या दर्शनाला गेले का”: आंबेडकर
4
टॉपर तरुणीला गुंगीचे औषध देऊन अत्याचार; स्वतःला संपवायला निघालेल्या माय-लेकीला माजी सैनिकाने वाचवलं
5
"भारत माझी मातृभूमी, तर पाकिस्तान…’’, दानिश कनेरियाचं मोठं विधान, नागरिकत्वाबाबत म्हणाला  
6
...तर रोहित-विराटवर वनडे वर्ल्ड कप स्पर्धेआधीच निवृत्ती घेण्याची वेळ येणार?
7
भारतीय तरुणांना फसवून सायबर गुन्ह्यांसाठी जुंपणारी आंतरराष्ट्रीय टोळी उघडकीस; दोघे अटकेत, भारतीय आरोपींसह चिनी कनेक्शन आले समोर 
8
बिहारमध्ये लालू यादवांच्या निवासस्थांनी उमेदवारीवरून गोंधळ, घरात घुसले कार्यकर्ते, म्हणाले, आम्हाला...  
9
पावसाच्या 'बॅटिंग'च्या जोरावर श्रीलंकेनं उघडलं खातं; पाकला पराभूत करताच टीम इंडिया होईल टॉपर
10
अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्याची गोळ्या घालून हत्या; शिक्षणासोबत पेट्रोल पंपावर करत होता पार्ट-टाईम काम
11
“राहुल गांधी यांचा पासपोर्ट जप्त करावा अन् कायदेशीर कारवाई करावी”; भाजपा नेत्यांची मागणी
12
रोहित शर्माने कप्तानी सोडली की त्याला हटवलं? निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
13
निसर्ग अशांतच! अतिवृष्टीनंतर आता ‘शक्ती’ चक्रीवादळाचा धोका; किनारपट्टी भागात सतर्कतेचा इशारा
14
वनडे क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार; रोहित शर्मा दुसरा, मग पहिला कोण?
15
फर्रुखाबादमधील कोचिंग सेंटरमध्ये भीषण स्फोट; एकाचा मृत्यू, सहा जण जखमी
16
“सोनम वांगचूक यांना सोडून द्यावे, नवीन पिढीसाठी मोठे योगदान”: शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद
17
४८ तासांत मंजूर झाले कोट्यवधींचे कर्ज ! भंडारा, नागपूर जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या नावे कर्ज घोटाळा; ईडीकडून कारवाईचा धडाका
18
“अनिल परब अर्धवट वकील”; रामदास कदमांचा पलटवार, पत्नीने जाळून घेतले की? यावरही दिले उत्तर
19
Video - "मी तुला गोळी मारेन, कोणी वाचवणार नाही"; भाजपा नेत्याची गुंडगिरी, डान्सरवर उधळले पैसे
20
प्रवाशांची दिवाळी! मुंबई-गोवा ‘वंदे भारत’च्या फेऱ्या वाढणार; कोकणवासीयांना फायदा, नवे टाइमटेबल

जव्हारच्या दोन विद्यार्थ्यांचे राज्यसेवा परीक्षेत यश

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2020 00:19 IST

तर वाळवंडा गावातील खडकीपाडा येथील कल्पेश चंदर जाधव (राज्यात दुसरा, अनुसूचित जमाती प्रवर्गातून) यांची तहसीलदार या पदावर निवड झाली असून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहेत.

जव्हार : महाराष्ट्र लोकसेवा अयोगातर्फे (एमपीएससी) घेण्यात आलेल्या राज्य सेवा मुख्य परीक्षेचा अंतिम निकाल नुकताच लागला असून पालघर जिल्ह्यातील अतिदुर्गम आदिवासी जव्हार तालुक्यातील दोन विद्यार्थी शुभम मदने (राज्यात प्रथम, अनुसूचित जमाती प्रवर्गातून) यांची उपजिल्हाधिकारीपदी निवड झाली आहे, तर वाळवंडा गावातील खडकीपाडा येथील कल्पेश चंदर जाधव (राज्यात दुसरा, अनुसूचित जमाती प्रवर्गातून) यांची तहसीलदार या पदावर निवड झाली असून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहेत.या दोन्ही विद्यार्थ्यांनी जव्हारसारख्या आदिवासी दुर्गम भागातून शिक्षण घेऊन चांगले यश संपादन केले आहे. कल्पेश जाधव हे जव्हार तालुक्यातील वाळवंडा खडकीपाडा येथील असून त्याचे आई-वडील निरक्षर असूनही जिद्दीच्या जोरावर त्यांनी वयाच्या २१व्या वर्षी राज्य सेवा परीक्षेत यश संपादन करून पहिल्या प्रयत्नात सहाय्यक आयुक्त, कौशल्य विकास अधिकारी म्हणून निवड झाली होती. त्यानंतर कल्पेश जाधव यांनी पुन्हा राज्य सेवा परीक्षा दिली असून आता त्यांची तहसीलदारपदी निवड झाली आहे.जव्हार, मोखाडा येथील मध्यमवर्गीय कुटुंबातील शुभम मदने याचे वडील एसटी महामंडळात मेकॅनिकलचे काम करतात. आई गृहिणी तर वडिलांचे उच्च शिक्षणाचे स्वप्न अपूर्ण राहिले होते. वडिलांची शिक्षणाविषयी इच्छा अपूर्ण राहिल्याने मनात खंत राहिली होती. ती पूर्ण करण्यासाठी शुभमने सलग अठरा तास अभ्यास करून हे यश मिळवले आहे. या दोन्ही विद्यार्थ्यांवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.>पालघर हा ग्रामीण आदिवासी जिल्हा असून आता ग्रामीण भागातील विद्यार्थी प्रशासकीय सेवा स्पर्धा परीक्षांचा अवलंब करीत पुढे जात असल्याने मला खूप आनंद आणि गर्व वाटत आहे. अजूनही स्पर्धक तयार होऊन अधिकाधिक अधिकारी तयार व्हावेत, यासाठी आम्ही मूलभूत सोयी-सुविधा उपलब्ध करून देऊ.- सुनील भुसारा, आमदार, विक्रमगड विधानसभा