शहरं
Join us  
Trending Stories
1
निशिकांत दुबेंना घेराव घातल्यानं राज ठाकरेंकडून वर्षा गायकवाड यांचे कौतुक, म्हणाले...
2
महापालिका निवडणुकीत आघाडी असणार की नाही, त्वरीत सांगा! पुण्यातून शरद पवार गटाची जाहीर मागणी
3
तब्बल ३८ तास बंद राहिला टोलनाका, तरीही २४ हजार लोकांनी प्रामाणिकपणे भरला टोल     
4
'नागपूरची लेक' वर्ल्ड चॅम्पियन दिव्या देशमुखला नितीन गडकरींचा 'व्हिडीओ कॉल', काय झाल्या गप्पा?
5
"महाराष्ट्राकडे 'बुद्धी आणि बळ' दोन्ही ओतप्रोत, ते जेव्हा..."; राज ठाकरेंकडून दिव्या देशमुखचं कौतुक
6
Pune Crime: 'छातीत दुखतंय', इंजिनिअर तरुण मीटिंग रुममधून उठला अन् सातव्या मजल्यावरून मारली उडी
7
चिनी मालाने दिला दगा, पहलगाम हल्ल्यानंतर तब्बल ९६ दिवस लपलेले दहशतवादी असे सापडले
8
Nitin Shete: नितीन शेटे यांच्या मृत्यूचे कारण वेगळेच? पोलीस अधीक्षकांनी केला महत्त्वाचा खुलासा
9
'अर्थव्यवस्था बंद करावी का?' रशियाकडून स्वस्त तेल खरेदी करण्याच्या वादाला भारताचे प्रत्युत्तर, आरसा दाखवला
10
Divya Deshmukh: बुद्धिबळाच्या पटावर नव्या 'क्वीन'चं राज्य! 'महाराष्ट्राची लेक' दिव्या देशमुख 'वर्ल्ड चॅम्पियन'; कोनेरु हम्पी उपविजेती
11
"ऑपरेशनला सिंदूर नाव देणं म्हणजे भावनांशी खेळ, एकाही देशाने साथ दिली नाही’’, अरविंद सावंत यांचा मोदी सरकारवर हल्लाबोल
12
'लाडकी बहीण योजनेला सुद्धा भ्रष्टाचारातून सुट्टी नाही'; रोहित पवारांचा अजित पवारांवर पलटवार, आदिती तटकरेंच्या खात्याचं प्रकरण काढलं
13
'शत्रूची किती विमानं पाडली, हे त्यांनी कधीच विचारलं नाही'; राजनाथ सिंह यांचा लोकसभेत राहुल गांधींवर निशाणा
14
थायलंड आणि कंबोडियामध्ये अखेर युद्धविराम! संघर्ष थांबला, या देशाची मध्यस्थी ठरली निर्णायक
15
टाटा ते HDFC बँक.. बाजाराच्या घसरणीतही 'हे' ५ स्टॉक करणार बंपर कमाई! एक्सपर्टने दिले टार्गेट प्राईज
16
बापरे! भारतात दहा रुपयांना मिळणारे पाणी 'या' देशात १ हजार रुपयांना मिळते; कारण काय?
17
कुठे फेडशील हे पाप? मैत्रिणीसोबत फिरायला गेल्याचा जाब विचारला म्हणून पत्नीला पेटवून दिले!
18
कश्मीर खोऱ्यात दहशतवाद्यांविरोधात 'ऑपरेशन महादेव'चे तांडव! कसे ठरते ऑपरेशनचे नाव?
19
अवघ्या १९व्या वर्षी 'वर्ल्ड चॅम्पियन', विजयानंतर दिव्या देशमुखची आईला घट्ट मिठी, आनंदाश्रू अनावर (Video)
20
भारताला नकोय चीनचा पैसा; दरवाजे बंदच ठेवण्याचे संकेत, ड्रॅगनसाठी काय संदेश?

श्रीनिवास समजूतदार तर गावित निष्ठावान - उद्धव ठाकरे

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2019 19:05 IST

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पालघर येथील दांडेकर मैदानात शनिवार, 27 एप्रिल रोजी 3:45 वाजता शिवसेनेचे उमेदवार राजेंद्र गावित यांच्याकरिता प्रचारसभा घेतली.

