शहरं
Join us  
Trending Stories
1
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
2
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
3
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
4
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
5
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
6
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
7
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
8
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
9
मोठी बातमी! पालघरमधील मेलोडी फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
10
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
11
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
12
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
13
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
14
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
15
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
16
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
17
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
18
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
19
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
20
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका

समानीकरण धोरणाला हरताळ, शिक्षकांच्या बेकायदा नियुक्त्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2020 00:57 IST

शासनाच्या परवानगीशिवाय त्यात बदल करता येणार नाही, असे स्पष्ट लिहिले असताना ८ शिक्षकांना नियुक्त्या देण्याचे बेकायदेशीर काम शिक्षणाधिकारी सानप, वसई गटशिक्षणाधिकारी दवणे आणि त्यांच्या सहकाºयांनी केल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

पालघर : शासनाच्या समानीकरण धोरणाला हरताळ फासत प्राथमिक विभागाच्या शिक्षणाधिकारी लता सानप यांनी आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने ८ शिक्षकांच्या नियुक्त्या वसई तालुक्यात केल्या आहेत. या प्रक्रियेत मोठा अर्थपूर्ण घोटाळा झाल्याची चर्चा असून शिक्षणाधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्याची लेखी मागणी उपाध्यक्ष नीलेश सांबरे यांनी मुख्य कार्यकारी अधिकाºयांकडे केली आहे.शासनाच्या ग्रामविकास विभागाने २८ जानेवारी २०१९ रोजी काढलेल्या परिपत्रकानुसार समानीकरण हे तत्त्व विद्यार्थ्यांच्या हक्कासाठी स्वीकारणे गरजेचे असल्याने कोणत्याही परिस्थितीत यामध्ये तडजोड करता येणार नाही असे परिपत्रकात स्पष्टपणे म्हटले असून मुख्य कार्यकारी अधिकाºयांनी समानीकरणासाठी प्रत्येक वर्षी अनिवार्य रिक्त जागा ठेवून त्या चिन्हांकित करण्याचे म्हटले आहे. शासनाच्या परवानगीशिवाय त्यात बदल करता येणार नाही, असे स्पष्ट लिहिले असताना ८ शिक्षकांना नियुक्त्या देण्याचे बेकायदेशीर काम शिक्षणाधिकारी सानप, वसई गटशिक्षणाधिकारी दवणे आणि त्यांच्या सहकाºयांनी केल्याचे तक्रारीत म्हटले आहे.प्रथम जिल्हा परिषदेतून अतिरिक्त ठरल्याने मिरा भार्इंदर महानगरपालिका क्षेत्रातील शाळांत गेलेल्या पण तेथेही महानगरपालिकेने अशा शिक्षकांना न स्वीकारण्याचा ठराव केल्याने या शिक्षकांना माघारी जिल्ह्यात यावे लागले होते. वसई तालुक्यामधील समानीकरणच्या धोरणानुसार मोठ्या प्रमाणात प्राथमिक शाळा ब्लॉक केल्या गेल्या होत्या. म्हणजेच जिल्हाअंतर्गत बदली प्रक्रियेमध्ये जिल्ह्यातील रिक्त जागांचे समानीकरण व्हावे यासाठी रिक्त पदे ठेवण्यात आली होती. या रिक्त पदांवर पदस्थापना देऊ नये, असे जिल्हा परिषदेने ठरवले होते. असे असतानाही जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकारी यांनी ज्या ठिकाणी पदस्थापना द्यायच्या नव्हत्या, त्या ठिकाणी मीरा-भार्इंदर महापालिकेतून आलेल्या आठ शिक्षकांना त्या ठिकाणी सामावून घेतले होते. त्यांना सामावून घेताना शासनाची अथवा मुख्य कार्यकारी अधिकारी महेंद्र वारभुवन यांची परवानगी घेतली गेली नव्हती. या शिक्षकांचे पगार निघावेत म्हणून गटशिक्षणाधिकाºयांकडून काही मुख्याध्यापकांवर दबावही टाकला जात असल्याची माहितीही पुढे येत आहे.जिल्ह्यात अनेक शून्य शिक्षकी शाळा असताना मीरा-भार्इंदरमध्ये विस्थापित झालेल्या शिक्षकांच्या बदल्या शून्य शिक्षकी शाळांमध्ये करणे आवश्यक होते. मात्र प्राथमिक विभागाच्या शिक्षणाधिकारी यांनी या गोष्टीचे पालन केलेले नाही.- नीलेश सांबरे, उपाध्यक्ष, जिल्हा परिषद पालघरशिक्षकांना आॅनलाईन पद्धतीने समुपदेशन व बदली प्रक्रिया न राबविता समानीकरण अंतर्गत बाहेरून आलेल्या शिक्षकांसाठी ब्लॉक केलेल्या शाळा खुल्या करून चुकीच्या पद्धतीने नियुक्ती दिली आहे हे बेकायदेशीर आहे.- कॅथलीन परेरा, अध्यक्षा,महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षण संघटना, वसईअन्याय दूर कराशिक्षणाधिकाºयांनी राबवलेली प्रक्रिया बेकायदेशीर असल्याचा आरोप करण्यात आला असून आमच्यावर झालेला अन्याय दूर करण्यात यावा, अशी मागणी त्यांनी केली आहे. नियुक्त्यांच्या कागदपत्रांची मागणी केली असता ती दिली जात नसल्याचे उपाध्यक्षांचे म्हणणे आहे.या प्रकरणी शिक्षण मंत्र्यांचीही भेट घेतली असून दोषी असणाºया सर्वांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे. संदर्भात गटशिक्षणाधिकारी लता सानप यांच्याशी अनेक वेळा मोबाईल वर संपर्क करण्याचा प्रयत्न करून, मेसेज टाकूनही त्यांनी प्रतिसाद दिला नाही.

टॅग्स :Vasai Virarवसई विरारEducation Sectorशिक्षण क्षेत्र