शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
2
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
3
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
4
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
5
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
6
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
7
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
8
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
9
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
10
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
11
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
12
iPhone 16: पहिल्यांदाच आयफोन १६ च्या खरेदीवर एवढी मोठी सूट!
13
भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!
14
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
15
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
16
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
17
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
18
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
19
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
20
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन

‘सूर्या’साठी संघर्ष : १३०० कोटींचा खर्च कुणाच्या लाभासाठी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2018 06:27 IST

वाढत्या शहरांची तहान भागवण्याच्या नावाखाली राजकीय स्वार्थ साधतानाच बिल्डर लॉबीचे हितही ‘अर्थ’पूर्णरित्या जपण्याचा हेतू लपून राहिलेला नाही.

मीरा रोड : पालघर, विक्रमगड, डहाणू तालुक्यातील आदिवासींच्या-शेतकऱ्यांच्या जमिनी ओलिताखाली याव्या, त्यांचे जगणे बदलून जावे, यासाठी खरे तर सूर्या धरण बांधण्यात आले. पण शेतीसाठी त्यातील अनेकांना पाणी उचलूच दिले गेले नाही आणि ते पाणी वाहून जाते आहे, असे सांगत सूर्याच्या पाण्यावर आसपासच्या शहरांनी हक्क सांगायला सुरूवात केली.सध्या तब्बल ९५ किलोमीटरचे अंतर पार करत एमएमआरडीएने सूर्याचे पाणी मीरा-भार्इंदर, वसई-विरारला देण्याचा १३०० कोटींचा प्रकल्प हाती घेतला आहे. सध्या मीरा-भार्इंदरला पुरेसे पाणी मिळत असतानाही भविष्यातील गरजांसाठी हे पाणी आणले जाणार आहे. पालघर जिल्ह्याच्या तीन तालुक्यांतील टंचाईवर उतारा म्हणून तेथे पाणी हवे असताना, तेथील शेतकरी ते मागत असतानाही हा घाट कुणासाठी, कशासाठी घातला जातो आहे असा सवाल विचारला जात आहे.सूर्या धरणाचे पाणी मीरा- भार्इंदर, वसई, विरार आणि मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणासाठी (म्हणजे पुन्हा मीरा-भार्इंदर महापालिकेसाठीच) आरक्षित ठेवण्यात आल्याने भविष्यात पालघर, डहाणू, विक्रमगड आदी तालुक्यातील वाढत्या नागरीकरणालाही पाणीटंचाई सोसावी लागणार आहे. .सध्या मीरा- भार्इंदरला १७६ ते १८० दशलक्ष लीटर दररोज मिळते. त्यात शहराची तहान भागते. भीषण पाणीटंचाईची परिस्थती शहरात नाही. शिवाय मंजूर ७५ दशलक्ष लीटर योजनेतील ३५ दशलक्ष लीटर पाणी महापालिका अजूनही उचलत नाही. तो कोटा शिल्लक आहे. तरीही नागिरकांच्या करातून गोळा केलेला एमएमआरडीएचा हा १३०० कोटींचा खर्च कुणाच्या हितासाठी?पाण्याचा पुनर्वापर, पाऊस पाणी संकलन, स्वत:ची लहान धरणे उभारणे यासारख्या प्रभावी पर्यायांकडे कानाडोळा करणाºया महापालिका व तेथील राजकारण्यांना आरोपींच्या पिंजºयात उभे करण्याऐवजी आदिवासी, शेतकरी व स्थानिक नागरिकांचे पाणी पळवण्यात सत्ताधाºयांनाही आपल्या समृध्दीचा महामार्ग दिसतोय हे स्पष्टच आहे.सध्याच्या घडीला मीरा- भार्इंदरला सूर्याच्या पाण्याची गरज नसली तरी शहरात झपाट्याने होणाºया मोठमोठ्या इमारतींना भविष्यात पाण्याची गरज भासणार आहे. दुसरीकडे सूर्या पाणी बचाव संघर्ष समितीसह पालघरच्या राजकीय नेत्यांनीही सूर्याचे पाणी तालुक्याबाहेर देण्यास विरोध चालवला आहे. परंतु सरकारसह मीरा- भार्इंदर, वसई, विरारमधील बलाढ्य राजकारणी, प्रशासकीय यंत्रणेपुढे विरोध किंवा आंदोलनाचा टिकाव लागणार नाही, हे निश्चित. विरोधाची धार किती टिकेल यावर मीरा भार्इंदरसह अन्य शहरांचे सूर्याचे पाणी मिळवण्याचे स्वप्न अवलंबून आहे.वाढत्या शहराची तहान भागविण्यासाठी...पालघर जिल्ह्यातील सूर्या धरणाचे पाणी मिळवण्यासाठी काही वर्षांपासून मीरा- भार्इंदर महापालिकेसह वसई- विरार महापालिका तसेच मुंबई महानगर प्रदेशातील (एमएमआरडीए) अन्य शहरे व उद्योगांची धावाधाव सुरू आहे.वाढत्या शहरांची तहान भागवण्याच्या नावाखाली राजकीय स्वार्थ साधतानाच बिल्डर लॉबीचे हितही ‘अर्थ’पूर्णरित्या जपण्याचा हेतू लपून राहिलेला नाही. स्थानिक आदिवासी व शेतकºयांना समृध्द बनवण्यासाठी सूर्या धरण बांधले गेले.परंतु आजही तब्बल १९ हजार एकर जमीन सिंचनाखाली आणण्यात सपशेल अपयश आले असताना सरकार व लोकप्रतिनिधींना मात्र याचे सोयरसूतक नाही. कारण समृध्दीचा मार्ग हा आदिवासी व शेतकºयांसाठी नसून तो केवळ राजकारणी तसेच बांधकाम, बिल्डरवजा राजकारण्यांच्या समृध्दीसाठी असतो, हे वेगळे सांगायला नको.

टॅग्स :Damधरण