पालघर/बोर्डी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पालघर येथील दांडेकर मैदानात शनिवार, 27 एप्रिल रोजी 3:45 वाजता शिवसेनेचे उमेदवार राजेंद्र गावित यांच्याकरिता प्रचारसभा घेतली. यावेळी त्यांनी प्रतिस्पर्धी बहुजन विकास आघाडी या पक्षावर टीका करताना, या पक्षाचे सर्वेसर्वा आमदार हितेंद्र ठाकूर यांचा प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरित्या गुंड असा उल्लेख केला. 

या शेवटच्या प्रचार सभेत बोलताना, शिवसेनेचे उमेदवार राजेंद्र गावित यांनी आमिषाला बळी न पडता, बहुमताने निवडून देण्याचे आवाहन केले. त्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या भाषणाला प्रारंभ झाला, त्यांनी पालघरची ही सभा जिद्द आणि विचाराने पेटलेली असल्याचा उल्लेख केला.  पक्ष नव्हे तर कंपनी असा बहुजन विकास आघाडीचा उल्लेख करताना, या मतदार संघातील त्यांची गुंडगिरी मोडीत काढणार असल्याचे सांगितले. यावेळी त्यांचा संपूर्ण रोख हितेंद्र ठाकूर यांच्यावर होता. तर त्यांचा उल्लेख उंदीर असा करून त्यांची शिकार करायला, वाघ नव्हे मांजरच हवी असेही ते म्हणाले. श्रीनिवास वनगाने ही जागा आताच लढविणार नसल्याचे सांगितल्याने, ती गावित यांना देण्यात आली. श्रीनिवास समजूतदार तर गावित निष्ठावान असल्याचे त्यांनी संबोधले. पोटनिवडणुकीत युतीला अधिक मतं मिळाल्याने बविआ तर्फे कोणीही उमेदवार लढण्यास तयार होईना, म्हणूनच त्यांची उमेदवारी घोषित होण्यास उशीर झाल्याचे टीकास्त्र सोडले.

वसई-विरार हा हरितपट्टा असून त्याला भूमाफियांमुळे कीड लागली असल्याचे सांगत, येथील सत्ताधाऱ्यांचा उल्लेख वाळवी म्हणून केला. तर ही कीड या भागाला पोखरून टाकत असल्याने तिला मतदानाचा फवारा मारून नष्ट करायचे असून युतीच्या उमेदवाराला निवडून देण्याचे आवाहन त्यांनी केले. येथील लोकसभा मतदारसंघ जिंकून त्यानंतर विधानसभा, महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांना ताब्यात घ्यायचा मनसुबाही त्यांनी जाहीर केला. तर डहाणू ते विरार रेल्वेचे नियंत्रण गुजरात ऐवजी मुंबईत असावे अशी येथील डहाणू-वैतरणा प्रवासी संघटनेकडून मागणी होत आहे.

आजपर्यंत ती पूर्ण का झाले नाही. वसईतील 29 गावं वगळण्याचा शब्द दिला असून तो पूर्ण करणार असल्याचा पुनरुच्चार त्यांनी केला. तर वाढवण बंदराबाबतच्या मुद्यावर बोलताना स्थानिकांच्या सहमतीशिवाय हे बंदर होणार नाही.जे नानार बाबत घडले तेच स्थानिकांच्या इच्छेनुसार वाढवण बाबतही घडेल असेही ते म्हणाले. श्रमाजीवीचे विवेक पंडित वसई- विरार येथील गुंडगिरीविरुद्ध एकट्याने लढा देत आहेत. त्यामुळे आमदार हितेंद्र ठाकूर यांचा प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे वारंवार गुंड म्हणून उल्लेख करण्यात आला. तर पालघर जिल्हा मुंबईच्या शेजारी असतानाही या भागात सेनेचे दुर्लक्ष झाल्याची कबुली त्यांनी भाषणातून दिली. मात्र गतवर्षी झालेल्या पोटनिवडणुकीपासून येथे लक्ष देण्यास सुरुवात केली असून यापुढे सातत्याने ते दिले जाईल असे त्यांनी सांगितले.

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेpalghar-pcपालघरLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकShiv Senaशिवसेना