शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
2
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
3
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
4
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
5
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
6
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
7
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
8
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
9
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
10
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
11
Asia Cup 2025 : बाबरनं षटकार मारत रुबाब झाडला! पण दुसऱ्याच चेंडूवर गोलंदाजानं असा घेतला बदला (VIDEO)
12
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
13
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
14
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
15
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
16
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
17
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
18
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
19
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
20
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन

श्रीनिवास समजूतदार तर गावित निष्ठावान - उद्धव ठाकरे

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2019 19:05 IST

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पालघर येथील दांडेकर मैदानात शनिवार, 27 एप्रिल रोजी 3:45 वाजता शिवसेनेचे उमेदवार राजेंद्र गावित यांच्याकरिता प्रचारसभा घेतली.

पालघर/बोर्डी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पालघर येथील दांडेकर मैदानात शनिवार, 27 एप्रिल रोजी 3:45 वाजता शिवसेनेचे उमेदवार राजेंद्र गावित यांच्याकरिता प्रचारसभा घेतली. यावेळी त्यांनी प्रतिस्पर्धी बहुजन विकास आघाडी या पक्षावर टीका करताना, या पक्षाचे सर्वेसर्वा आमदार हितेंद्र ठाकूर यांचा प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरित्या गुंड असा उल्लेख केला. 

या शेवटच्या प्रचार सभेत बोलताना, शिवसेनेचे उमेदवार राजेंद्र गावित यांनी आमिषाला बळी न पडता, बहुमताने निवडून देण्याचे आवाहन केले. त्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या भाषणाला प्रारंभ झाला, त्यांनी पालघरची ही सभा जिद्द आणि विचाराने पेटलेली असल्याचा उल्लेख केला.  पक्ष नव्हे तर कंपनी असा बहुजन विकास आघाडीचा उल्लेख करताना, या मतदार संघातील त्यांची गुंडगिरी मोडीत काढणार असल्याचे सांगितले. यावेळी त्यांचा संपूर्ण रोख हितेंद्र ठाकूर यांच्यावर होता. तर त्यांचा उल्लेख उंदीर असा करून त्यांची शिकार करायला, वाघ नव्हे मांजरच हवी असेही ते म्हणाले. श्रीनिवास वनगाने ही जागा आताच लढविणार नसल्याचे सांगितल्याने, ती गावित यांना देण्यात आली. श्रीनिवास समजूतदार तर गावित निष्ठावान असल्याचे त्यांनी संबोधले. पोटनिवडणुकीत युतीला अधिक मतं मिळाल्याने बविआ तर्फे कोणीही उमेदवार लढण्यास तयार होईना, म्हणूनच त्यांची उमेदवारी घोषित होण्यास उशीर झाल्याचे टीकास्त्र सोडले.

वसई-विरार हा हरितपट्टा असून त्याला भूमाफियांमुळे कीड लागली असल्याचे सांगत, येथील सत्ताधाऱ्यांचा उल्लेख वाळवी म्हणून केला. तर ही कीड या भागाला पोखरून टाकत असल्याने तिला मतदानाचा फवारा मारून नष्ट करायचे असून युतीच्या उमेदवाराला निवडून देण्याचे आवाहन त्यांनी केले. येथील लोकसभा मतदारसंघ जिंकून त्यानंतर विधानसभा, महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांना ताब्यात घ्यायचा मनसुबाही त्यांनी जाहीर केला. तर डहाणू ते विरार रेल्वेचे नियंत्रण गुजरात ऐवजी मुंबईत असावे अशी येथील डहाणू-वैतरणा प्रवासी संघटनेकडून मागणी होत आहे.

आजपर्यंत ती पूर्ण का झाले नाही. वसईतील 29 गावं वगळण्याचा शब्द दिला असून तो पूर्ण करणार असल्याचा पुनरुच्चार त्यांनी केला. तर वाढवण बंदराबाबतच्या मुद्यावर बोलताना स्थानिकांच्या सहमतीशिवाय हे बंदर होणार नाही.जे नानार बाबत घडले तेच स्थानिकांच्या इच्छेनुसार वाढवण बाबतही घडेल असेही ते म्हणाले. श्रमाजीवीचे विवेक पंडित वसई- विरार येथील गुंडगिरीविरुद्ध एकट्याने लढा देत आहेत. त्यामुळे आमदार हितेंद्र ठाकूर यांचा प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे वारंवार गुंड म्हणून उल्लेख करण्यात आला. तर पालघर जिल्हा मुंबईच्या शेजारी असतानाही या भागात सेनेचे दुर्लक्ष झाल्याची कबुली त्यांनी भाषणातून दिली. मात्र गतवर्षी झालेल्या पोटनिवडणुकीपासून येथे लक्ष देण्यास सुरुवात केली असून यापुढे सातत्याने ते दिले जाईल असे त्यांनी सांगितले.

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेpalghar-pcपालघरLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकShiv Senaशिवसेना